Friday, October 5, 2018

Anna Hazare गेल्या तीन दशकांतील अण्णा हजारे



शनिवार, ६ ऑक्टोबर,  २०१८


गेल्यातीन दशकांतील अण्णा
गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१८     goo.gl/mq788E  कामिल पारखे
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या गेल्या तीन दशकांतील प्रवासाचा आलेख असंख्य चढउतारांनी भरलेला आहे. एक पत्रकार म्हणून जवळून बघितलेल्या प्रवासाचा हा आढावा.
पुण्यात नव्यानेच सुरु झालेल्या इंडियन एक्सप्रेसच्या आवृत्तीत  बातमीदार म्हणून मी नुकताच रुजू झालो होतो. एक दिवस पुणे-अहमदनगर रस्त्यावर  शिरूरजवळ पारनेर फाट्यापाशी शेतकऱ्यांच्या आंदोलनात गोळीबार झाला अशी वृत्तसंस्थांनी बातमी दिली आणि मी, लोकसत्ताचा एका बातमीदार फोटोग्राफरसह लगेचच घटनास्थळी रवाना झालो. हमरस्त्यावर असलेल्या वाडेगव्हाण येथे अगदी हृदयद्रावक परिस्थिती होती.  वीजदर वाढीच्या विरोधात चाललेल्या शेतकऱ्यांचे त्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते आणि पोलिसांच्या गोळीबारात पाचसहा शेतकरी ठार झाले होते. मृतदेह पोस्टमार्टेमसाठी नेले होते पण त्या शेतकऱ्यांच्या घरच्या लोकांचा शोक मनाला पिळवटून टाकता होता. तेथून आम्ही तडक अहमदनगरला गेलो. वीजदरवाढीविरुद्ध शेतकऱ्यांच्या त्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे समाजकार्यकर्ते अण्णा हजारे यांचे तेथे आमरण उपोषण सुरू केले होते. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपोषणाच्या त्या नवव्या दिवशी मिळालेल्या एका राजकीय नेत्यांच्या आश्वासनानंतर त्यांनी आपले उपोषण आणि आंदोलन मागे घेतले होते. 
आतापर्यंत राळेगण सिद्धीच्या आदर्श गाव चळवळीत स्वतःस झोकून देणाऱ्या अण्णा हजारेंचे हे पहिलेच आंदोलन आणि पहिलेच उपोषण होते! अण्णांची  आणि माझी ही पहिली गाठभेट. सन १९८९च्या अखेरची ही घटना. तेव्हापासून राळेगण सिद्दीची आणि आदर्श गाव योजनेची सीमा ओलांडून अण्णा इतर आंदोलने छेडू  लागले. त्यामुळे एका राष्ट्रीयपातळीवरील  इंग्रजी वृत्तपत्राचा बातमीदार म्हणून माझा त्यांच्याशी  वेळोवेळी संबंध येऊ लागला आणि मग व्यक्तिगत पातळीवरही आमचे नातेसंबंधही  निर्माण झाले.  
त्याकाळात पुण्यात असले की अण्णांचा नारायण पेठेतील मोदी गणपतीच्या जवळ असलेल्या राष्ट्रभाषा समितीच्या इमारतीत मुक्काम असे. राष्ट्रभाषा समितीचे मोहन धारीया आणि अण्णांचे त्यावेळी घनिष्ठ संबंध होते. त्याकाळात इंडियन एक्सप्रेसमधली आम्ही बॅचलर रिपोर्टर मंडळी डेक्कन जिमखान्यातल्या  रानडे इन्स्टिट्यूटसमोरच्या एका लॉजवर कॉट बेसिसवर राहत असू. त्यामुळे अण्णांची माझी वेळोवेळी  भेट होई. आपल्या कामाविषयी, आंदोलनाविषयी अण्णा अनेकदा निळ्या अंतर्देशीय पत्रांवर मराठीत टाईप केलेली पत्रे मला पाठवत असत, त्यांच्याविषयी छापलेल्या बातम्यांची, लेखांची कात्रणे मी त्यांना पोस्टाने पाठवत असे, त्याबद्दल आभार मानण्यासाठीही अण्णा मला पत्र पाठवत असत. मजकुराखाली कि. बा. हजारे (आण्णा) अशी सही असे. (जपून ठेवलेली ही  पत्रे आता वाचताना त्याकाळात पुन्हा एकदा जाऊन आल्यासारखे होते.)
वाडेगव्हाण येथील गोळीबारात सहा शेतकरी ठार झाल्याने या घटनेची इंडियन इक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन पोस्टसारख्या इंग्रजी आणि राष्ट्रीय वृत्तपत्रांनी दखल घेतली. त्यावेळी राष्ट्रीय वृत्तपत्रांत पहिल्या पानांवर अण्णा पहिल्यांदाच झळकले! अण्णांचे व्यक्तिमत्व हे  वेळोवेळी होऊ शकणाऱ्या बातमीचे एक चांगले स्रोत असू शकतात हे  इंग्रजी वृत्तपत्रांतील आम्हा समवयस्क तरुण पत्रकारांच्या लक्षात आले आणि आम्ही सर्वानीच आपल्या परीने हे न्युज सोर्स बऱ्यापैकी कल्टिवेट केले. यात मी अण्णांच्या सर्वांत जवळचा होतो, म्हणून इतर पत्रकार मित्र माझी वेळोवेळी मदत घेत असत. केवळ एस्क्ल्युझिव्ह बातम्यांच्या वेळीच 'प्रतिस्पर्धी पत्रकार'  म्हणून आम्ही हात आखडून घेत असू आणि यात काही वावगे आहे असे कुणालाच वाटत नसे. 
त्याकाळात म्हणजे १९८०च्या दशकांत त्याकाळात स्थानिक वृत्तपत्रे म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील मराठी पत्रकार मंडळी अण्णांविषयी फारसे लिहित नसत. या दशकाच्या उत्तरार्धात अण्णांना इंग्रजी वृत्तपत्रांत आणि त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर आणण्यात त्यावेळचे  माझे समवस्यक आणि मित्र असलेले टाइम्स ऑफ इंडियाचे  अभय वैद्य, इंडियन एक्सप्रेसचे नरेन करुणाकरन आणि मी स्वतः  मोलाची कामगिरी केली. अर्थात यात आमची व्यावसायिक जबाबदारीही होती आणि  आमची वृत्तपत्रे राष्ट्रीय पातळीवर असण्याचा एक मोठा फायदा होता.  त्यामुळे अण्णांचेही न्युज व्हॅल्यू वाढत होते. एकदा तर  अण्णांच्या  विविध क्षेत्रांतील कामांची नीट ओळख करून घेण्यासाठी मी माझ्या एका पत्रकार मित्राबरोबर राळेगणला दोन दिवस मुक्कामच ठोकला होता. मला आठवते तेव्हा अण्णांच्या सचिवाने मला अण्णांवरील पुस्तक देण्यासाठी त्या पुस्तकाची किंमत सांगितली. ते पुस्तक आम्हाला फुकटात देण्याची त्याची तयारी नव्हती. शेजारीच उभ्या असलेल्या अण्णांनी मात्र काही न बोलता  ते पुस्तक माझ्या खांद्यावरच्या बॅगेत अलगदपणे टाकले होते. अण्णा पक्के मिडिआ सॅव्ही आहेत याची त्याचवेळेत मला जाणीव झाली!

याचकाळात राज्यातील भ्रष्टाचाराविरुद्ध अण्णांनी पहिल्यांदाच दंड थोपटले आणि यासंबंधीची भली मोठी फाइलच त्यावेळच्या राज्य सरकारला सादर केली. त्यानंतर भ्रष्ठाचारी व्यक्तीविरुद्ध कारवाई व्हावी या मागणीसाठी त्यांनी राळेगणात मौनव्रत सूरू केले. त्यांची मुलाखत घेण्यासाठी टाइम्स ऑफ इंडियाचे अभय वैद्य आणि मी राळेगणला तेव्हा गेलो होतो. आम्ही प्रश्न विचारायचो आणि अण्णा एका नोटपॅडवर त्यांची लांबलचक उत्तरे लिहून द्यायचे. तो एकूण प्रकारच खूप गंमतीदार होता. मी त्यावेळी नुकतीच गद्ध्ये पंचविशी ओलांडली होती. अण्णांच्या समोरच बसलेलो असूनही त्यावेळी येणारे हसू रोखणे मला खूपच  कठीण गेले. त्यावेळी  अभयने अण्णांसोबतचा माझा घेतलेला  कृष्णधवल फोटो  आणि आता पिवळी पडलेल्या कागदांवर अण्णांनी लिहिलेली ती प्रश्नोत्तरे आजही  माझ्याकडे आहेत. त्यानंतर  ९ ऑगस्टच्या क्रांतिदिनानिमित्त सुरू होणाऱ्या अण्णांच्या आमरण उपोषणाची वार्षिक मालिकाच सुरू झाली. 
अण्णांनीच सांगितलेला वा  मी  कुठेतरी वाचलेला तो एक  किस्सा आजही आठवतो. सन १९९२ची ही घटना. एके सकाळी पारनेर तालुक्याच्या तहसीलदारांची जीप राळेगण सिद्धीला आली आणि अण्णांना घेऊन तातडीने पारनेर तहसीलदार कचेरीत परतली.  दिल्लीहून पंतप्रधान कार्यालयातून निरोप आला होता की पंतप्रधानांना अण्णांशी बोलायचे आहे. त्याकाळात लँडलाईन फोन केवळ शहरांतच आणि तेही फक्त श्रीमंतांकडे आणि  मोठया सरकारी कार्यालयातच असत. राळेगणला फोन नव्हताच. त्यामुळे अण्णांना फोन असलेल्या त्यांच्या सर्वांत जवळच्या ठिकाणी म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी आणण्यात आले होते. पी. व्ही. नरसिंह राव त्यावेळी पंतप्रधान होते. 
अण्णा तहसीलदार कचेरीत आल्यावर तेथून दिल्लीत पंतप्रधानांच्या कार्यालयात फोन लावला गेला आणि अण्णा तेथे आल्याची माहिती देण्यात अली. थोड्या वेळाने दिल्लीहून परत फोन आला आणि काही क्षणात स्वतः पंतप्रधानच फोनवर आले. नरसिह रावांचे मराठीवर चांगलेच प्रभुत्व असल्याने सर्व बोलणे अर्थातच मराठीत झाले. पंतप्रधानांना अण्णांकडून एक हमी हवी होती आणि त्यासाठी त्यांना राळेगणहून बोलावण्यात आले होते. पंतप्रधान अण्णांना पद्मभूषण किताब देणार  होते,  मात्र आपल्या सवयीनुसार अण्णा हा किताब कुठल्याही कारणासाठी  परत करण्याची धमकी देणार नाही अशी हमी नरसिह राव मागत होते.  याआधी मिळालेला पदमश्री हा किताब आपल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात परत करण्याची अण्णांनी अनेकदा धमकी दिली होती. अण्णांनी हसून पंतप्रधानांना तसे वचन दिले आणि काही काळानंतर पद्मभूषण पुरस्कारार्थींमध्ये अण्णांचे नाव झळकले.    
 
यानंतरच्या काळात  पत्रकारीतेतील माझी बीट आणि नंतर कामाचे स्वरूप  बदलल्याने अण्णांशी माझा संपर्क राहिला नाही. याकाळात अण्णांच्या कर्तृत्वाचा आणि प्रसिद्धीचा आलेख सतत वाढतच गेला. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनीं - चंद्राबाबू नायडूंनी - आदर्श ग्राम योजनेत त्यांची मदत घेतली. युपीए सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात  लोकपालच्या  नेमणुकीसाठी झालेल्या आंदोलनात तर अण्णांना 'दुसरे गांधी'च संबोधण्यात आले. त्याकाळात अण्णा, अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी यांनी देशभर लोकांच्या मनात आदराचे स्थान मिळवले होते. किरण  बेदी गोव्यात वाहतूक खात्याच्या पोलीस उपायुक्त असताना पणजीतील बातमीदार या नात्याने मी त्यांना नेहेमी भेटत असे. लोकपाल आंदोलनाच्या काळात  दूरदर्शनच्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर अण्णा  आणि किरण  बेदी सतत झळकत असताना वृत्तपत्रातील माझे काही सहकारी मला विचारत असत की अण्णा आणि बेदी मला आजही ओळखत असतील काय? यावर  'छे, शक्यच नाही'  असे माझे उत्तर असे !  
लोकपाल आंदोलनानंतर केंद्रांत आणि अनेक राज्यांत सत्तापालट झाल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतापासून अण्णा फार लांबवर फेकले गेले. त्यानंतर त्यांनी केलेल्या आंदोलनाकडे लोकांनी आणि प्रसारमाध्यमांनीही दुर्लक्ष केले. या आठवडयात पुन्हा एकदा प्रकाशझोतात येण्याचा अण्णांनी क्षीण प्रयत्न केला आणि त्यानिमित्ताने जुन्या काळातील या आठवणींना उजाळा मिळाला.

Bhausaheb Nevarekar
मी कुकडी प्रकल्पावर सन 10/1989 ते 6/1993 या कालावधीत कार्यकारी अभियंता होतो .तेव्हा राळेगणला नेहमीच जाणं होत असे व अण्णाही आमचेकडील कार्यक्रमास येत असत .
अण्णा मुळचे अहमदनगर नजिकच्या भिंगारचे .
राळेगाव सुरवातीस टाटा सोशल फौंडेशनने विकसीत करण्यास घेतले होते .टाटा गृपचे चेअरमन एअर मार्शल मुळगांवकर होते .त्यांच्या पत्नी सौ लिला मुळगावकर या फौंडेशनच्या अध्यक्षा होत्या त्या स्वतः अहमदनगर चे श्री भारदे मंत्री ' उद्योगपती नवलकिशोर यांच्या माध्यमातून राळेगण येथे जलसंधारणाचं काम सुरू केले होते .श्री मुळगावकरांचा अचानक मृत्यू झाला व तो सहन न झाल्याने सौ मुळगावकरांनी फौंडेशन सोडले .राळेगणचे काम रेंगाळले .त्या दरम्यान फौजेतून सेवा निवृत्त अण्णा हे मंत्री भारदेच्या परिचयात होते .मंत्री भारदे व नवलकिशोर फिरोदियानी राळेगणला अण्णा हजारेना पाठवले .

Camil Parkhe
Bhausaheb Nevarekarतुमचे म्हणणे बरोबर आहे. अण्णांच्याही आधी राळेगाव गाव टाटा सोशल फौंडेशनने विकसीत करण्यास घेतले होते चिंचवडचे माझे एक शेजारी त्या प्रोजेक्ट्वरच होते. तेथे जलसंधारणाचं काम आधीच सुरू होते, अण्णांनी ते पुढे नेले. मात्र दुष्काळग्रस्त अहमदनगर जिल्ह्यात ग्रामविकास आणि जलसंधारणाचे पायोनियरींग स्वरूपाचे काम करण्याचे श्रेय फादर हर्मन बाखर या येशूसंघीय (जेसुइट ) ख्रिस्ती धर्मगुरूला द्यावे लागेल. त्यांनी आपला मायदेश स्वित्झलँडच्या मदतीने १९७२च्या दुष्काळात संगमनेर तालुक्यात काम सुरू केले होते. मला वाटते श्री Ramesh Zawar सर यांना याबाबत अधिक माहिती असेल
3
  • Like
Ramesh Zawar
Camil Parkhe ही माहिती मला नवी आहे. दिवंगत केंद्रीय मंत्री अण्णासाहेबांच्या पुस्तकातही ही माहिती नाही. पीटीआयचे ज्येष्ठ वार्ताहर नारायण हरळीकर ह्यांनी ह्या विषयावर तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकांना एक अभ्यास अहवाल सादर केला होता. त्या अहवालातही तुम्ही दिलेली माहिती नव्हती.

Ramesh Zawar
मी बाळासाहेब भारदेंना ज्या ज्या वेळी भेटायला गेलो त्या त्या वेळी बाळासाहेब म्हणायचे, आमचा अण्णा पाहा. पाणी अडवून सिंचनाची योजना राबवण्यासाठी किती धडपड करतोय्!..तुम्ही पत्रकारांनी मुद्दाम राळेगणला येऊन पाह्यलं पाहिजे. भारदे गेल्यानंतरच अण्णांकडे मिडियाचं लक्ष गेलं. तुमची पोस्ट वाचून सगळाच उलगडा झाला!

  • Prasanna Keskar
    फादर बाखर संगमनेर तालुक्यात काम करत होते ना?
    1
    • Like
    • Reply
    • 3 y
  • Ramesh Zawar
    Prasanna Keskar संगमनेर तालुक्यात काम केलेअसेल तर रमेश गुणेंना माहित असेल.
    2
    • Wow
    • Reply
    • 3 y
  • Prasanna Keskar
    Ramesh Zawar फादर बाखर यांनी काम केलं ते नक्की माहिती आहे. राळेगणसिद्धी, निमगाव केतकी, म्हैसाळ वगैरे प्रकल्पाच्या बरेच आधीपासूनच ते काम सुरू होतं हे पण मला माहिती आहे. मी बाखर प्रकल्प संगमनेर तालुक्यात पाहिलेत. माझी आठवण बरोबर असेल तर तिथेच कुठंतरी त्यांचं ट्रेनिंग सेंटर पण आहे. पण फादर बाखर यांचं काय तेव्हा खूप विस्कळीत आणि लहान प्रकल्पाच्या स्वरूपात होतं.
    4
    • Wow
    • Reply




Sukhadeo Kale
अण्णा यांच्या पाणलोट विकास कामाच्या पाठीमागे पाणी पंचायत चे विलासराव साळुंखे यांचे तांत्रिक मार्गदर्शन होते
फादर बाखर यांनी वॉटर ही संस्था स्थापन केली आणि त्यानीं ही काम केले पण एकसलग एक खेडे सर्वांगानी प्रथम विकसित झाले ते मात्र राळेगण सिद्धीचं,नापासाची शाळा,सोलर ऊर्जा, सामूहिक गोबर गॅस ई
जमिनीतर्गत बंधारे(underground dam) ही संकल्पना आम्ही शिकवायचो पण विध्यार्थ्याना ती प्रत्यक्ष काम चालू असताना दाखविण्याची संधी मला मिळाली ती राळेगण लाच
असे अनेक प्रयोग
हिवरेबाजार त्याची आधुनिक आवृती असे म्हटले तर वावगे ठरू नये अशी अनेक गावे विकसित होऊ शकली असती


Wednesday, September 26, 2018

अनुभवलेले पुल


बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८

अनुभवलेले पुल
बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८      goo.gl/pEKUE4 कामिल पारखे
पु. ल. देशपांडे काळाच्या पडद्याआड जाऊन १८ वर्षे लोटली तरीही रसिकांच्या मनावरील त्यांचे राज्य कायम आहे. एक वाचक म्हणून आणि नंतर बातमीदार म्हणून अनुभवलेल्या पुलंविषयी थोडेसे.
पुलंची पुस्तके आणि त्यांच्याविषयीचे साहित्य मी प्रथम वाचायला सुरुवात केली ते इचलकरंजी येथील १९७४ सालच्या मराठी साहित्य संमेलनाचे पडघम वाजायला लागले तेव्हा. ते पन्नासावे मराठी साहित्य संमेलन  होते आणि पुल स्वतः संमेलनाध्यक्ष होते. वृत्तपत्रे सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्यानंतर पुल हे सर्वांत पहिलेच सेलेब्रिटी संमेलनाध्यक्ष असावेत. पुल त्यावेळी आपल्या साहित्यिक कारकिर्दीच्या आणि लोकप्रियतेच्या अगदी शिखरावर होते, त्यावेळचे ते महाराष्ट्रातील सर्वांत लोकप्रिय साहित्यिक आणि लाडके व्यक्तीमत्व होते. त्यावेळी श्रीरामपूरला मी नववीला होतो. याकाळात संमेलनाआधी पुलंविषयी आणि त्या संमेलनाविषयी सर्वच मराठी वृत्तपत्रात कितीतरी दिवस रकानेच्या रकाने मजकूर छापून येत होता आणि आम्ही वाचक ते सर्व अधाशासारखे वाचत होतो.
मात्र त्यानंतरच्या वर्षी  कराड येथे झालेले मराठी साहित्य संमेलन त्याहूनही  अधिक गाजले, वादग्रस्त ठरले आणि ऐतिहासिकही ठरले. आजवरच्या इतिहासात हे सर्वात अधिक गाजलेले मराठी साहित्य संमेलन ठरले. त्याचे कारण म्हणजे हे संमेलन आणिबाणीच्या काळात म्हणजे १९७५ साली भरत होते आणि संमेलनाध्यक्षा होत्या विदुषी दुर्गा भागवत. मावळते अध्यक्ष म्हणून नव्या संमेलनाध्यक्षांकडे सूत्रे सोपविण्यासाठी पुलदेखील  संमेलनाच्या व्यासपीठावर असणार होते. यानिमित्ताने दोन ज्येष्ठ, दिग्गज साहित्यिक एकाच व्यासपीठावर असणार होते आणि  संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि यजमान  होते कराडचेच रहिवासी आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण. 
राजकारणी लोकांनी मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर असू नये अशा त्यावेळच्या मागणीमुळे स्वतः साहित्यिकही  असलेले यशवंतराव संमेलनात  श्रोत्यांमध्ये बसले होते. त्यावेळी  ''फारच तुडवले गेले तर मेलेल्या जनावराच्या कातडीपासून  बनवलेली वहाणही  कुरकुरू लागते''' अशा  आशयाचा उल्लेख  आणिबाणीत लागू केलेल्या निर्बंधाबाबत  पुलंनी आपल्या भाषणात केला असे वाचल्याचे अजुनही आठवते.  त्याकाळात आजारी असलेल्या जयप्रकाश नारायण यांच्या प्रकृतीस आराम मिळावा म्हणून काही वेळ उभे राहण्याची सूचना करून त्यावेळी दुर्गाबाईंनी भर सभेत बॉम्बगोळाच टाकला होता. त्यावेळी दुर्गाबाईंच्या सूचनेस  मान देऊन यशवंतरावांना उभे राहणे भाग पडले होते. त्यानंतर दुर्गाबाईंना झालेली अटक आणि पुलंनी आणिबाणीस जाहीर सभांमधून केलेला विरोध वगैर घटनाक्रम हा तर इतिहासच आहे. 
मला आठवते  इचलकरंजी आणि  कराड या  दोन्हीही शहरांतील संमेलनांच्या अध्यक्षांची  आणि प्रमुख्य पाहुण्यांची भाषणे वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर पहिली बातमी म्हणून वापरली होती. त्या दोन्हीही संमेलनाला केवळ काही हजार साहित्य रसिक मंडळी आली असणार, मात्र वृत्तपत्रांच्या विस्तृत वार्तांकनांमुळे, लक्षवेधी क्षणचित्रांमुळे आणि फोटोंमुळे तेथे प्रत्यक्ष उपस्थित नसलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातील माझ्यासारख्या लाखो वाचकांनी ती दोन्ही संमेलने अनुभवली असणार. 
गोव्यात पणजीला धेम्पे कॉलेजात एफवायबीएला मला पुलंचे 'तुझे आहे तुझ्यापाशी' हे नाटक होते. संपूर्ण वर्गात केवळ तीनच विद्यार्थी - मी आणि इतर दोन मुली- असतानासुद्धा आमच्या शिक्षकांनी हे नाटक अगदी समरसून शिकवले. त्यांतील काकांचे आणि आचार्यांचे जीवनविषयक परस्परविरोधी तत्त्वज्ञान मनात खोलवर रुतून बसले. (पुढे काही वर्षांनंतर पुण्यात स्थायिक झालो तेव्हा या नाटकाच्या बहुधा शेवटच्या काळात होणाऱ्या एका प्रयोगाला हजर राहण्याची संधीही मला मिळाली होती.) याचकाळात मग पुलंचे  इतरही साहित्य मी वाचून काढले. लहानपणी शाळेत पाठ्यपुस्तकांतून त्यांच्या  'बटाटयाची चाळ'मधील अनेक व्यक्तिमत्त्वांची  ओळख झाली होतीच  मराठी भाषेतील पी. जी. वूडहाऊस असे त्यांच्याविषयी म्हटले जात असे पण पुल म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेले  निव्वळ पुलच  होते.
या खूप वाचलेल्या आणि मनात साठलेल्या पुलंना प्रत्यक्ष पाहण्याचा आणि ऐकण्याचा योग अचानक आला तो एक व्यावसायिक भाग म्हणून. महाराष्ट्र सरकारच्या गोव्यातील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संचालिका असलेल्या अनुराधा आठवले यांनी पु. ल.  देशपांडे यांची पणजीत तीन दिवसांची व्याख्यानमाला आयोजित केली होती  याकाळात  नारायण आठवले पणजीतील  दैनिक 'गोमंतक'चे संपादक होते. ते बहुधा १९८२-८३ साल  असावे. पणजीतील महालक्ष्मी मंदिराच्या शेजारी असलेल्या सभागृहात पुलंचे व्याख्यान होते. नवहिंद टाइम्स या इंग्रजी दैनिकाचा बातमीदार म्हणून त्या व्याख्यानाची बातमी देण्याचे काम माझ्यावर सोपवण्यात आले होते. त्यासाठी मी तेथे वेळेत गेलो. मात्र बातमीदाराचे ओळखपत्र असूनही मला बसण्यासाठी जागा मिळाली नाही इतकी. चिक्कार गर्दी तेथे होती. 
पुलंचे भाषण सुरू झाले आणि त्यापाठोपाठ सभागृहात हास्यकल्लोळ. चार दशकांपूर्वी झालेल्या त्या भाषणातील मुद्दे मला आठवत नसले तरी एक संवाद अजूनही मला आठवतो. "तू उगी राव, हांव कितें सांगता ते ऐक!"  नवरोजींनी आपल्या बायकोला उद्देशून म्हटलेला कोकणीतील तो संवाद ऐकून सभागृहात हशा पिकला होता. त्या हशाच्या काळात पुलंनी समोर ठेवलेल्या तांब्यातील पाणी फुलपात्रांत ओतून त्यातील एक घोटभर पाणी पिले होते. 
दुसऱ्या दिवशी गोमंतक आणि नवप्रभा या मराठी दैनिकांत पान एकवर अँकरला  पुलंच्या भाषणाचे फोटो आणि क्षणचित्रांसह विस्तृत बातम्या छापून आल्या होत्या.. आमच्या इंग्रजी नवहिंद टाइम्समध्ये मात्र मी एक छोटीशी बातमी आणि फोटोओळ यावर वेळ निभावून नेली होती. 
दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाच्या वेळेच्या आधी खूप लवकर जाऊनही सभागृहाच्या दारापाशी उभे राहण्यासाठी मला कशीबशी जागा मिळाली.  पुलंच्या भाषणांच्या त्या दिवशी छापून आलेल्या बातम्यांमुळे श्रोत्यांची संख्या वाढली होती. व्याख्यानाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवसाच्या गर्दीबद्दल तर बोलायलाच नको. मला वाटते त्या दिवशी मला हॉलमध्ये प्रवेश मिळालाच नव्हता. पुलंचे व्यक्तिमत्व, वक्तृत्व आणि लोकप्रियता याचा प्रत्यक्ष अनुभव या तीन दिवसांत मी घेतला  
त्यानंतरच्या काळात महाराष्ट्र परिचय केंद्राने पणजीत राम शेवाळकर यांची रामायणावर व्याख्यानमाला  आयोजित केली होती. कवि नारायण सुर्वेची भाषणे ठेवली, या व्याख्यानमालांना बातमीदार म्हणून मी हजर होतो, त्या व्याख्यानांवर आधारित मी आमच्या  इंग्रजी दैनिकात 'नवहिंद टाइम्स'मध्ये बातम्या आणि विस्तृत लेखही लिहिले होते. मात्र पुलंच्या विनोदी व्याख्यानाचा इंग्रजीत अनुवाद करणे मला शक्य झाले नव्हते. त्यांच्या भाषणाला, विनोदाला भाषेचा आणि स्थानिक संस्कृतीचा संदर्भ होता.  पुलंच्या साहित्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला होता. साहित्य अकादमी पुरस्कार लाभलेल्या साहित्याचा इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद केला जातो.  मात्र पुलंचे साहित्य अत्यंत उकृष्ट दर्जाचे असूनही त्यांचे इतर भारतीय भाषांत, इंग्रजीत किंवा इतर परदेशी भाषांत अनुवाद झाले नाही ते यामुळेच.

Monday, September 24, 2018

Shaikh family celebrates Ganesh festival with zeal

Monday, September 24, 2018, 7:33 PM   e-paper

Shaikh family celebrates Ganesh festival with zeal

Camil Parkhe And Radhakrishna Yenare
Friday, 21 September 2018   goo.gl/FyKuEi
Shaikh family celebrates Ganesh festival with zeal
Fascinated by the Ganesh festival celebrated at his peers’ homes, Class IV student Anvar Shaikh insisted that his family too conduct similar rituals at his home. Bowing to his demand, Anvar’s family members at Shirgaon near Somatane are hosting the 11-day Ganesh festival for the past five years.
Pimpri: Fascinated by the Ganesh festival celebrated at his peers’ homes, Class IV student Anvar Shaikh insisted that his family too conduct similar rituals at his home. Bowing to his demand, Anvar’s family members at Shirgaon near Somatane are hosting the 11-day Ganesh festival for the past five years.
Anvar’s grandfather and former sarpanch Usmanbhai Shaikh and maternal uncle Police Patil Sameer Shaikh respected the boy’s wishes and since 2013, Ganesh festival has become an annual joyous affair at the Shaikhs’ family.
Initially, the Shaikh family was not aware of the various rituals associated with Ganesh festival and had to depend on a priest to get acquainted with them. Since then every year, the whole family takes part in preparing decorations for the festival and a priest ceremoniously installs Ganesh idol on Ganesh Chaturthi.
All members of the Shaikh family participate in the aarti sung before the Ganesh idol early morning during the festival. The idol will be immersed on the Anant Chaturdashi on Sunday.