Saturday, September 12, 2020

पुणेरी ख्रिश्चन्स पुणे पिंपरी-चिंचवड ख्रिस्ती संस्कृती






 एके काळी ‘कॅम्प’ या भागाबद्दल सर्वांना बरंच आकर्षण होतं. तिथले रस्ते, तिथली दुकान, तिथली राखण्यापिण्याची चंगल वगैरेंमुळे पुणेकर कॅम्पात खेचले जायचे. हा भाग ख्रिश्‍चनबहुल. त्यामुळे त्याबद्दलही एक वेगळंच आकर्षण होतं. आता कॅम्पचं स्वरूप बदललं आहे आणि हीच ख्रिश्‍चनधर्मीय मंडळीही तिथून बाहेर पडली आहेत. आजमितीला कॅम्पशिवाय पुण्याच्या विविध भागांमध्ये ख्रिश्‍चन समाजवास्तव्य करत आहे. एका अर्थाने पुण्याच्या सामाजिक जीवनात हा समाज मिसळून गेला आहे.

ख्रिस्ती संस्कृतीचा पुण्याशी संबंध आला अठराव्या शतकात. पेशव्यांच्या राजवटीत ख्रिस्ती मंडळींचं आणि पुण्याचं नातं सैन्यातील व्यवहारांच्या निमित्ताने जुळू लागलं होतं. मुळात गोमंतकीय पोर्तुगीज नागरिक पशेव्यांच्या आणि ख्रिस्ती समाजाच्या संपर्कातील सेतू ठरले. त्यानंतर काही ख्रिस्ती लोक पेशव्यांच्या सैन्यात अधिकारपदावर किंवा तोफांच्या कारखान्यातले कर्मचारी म्हणून किंवा व्यापारी म्हणून सामील होत गेले. पुणे कॅम्प ही तेव्हाची लष्कराची छावणी. त्यामुळे पूर्वी मराठ्यांच्या लष्करातील सहभागाच्या निमित्ताने शहरात आलेले ख्रिश्‍चन अधिकारी व सैनिक या परिसरात स्थायिक झाले. याशिवाय खडकी, वानवडी या बाजूलाही ख्रिस्ती सैनिक व अधिकारी वसू लागले.

मराठी फौजेतील युरोपीय वंशाच्या किंवा गोमंतकीय ख्रिस्ती लष्करी अधिकारी व सैनिकांसाठी पुणे कॅम्पात 1792 साली एक चर्च बांधण्यात आलं. अनेकांना माहीत नसेल, परंतु सवाई माधवराव पेशव्यांनी देणगी म्हणून दिलेल्या जागेवर हे सिटी चर्च (इमॅक्युलेट कन्फेशन चर्च) उभं राहिलं. क्वार्टर गेट परिसरातलं हे चर्च पुण्यातील ख्रिस्तीधर्मीयांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी सर्वात जुनी खूण. या चर्चचं मूळ बांधकाम माती आणि चुन्याच्या साहाय्याने केलेलं होतं. 1852 साली जुनं बांधकाम पाडून चर्चचं सध्याचं रूप घडवण्यात आलं. पुणे आणि ख्रिस्तीधर्मीयांचं नातेसंबंध घडण्याची आखणी एक खूण म्हणजे कॅम्पातच, सोलापूर रोडवर असलेलं सेंट मेरीज चर्च. हे चर्च 1823 साली बांधण्यात आलं. नंतरच्या काळात मराठा फौजेतील ख्रिस्ती अधिकारी व सैनिकांसाठी लष्करी तळांच्या परिसरात अनेक चर्च बांधली गेली.

अव्वल बि‘टिश आमदनीत पुण्यातील ख्रिश्‍चन समाज मु‘यत्वे फौजेतील युरोपीय या गोमंतकीय अधिकारी व सैनिक आणि त्यांची कुटुंबं असा मर्यादित होता. त्यामुळेच पुण्यातील सर्वांत जुनी कॅथॉलिक आणि प्रॉटेस्टंट चर्च केवळ पुणे कम्प, खडकी आणि वानवडी या लष्करी तळांत दिसतात. पुणे स्वातंत्र्यपूर्व काळात लष्करातील किंवा रेल्वे खात्यातील नोकरीच्या निमित्ताने अनेक दाक्षिणात्य  ख्रिस्ती कुटुंबं पुणे कँपात आणि खडकीत स्थायिक झाली. त्यातून हा भाग ख्रिश्‍चनबहुल बनत गेला. गेल्या तीन-चार दशकांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत जी अनेक ख्रिस्ती चर्च उभी राहिलेली दिसतात ती ख्रिश्‍चनांच्या सं‘येत या परिसरात मोठी वाढ झाल्याचं दर्शवतात.

भारताच्या अनेक भागांत ख्रिस्ती समाज आढळतो आणि त्यांच्या चालीरीती त्या त्या भागांतील स्थानिक संस्कृतीनुसार असतात. पुण्यात देशातील सर्वच भागांतील ख्रिस्ती स्थलांतरित झाले असल्याने धर्माने एकच असलेल्या या समाजाच्या विविध घटकांत खूपच सांस्कृतिक विविधता आढळते. पुण्यातील ख्रिस्ती समाज हा बहुभाषिक, विविध पंथीय, भिन्न भिन्न संस्कृतींचा आणि आपल्या मूळ प्रांतांच्या संस्कृतीनुसार वेशभूषा करणारा आहे, त्याचप्रमाणे तो अठरापगड जातींचाही आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ख्रिस्ती समाजाच्या कॅथॉलिक आणि प्रॉस्टेस्टं या दोन्ही पंथांचे लोक आहेत. कॅथॉलिकांची सं‘या तुलनेने अधिक आहे. कॅथॉलिक चर्चतर्फे चालवल्या जाणार्‍या शाळा, प्रशिक्षण केंद्र, दवाखाने आणि इतर संस्थांची सं‘याही अधिक आहे. या दोन्ही पंथांतील लोक मराठी भाषक, कोकणी भाषक गोवन, कोकणी भाषक मंगलोरियन, तमिळ, मल्याळी आणि तेलुगू वगैरे भाषिक गटांत विभागलेले आहेत.

विशेष म्हणजे खुद्द मराठी भाषक ख्रिस्ती समाजसुद्धा महाराष्ट्रातील चार प्रदेशांतून इथे स्थलांतरित झाल्यामुळे त्यांच्या संस्कृती किंवा बोलीभाषा एकमेकांपासून भिन्न आहेत. ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यातून स्थलांतरित झालेला, मूळचा गोमंतकीय असलेला बार्देकर समाज; पश्‍चिम महाराष्ट्रातील अहबदनगर-कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांतून आलेला आणि मराठवाड्यातून स्थलांतरित झालेला ख्रिस्ती समाज अशा चार गटांत मराठी भाषिक ख्रिस्ती समाज विभागलेला आहे. गोवा मंगळूर, बार्देस आणि वसई इथून स्थलांतरित झालेल्या ख्रिस्ती समाजात डिसूझा, गोन्साल्विस, फर्नांडिस अशी पाश्‍चिमात्य धर्तीची आडनावं आढळतात, याचं कारण म्हणजे या समाजघटकांना लाभलेला पोर्तुगीज राज्यकर्त्यांचा वारसा.

पुण्यातील काही नामांकित व्यक्तींमधील पुण्याचे निवृत्त बिशप वॅलेरीन डिसूझा हे मूळचे गोमंतकीय आहेत, विद्यमान बिशप थॉमस डाबरे हे वसईचे आहेत, नाशिकचे निवृत्त बिशप थॉमस भालेराव हे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत, तर पुणेकर असलेले आणि सध्याचे नाशिकचे बिशप असलेले लुईस डॅनियन हे मूळचे तमिळ आहेत. पुण्यातील ख्रिस्ती समाजातील आडनावांवरूनसुद्धा जाणकार मंडळींना त्यांची प्रादेशिक, भाषिक आणि जातीय पार्श्‍वभूमी समजते.

भारतात ख्रिस्ती समाज हिंदू धर्मातील विविध जाती-जमातींतून आलेला आहे. गोव्यात आणि वसईत धर्मांतर होऊन ती-चार शतकांचा काळ उलटला, तरी तेथील ख्रिस्ती समाजात त्यांच्या मूळ हिंदू उच्च-नीच समजल्या जाणार्‍या जाती आजही ठाम पाय रोवून आहेत. विशेषतः लग्नसंबंधात या जातींची उतरंड आणि प्रदेश विशिष्ट पार्श्‍वभूमी काम करताना दिसते. पुण्यातील गोवन तरुणाचं लग्न पुण्यातील गोवन तरुणीशी किंवा गोव्यात स्थायिक असलेल्या तरुणीशी होतं, तसंच पुणेस्थित मूळचे अमदनगर, औरंगाबाद किंवा कोल्हापूर जिल्ह्यांतील आणि त्याचप्रमाणे मूळ वसईकर, बार्देस्कर किंवा तमिळ ख्रिस्ती तरुणांचे विवाह जुळत असतात. प्रेमविवाहाचा अर्थात या प्रथेला अपवाद असतो.

मुंबईप्रमाणेच पुणे शहरात कॅथॉलिक आणि प्रॉटेस्टंट मिशनर्‍यांनी अनेक शाळा आणि संस्था उभारलेल्या असल्या तरी या दोन्ही शहरांत मोठ्या प्रमाणात धर्मांतर झालेली नाहीत. अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात धर्मांतरं झाली ती ठाणे जिल्ह्यात वसई येथे आणि उर्वरित महाराष्ट्रात अमदनगर, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावती वगैरे ठिकाणी. रेव्हरंड नारायण वामन टिळक, त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळक, रेव्हरंड निळकंठशास्त्री नहेम्या गोर्‍हे आणि पंडिता रमाबाई वगैरे उच्चवर्णीय व्यक्तींचा अपवाद वगळता ही सर्व धर्मांतरं हिंदूंमधल्या अस्पश्य गणल्या जाणार्‍या दलित समाजपुरती मर्यादित होती.

मराठी ख्रिस्ती समाजपुरतं बोलायचं झाल्यासहा समाज इतर मराठी समाजापेक्ष्ज्ञा काही वगेळा आहे अशी जाणीवही होणार नाही. कारण या मातीतच इतरांसारखी मराठी ख्रिस्ती व्यक्ती वाढली आहे. त्यांचे संस्कार, चालीरीती, भाषा आणि संस्कृती या भूमीतीलच आहे. ख्रिस्त धर्म स्वीकारला म्हणून येथील भाषा, संस्कृती आणि चालीरीतींचा त्याग करण्याची या समाजाला गरज भासलेली नाही. ज्या युरोपीय मिशनरींनी त्यांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली त्यांनादेखील येथील संस्कृती ख्रिस्ती धर्माच्या तत्त्वांशी विसंगत आहे असं वाटलं नाही. त्यामुळे हिंदू धर्मातील चांगल्या परंपरा आणि रीती कायम ठेवून नवधर्मांतरित ख्रिस्ती लोकांनी आपली जीवनशैली कायम ठेवली. गोव्यात आणि वसईत मात्र पोर्तुगीजांनी स्थानिक मराठी-कोकणी भाषांची गळचेपी केली. महाराष्ट्राच्या इतर भागांत असा प्रकार सुदैवाने झाला नाही. त्यामुळे ख्रिस्ती झाल्यानंतरही नारायण वामन टिळक, सत्यवान नामदेव सूर्यवंशी, पंडिता रमाबाई किंवा लक्ष्मीबाई टिळक ही नावं ख्रिस्ती धर्मतत्त्वांशी विसंगत आहेत असं कुणालाही वाटलं नाही. पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून पुण्यात आलेल्या ख्रिस्ती समाजातही गायवाकड, सोनवणे, कांबळे, भालेराव, तांबे अशी खास मराठमोळी आडनावं आहेेत.

असाच काहीसा प्रकार मराठी ख्रि‘स्ती समाजाच्या वेशभूषेबाबत आणि काही स्थानिक (हिंदू) सणांबाबत घडला आहे. आपल्या धर्माच्या तत्त्वांशी कुठलीही तडजोड न करता पुण्यातील मराठी ख्रिस्ती समाजाने या परंपरा चालू ठेवल्या आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कुठल्याही कॅथॉलिक चर्चमध्ये मराठी उपासनाविधीत सहभागी होणार्‍या जेष्ठ महिला नऊवारी किंवा गोल साडी, कुंकू आणि मंगळसूत्र आणि डोक्यावर पूर्ण पदर घेणार्‍या आहेत, असं दिसून येईल. हिंदू समाजात कुंकू, मंगळसूत्र ही सौभाग्यलेणी समजली जातात. कॅथॉलिक धर्मपीठालाही या समजुती ख्रिस्ती धर्मविरोधी आहेत असं वाटत नाही. त्यामुळेच मराठी ख्रि‘स्ती विवाह चर्चमध्ये होताना लग्नाच्या आणाभाका घेतल्यानंतर धर्मगुरू मंगळसूत्र, अंगठी, जोडवी आशीर्वादित करतो आणि त्यानंतर नवरदेव वधूच्या गळ्यात हे मंगळसूत्र विधिपूर्वक घालतो. काही प्रॉटेस्टंट पंथीयांनी मात्र कुंकू आणि मंगळसूत्र ही सौभाग्यलेणी ख्रिस्ती धर्मतत्त्वांविरुद्ध आहेत, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे प्रॉटेस्टंट पंथातील बहुतेक महिला कुंकू लावत नाहीत.

पिंपरी-चिंचवड परिसरात काळेवाडी, पिंपरी, कासारवाडी या परिसरात मराठी ख्रिस्ती भाषकांची सं‘या लक्षणीय आहे. यापैकी सध्या ज्येष्ठ नागरिक असणार्‍या या कुटुंबप्रमुखांची पार्श्‍वभूमी औद्योगिक कामगाराची आहे. यामागेही एक इतिहास आहे. पुण्यात स्वारगेटजवळ शंकरशेट रोडवर सेंट जोसेफ टेक्निकल इन्स्टिट्यूट ही एकेकाळी नावाजलेली संस्था आहे. येशूसंघीय (जेझुइट) या कॅथॉलिक पंथीय धर्मगुरूंनी चालविलेल्या या संस्थेने पुण्यातील अनेक औद्योगिक कंपन्यांना कुशल कामगार पुरविले आहेत. 1960 आणि 1970 च्या दशकांत येशूसंघीय धर्मगुरूुंच्या संपर्काने अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेली अनेक मुलं या प्रशिक्षण संस्थेत दाखल झाली आणि त्यांचं प्रशिक्षण पूर्ण होताच टाटा मोटर्स, बजाज ऑटो, ग‘ीव्ह्ज वगैरे प्रमुख कंपन्यांत त्यांना नोकर्‍या मिळाल्या. अशा प्रकारे अहमदनग आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एक पिढी त्या काळात पुण्यात स्थिरावली. पिंपरी-चिंचवड या औद्योगिक नगरीत मराठी भाषक ख्रिस्ती नागरिकांची मोठी सं‘या असल्याचं हे एक प्रमुख कारण. आज या कुटुंबांच्या दुसर्‍या-तिसर्‍या पिढ्या कार्यरत झाल्या आहेत.

विशेष महत्त्वाची बाब म्हणजे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत गेली तीन-चार दशकं स्थिरावूनही मराठी ख्रिस्ती भाषिक समाजाने आपल्या मूळ भूमीशी नातं कायम राखलं आहे. अहमदनगर-औरंगाबाद जिल्ह्यांतील आपल्या मूळ गावी जुन्या पिढीतील व्यक्ती वर्षातून एकदा तरी भेट देतातच. नव्या पिढीतील मंडळी लग्न वा इतर कार्यक‘मासाठी गावी जात असतात. पुण्यातील वसईकर मंडळी या बार्देस्कर मंडळीसुद्धा आपल्या मूळ भूमीशी कायम संपर्क राखून असतात. विशेषतः लग्नासाठी सोयरीक जुळवताना मूळ गावातील नातेवाईक मंडळींचं साहाय्या घेतलं जातं.

मराठी भाषक खिस्ती समाज कॅथॉलिक आणि प्रॉटेस्टंट या पंथांत विभागला असून त्यांच्यात जसे विवाहसंबंध होत नाहीत. तसंच कुठल्याही धार्मिक वा इतर कारणामुळे या दोन्ही पंथांच्या लोकांना परस्परसंबंधदेखील होत नाहीत. मराठी साहित्य चळवळ मात्र यास अपवाद म्हणावी लागेल. ‘मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलना’च्या निमित्ताने या दोन्ही पंथांतील लोक एकत्र येतात. सन 1927 पासून ख्रिस्ती साहित्य संमेलनं भरत असून ती परंपरा आजही सुरू आहे. पुण्यातील मराठी ख्रिस्ती साहित्य संघाची दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी वायएमसीएच्या हॉलमध्ये नियमितपणे बैठक होत असते.

पुण्यातील कॅथॉलिक आणि प्रॉटेस्टंट चर्चमध्ये मराठी उपासनाविधी होतो तेव्हा तिथे रेव्हरंड ना. वा. टिळक, कृष्णाची सांगळे वगैरे नामवंतकवींनी केलेल्या रचना गायल्या जातात. मराठी ख्रिस्ती समाजाच्या या गायनप्रथेला शंभर-सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. ज्या चर्चमध्ये यूथ ग‘ुप या गायकवृंद असेल तिथे हार्मोनियम, तबला वगैरे वाद्यांच्या साथीने गीतं गायली जातात. नाताळच्या आधी आठवडाभर कॅरोल सिंगर्स नाताळची गाणी गात ख्रिस्ती कुटुंबांच्या घरी भेटी देतात, तेव्हाही नामांकित कवींनी विशिष्ट रागांत रचलेली गायनं गायिली जातात. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील कॅथॉलिक चर्चमध्ये मराठी भाषकांसाठी खास वेगळी मिस्सा किंवा उपासना केली जाते. धर्मगुरू आशीर्वाद देतात तेव्हा सर्व महिला डोक्यावर पूर्ण पदर घेतात, त्याचप्रमाणे तामिळ किंवा मल्ल्याळी भाषकांसाठीही त्यांच्या भाषांत प्रार्थना केल्या जातात. याशिवाय इंग‘जी भाषेत होणार्‍या प्रार्थनेसाठी सर्वच भाषक नाताळला एकत्र जमतात.

विवाह समारंभाच्या बाबतीतही मराठी ख्रिस्ती समाजाने सुपारी फोडणे, साखरपुडा, हळद लावणे वगैरे परंपरा कायम ठेवल्या आहेत. यातही भारतीय आणि पाश्‍चिमात्य परंपरेची सांगड घातली जाते. युरोपियन पद्धतीनुसार चर्चमध्ये लग्नात नववधूने सफेद गाऊन घालण्याची परंपरा आहे. आपल्याकडे मात्र गाऊनऐवजी सफेद साडी नेसली जाते. मात्र, डोक्यावर पांढरा जाळीदार व्हेल (पडदा) आणि हातात पांढरे हातमोजे असतात. लग्नविधीनंतर रिसेप्शनला मात्र भारतीय परंपरेनुसार शालू हवाच. बिगरमराठी भाषक ख्रिस्ती समाजानेही अशाच प्रकारे दोन्ही संस्कृतींची सांगड घातलेली दिसते.

स्वातंत्र्यपूर्व काळत आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काही दशकांत गोव्यातील अनेक कॅथॉलिक कुटुंब पुणे कँपात स्थायिक झाली. त्यामुळे तिथे आणि नजीकच्या परिसरात सिटी चचर्च, सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रल आणि सेंट झेवियर्स ही देवळं उभारण्यात आली. दोन-अडीच दशकांपूर्वी गोव्यातील बार्देस तालुक्यातून अनेक ख्रिस्ती कुटुंबं नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील घाटावरील प्रदेशात स्थलांतरित झाली. त्या वेळी गोवा पोर्तुगीज अमलाखाली होता. इन्क्विझिशनच्या काळात नवधर्मांतरित ब‘ाह्मण आणि इतर जातींतील ख्रिस्ती समाजावर पाश्‍वात्य संस्कृती स्वीकारण्यासाठी अत्याचार झाल्यामुळे, प्लेगच्या साथीमुळे आणि इतर काही कारणांमुळे हे स्थलांतर झालं, असं म्हणतात. मात्र या दोन-अडीच दशकांत या बार्देस्कर समाजाने आपली गोमंतकीय संस्कृती आणि कोकणी भाषा जतन केली. धर्मगुरू नसतानाही ख्रिस्ती धर्माचं आचरण चालू ठेवलं. हा एक मोठा सामाजिक चमत्कारच म्हटला पाहिजे. गेल्या दोन-अडीच दशकांत घाटावरील हा बार्देस्कर समाज पुण्यात आणि चिंचवड इथे स्थायिक झाला आहे.

पुण्यातील तमिळ आणि मल्याळी ख्रिस्ती कुटुंबं पूर्वी कँपात छोट्याशा भाडोत्री घरात किंवा स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असत. गेल्या तीन दशकांच्या काळात जमिनींच्या किमती स्वमालकीची जागा विकून त्या बदल्यात मिळालेल्या रकमेत पुणे शहराबाहेर असलेल्या वानवडी वगैरे परिसरांत जागा घेऊन घ्ज्ञरं बांधली किंवा नवे फ्लॅट्स खरेदी केले. पुण्यातील सदाशिव, नारायण वगैरे पेठांतील वाडा संस्कृतीत राहणार्‍या लोकांनी जागा विकून शहराबाहेर म्हणजे कोथरूड परिसरात जागात किंवा फ्लॅट्स विकत घेऊन स्थलांतर केलं, अगदी तसाच हा प्रकार होता.

दरम्यान, याच काळात धर्मगुरू होऊ इच्छिणार्‍या उमेदवारांना प्रशिक्षण देणार्‍या ‘डी नोबिली कॉलेज’ आणि ‘पेपर सेमिनरी’ यासार‘या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था नगर रोडवर सुरू झाल्या. या संस्थांच्या अनुषंगाने अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील अनेक कुटुंबं नोकरी वा शिक्षणाच्या निमित्ताने रामवाडी, येरवडा आणि वडगाव शेरी या परिसरात स्थायिक झाली. खिस्ती समाजाचं प्राबल्य असलेल्या अनेक सहकारी गृहनिर्माण संस्था या परिसरात उभ्या राहिल्या आहेत. आज या परिसरात होणार्‍या महानगरपालिकेच्या निवणुकीत मतपेटीचा कौल फिरवू शकेल इतकी या समाजाच्या मतदाराची सं‘या आहे; या परिसरातील ख्रिस्ती समाजात मराठी भाषकांची सं‘या अधिक आहे, तर वानवडी, फातिमानगर आणि पुणे कँप परिसरात गोवन ख्रिस्ती कुटुंबांची सं‘या अधिक आहे. खडकी कँटोन्मेंट क्षेत्रात आणि शेजारच्या भागात तमिळ ख्रिस्ती कुटुंबांची सं‘या लक्षणीय आहे. केरळमधून अलीकडील काही वर्षांत स्थलांतरित झालेली कुटुंबं मात्र पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात विखुरलेली आहेत.

शहरातील गोवन समाजाने कुटुंबात, नातलगांत आणि मित्रांशी कोकणी भाषेत बोलून आपली ही भाषा जतन केली आहे. गोव्यात ख्रिस्ती धर्मप्रसारात महत्त्वाची भूमिका करणारे सेंट फान्सिस झेवियर हे या गोमंतकीय समाजाचं प्रमुख श्रद्धास्थान. या ‘गोयंच्या सायबा’चया 3 डिसेंबरच्या सणाला हा समाज चर्चमध्ये मोठ्या सं‘येने उपस्थित असतो. पुणे कॅम्पात ‘पूना गोवन इन्स्टिट्यूट’ इथे होणार्‍या अनेक सभा-समारंभांत शहरातील गोमंतकीय ख्रिस्ती समाज आवर्जून उपस्थित राहतो. ख्रिस्ती गोमंतकीय संस्कृतीतील अनेक उत्सव इथे उत्साहपूर्वक साजरे केले जातात. पुणे कॅम्पातील एम. जी. रोडपाशी काही दुकानं गोवन किंवा ख्रिस्ती समाजाच्या संस्कृतीशी निगडित असलेल्या विविध चालीरीत, स्नानसंस्कार किंवा पुण्यस्मरण यासार‘या विधींसाठी लागणारं विविध साहित्य, उपकरणं पुरवत असतात. नाताळपूर्वी तर कॅम्पातील अनेक दुकानं या सणासाठी अगदी सजलेली असतात. नाताळचा खास फील अनुभवण्यासाठी, त्या फेस्टिव्ह मूडमध्ये जाण्यासाठी अनेक बिगरख्रिस्ती कुटुंबं आपल्या लहान मुलांसह कॅम्पचा फेरफटका मारतात, तो केवळ यासाठीच.

जगभरात सर्व पसरलेल्या गोवन ख्रिस्ती कुटुंबांत सेंट फान्सिस झेवियर हे एक महत्त्वाचं श्रद्धास्थान असतं. गोव्यातील ‘बॉम जेसू बॅसिलिका’त या पंधराव्या शतकातील संतांच्या शरीराचे अवशेष आजही जतन करण्यात आले आहेत. पुण्यातील गोवन ख्रिश्‍चनांच्या या श्रद्धास्थानाकडे विशेष ओढा असतो. तर अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांतून पुण्यात आलेले ख्रिस्ती समाजातील हजारो लोक दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुसर्‍या शनिवारी-रविवारी हरेगावच्या मतमाउलीच्या सणाला आवर्जून जात असतात. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरजवळील या खेड्यात येशूची आई मारिया हिच्या जन्मतिथीनिमित्त ही यात्रा गेली सहा दशकं भरत आहे. लाखो लोक आकर्षित करणार्‍या या यात्रेमुळेच हरेगावला मराठी ख्रिस्ती समाजाची पंढरी असं संबोधलं जातं.

तमिळ ख्रिस्ती समाजात सेंट अँथनी या संताला विशेष मान दिला जातो. हा समाज या संताच्या सणाला शहरातील विविध चर्चमध्ये आवर्जून हजरत असतो. हरेगावला मतमाउलीचा सण साजरा होतो, त्याच दरम्यान पुण्यातील खडकी येथील सेंट इग्नेशियस चर्चमध्येही माता मारियेची यात्रा नऊ दिवस भरवली जाते. पुणे पिंपरी-चिंचवड परिसरातील ख्रिस्ती आणि इतरही भाविक या नऊ दिवसाच्या प्रार्थनेला - ‘नोव्हेना’ला उपस्थित असतात. या वेळी चर्चमधील मारियेच्या पुतळ्याला साडी चढवली जाते. हिंदू देवळांत ज्याप्रमाणे देवीला साडली नेसवली जाते, तीच परंपरा इथेही चालू ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे इथे साडीबरोबर नारळसुद्धा अर्पण केला जातो.

ख्रिस्ती धर्माचा प्रसार करताना स्थानिक संस्कृतीतील चांगल्या परंपरांचा स्वीकार करण्याची भूमिका अनेक ख्रिस्ती मिशनर्‍यांनी संपूर्ण जगभर घेतल्याचं दिसून येतं. मदुराई भागांत उच्चवर्णीय ब‘ाह्मणांमध्ये कार्य करणार्‍या सेंट रॉबर्ट डी नोबिली याने धर्मांतर केल्यानंतरही धर्मांतरीतांना डोक्याचं मुंडन करून शेंडी राखावयास आणि कपाळावर भस्म राखण्यास मुभा मिळवली. यासाठी त्याने अगदी रोमपर्यंत लढा दिला होता. गोव्यात सतराव्या शतकाच्या सुरुवातीला ‘ख्रिस्तपुराण’ हे मराठी महाकाव्य लिहिणार्‍या थॉमस स्टीफन्स या बि‘टिश धर्मगुरूने हिंदू धर्मातील अनेक संकल्पनांचा या महाकाव्यात वापर केला आहे. 

स्थानिक संस्कृतीतील काही चांगल्या परंपरांचा, रीतिरिवाजांचा ख्रिस्ती धर्मातही वापर करण्याच्या प्रथेला ‘सांस्कृतिकीकरण’ किंवा ‘इनकल्चरेशन’ असं म्हटलं जातं. कॅथॉलिक चर्चने गेल्या काही दशकांत या संकल्पनेचा हिरिरीने पुरस्कार केला आहे. यामुळेच पुण्यात किंवा महाराष्ट्रातही अनेक ख्रिस्ती धर्मगुरू आखपल्या पांढर्‍या झग्यावर खांद्यावर शाल गुंडाळून उपासना करताना दिसतात. अनेक मराठी ख्रिस्ती कुटुंबांत रक्षाबंधन, भाऊबीज वगैरे परंपरा आजही पाळल्या जातात. तमिळ आणि मल्याळी ख्रिस्ती समाजातही पोंगल आणि ओणम वगैरे सण उत्साहपूर्वक साजरे केले जातात.

पुण्यातील ख्रिस्ती समाजातील विविध घटकांनी आपली खास वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, चालीरीती ख्रिस्ती धर्मतत्त्वांशी तडजोड न करता अशा प्रकारे जतन केली आहे. भाषा, आहार अशा गोष्टींमध्येही या मंडळींनी आपली वैशिष्ट्यं जपली आहेत. ही जपणूक करताना ते पुण्याच्या स्थानिक संस्कृतीपासून वेगळे पडले नाहीत, तर या मंडळींच्या संस्कृतिवैविध्यामुळे पुण्याच्या संस्कृतीलाही नवीन आयाम मिळाले.

कामिल पारखे

Wednesday, September 9, 2020

My first newspaper byline

I had been visiting The Navhind Times office in Panjim in Goa for nearly two months, pestering the news editor, M.M. Mudaliar, there for a part-time or a full time. I had just appeared for the BA final examination of the Bombay University and wanted some job to continue post-graduation studies. I was aspiring for a college or university teacher's post after securing the MA degree in philosophy.
The news editor who said there was a vacancy in the newspaper had no hesitation in giving me a job. The only issue was that I was inclined to accept a proof-reader's post which would have permitted me to attend my classes at the post-graduate centre at the nearby Sushila Building on the 18th June Road in the city. News Editor Mudaliar, however, insisted on me taking up a staff reporter's post which, he said, was a higher post and had better salary. But I was too naïve to know the functioning of various posts and designations in a newspaper, let alone the pay scales as per the Justice Palekar wage award applicable to various posts in newspaper. (The wage board and pay scales of journalists would be matters close to my heart in my subsequent role as a trade unionist in Goa Union of Journalists !)
Mudaliar was a thorough gentleman who gave a patient hearing to his numerous visitors. This was in stark contrast to the newspaper editor Bikram Vohra who was young, impatient to hear others and ever restless but very dynamic with his ideas. The young editor had high regard for the middle-aged news editor Mudaliar and would not normally veto his decisions. I am referring to Bikram Vohra as `young editor’ because at 28, he was just seven years elder to me but younger than the news editor, the two reporters and the news desk staff. I had gained these insights during my numerous visits to the newspaper office. The Navhind Times office was located near the Panjim Market. The typical Goan style one-storeyed newspaper building had wooden stairs, also a wooden flooring and a tiled roof with balconies facing the Dayanand Bandodkar road along the Mandovi river.
During one of my such visits, editor Vohra asked me to rush to a school and to file a story. There was no reporter around in the office and so I was asked to rush to the site.
The nature of the reporting assignment baffled me. The headmistress of a school (she was also the school founder) in nearby Ribandar village had assaulted a fifth standard school with a wooden ruler and Avinash Bhosale, a leader of a students union, had approached the newspaper editor to highlight the beating incident. When I wondered what was wrong with a teacher punishing an errant student, the editor said that corporal punishment in educational institutions was against law and we must highlight this incident.
And so, along with the students leader Bhosale, I rushed to Ribandar, a couple of km from Panjim, where the school was located. The school founder -cum teacher couple were surprised when I, along with a photographer and the student leader, approached them to seek their version of the `assault’. The school principal who was in his early sixties was too shocked to react to see newspaper persons arriving at his doorsteps to give a bad publicity for his reputed school. His wife who was in an aggressive mood saw nothing wrong in punishing the child who, she said, was at that time attending her classes, having fully forgotten that she had been punished the previous day.
Her statement had, in fact, convinced me that she had not committed any crime at all.
When I briefed the newspaper editor about the visit, he excitedly said that there was a good 'copy' for publication. The next day, the story written by me and heavily edited by the editor, was published in the newspaper with my byline.
The next morning, I was in the news editor's cabin, beaming with joy of publication of my byline in the newspaper.
“Sir, what about my job...?” I asked him again.
“But you have already been hired...” Mudaliar said as he lit his pipe.
“Since when?” I asked, astonished.
“From yesterday, August 18..The news story you covered was your first assignment,” he replied as a matter of fact.
The joy of getting a first job had no bounds. But nonetheless I had a nagging feeling that I had committed some of kinds of injustice to the school's dedicated founders.
In my journalism career, I have had some proud moments and some not so proud moments. Some of the incidents have gone blur in memory with the passage of time and it is only when I wipe off the dust from the file of thousands of my old newspaper cuttings that faint memories of these incidents are revived.
After a few years, I destroyed the clipping of my ‘first byline’ as I did not consider the news story as a matter of pride. But to this date, I have not succeeded in wiping out that incident from my memory.

Friday, August 21, 2020

सत्ताधारी मंडळीपुढे कधीही लोटांगण न घालण्याची दर्पोक्ती करणाऱ्या आम्हा पत्रकारांनाही मालकांच्या रूपाने आमचा ‘बोलाविता धनी’ वा स्वामी असतोच !

पडघम - माध्यमनामा

कामिल पारखे

प्रातिनिधिक चित्र

  • Tue , 18 August 2020
  • पडघममाध्यमनामासरSirयुवर लॉडशिपYour Lordshipमि. प्रेसिडेंटMr. Presidentमि. प्राईम मिनिस्टरMr. Prime Minister

राजकारणात दादा, भाऊ, साहेब, अण्णा, तात्या अशा नावांची खैरातच पाहायला मिळते. आपल्या नेत्याची हांजी हांजी करावी लागत असल्याने ते अपरिहार्य असावे. पण ही बाधी केवळ राजकारणातच पाहायला मिळते असं नाही. कारण नसताना आणि कुणालाही ‘साहेब’, ‘सर’ म्हणण्याची गरज नसते. शिष्टाचार, संकेत यांबाबतीत आपण सहसा उदासीन तरी असतो किंवा बेफिकीर तरी. या पार्श्वभूमीवर हा लेख मननीय ठरावा.. 

...............

गोव्यातल्या ‘नवहिंद टाइम्स’चा ‘कॅम्पस रिपोर्टर’ असताना पणजीतल्या १८ वा जून रोडवरच्या शिक्षण संचालनालयाला आठवड्यातून दोन-तीन वेळेस भेट देत असे. एक दिवस मला ऑफिसला पोहचण्यास उशीर झाला. त्याबाबत कार्यकारी संपादक एम. एम. मुदलीयार यांनी विचारले असता ‘शिक्षण खात्याच्या उपसंचालकांच्या भेटीसाठी अर्धा तास ताटकळत बसावे लागले’ असे मी सांगितले. त्यावर ते एकदम भडकले. ‘‘नवहिंद टाइम्स’च्या एखाद्या बातमीदाराला कुठल्याही ऑफिसात असे भेटीसाठी ताटकळत ठेवणे’, हा आपल्या दैनिकाचा अपमान आहे, असे ते म्हणाले. ‘ते अधिकारी खरेच महत्त्वाच्या कामात असतील तर तिथे तू थांबायची काहीच गरज नाही’, असे त्यांनी सांगितले.

त्या काळात गोव्यातील एकमेव इंग्रजी दैनिक आणि त्याचबरोबर सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीशी सरकारी अधिकाऱ्याने कसे वागावे, हे मी त्यांना दाखवून दिले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. मुदलियारसाहेबांचा हा आदेश पाळण्याचा प्रयत्न मी नेहमीच केला.

पत्रकाराने बातम्या कशा मिळवाव्या, पत्रकार म्हणून कसे वागावे, कसे वागू नये, याचे बहुतांश प्राथमिक धडे मी गोव्यात १९८०च्या दशकात आठ-नऊ वर्षे बातमीदार असताना गिरवले. कुठल्याही ऑफिसात, कार्यक्रमात वा इतर कुठेही संपर्कात येणाऱ्या कुणाही व्यक्तीला ‘सर’ असे आदरार्थी विशेषण वापरायचे नाही, अशी दुसरी एक सक्त ताकीद मुदलियारसाहेबांनी मला दिली होती. ‘आपल्या या वृत्तपत्रात तुझे बॉस असणाऱ्या व्यक्तीशिवाय इतर कुणालाही,  मग भले ती व्यक्ती सरकारी अधिकारी असो व मंत्री असो, त्यांना पत्रकार म्हणून भेटताना सारखे ‘यस सर, यस सर’ असे पालुपद लावायची काहीही गरज नाही, पत्रकार कुणाच्याही ताटाखालचे मांजर नसतो. अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाबद्दल धारेवर धरायचे, त्यांना जाब विचारायचा,  हे बातमीदारांचे काम, त्यामुळे भेटताना त्यांना ‘सर’ म्हणण्याऐवजी त्यांच्या पदाचा आदर राखत ‘मिस्टर अमुकअमुक’ असे म्हटले की बस!’, असा मुदलियारसाहेबांचा आदेश होता. 

या आदेशाचे पालन मी पत्रकारितेच्या व्यवसायात गोवा सोडल्यानंतरही सातत्याने करत आलो. त्याचा मला फायदा झाला. समोरची व्यक्ती आपली काही बॉस नाही, पत्रकार या नात्याने आपण दोघे समपातळीवर आहोत, हा विश्वास त्यामुळे निर्माण झाला. सुदैवाने मी ‘नवहिंद टाइम्स’, ‘लोकमत टाइम्स’, ‘इंडियन एक्सप्रेस’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’ आणि ‘सकाळ’ मीडिया ग्रुपसारख्या आघाडीच्या दैनिकांत नोकरी केली. त्याचाही एक वेगळाच फायदा झाला. छोट्या दैनिकांत काम करणाऱ्या बातमीदारांना बातमी मिळवण्यासाठी, अगदी अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी वा क्वचित जाहिरात मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांची आणि इतरांची हांजीहांजी करावी लागते. त्यामुळे त्यांना स्वतःकडे कमीपणा घ्यावा लागतो, इतरांना सारखे ‘सर’ असे म्हणावे लागते, याची मला जाणीव आहे.

कार्यालयाबाहेर बॉस नसणाऱ्या कुणालाही ‘सर’ ही उपाधी न लावण्याचा हा नियम इंग्रजी पत्रकारितेतील अनेक जण पाळतात, हे मी अनेक वृत्तपत्रांत अनुभवलेले आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक प्रकाश कर्दळे हे आम्हा सहकाऱ्यांची इतरांना ओळख करून देताना ‘हे माझे सहकारी अमुकअमुक’ असे म्हणत असत. अनेक संपादक आणि इतर ज्येष्ठ मंडळी आपल्याला (!) ‘सर’ म्हणू नये, नावानेच हाक मारावी असा आग्रह करताना मी अनुभवले आहे.

‘नवहिंद टाइम्स’चे वयाची तिशीही न पार केलेले संपादक बिक्रम व्होरा यांना बहुतेक सर्व वरिष्ठ व कनिष्ठ सहकारी ‘बिक्रम’ या नावानेच संबोधत. कुणाही व्यक्तीला तिच्या पहिल्या नावाने हाक मारायची, हा इंग्रजी पत्रकारितेतील आणखी एक रुळलेला संकेत. पत्रकारितेत अनेक वर्षे कारकीर्द केली तरी टीम लीडर म्हणून मी फार कमी काळ काम केले, कुठल्या शैक्षणिक संस्थेत तर कधीच शिकवले नाही. त्यामुळे ‘सर’ ही उपाधी स्वतःला चिकटून घेणे मला कधीच आवडले नाही. ही नावडती उपाधी अलीकडच्या काळात अगदी अनिच्छेनेच मला चिकटली. तरी मी ओळखला जातो तो मुख्यत: ‘कामिल’ म्हणूनच. त्यामुळे खूप मोकळेढाकळे  वाटते. 

माझ्या पत्रकारितेच्या अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे १९८३ला गोव्यात कॉमनवेल्थची एक बैठक झाली. दिल्लीतील औपचारिक परिषदेनंतर गोव्यात ही अनौपचारिक बैठक म्हणजे रिट्रीट होते. त्यानिमित्ताने ब्रिटिश साम्राज्याचा एके काळी भाग असलेल्या संपूर्ण जगातील ३९ राष्ट्रांचे प्रमुख गोव्यात चार दिवस रिट्रिटसाठी जमले होते. त्यामध्ये ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान बॉब किंवा रॉबर्ट  हॉक, झिम्बाब्वेचे राष्ट्रप्रमुख रॉबर्ट मुगाबे वगैरेंचा समावेश होता. या कॉमनवेल्थ परिषदेच्या यजमान म्हणून पंतप्रधान इंदिरा गांधी उपस्थित होत्या.

यापैकी कुणाही राष्ट्रप्रमुखाला भेटण्याची किंवा त्यांच्या आसपास फिरकण्याची आम्हां पत्रकारांना मुभा नव्हती. जगभरातील पत्रकार यानिमित्ताने गोव्यात आले होते. फोर्ट आग्वाद ताज व्हिलेज रिसॉर्टवर एकमेकांना अनौपचारिकरीत्या भेटत या राष्ट्रप्रमुखांच्या चर्चा चालू होत्या. जुना गोवा आणि विविध समुद्रकिनारी भेटी, तसेच जुन्या चर्चमधील प्रार्थनांत सहभाग वगैरे बातम्या आम्ही स्थानिक आणि इतरही पत्रकार देत होतो.

भारतीय वंशाचे असलेले श्रीदत्त रामफळ हे तेव्हा कॉमनवेल्थ कॉन्फरन्सचे सरचिटणीस होते. परिषदेचे प्रवक्ता या नात्याने ते आम्हा पत्रकारांना दररोज भेटत असत, दैनंदिन घडामोडीविषयी काही सांगत असत. थ्रिपिस सूट घातलेले, हातात टेपरेकॉर्डरसारखी विविध अद्ययावत उपकरणे घेऊन पत्रकार परिषदेस हजर राहणारे वेगवेगळ्या देशांतील विविध वृत्तपत्रांचे आणि वृत्तसंस्थांचे पत्रकार तेव्हा मी पहिल्यांदा पाहिले. ‘मिस्टर सेक्रेटरी जनरल...’ या संबोधनाने ते कॉमनवेल्थ कॉन्फरन्सचे सरचिटणीस रामफळ यांना प्रश्न विचारत. त्या चार दिवसांत कुणीही त्यांना वा इतर अधिकाऱ्यांना ‘सर’ हे संबोधन वापरले नाही आणि त्यांत त्यांनाही काही अपमानास्पदही वाटले नाही, हे मी या वेळी अनुभवले.

माझ्या कारकिर्दीतील गोव्यातली ही कॉमनवेल्थ परिषद सर्वांत मोठी घटना. या परिषदेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान व राष्ट्रप्रमुखांना ‘मिस्टर प्रेसिडेंट’ वा ‘मिस्टर प्राईम मिनिस्टर’ असे संबोधन कसे वापरतात हे मी जवळून अनुभवले. असेच संबोधन असलेल्या ‘यस मिनिस्टर’ आणि ‘यस प्राईम मिनिस्टर’ या कमालीच्या गाजलेल्या आंतरराष्ट्रीय टेलिव्हिजन मालिका अनेकांना आजही आठवत असतीलच. 

पणजीला सचिवालयात वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी बोलताना अगदी मंत्र्यांशीही बोलताना पत्रकारितेतील हे तत्त्व पाळल्याचा फायदा झाला. गोव्यात कोकणी भाषेत ‘तुम्ही, आपण’ असे आदरार्थी संबोधन नसल्याने आणखी फायदा व्हायचा. त्या वेळी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, विधानसभेचे सभापती दयानंद नार्वेकर, विरोधी पक्षनेते रमाकांत खलप वा इतर मंत्र्यांनाही ‘तू, तुका’ असेच संबोधन असायचे. फारच आदर द्यायचा झाल्यास ‘राणेबाब, नार्वेकरबाब, खलपबाब’ असा जोड लागायचा.     

त्याशिवाय कुठल्याही कनिष्ठ व वरच्या पातळीवरील न्यायालयात न्यायाधीश वा न्यायमूर्ती प्रवेश करताना आणि जाताना इतर लोकांप्रमाणे पत्रकारांनाही उभे राहण्याचा शिष्टाचार पाळावा लागतो. पणजीला उच्च न्यायालयात न्यायमूर्तींसमोर सुनावणी चालू असताना मी खुर्चीवर बसल्यावर दोन्ही पाय एकमेकांवर टाकले की, लगेच तिथला भालदार येऊन सरळ, नीट आदराने बसण्याची तंबी द्यायचा हे मला आजही आठवते.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात गेल्यावर तिथल्या न्यायमूर्तींना त्यांच्या चेम्बरमध्ये मी ‘युअर लॉर्डशिप’ असेच संबोधत असे आणि उच्च न्यायालयाच्या बातम्यांमध्ये त्यांचा ‘मिस्टर जस्टीस अमुकतमुक’ असाच उल्लेख करावा लागत असे. ‘मिस्टर जस्टीस’ ही उपाधी नक्की कुणासाठी वापरायची हे माहीत नसलेल्या एका बातमीदाराने एकदा ही उपाधी सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशासाठी वापरली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पणजीतल्या सचिवालयातल्या आमच्या प्रेसरूमध्ये मोठा हास्यकल्लोळ उडाला होता. ‘न्यायाधीश’ ही उपाधी खालच्या न्यायालयांतल्यांसाठी वापरली जाते, तर ‘न्यायमूर्ती’ ही उपाधी उच्च न्यायालयाच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पीठासीन व्यक्तींसाठी वापरतात.

अनेक दैनिकांनी काळानुसार बातम्यांत व्यक्तीच्या नावाआधी  ‘श्री, श्रीमती’ हे विशेषण वगळले आहे. अगदी जुन्या काळात ‘राजमान्य राजश्री’ असा अगदी आदरपूर्वक उल्लेख केला जायचा.  काही स्थानिक आणि राष्ट्रीय वृत्तपत्रांनी न्यायमूर्तीसाठी ‘मिस्टर जस्टीस’ ही उपाधी वगळली  आहे. काही दैनिके मात्र सरंजामशाहीचे प्रतीक असलेली ‘मिस्टर जस्टीस’ ही उपाधी उच्च न्यायालयाच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी आजही वापरतात. आम्हाला ‘माय लॉर्ड’ किंवा ‘युअर लॉर्डशिप’ म्हणू नका, असे काही वर्षांपूर्वी काही न्यायमूर्तींनी बजावले आहेच

असेच पत्रकारितेतील काही संकेत कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमाची बातमी देण्याबाबत होते. पत्रकारांना पुढच्या रांगेत वा वेगळ्या कक्षात बसण्याची सोय केली जायची. मुख्य पाहुणे असलेले मुख्यमंत्री, मंत्रीमहोदय वा इतर माननीय व्यक्ती सभागृहात प्रवेश करतात. उपस्थित लोक उभे राहून त्यांचे स्वागत करणार. अशा वेळी सभागृहाच्या पहिल्या व दुसऱ्या रांगेतील पत्रकार कक्षातील आम्ही सर्वजण आमचे नोटबुक आणि पेन हातात घेऊन बसलेलेच असायचो. सर्वजण एकत्र बसल्याने या अलिखित सांकेतिक प्रथेला वेगळाच भारदस्तपणा यायचा.

मात्र पत्रकारितेच्या या शिष्टाचार संकेतास काही सन्माननीय अपवाद होतेच. उदाहरणार्थ, राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि सभागृहात असताना लोकसभेचे किंवा विधानसभेचे  सभापती यांच्या पदाचा आदर व्यक्त करण्यासाठी पत्रकारांनी उभे राहावे, असा सर्वसाधारण संकेत आम्ही पाळत असू. आमच्या संपादकाच्या मतानुसार विद्यापीठाचे कुलगुरूसुद्धा या अपवादात्मक आदरास पात्र होते.

या संकेतामुळे मात्र कधी गंमतीदार घटनाही घडायच्या. वसंतराव डेम्पो, विश्वासराव चौगुले, तिंबलो, साळगावकर वगैरे उद्योगपती म्हणजे गोव्यातील लोहखनिज खाणींचे मालक हे इंग्रजी, कोकणी आणि मराठी वृत्तपत्रांचेही मालक होते. या वृत्तपत्रांच्या मालकांना सार्वजनिक कार्यक्रमांत मिरवण्याची मोठी हौस असायची. यापैकी प्रत्येक जण वर्षांतून किमान चार-पाच वेळा सार्वजनिक व्यासपीठांवर यायचे. या कार्यक्रमांत ते वाचत असलेली भाषणे त्यांच्या दैनिकांतील मुख्य संपादकांनीच लिहिलेली असायची !

तर ‘नवहिंद टाइम्स’ आणि ‘नवप्रभा’ या दैनिकांचे मालक असलेले वसंतराव डेम्पो कार्यक्रमाच्या स्थळी आले की, ‘गोमंतक’चे बातमीदार रमेशचंद्र सरमळकर, सुरेश काणकोणकर, ‘राष्ट्रमत’चे  बालाजी  गावणेकर वगैरे पत्रकार ‘नवहिंद’ ग्रुपच्या आम्हा एक-दोन बातमीदारांना ढोपऱ्याने टोचून ‘अरे तुझो पात्राव आयलो, बेगिन उभे राव’ असे डिवचत आम्हाला आदराने उभे राहण्याचे फर्मावत असत आणि मग चरफडत मी आणि ‘नवप्रभा’चे बातमीदार गुरुदास सावळ वगैरे मुकाट्याने तटदिशी उभे राहत असू. पुढे कधीतरी गोमंतक दैनिकाचे मालक विश्वासराव चौगुले कार्यक्रमास हजर असत, तेव्हा ‘नवहिंद’ माध्यमसमूहाचे आम्ही पत्रकारमंडळी मग सरमळकर, काणकोणकर वगैरेंवर अगदी त्याच पद्धतीने पुरता वचपा काढत असू. 

सार्वजनिक कार्यक्रमांत वा इतरत्र कुठेही कुठल्याही राजकीय सत्तास्थानासमोर न झुकण्याशी फुशारकी मारणाऱ्या आम्हा पत्रकारांच्या आणि वृत्तपत्रांच्या निर्भीड स्वातंत्र्यालाही अशा प्रकारे कधीतरी नव्हे तर अनेकदा मुरड घालावीच लागते. सत्ताधारी मंडळीपुढे कधीही लोटांगण न घालण्याची दर्पोक्ती करणाऱ्या आम्हा पत्रकारांनाही मालकांच्या रूपाने आमचा ‘बोलाविता धनी’ वा स्वामी असतोच, या कटु सत्याची अशा प्रतीकात्मक घटनांमुळे प्रतिस्पर्धी वृत्तपत्रांतही काम करणाऱ्या आम्हा सर्वच पत्रकारांना प्रकर्षाने जाणीव व्हायची.


Sunday, August 9, 2020

When fugitive Charles Sobhraj was nabbed in Porvorim, Goa


 When fugitive Charles Sobhraj was nabbed in Porvorim, Goa

I was winding up my work in our newspaper office in Panjim on a Sunday evening when I attended a telephone call. A newspaper reader wanted to know about the frantic activity going around in Porvorim near Panjim. As a crime reporter of The Navhind Times, I asked the caller some details related to his query and assured him to check what was happening there. Then, I made a quick call to the police control room and was relaxed when I got the stock reply, "सोगळे शांत असा, काय गडबड ना!” (No major crimes, all is well!)
That was one of the first and also the most casual calls on the office landline I received on that Sunday late evening, 6 April 1986.
It was past 8.30 pm. In 1970s and early 1980s, there was almost no life on streets in Panjim, capital of Goa, Daman and Diu after 7 pm on weekdays , and Sundays and public holidays, would be even worse. A person informing about something abnormal happening on Panjim-Mapusa route on Sunday evening therefore rang an alarming bell in me, a crime reporter. I immediately rang up to the police control room, Number 100, to know what was happening in Porvorim.. ‘Kay Na’ prompt came the reply and I was assured.
I rang up a police inspector but he too said there was nothing to report. Within half an hour, I had received more calls.
Those days there was a single road for the most stretch of the Panjim-Mapusa route and therefore many people on the move had noticed that something was cooking at a particular site.
By 9 p.m, there were many such calls, each phone call prompting me to ring up higher police officials and different police stations to verify if something strange or major incident was taking place at the site. Thus I had called Mapusa police station, press relations officer of the Goa Police and many others and each verification call had drawn a blank.
The calls of our newspaper readers really irritated me. It was Sunday and normally I did not stay in the office so late. The deadline for filing stories for us reporters was 7.30 pm, maximum 8 pm by which time our Assistant Editor M. M. Mudaliar would clear stories, mark their pages, and leave for home. Only stories meant for the page one were accepted after that and they were cleared by Editor Bikram Vohra when the night chief sub-editor along with page one copies went in a office jeep to his Miramar residence at around 9 pm. There was a reason why I was hanging around so late in the newspaper office that Sunday night.
With Mudaliar’s prior permission, that evening I had booked urgent calls to Delhi headquarters of the Indian Federation of Working Journalists (IFWJ) to confirm about my journalism diploma course in Bulgaria and a visit to Russia. Those days, the BSNL had ordinary, urgent and lightening categories for local and outstation calls. After the urgent call materialised after two hours waiting, IFWJ president K. Vikram Rao had asked me to fly to New Delhi the very next day as I, along with other journalists, were to fly to Moscow within a week. With this excitement of my foreign tour, now I was troubled with these telephone calls about some strange happenings in Porvorim. Was someone playing a prank, I wondered.
Soon, I got another call. This time the caller was more specific. Has the police caught a big fish near Porvorim, he asked. That was an alarm bell for the crime reporter in me. I rang up the senior most police, Goa inspector general of police. I apologised to him for calling on Sunday at this night hour and asked him if there was any major arrest or happening near Porvorim. I felt assured when he replied in the negative. But when there was no end to inquisitive telephone callers and there seemed no possibility if prank calls, I once again called the Goa IGP with more profound apologies. This time, the IGP did not hide his annoyance. “Camil, you know it too well, If there is anything major, or arrest of a big fish, I will be the first person to know it,” he said, again denying that any major happening was taking place at that moment in Porvorim.
Normally, such reply from the top cop would have been final. But this time I did not feel assured. Was the IGP hiding the news for the time being? I wondered.
Jovita Lopes, our sports reporter, who was typing his stories on typewriter had his ears all tuned to my local telephone conversation, the repeated phone calls and my efforts to verify the callers’ claims. Soft-spoken Jovito who was also a school teacher was much senior to me in journalism. The night chief sub had already left with a compiled bunch of stories of national news agencies and reporters for the editor’s residence. After I had ended my second telephone call to the IGP, Jovito filed his last sport story, asked the peon to send it for Linotype setting and he turned to me and said. : Camil, there is really something big cooking up there in Porvorim. Let’s now waste time. Let’s move to that spot even if it it late night!”
Hurriedly, both of us climbed down the wooden steps of our one-storeyed tiled roof building and Jovito took out his scooter. In a few minutes, we had crossed both the Pato and Mandovi bridges and 10 minutes later arrived at O Coqueiro hotel in Porvorim, which had figured in some of those telephone calls. Some people who were on the road outside the hotel told us that the `centre of action’ had moved from O Coqueiro to Mapusa. Without wasting a moment, Jovito sped away his scooter. Soon we had arrived near the bust of Mahatma Gandhi, in Mapusa and now there was no need to ask anyone the direction .
There was huge crowd at the Hotel Residency, the hotel of the Goa Tourism Department Corporation located just opposite Mapusa bus stand. Jovito and I realised that a major event was indeed unfolding there. The crowd was watching as a group of persons with strong physique made hurried movements from the hotel to the private taxis parked there. There was no guessing that these plains clothed people were police personnel. There were obviously in hurry to leave the place as early as possible and none of them were interested in talking to anyone, let alone presspersons. I had noted that a few journalists from other newspapers in Goa were already at the spot before us !
I held my breath as I saw what was happening before my eyes and learnt what had taken place. Jovito, a seasoned journalist, had managed to speak to some those persons and the gathered bits of information was just shocking : The plain clothed persons we were watching getting their bags into the waiting taxis were Mumbai Police personnel and they had just succeeded in recapturing a most wanted international criminal, Charles Sobhraj. The serial killer had escaped some weeks back from India’s most high security Tihar Central Prison. The daredevil team of Mumbai police had been on the trail of the fugitive for a few weeks.
What we gathered from the action spot was that the Mumbai police team headed by Madhukar Zende had nabbed Charles Sobhraj perhaps an hour before at O Coqueiro hotel in Porvorim. The Mumbai police had for most obvious reasons not given any clues to the Goa police about the big fish they had in their net. That explained why even Goa’s top cop, the inspector general of police - was not aware of what was going on right under his nose in this tiny territory.
The Mumbai police team was in a hurry to leave for Mumbai along with their most prized cash. As a reporter who visited everyday Panjim police station and also the Goa bench of the Bombay High Court everyday, I understood the need and hurry of the Mumbai police team in rushing out of this Goa at this late night hour. The notorious criminal they had just nabbed had to be produced in a court within 24 hours after the declared time of his arrest. Obviously they were not interested in producing their prized catch in a court in Goa and thus make Goa Police a party to their extraordinary success of arrest of the fugitive criminal.
The Mumbai Police team which was on a long hunt to locate the whereabouts of Charles Sobhraj had been going in cognito during these days. They did not even have their official cars and were now leaving for their headquarters in Mumbai in private hired taxis.
Jovito and I were at the ground before Hotel Residency not more than 10 minutes. We watched in awe as the six to seven taxis – Charles Sobhraj was bundled off on one of them – sped away one by one before our eyes towards Altinho and then straight to Mumbai.
A few seconds later, Jovito and I rushed to his scooter and we too sped away in opposite direction –to Panjim - and to inform our boss the most prized catch in our booty which we had to file at this hour which was beyond our newspaper deadline.
Immediately on arrival at the newspaper office, Jovito rang up editor Bikram Vohra to inform him of our story. The editor in turn spoke to the night chief sub and asked him to accommodate the late story and thus delay the next day’s newspaper printing. By this time, Jovito had been banging speedily the typewriter keys with his one finger typing. Ten minutes later, the chief sub-editor had a quick look at the one and half pages news copy and sent it to ground floor for linotype setting. I had not much role in this.
The next day, The Navhind Times carried a front page eight columns news with a joint byline ‘Jovito Lopes and Camil Parkhe’, announcing recapture of Interpol-wanted criminal Charles Sobhraj. No, it was not a scoop for The Navhind Times. A few other dailies in Goa had also carried the news in that day’s edition. The national dailies however missed the news of late night capture of one of the world’s most celebrated criminal.
Thanks to the alertness of sports reporter Jovito Lopes, I, a crime reporter was saved from the huge shame and lifelong embarrassment of missing a major, international story of re-arrest of Sobhraj.
The Mumbai police left Goa with their prized collection just before the midnight. No, no, there was no encounter after the police team entered Maharashtra borders. Mumbai police in 1970s and 1980s was regarded the best in investigation and dedication in the whole world, next only to the Scotland Police. After reaching their headquarters, Mumbai police proudly announced to the world that they had captured Charles Sobhraj and the news was carried the next day in all national dailies.
Post script
The day The Navhind Times carried news of arrest of Charles Sobhraj, I flew to New Delhi. I had carried the NT newspaper copies with me. I stayed with Mr. Padmnabhan, Special Correspondent of The Hindu in New Delhi, whose son, also a Hindu reporter in Chennai, was to attend journalism course along with me in Bulgaria. The newspaper clipping impressed Mr Padmanabhan who the very next day arranged my interaction with some New reporters in connection with the arrest of Charles Sobhraj. I too became a celebrity, basking in the reflected glory of the celebrity criminal !!!.
Charles Sobhraj who was released after serving his term in Indian prison later lived in France. Presently he has been serving a prison sentence in Nepal for another crime he committed in that country.
By the way, Madhukar Zende, leader of the Mumbai police team, who nabbed Charles Sobhraj and who post-retirement is now settled in Katraj in Pune does not believe that capturing Sobhraj was his most extraordinary achievement in his career. There are other more significant cases investigated and handled by him, he says.

Nishikant Anant Bhalerao has replied to my Facebook post...

कॅमिल, अरे तुला गम्मत सांगतो, तू गोव्यात होता आणि बातमी तुला मिळाली स्कुप म्हणून. त्यावेळी मी मराठवाडा दैनिकात रात्रपाळीत होतो. जयदेव पण होता.12 वाजता पाने देऊन आम्ही घरी गेलो. मी गच्चीवर झोपायला गेलो. अनंतराव तेव्हा संपादक होते.12.30 ला त्यांना घरी जगन फडणीस तेव्हा मुंबई प्रतिनिधी म्हणून ते मराठवाडा दैनिकाचे स्वेच्छेने काम करायचे. त्यांनी अनंतराव यांना सांगितले की प्रेस मध्ये फोन कोणी उचलत नाही म्हणून तुम्हाला फोन केलाय Stop Press बातमी आहे असे त्यांनी सांगितले आणि चार्ल्स शोभराज ला गोव्यात एका हॉटेल मध्ये इन्स्पेक्टर झेंडे यांनी पकडल्याचे सांगितले.कोणीच उपसंपादक रात्रपळीत नसल्याने कंपोज कोण करणार हा प्रश्न अनंतराव यांना पडला नाही त्यांनी फोर्मन ला बोलावून पहिल्या पानावरील एक बातमी काढली आणि धावता धावता या मथळ्याखाली 5 ओळी आपल्या स्व अक्षरात लिहून त्याची प्लेट बनवून घेतली आणि दुसऱ्यादिवशी महाराष्ट्रात फक्त औरंगाबादच्या मराठवाडा मध्ये बातमी आल्याने आम्ही खूष होतो. संपादकांच्या अक्षरात बातमी प्रसिद्ध झाल्याची ही पहिलीच घटना होती. जगन फडणीस स्टार पत्रकार होते आणि त्यांच्या मुंबई च्या दैनिकाचे deadline होऊन गेल्याने त्यांनी ती मराठवाडा दैनिकाला दिली. दैनिक समाजवादी, वार्ताहर पुरोगामी, चार्ल्स ला पकडणारे झेंडे सेवादलाचे अशीही एक गम्मत होतीच.जगन यांना स्वतः झेंडे यांनी फोन करून चालर्स पकडल्याचे सांगितले होते.झेंडे हे नाव बहुदा असेच आठवते. गोवा तुझे तर मराठवाडा आमचा.
  • Like
  • Reply
  • 14h