Showing posts with label Konkani. Show all posts
Showing posts with label Konkani. Show all posts

Saturday, September 12, 2020

पुणेरी ख्रिश्चन्स पुणे पिंपरी-चिंचवड ख्रिस्ती संस्कृती






 एके काळी ‘कॅम्प’ या भागाबद्दल सर्वांना बरंच आकर्षण होतं. तिथले रस्ते, तिथली दुकान, तिथली राखण्यापिण्याची चंगल वगैरेंमुळे पुणेकर कॅम्पात खेचले जायचे. हा भाग ख्रिश्‍चनबहुल. त्यामुळे त्याबद्दलही एक वेगळंच आकर्षण होतं. आता कॅम्पचं स्वरूप बदललं आहे आणि हीच ख्रिश्‍चनधर्मीय मंडळीही तिथून बाहेर पडली आहेत. आजमितीला कॅम्पशिवाय पुण्याच्या विविध भागांमध्ये ख्रिश्‍चन समाजवास्तव्य करत आहे. एका अर्थाने पुण्याच्या सामाजिक जीवनात हा समाज मिसळून गेला आहे.

ख्रिस्ती संस्कृतीचा पुण्याशी संबंध आला अठराव्या शतकात. पेशव्यांच्या राजवटीत ख्रिस्ती मंडळींचं आणि पुण्याचं नातं सैन्यातील व्यवहारांच्या निमित्ताने जुळू लागलं होतं. मुळात गोमंतकीय पोर्तुगीज नागरिक पशेव्यांच्या आणि ख्रिस्ती समाजाच्या संपर्कातील सेतू ठरले. त्यानंतर काही ख्रिस्ती लोक पेशव्यांच्या सैन्यात अधिकारपदावर किंवा तोफांच्या कारखान्यातले कर्मचारी म्हणून किंवा व्यापारी म्हणून सामील होत गेले. पुणे कॅम्प ही तेव्हाची लष्कराची छावणी. त्यामुळे पूर्वी मराठ्यांच्या लष्करातील सहभागाच्या निमित्ताने शहरात आलेले ख्रिश्‍चन अधिकारी व सैनिक या परिसरात स्थायिक झाले. याशिवाय खडकी, वानवडी या बाजूलाही ख्रिस्ती सैनिक व अधिकारी वसू लागले.

मराठी फौजेतील युरोपीय वंशाच्या किंवा गोमंतकीय ख्रिस्ती लष्करी अधिकारी व सैनिकांसाठी पुणे कॅम्पात 1792 साली एक चर्च बांधण्यात आलं. अनेकांना माहीत नसेल, परंतु सवाई माधवराव पेशव्यांनी देणगी म्हणून दिलेल्या जागेवर हे सिटी चर्च (इमॅक्युलेट कन्फेशन चर्च) उभं राहिलं. क्वार्टर गेट परिसरातलं हे चर्च पुण्यातील ख्रिस्तीधर्मीयांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी सर्वात जुनी खूण. या चर्चचं मूळ बांधकाम माती आणि चुन्याच्या साहाय्याने केलेलं होतं. 1852 साली जुनं बांधकाम पाडून चर्चचं सध्याचं रूप घडवण्यात आलं. पुणे आणि ख्रिस्तीधर्मीयांचं नातेसंबंध घडण्याची आखणी एक खूण म्हणजे कॅम्पातच, सोलापूर रोडवर असलेलं सेंट मेरीज चर्च. हे चर्च 1823 साली बांधण्यात आलं. नंतरच्या काळात मराठा फौजेतील ख्रिस्ती अधिकारी व सैनिकांसाठी लष्करी तळांच्या परिसरात अनेक चर्च बांधली गेली.

अव्वल बि‘टिश आमदनीत पुण्यातील ख्रिश्‍चन समाज मु‘यत्वे फौजेतील युरोपीय या गोमंतकीय अधिकारी व सैनिक आणि त्यांची कुटुंबं असा मर्यादित होता. त्यामुळेच पुण्यातील सर्वांत जुनी कॅथॉलिक आणि प्रॉटेस्टंट चर्च केवळ पुणे कम्प, खडकी आणि वानवडी या लष्करी तळांत दिसतात. पुणे स्वातंत्र्यपूर्व काळात लष्करातील किंवा रेल्वे खात्यातील नोकरीच्या निमित्ताने अनेक दाक्षिणात्य  ख्रिस्ती कुटुंबं पुणे कँपात आणि खडकीत स्थायिक झाली. त्यातून हा भाग ख्रिश्‍चनबहुल बनत गेला. गेल्या तीन-चार दशकांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत जी अनेक ख्रिस्ती चर्च उभी राहिलेली दिसतात ती ख्रिश्‍चनांच्या सं‘येत या परिसरात मोठी वाढ झाल्याचं दर्शवतात.

भारताच्या अनेक भागांत ख्रिस्ती समाज आढळतो आणि त्यांच्या चालीरीती त्या त्या भागांतील स्थानिक संस्कृतीनुसार असतात. पुण्यात देशातील सर्वच भागांतील ख्रिस्ती स्थलांतरित झाले असल्याने धर्माने एकच असलेल्या या समाजाच्या विविध घटकांत खूपच सांस्कृतिक विविधता आढळते. पुण्यातील ख्रिस्ती समाज हा बहुभाषिक, विविध पंथीय, भिन्न भिन्न संस्कृतींचा आणि आपल्या मूळ प्रांतांच्या संस्कृतीनुसार वेशभूषा करणारा आहे, त्याचप्रमाणे तो अठरापगड जातींचाही आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ख्रिस्ती समाजाच्या कॅथॉलिक आणि प्रॉस्टेस्टं या दोन्ही पंथांचे लोक आहेत. कॅथॉलिकांची सं‘या तुलनेने अधिक आहे. कॅथॉलिक चर्चतर्फे चालवल्या जाणार्‍या शाळा, प्रशिक्षण केंद्र, दवाखाने आणि इतर संस्थांची सं‘याही अधिक आहे. या दोन्ही पंथांतील लोक मराठी भाषक, कोकणी भाषक गोवन, कोकणी भाषक मंगलोरियन, तमिळ, मल्याळी आणि तेलुगू वगैरे भाषिक गटांत विभागलेले आहेत.

विशेष म्हणजे खुद्द मराठी भाषक ख्रिस्ती समाजसुद्धा महाराष्ट्रातील चार प्रदेशांतून इथे स्थलांतरित झाल्यामुळे त्यांच्या संस्कृती किंवा बोलीभाषा एकमेकांपासून भिन्न आहेत. ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यातून स्थलांतरित झालेला, मूळचा गोमंतकीय असलेला बार्देकर समाज; पश्‍चिम महाराष्ट्रातील अहबदनगर-कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांतून आलेला आणि मराठवाड्यातून स्थलांतरित झालेला ख्रिस्ती समाज अशा चार गटांत मराठी भाषिक ख्रिस्ती समाज विभागलेला आहे. गोवा मंगळूर, बार्देस आणि वसई इथून स्थलांतरित झालेल्या ख्रिस्ती समाजात डिसूझा, गोन्साल्विस, फर्नांडिस अशी पाश्‍चिमात्य धर्तीची आडनावं आढळतात, याचं कारण म्हणजे या समाजघटकांना लाभलेला पोर्तुगीज राज्यकर्त्यांचा वारसा.

पुण्यातील काही नामांकित व्यक्तींमधील पुण्याचे निवृत्त बिशप वॅलेरीन डिसूझा हे मूळचे गोमंतकीय आहेत, विद्यमान बिशप थॉमस डाबरे हे वसईचे आहेत, नाशिकचे निवृत्त बिशप थॉमस भालेराव हे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत, तर पुणेकर असलेले आणि सध्याचे नाशिकचे बिशप असलेले लुईस डॅनियन हे मूळचे तमिळ आहेत. पुण्यातील ख्रिस्ती समाजातील आडनावांवरूनसुद्धा जाणकार मंडळींना त्यांची प्रादेशिक, भाषिक आणि जातीय पार्श्‍वभूमी समजते.

भारतात ख्रिस्ती समाज हिंदू धर्मातील विविध जाती-जमातींतून आलेला आहे. गोव्यात आणि वसईत धर्मांतर होऊन ती-चार शतकांचा काळ उलटला, तरी तेथील ख्रिस्ती समाजात त्यांच्या मूळ हिंदू उच्च-नीच समजल्या जाणार्‍या जाती आजही ठाम पाय रोवून आहेत. विशेषतः लग्नसंबंधात या जातींची उतरंड आणि प्रदेश विशिष्ट पार्श्‍वभूमी काम करताना दिसते. पुण्यातील गोवन तरुणाचं लग्न पुण्यातील गोवन तरुणीशी किंवा गोव्यात स्थायिक असलेल्या तरुणीशी होतं, तसंच पुणेस्थित मूळचे अमदनगर, औरंगाबाद किंवा कोल्हापूर जिल्ह्यांतील आणि त्याचप्रमाणे मूळ वसईकर, बार्देस्कर किंवा तमिळ ख्रिस्ती तरुणांचे विवाह जुळत असतात. प्रेमविवाहाचा अर्थात या प्रथेला अपवाद असतो.

मुंबईप्रमाणेच पुणे शहरात कॅथॉलिक आणि प्रॉटेस्टंट मिशनर्‍यांनी अनेक शाळा आणि संस्था उभारलेल्या असल्या तरी या दोन्ही शहरांत मोठ्या प्रमाणात धर्मांतर झालेली नाहीत. अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात धर्मांतरं झाली ती ठाणे जिल्ह्यात वसई येथे आणि उर्वरित महाराष्ट्रात अमदनगर, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावती वगैरे ठिकाणी. रेव्हरंड नारायण वामन टिळक, त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळक, रेव्हरंड निळकंठशास्त्री नहेम्या गोर्‍हे आणि पंडिता रमाबाई वगैरे उच्चवर्णीय व्यक्तींचा अपवाद वगळता ही सर्व धर्मांतरं हिंदूंमधल्या अस्पश्य गणल्या जाणार्‍या दलित समाजपुरती मर्यादित होती.

मराठी ख्रिस्ती समाजपुरतं बोलायचं झाल्यासहा समाज इतर मराठी समाजापेक्ष्ज्ञा काही वगेळा आहे अशी जाणीवही होणार नाही. कारण या मातीतच इतरांसारखी मराठी ख्रिस्ती व्यक्ती वाढली आहे. त्यांचे संस्कार, चालीरीती, भाषा आणि संस्कृती या भूमीतीलच आहे. ख्रिस्त धर्म स्वीकारला म्हणून येथील भाषा, संस्कृती आणि चालीरीतींचा त्याग करण्याची या समाजाला गरज भासलेली नाही. ज्या युरोपीय मिशनरींनी त्यांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली त्यांनादेखील येथील संस्कृती ख्रिस्ती धर्माच्या तत्त्वांशी विसंगत आहे असं वाटलं नाही. त्यामुळे हिंदू धर्मातील चांगल्या परंपरा आणि रीती कायम ठेवून नवधर्मांतरित ख्रिस्ती लोकांनी आपली जीवनशैली कायम ठेवली. गोव्यात आणि वसईत मात्र पोर्तुगीजांनी स्थानिक मराठी-कोकणी भाषांची गळचेपी केली. महाराष्ट्राच्या इतर भागांत असा प्रकार सुदैवाने झाला नाही. त्यामुळे ख्रिस्ती झाल्यानंतरही नारायण वामन टिळक, सत्यवान नामदेव सूर्यवंशी, पंडिता रमाबाई किंवा लक्ष्मीबाई टिळक ही नावं ख्रिस्ती धर्मतत्त्वांशी विसंगत आहेत असं कुणालाही वाटलं नाही. पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून पुण्यात आलेल्या ख्रिस्ती समाजातही गायवाकड, सोनवणे, कांबळे, भालेराव, तांबे अशी खास मराठमोळी आडनावं आहेेत.

असाच काहीसा प्रकार मराठी ख्रि‘स्ती समाजाच्या वेशभूषेबाबत आणि काही स्थानिक (हिंदू) सणांबाबत घडला आहे. आपल्या धर्माच्या तत्त्वांशी कुठलीही तडजोड न करता पुण्यातील मराठी ख्रिस्ती समाजाने या परंपरा चालू ठेवल्या आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कुठल्याही कॅथॉलिक चर्चमध्ये मराठी उपासनाविधीत सहभागी होणार्‍या जेष्ठ महिला नऊवारी किंवा गोल साडी, कुंकू आणि मंगळसूत्र आणि डोक्यावर पूर्ण पदर घेणार्‍या आहेत, असं दिसून येईल. हिंदू समाजात कुंकू, मंगळसूत्र ही सौभाग्यलेणी समजली जातात. कॅथॉलिक धर्मपीठालाही या समजुती ख्रिस्ती धर्मविरोधी आहेत असं वाटत नाही. त्यामुळेच मराठी ख्रि‘स्ती विवाह चर्चमध्ये होताना लग्नाच्या आणाभाका घेतल्यानंतर धर्मगुरू मंगळसूत्र, अंगठी, जोडवी आशीर्वादित करतो आणि त्यानंतर नवरदेव वधूच्या गळ्यात हे मंगळसूत्र विधिपूर्वक घालतो. काही प्रॉटेस्टंट पंथीयांनी मात्र कुंकू आणि मंगळसूत्र ही सौभाग्यलेणी ख्रिस्ती धर्मतत्त्वांविरुद्ध आहेत, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे प्रॉटेस्टंट पंथातील बहुतेक महिला कुंकू लावत नाहीत.

पिंपरी-चिंचवड परिसरात काळेवाडी, पिंपरी, कासारवाडी या परिसरात मराठी ख्रिस्ती भाषकांची सं‘या लक्षणीय आहे. यापैकी सध्या ज्येष्ठ नागरिक असणार्‍या या कुटुंबप्रमुखांची पार्श्‍वभूमी औद्योगिक कामगाराची आहे. यामागेही एक इतिहास आहे. पुण्यात स्वारगेटजवळ शंकरशेट रोडवर सेंट जोसेफ टेक्निकल इन्स्टिट्यूट ही एकेकाळी नावाजलेली संस्था आहे. येशूसंघीय (जेझुइट) या कॅथॉलिक पंथीय धर्मगुरूंनी चालविलेल्या या संस्थेने पुण्यातील अनेक औद्योगिक कंपन्यांना कुशल कामगार पुरविले आहेत. 1960 आणि 1970 च्या दशकांत येशूसंघीय धर्मगुरूुंच्या संपर्काने अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेली अनेक मुलं या प्रशिक्षण संस्थेत दाखल झाली आणि त्यांचं प्रशिक्षण पूर्ण होताच टाटा मोटर्स, बजाज ऑटो, ग‘ीव्ह्ज वगैरे प्रमुख कंपन्यांत त्यांना नोकर्‍या मिळाल्या. अशा प्रकारे अहमदनग आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एक पिढी त्या काळात पुण्यात स्थिरावली. पिंपरी-चिंचवड या औद्योगिक नगरीत मराठी भाषक ख्रिस्ती नागरिकांची मोठी सं‘या असल्याचं हे एक प्रमुख कारण. आज या कुटुंबांच्या दुसर्‍या-तिसर्‍या पिढ्या कार्यरत झाल्या आहेत.

विशेष महत्त्वाची बाब म्हणजे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत गेली तीन-चार दशकं स्थिरावूनही मराठी ख्रिस्ती भाषिक समाजाने आपल्या मूळ भूमीशी नातं कायम राखलं आहे. अहमदनगर-औरंगाबाद जिल्ह्यांतील आपल्या मूळ गावी जुन्या पिढीतील व्यक्ती वर्षातून एकदा तरी भेट देतातच. नव्या पिढीतील मंडळी लग्न वा इतर कार्यक‘मासाठी गावी जात असतात. पुण्यातील वसईकर मंडळी या बार्देस्कर मंडळीसुद्धा आपल्या मूळ भूमीशी कायम संपर्क राखून असतात. विशेषतः लग्नासाठी सोयरीक जुळवताना मूळ गावातील नातेवाईक मंडळींचं साहाय्या घेतलं जातं.

मराठी भाषक खिस्ती समाज कॅथॉलिक आणि प्रॉटेस्टंट या पंथांत विभागला असून त्यांच्यात जसे विवाहसंबंध होत नाहीत. तसंच कुठल्याही धार्मिक वा इतर कारणामुळे या दोन्ही पंथांच्या लोकांना परस्परसंबंधदेखील होत नाहीत. मराठी साहित्य चळवळ मात्र यास अपवाद म्हणावी लागेल. ‘मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलना’च्या निमित्ताने या दोन्ही पंथांतील लोक एकत्र येतात. सन 1927 पासून ख्रिस्ती साहित्य संमेलनं भरत असून ती परंपरा आजही सुरू आहे. पुण्यातील मराठी ख्रिस्ती साहित्य संघाची दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी वायएमसीएच्या हॉलमध्ये नियमितपणे बैठक होत असते.

पुण्यातील कॅथॉलिक आणि प्रॉटेस्टंट चर्चमध्ये मराठी उपासनाविधी होतो तेव्हा तिथे रेव्हरंड ना. वा. टिळक, कृष्णाची सांगळे वगैरे नामवंतकवींनी केलेल्या रचना गायल्या जातात. मराठी ख्रिस्ती समाजाच्या या गायनप्रथेला शंभर-सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. ज्या चर्चमध्ये यूथ ग‘ुप या गायकवृंद असेल तिथे हार्मोनियम, तबला वगैरे वाद्यांच्या साथीने गीतं गायली जातात. नाताळच्या आधी आठवडाभर कॅरोल सिंगर्स नाताळची गाणी गात ख्रिस्ती कुटुंबांच्या घरी भेटी देतात, तेव्हाही नामांकित कवींनी विशिष्ट रागांत रचलेली गायनं गायिली जातात. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील कॅथॉलिक चर्चमध्ये मराठी भाषकांसाठी खास वेगळी मिस्सा किंवा उपासना केली जाते. धर्मगुरू आशीर्वाद देतात तेव्हा सर्व महिला डोक्यावर पूर्ण पदर घेतात, त्याचप्रमाणे तामिळ किंवा मल्ल्याळी भाषकांसाठीही त्यांच्या भाषांत प्रार्थना केल्या जातात. याशिवाय इंग‘जी भाषेत होणार्‍या प्रार्थनेसाठी सर्वच भाषक नाताळला एकत्र जमतात.

विवाह समारंभाच्या बाबतीतही मराठी ख्रिस्ती समाजाने सुपारी फोडणे, साखरपुडा, हळद लावणे वगैरे परंपरा कायम ठेवल्या आहेत. यातही भारतीय आणि पाश्‍चिमात्य परंपरेची सांगड घातली जाते. युरोपियन पद्धतीनुसार चर्चमध्ये लग्नात नववधूने सफेद गाऊन घालण्याची परंपरा आहे. आपल्याकडे मात्र गाऊनऐवजी सफेद साडी नेसली जाते. मात्र, डोक्यावर पांढरा जाळीदार व्हेल (पडदा) आणि हातात पांढरे हातमोजे असतात. लग्नविधीनंतर रिसेप्शनला मात्र भारतीय परंपरेनुसार शालू हवाच. बिगरमराठी भाषक ख्रिस्ती समाजानेही अशाच प्रकारे दोन्ही संस्कृतींची सांगड घातलेली दिसते.

स्वातंत्र्यपूर्व काळत आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काही दशकांत गोव्यातील अनेक कॅथॉलिक कुटुंब पुणे कँपात स्थायिक झाली. त्यामुळे तिथे आणि नजीकच्या परिसरात सिटी चचर्च, सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रल आणि सेंट झेवियर्स ही देवळं उभारण्यात आली. दोन-अडीच दशकांपूर्वी गोव्यातील बार्देस तालुक्यातून अनेक ख्रिस्ती कुटुंबं नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील घाटावरील प्रदेशात स्थलांतरित झाली. त्या वेळी गोवा पोर्तुगीज अमलाखाली होता. इन्क्विझिशनच्या काळात नवधर्मांतरित ब‘ाह्मण आणि इतर जातींतील ख्रिस्ती समाजावर पाश्‍वात्य संस्कृती स्वीकारण्यासाठी अत्याचार झाल्यामुळे, प्लेगच्या साथीमुळे आणि इतर काही कारणांमुळे हे स्थलांतर झालं, असं म्हणतात. मात्र या दोन-अडीच दशकांत या बार्देस्कर समाजाने आपली गोमंतकीय संस्कृती आणि कोकणी भाषा जतन केली. धर्मगुरू नसतानाही ख्रिस्ती धर्माचं आचरण चालू ठेवलं. हा एक मोठा सामाजिक चमत्कारच म्हटला पाहिजे. गेल्या दोन-अडीच दशकांत घाटावरील हा बार्देस्कर समाज पुण्यात आणि चिंचवड इथे स्थायिक झाला आहे.

पुण्यातील तमिळ आणि मल्याळी ख्रिस्ती कुटुंबं पूर्वी कँपात छोट्याशा भाडोत्री घरात किंवा स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असत. गेल्या तीन दशकांच्या काळात जमिनींच्या किमती स्वमालकीची जागा विकून त्या बदल्यात मिळालेल्या रकमेत पुणे शहराबाहेर असलेल्या वानवडी वगैरे परिसरांत जागा घेऊन घ्ज्ञरं बांधली किंवा नवे फ्लॅट्स खरेदी केले. पुण्यातील सदाशिव, नारायण वगैरे पेठांतील वाडा संस्कृतीत राहणार्‍या लोकांनी जागा विकून शहराबाहेर म्हणजे कोथरूड परिसरात जागात किंवा फ्लॅट्स विकत घेऊन स्थलांतर केलं, अगदी तसाच हा प्रकार होता.

दरम्यान, याच काळात धर्मगुरू होऊ इच्छिणार्‍या उमेदवारांना प्रशिक्षण देणार्‍या ‘डी नोबिली कॉलेज’ आणि ‘पेपर सेमिनरी’ यासार‘या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था नगर रोडवर सुरू झाल्या. या संस्थांच्या अनुषंगाने अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील अनेक कुटुंबं नोकरी वा शिक्षणाच्या निमित्ताने रामवाडी, येरवडा आणि वडगाव शेरी या परिसरात स्थायिक झाली. खिस्ती समाजाचं प्राबल्य असलेल्या अनेक सहकारी गृहनिर्माण संस्था या परिसरात उभ्या राहिल्या आहेत. आज या परिसरात होणार्‍या महानगरपालिकेच्या निवणुकीत मतपेटीचा कौल फिरवू शकेल इतकी या समाजाच्या मतदाराची सं‘या आहे; या परिसरातील ख्रिस्ती समाजात मराठी भाषकांची सं‘या अधिक आहे, तर वानवडी, फातिमानगर आणि पुणे कँप परिसरात गोवन ख्रिस्ती कुटुंबांची सं‘या अधिक आहे. खडकी कँटोन्मेंट क्षेत्रात आणि शेजारच्या भागात तमिळ ख्रिस्ती कुटुंबांची सं‘या लक्षणीय आहे. केरळमधून अलीकडील काही वर्षांत स्थलांतरित झालेली कुटुंबं मात्र पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात विखुरलेली आहेत.

शहरातील गोवन समाजाने कुटुंबात, नातलगांत आणि मित्रांशी कोकणी भाषेत बोलून आपली ही भाषा जतन केली आहे. गोव्यात ख्रिस्ती धर्मप्रसारात महत्त्वाची भूमिका करणारे सेंट फान्सिस झेवियर हे या गोमंतकीय समाजाचं प्रमुख श्रद्धास्थान. या ‘गोयंच्या सायबा’चया 3 डिसेंबरच्या सणाला हा समाज चर्चमध्ये मोठ्या सं‘येने उपस्थित असतो. पुणे कॅम्पात ‘पूना गोवन इन्स्टिट्यूट’ इथे होणार्‍या अनेक सभा-समारंभांत शहरातील गोमंतकीय ख्रिस्ती समाज आवर्जून उपस्थित राहतो. ख्रिस्ती गोमंतकीय संस्कृतीतील अनेक उत्सव इथे उत्साहपूर्वक साजरे केले जातात. पुणे कॅम्पातील एम. जी. रोडपाशी काही दुकानं गोवन किंवा ख्रिस्ती समाजाच्या संस्कृतीशी निगडित असलेल्या विविध चालीरीत, स्नानसंस्कार किंवा पुण्यस्मरण यासार‘या विधींसाठी लागणारं विविध साहित्य, उपकरणं पुरवत असतात. नाताळपूर्वी तर कॅम्पातील अनेक दुकानं या सणासाठी अगदी सजलेली असतात. नाताळचा खास फील अनुभवण्यासाठी, त्या फेस्टिव्ह मूडमध्ये जाण्यासाठी अनेक बिगरख्रिस्ती कुटुंबं आपल्या लहान मुलांसह कॅम्पचा फेरफटका मारतात, तो केवळ यासाठीच.

जगभरात सर्व पसरलेल्या गोवन ख्रिस्ती कुटुंबांत सेंट फान्सिस झेवियर हे एक महत्त्वाचं श्रद्धास्थान असतं. गोव्यातील ‘बॉम जेसू बॅसिलिका’त या पंधराव्या शतकातील संतांच्या शरीराचे अवशेष आजही जतन करण्यात आले आहेत. पुण्यातील गोवन ख्रिश्‍चनांच्या या श्रद्धास्थानाकडे विशेष ओढा असतो. तर अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांतून पुण्यात आलेले ख्रिस्ती समाजातील हजारो लोक दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुसर्‍या शनिवारी-रविवारी हरेगावच्या मतमाउलीच्या सणाला आवर्जून जात असतात. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरजवळील या खेड्यात येशूची आई मारिया हिच्या जन्मतिथीनिमित्त ही यात्रा गेली सहा दशकं भरत आहे. लाखो लोक आकर्षित करणार्‍या या यात्रेमुळेच हरेगावला मराठी ख्रिस्ती समाजाची पंढरी असं संबोधलं जातं.

तमिळ ख्रिस्ती समाजात सेंट अँथनी या संताला विशेष मान दिला जातो. हा समाज या संताच्या सणाला शहरातील विविध चर्चमध्ये आवर्जून हजरत असतो. हरेगावला मतमाउलीचा सण साजरा होतो, त्याच दरम्यान पुण्यातील खडकी येथील सेंट इग्नेशियस चर्चमध्येही माता मारियेची यात्रा नऊ दिवस भरवली जाते. पुणे पिंपरी-चिंचवड परिसरातील ख्रिस्ती आणि इतरही भाविक या नऊ दिवसाच्या प्रार्थनेला - ‘नोव्हेना’ला उपस्थित असतात. या वेळी चर्चमधील मारियेच्या पुतळ्याला साडी चढवली जाते. हिंदू देवळांत ज्याप्रमाणे देवीला साडली नेसवली जाते, तीच परंपरा इथेही चालू ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे इथे साडीबरोबर नारळसुद्धा अर्पण केला जातो.

ख्रिस्ती धर्माचा प्रसार करताना स्थानिक संस्कृतीतील चांगल्या परंपरांचा स्वीकार करण्याची भूमिका अनेक ख्रिस्ती मिशनर्‍यांनी संपूर्ण जगभर घेतल्याचं दिसून येतं. मदुराई भागांत उच्चवर्णीय ब‘ाह्मणांमध्ये कार्य करणार्‍या सेंट रॉबर्ट डी नोबिली याने धर्मांतर केल्यानंतरही धर्मांतरीतांना डोक्याचं मुंडन करून शेंडी राखावयास आणि कपाळावर भस्म राखण्यास मुभा मिळवली. यासाठी त्याने अगदी रोमपर्यंत लढा दिला होता. गोव्यात सतराव्या शतकाच्या सुरुवातीला ‘ख्रिस्तपुराण’ हे मराठी महाकाव्य लिहिणार्‍या थॉमस स्टीफन्स या बि‘टिश धर्मगुरूने हिंदू धर्मातील अनेक संकल्पनांचा या महाकाव्यात वापर केला आहे. 

स्थानिक संस्कृतीतील काही चांगल्या परंपरांचा, रीतिरिवाजांचा ख्रिस्ती धर्मातही वापर करण्याच्या प्रथेला ‘सांस्कृतिकीकरण’ किंवा ‘इनकल्चरेशन’ असं म्हटलं जातं. कॅथॉलिक चर्चने गेल्या काही दशकांत या संकल्पनेचा हिरिरीने पुरस्कार केला आहे. यामुळेच पुण्यात किंवा महाराष्ट्रातही अनेक ख्रिस्ती धर्मगुरू आखपल्या पांढर्‍या झग्यावर खांद्यावर शाल गुंडाळून उपासना करताना दिसतात. अनेक मराठी ख्रिस्ती कुटुंबांत रक्षाबंधन, भाऊबीज वगैरे परंपरा आजही पाळल्या जातात. तमिळ आणि मल्याळी ख्रिस्ती समाजातही पोंगल आणि ओणम वगैरे सण उत्साहपूर्वक साजरे केले जातात.

पुण्यातील ख्रिस्ती समाजातील विविध घटकांनी आपली खास वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, चालीरीती ख्रिस्ती धर्मतत्त्वांशी तडजोड न करता अशा प्रकारे जतन केली आहे. भाषा, आहार अशा गोष्टींमध्येही या मंडळींनी आपली वैशिष्ट्यं जपली आहेत. ही जपणूक करताना ते पुण्याच्या स्थानिक संस्कृतीपासून वेगळे पडले नाहीत, तर या मंडळींच्या संस्कृतिवैविध्यामुळे पुण्याच्या संस्कृतीलाही नवीन आयाम मिळाले.

कामिल पारखे

Friday, July 24, 2020

Goa city bus travel



 गोव्यातील नवहिंद टाइम्स या दैनिकात खूप वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेले ते व्यंगचित्र मला अजूनही आठवते. गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचे त्याकाळात म्हणजे १९७७ साली मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले एक महाशय गोव्याच्या दाबोळी विमानतळावरील धावपट्टीवर ब्रिफकेस घेऊन पळत येत असतांना लांबूनच हात उंचावून 'राव रे!' असे म्हणतात आणि उड्डाणाच्या तयारीत असलेले ते विमान त्यांना घेण्यासाठी खरेच चक्क थांबते असे ते व्यंगचित्र होते. आदल्या दिवशी शिक्षणमंत्री राऊल फर्नांडीस या मंत्रीमहोदयांना विमानतळावर पोहोचण्यास उशीर झाला तेव्हा त्यांनी त्यांचे आगमन होईपर्यंत विमानच रोखून धरले होते, या घटनेवर आधारित सुबोध केरकर यांनी काढलेले ते व्यंगचित्र होते.
धेम्पे कॉलेजात मी हायर सेकंडरीला असताना नवहिंद टाइम्सच्या पान एकवर प्रसिद्ध झालेले ते व्यंगचित्र मला आज चाळीस वर्षांनंतरही ठळकपणे आठवते. याचे कारण म्हणजे `राव रे' ( 'अरे थांब रे) असे कोकणी भाषेत सांगताच थांबणारे ते विमान म्हणजे गोव्याची खासियत असलेल्या खासगी सिटी बस सेवेवरची ती एक मजेदार टिपण्णी होती !
पोर्तुगिजांची सत्ता संपवून गोवा १९६१ च्या डिसेंबरात भारत संघराज्यात सामील झाला तेव्हापासून गोव्यामध्ये खासगी बस वाहतूक आहे. या खासगी बस वाहतुकीचा या व्यंगचित्राला संदर्भ होता. गोव्यातील या खासगी बस वाहतुकीचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही रस्त्यावर, एखाद्या टोंक रस्त्यावर म्हणजे तीन रस्ते मिळतात तिथे, चौकात किंवा अगदी रस्त्यापाशी असलेल्या तुमच्या घरापाशी थांबून तुम्ही 'राव रे!' अशी हाक दिली की नागमोडी रस्त्यावर कितीही वेगात असलेली ही खासगी बस तुमच्यासाठी हमखास थांबते.
गोव्याच्या बहुतेक सर्व खेड्यांत सर्व घरांची रचना रस्त्यालगत असते यामुळे हे सहजशक्य होते. प्रवाशांसाठी कुठेही आणि कितीही वेळेपर्यंत थांबणाऱ्या गोव्याच्या या बसबद्दल त्यामुळे अनेक गंमतीदार घटना होतात. उदाहरणार्थ, घरातून कुटुंबातील दुसरी व्यक्ती येईपर्यंत दारासमोर असलेली बस थांबून राहू शकते ! खरे म्हणजे 'राव रे' अशी साद देणारे कुणी प्रवाशी रस्त्यावर आहेत का याचीच बसचे ड्रायव्हर आणि कंडक्ट्रर असे दोघेही टेहेळणी करत असतात. आपल्या घराच्या दारापाशी रस्त्यावर सामान घेऊन बसची पाहत असलेले कुणीही लांबूनही प्रवाशी दिसले कि हाक नाही मारली तरी ड्रायव्हर सवयीने बसचा वेग कमी करुन त्या प्रवाश्यांपाशी थांबत असतो. तुम्हाला तुमच्या सामानासह आत घेतल्यानंतर, सामान ड्रायव्हरच्या शेजारच्या जागेत कोंबल्यावर बसचा कंडक्टर मग पिल्लुक मारतो (शीळ घालतो) आणि ड्रायव्हर मग बस पुढे नेतो. बसमधील कुणा प्रवाशानेही 'राव रे !' असे म्हटले की त्याच्या घरापाशी व इतर इच्छित स्थळी बस थांबते. प्रवाशी घेण्याचा आणि उतरविण्याचा हा सिलसिला बसचा अखेरचा स्टॉप येईपर्यंत चालू राहतो.
भारतातील ज्या मोजक्या राज्यांत आणि शहरांत खासगी प्रवासी सिटी बस वाहतूक चालते, त्यामध्ये गोव्याचा समावेश होतो. गोवा हे एक स्वतंत्र राज्य असले तरी या राज्याचा भौगोलिक आकार अगदी छोटा म्हणजे महाराष्ट्रातील अहमदनगरसारख्या मोठ्या जिल्ह्यासारखा असल्याने तेथील सातआठ शहरांत आणि गावोगावी धावणाऱ्या बसेस तशा सिटी बसेसच. यातील फार लांब पल्ल्यांच्या बसच्या प्रवासाचा म्हणजे पणजी ते मडगाव व वास्को ते पणजी यादरम्यानचा प्रवास साधारणतः एका तासाच्या आसपास असतो ! या दीर्घ आणि छोट्या पल्ल्याच्या बस वाहतुकीतून गोमंतकीय संस्कृतीचे एक आगळेवेगळे दर्शन घडत असते. गोव्यात शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण आणि नंतर नोकरीनिमित्त अनेक वर्षे वास्तव्य करूनही आजही या संस्कृतीचे दर्शन मला आकर्षित करत असते.
पणजी, म्हापसा, पोंडा, वॉस्को, काणकोण किंवा मडगाव शहरांत बसस्टँडवार तुम्ही पोहोचला की वेगवेगळ्या दिशेने जाणाऱ्या बसचे कंडक्टर तुम्हाला 'पोणजे मार्केट, मिरामार- डोना पावला', 'पोरवोरीम-म्हापसा', 'मडगाव-पोणजे', 'ओल्ड गोवा-मंगेशी- पोंडा' वॉस्को -मडगाव ,असे ओरडत प्रवाशांना आकर्षित करत असतात. बस अगदी खचाखच भरल्याशिवाय बसस्टँड सोडत नाही आणि वाटेवरही प्रवासी घेतच राहते. प्रवाशांकडे सामान असले तर हे कंडक्टर ते सामान ड्रायव्हरच्या केबिनमध्ये ठेवण्यासही मदत करतात.
गोव्यामध्ये हिंदू आणि ख्रिस्ताव हे दोन प्रमुख समाज. त्याचे प्रतिबिंब बसमध्ये ड्रायव्हरच्या केबिनमध्ये दिसते. कधी बसमालक ख्रिस्ती असतो तर ड्रायव्हर हिंदू असतो किंवा याउलट असते. त्यामुळे येशू ख्रिस्त आणि मदर मेरीच्या फोटोबरोबरच ड्रायव्हरच्या पुढयात मंगेशाची किंवा साईबाबांची छोटीशी प्रतिमा किंवा पुतळा असतो. केबिनमध्ये अगरबत्तीचा वास दरवळत असतो. त्याचबरोबर शेजारच्या येशू आणि मदर मेरीच्या (सायबिणीच्या) आणि गोयंचो सायबा असलेल्या संत फ्रान्सिस झेव्हियरच्या फोटोंसमोरील वायरीने जोडलेली मेणबत्तीही कायम तेवत असते. यात कुणालाही विसंगती भासत नाही वा कुणाच्या धार्मिक श्रध्दाही दुखावल्या जात नाहीत !
गोव्यातील खासगी बस वाहतुकीसाठी पैसे मोजावे लागत असले तरी प्रवाशांना तिकिटे मात्र दिली जात नाहीत. प्रवाशांनी गच्च भरलेल्या बसमध्ये कंडक्टरची बस ड्रायव्हरशी संवाद साधण्याची खास कला अनुभवायलाच हवी. बसमध्ये या दारापासून तो दुसऱ्या दारापर्यंत जात तिकिटांचे पैसे गोळा करत कंडक्टर सारखे 'यो रे' 'चोल रे' 'वोस रे' असे बोलत ड्रायव्हरला सूचना देत असतो. एका हातात नोटा घेऊन दुसऱ्या हाताची दोन बोटे तोंडात घालून वेगवेगळ्या प्रकारची शीळ घालून कंडक्टर ड्रायव्हरला थांबण्याचे वा पुढे निघण्याचे इशारे देत असतो. असे सांकेतिक इशारे देण्यासाठी शिटी वापरणारा कंडक्टर क्वचितच दिसतो. त्याशिवाय अधिकाधिक प्रवाशी मिळवण्यासाठी बसच्या ड्रायव्हरची आणि कंडक्टरची दुसऱ्या बसशी सतत स्पर्धा चाललेली असते. पणजी-मिरामार -दोनापावला अशा छोट्या अंतराच्या मार्गांवर वीसपंचवीस प्रवाशांसाठी मिनीबस असतात , या बसमध्ये एकच कंडक्टर असतो, लांब पल्ल्याच्या बसमध्ये शक्यतो दोन कंडक्टर असतात.
गोव्यात बहिणीकडे सुट्टीसाठी एकटा गेलो की प्रवासासाठी माझी प्रथम निवड हे तेथील बससेवाच असते. गोव्यात अनेक वर्षे राहिल्याने तेथे गेल्यावर मी फार हिंडत नसतो. पणजी ते म्हापसा, ओल्ड गोवा-मंगेशी आणि क्वचित मडगाव आणि मिरामार-डोना पावला इथपर्यंत माझा प्रवास असतो. त्याशिवाय शाळेत शिकवणाऱ्या माझ्या बहिणीची बदली चार-पाच वर्षांनी दक्षिण किंवा उत्तर गोव्यातील ज्या गावी होईल तेथेही जाणे होतेच.
सत्तरच्या दशकात पणजी शहरातील मुख्य बसस्टॅण्डवरील बहुतेक मार्गावरील सिटी बससेवा संध्याकाळी सातला बंद व्हायच्या. संध्याकाळी सातनंतर गोव्याची राजधानी असलेली पणजी एकदम सामसूम व्हायची. त्यामुळे पुण्यातून पणजीला जाणारी महाराष्ट्राची स्टेट ट्रान्सपोर्ट एस टी बस पुणे स्टेशनहून पहाटे चारला निघायची. याचे कारण म्हणजे ही बस पणजीला सूर्यास्ताआधी म्हणजे सिटी बसवाहतूक बंद होण्याआधी पोहोचायला हवी. मी असा प्रवास दोनतीन वेळेस केलेला आहे. कलंगुट आणि बागा या समुद्रकिनाऱ्याला गेल्यानंतर तेथून संध्याकाळी पाचच्या आत म्हापशाच्या दिशेने बस पकडावी लागायची अन्यथा या बीचवर रात्रभर अडकून राहावे लागत असे, आणि त्याकाळी या समुद्रकिनाऱ्यावर हॉटेलसुद्धा नव्हती यावर आज अनेकांचा विश्वास बसणार नाही.
गोव्यात पर्यटनासाठी पहिल्यांदाच जाणाऱ्या लोकांना गोव्याची तोंडओळख करून घेण्यासाठी मी त्यांना दोन दिवसांच्या 'गोवा दर्शन' टूरमध्ये सहभागी होण्याचा सल्ला देत असतो. या दोन दिवसांत उत्तर आणि दक्षिण गोवा असे पूर्ण गोवा राज्यातील सर्व प्रमुख पर्यटनस्थळे, मंदिरे, चर्चेस, समुद्रकिनारे वगैरे प्रेक्षणीय स्थळे दाखविली जातात. पहिल्या भेटीतच लोक गोव्याच्या प्रेमात पडतात. त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या गोवा भेटीनंतर कुणाचाही अशा धावत्या दौऱ्याचा उत्साह कमी होतो आणि गोव्याची संस्कृती विविध अंगांनी पाहण्याची, अनुभवण्याची इच्छा निर्माण होते. अशा लोकांनी मग स्वतःच्या दुचाकीवर किंवा चारचाकीने गोवा भटकंतीवर अवश्य जावे. मात्र निदान एकदातरी गोव्यातील प्रवासी बसने हिंडायालाच हवे,असा माझा मित्रमंडळींना आग्रहवजा सल्ला असतो ! या बस प्रवासात गोव्याच्या संस्कृतीची अनेक रूपे दिसून येतात हे या माझ्या आग्रहामागचे मुख्य कारण असते.
आजकाल उबर आणि ओला टॅक्सीच्या जमान्यात दुसऱ्या शहरात सहसा कुणी सिटी बसने प्रवास करण्याच्या फंदात पडणार नाही. पण दुसऱ्या देशातील, शहरातील संस्कृती जवळून अनुभवण्यासाठी स्थानिक सार्वजनिक वाहतूक सेवेसारखा दुसरा पर्याय नाही. युरोपच्या दौऱ्यात असताना यासाठीच रोम शहरात मी कुटुंबासह सिटी बसने आणि ट्रॅमने प्रवास करायचो. 'व्हेन इन रोम, डू ऍज रोमन्स डू' या उक्तीनुसार हे वागणे होते. या बस आणि ट्रॅम प्रवासात रोमवासी काही वर्तनाच्या बाबतींत अगदी आपल्या भारतीयांसारखेच आहेत याचे काही गंमतीदार अनुभव मिळाले. पॅरीसमध्ये मेट्रोने प्रवास करताना गर्दी नसतानाही एका चोराने स्टेशनवर उतरताना आमचे पाकिट मारले आणि तिथल्या एका वेगळ्याच संस्कृतीची आम्हाला चुणूक दाखविली.
गोव्यात मी इतरांबरोबर असलो की या लोकांना मी हमखास बसचा एकतरी प्रवास घडवतो. दोन वर्षांपूर्वी `सकाळ टाइम्स'चे जुळे प्रकाशन असलेल्या गोमंतक टाइम्सच्या कामासाठी आम्ही काही जण सांत इनेजला गोमंतक भवन मध्ये उतरलो होतो. सकाळी तेथून १८ वा जून रस्त्याने चालत भाजीपाव आणि मिरचीभजे खाण्यासाठी आझाद मैदानापाशी गेलो आणि येताना त्यांना मी हॉटेल मांडवी येथून कला अकादमीपर्यंत बसने आणले.
धेम्पे कॉलेजात मी हायर सेकंडरीला असताना ऑल गोवा स्टुडंट्स युनियनने ( अगसू) विद्यार्थी संघटनेने या खासगी बसमध्ये विद्यार्थ्यांना पन्नास टक्के प्रवास भाडे सवलत मिळावी म्हणून आंदोलन केले होते. सतीश सोनक आणि मनोज जोशी हे आंदोलनाचे नेते होते. या आंदोलनाच्या वेळी पोर्तुगीज सत्तेतून मुक्त होऊन भारतात समाविष्ट झालेल्या गोव्यात पहिल्यांदाच खळखट्याक आवाज झाला ! आंदोलन यशस्वी होऊन विद्यार्थ्यांना प्रवासभाडे सवलत मिळाली ती आतापर्यंत चालू आहे. त्याकाळात म्हणजे १९७८ साली पणजी मिरामार प्रवास भाडे पंचवीस पैसे होते, या आंदोलनानंतर आम्हा विद्यार्थ्यांसाठी हे प्रवासभाडे तेरा पैसे इतके झाले हे आजही आठवते.
मी कॉलेजला शिकत असताना काही संघटनांनी गोव्यत खासगी बस वाहतूकसेवा बंद करुन सरकारी बस वाहतूक सेवा करावी अशी मागणी केली होती. या मागणीचे समर्थन करणाऱ्या रोलंड मार्टिन या विद्यार्थी नेत्याशी माझा नेहेमी वाद व्हायचा. महाराष्ट्रातील त्याकाळच्या बस वाहतुकीच्या अनुभवावरुन आणि गोव्यातील प्रवासीभिमुख खासगी बस सेवेमुळे माझा बस वाहतुकीच्या सरकारीकरणास ठाम विरोध असायचा. अलिकडच्या काळात कोलकाता आणि इतर काही शहरांत खासगी बसने प्रवास करण्याचा प्रसंग आला आणि ते अनुभव फारसे सुखावह नव्हते.
प्रतापसिंग राणे मुख्यमंत्री असताना १९८०च्या दशकांत गोव्यात सरकारी बस वाहतूक सुरू करण्यात आली. त्यासाठी कदंब वाहतूक महामंडळ स्थापन करण्यात आले. गोव्यात एके काळी कदंब घराण्याची राजसत्ता होती. म्हणून कदंब हे नाव ! कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन हे मुख्यमंत्री राणे यांच्या या आवडत्या अपत्याने मात्र बाळसे असे कधीच धरले नाही. कदंब वाहतूक महामंडळाची स्थापना होऊन चाळीस वर्षे उलटून गेली तरी आजही आजसुद्धा अगदी थोडयाच मार्गांवर निळ्या-पांढऱ्या रंगाच्या कदंब बस धावत असतात. सरकारी मालकीच्या असलेल्या या बसमध्ये प्रवाशांना तिकिटेही दिली जातात. पणजी-म्हापसा अशा ठराविक काही मार्गांवर विनावाहक तत्त्वावर कदंब बसेस चालतात. या बसमध्ये तुम्हाला बसायला जागा मिळू शकते, मात्र फेऱ्यांचे प्रमाण कमी असल्याने प्रवासी भरगच्च भरलेल्या खासगी बसचाच पर्याय निवडतात.
या खासगी बससेवेचा एक तोटा म्हणजे बस अगदी भरुन गेल्याशिवाय बसस्टॅण्ड सोडत नाही. कंडक्टरला फूटबोर्डवर जेमतेम पाय टेकवता येईल इतकी बस भरली की मगच बस पुढे ढळते . याउलट कदंब बस अगदी ठराविक वेळापत्रकानुसार सुटतात. मात्र कदंबाचे पगारदार ड्रायव्हर आणि कंडक्टरसुद्धा प्रवाशी आकर्षित करण्याचे प्रयत्न करतात हे मान्य करायला हवे.
गोव्यातील नागमोडी वळणाच्या अरुंद रस्त्यांवरून या खासगी बस आणि मिनीबस जातात, तेव्हा ड्रायव्हरच्या कौशल्याला दाद द्यावी लागते. एखादया टोंकापाशी (तीन रस्ते मिळतात ती जागा) बस थांबते तेव्हा कुणी प्रवासी आपल्या घरापासून येतो आहे काय याकडे ड्रायव्हर आणि कंडक्ट्रर या दोघांचेही लक्ष असते. त्याचवेळी मागून येणारी बस ओव्हरटेक करून पुढचे सर्व प्रवासी घेणार नाही याचीही त्यांना काळजी घ्यावी लागते. एखादी महिला सामानासह लांबून येताना दिसली की कंडक्ट्रर ड्रायव्हरला थांबण्याचा इशारा करतो. 'ये गो, बेगीन यो !' असे त्या महिलेलाही सांगतो. गोव्यात कोकणीत लहान-मोठयांशी एकेरीतच बोलले जाते. अगदी मुख्यमंत्री किंवा कुणाही मोठ्या व्यक्तीला आदरयुक्त स्वरात पण एकेरीतच 'तू बस हांगा!' असेच म्हटले जाते. कोकणी भाषेतला हा खास गोडवा ! प्रवाशांना बसमध्ये घेत असताना त्याचवेळी मागची बस ओव्हरटेक करुन पुढे उभे राहिलेले प्रवाशी घेणार तर नाही ना याची काळजी कंडक्ट्ररला असते. दररोजच्या फेऱ्यांमधून अधिकाधिक पैसा गोळा करण्यासाठी ड्रायव्हर आणि कंडक्ट्रर यांच्यामध्ये सुसूत्रता असते महत्त्वाचे असते.
प्रवाशांचे अवजड सामान ड्रायव्हरच्या केबिनमधील मोकळ्या जागेत ठेवले जाते. ज्येष्ठ नागरीकांचे आणि इतरही प्रवाशांचे सामान घेऊन ते ड्रायव्हरच्या शेजारच्या मोकळया जागेत ठेवण्यात कंडक्ट्रर मदत करतो. जास्तीत जास्त प्रवासी मिळवून उत्पन्न वाढवण्याचा प्रत्येक ड्रायव्हर अन कंडक्ट्रर प्रयत्न करत असतो त्यामुळे प्रवाशांना ही व्हीआयपी वागणूक !
गोव्यातील सिटी बसमधील पुढच्या निम्म्या जागा महिलांसाठी राखीव असतात. प्रवास सुरु झाला कि थोड्या वेळाने कंडक्ट्रर प्रवाशांकडून तिकिटाचे पैसे गोळा करू लागतो. तिकीट अर्थांतच नसते. बसमध्ये खूप गर्दी असली तर प्रत्येक स्टॉपवर बसमधून खाली उतरून कंडक्टर उतरणाऱ्या प्रवाश्यांकडून तिकिटाचे पैसे गोळा करत असतो. हा विश्वासाचा मामला असतो. या बसमध्ये तिकीट नसले तरी त्यामुळे तिकिटाचे पैसे न दिल्याबद्दल वाद कधी होत नाहीत हे विशेष. हा, `मोडचे' म्हणजे सुट्टे पैसे नसले तर गडबड होऊ शकते.
गोव्यातील प्रवासी वाहतुकीचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे तेथील पायलट दुचाकी सेवा. तुम्ही पोणजे प्रासा किंवा पणजी आंतरराज्यीय बसस्टँडवर पोहोचला की पिवळ्या रंगाचे मडगार्ड असलेल्या मोटारसायकलींवरील पायलट तुम्हाला कुठे जायचे आहे असे विचारतील. अशा मोटारसायकल रिक्षा भारतात केवळ गोव्यातच असाव्यात.
खूप वर्षांपूर्वी म्हणजे १९७० आणि १९८०च्या दशकांत मी पणजीला शिकत असताना हे मोटारसायकल पायलट गोव्यात सगळ्या शहरांत चौकाचौकात आणि मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठया संख्येने दिसायचे. माझ्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनाच्या काळात गोव्यात शेकडो युवकांना आणि इतरांना मोटारसायकल पायलटच्या सेवेने रोजगार मिळवून दिला होता. कर्जावर घेतलेल्या राजदूत आणि इतर मोटारसायकल एव्हढीच काय त्यांची यासाठी आर्थिक गुंतवणूक असायची. एखादी साडीवाली, फ्रॉकवाली किंवा स्कर्टधारी महिला मासे आणि भाजीपाला घेऊन पणजी मार्केटबाहेर आली की एखादा पायलटच्या दुचाकीवरून मिरामार, अल्तिनो किंवा सांत इनेजला जाई.
त्याकाळात या छोट्याशा अंतरासाठी किमान दहा रुपये भाडे असायचे. कामावर किंवा इतर कुठे जाणारी पुरुषमंडळी छोटया अंतरावर जाण्यासाठी या मोटारसायकल पायलट सेवेचा वापर करत. एका व्यक्तीसाठी तीनआसनी रिक्षापेक्षा मोटारसायकल पायलट सेवा अधिक स्वस्त असायाची. तीन -आसनी रिक्षा त्याकाळात प्रामुख्याने पर्यटकच वापरायचे.
दोन वर्षांपूर्वी थायलंडच्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत जगभरातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर सकाळ टाइम्सचा वार्ताहर म्हणून मी उपस्थित होतो. तेथे बँकॉक येथे सकाळी चौकाचौकात शाळकरी मुले-मुली अशाच मोटारसायकल पायलटबरोबर शाळेत जाताना दिसली आणि गोव्याच्या अशाच आगळ्यावेगळ्या प्रवाससेवेची आठवण झाली. का कुणास ठाऊक पण गेल्या काही वर्षांत या मोटारसायकल पायलटांची संख्या अख्ख्या गोव्यात खूपच कमी झाली आहे.
मात्र अलीकडच्या काळात प्रवासी दुचाकीची एका नवी सेवा गोव्यात सुरू झाली आहे. तुमच्याकडे पॅनकार्डसारखा ओळखपत्र पुरावा असला की तुम्हाला एखादी दुचाकी दिवसाला साडेतीनशे किंवा चारशे रुपयांस भाडयाने मिळू शकते. मागे एकदा मी एका पेट्रोलपंपावर उभा होते तेव्हा पेट्रोल भरणाऱ्या युवकाने विचारले, 'गोव्यात फिरायला आला का?' भाडेतत्त्वावर दिल्या जाणाऱ्या दुचाकीचे मडगार्ड व्यावसायिक वाहनाचे म्हणजे पिवळ्या रंगाचे असल्याने मी पर्यटक आहे हे त्याने ओळखले होते !
कोरोनाचा सद्याचा लॉकडाऊन संपला कि गोव्याचा दौरा करायला उत्सुक असणाऱ्या लोकांनी एकदा तरी गोव्याच्या या सिटी बसमध्ये प्रवास करायलाच हवा

Friday, April 26, 2019

महाराष्ट्रातील ख्रिस्ती मतदारांचा कौल कुणाला?

महाराष्ट्रातील ख्रिस्ती मतदारांचा कौल कुणाला?

पडघम - राज्यकारण 
कामिल पारखे
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Mon , 22 April 2019
  • पडघमराज्यकारणख्रिस्ती समाजChristian SocietyगोवाGoaवसईVasaiअहमदनगरAhmednagar
महाराष्ट्राच्या लोकसंख्येत ख्रिस्ती समाजाचे प्रमाण अवघे दोन टक्के आहे! लोकसंख्येच्या प्रमाणात राज्यातील ख्रिस्ती समाजाची सर्वाधिक संख्या आहे ती कॉस्मोपॉलिटन मुंबई आणि या महानगराच्या उपनगरांत. याचे कारण म्हणजे पोर्तुगीज संस्कृतीचा वारसा असलेला मूळचा गोवन आणि त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यातील वसईचा कॅथॉलिक समाज इथे मोठ्या संख्येने स्थायिक आहे. तसेच दक्षिणेतील कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट पंथीय केरळी, तामिळ, तेलुगू, बंगाली, कारवारी, मँगलोरीयन ख्रिस्ती समाज आणि पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व इतर प्रदेशातील लोक मुंबई आणि नजीकच्या परिसरात असल्याने तेथील अनेक विधानसभा-लोकसभा मतदारसंघांत ख्रिस्ती समाजाची मते निर्णायक नसली तरी महत्त्वाची ठरू शकतात.
मुंबईखालोखाल ख्रिस्ती समाजाचे सर्वाधिक प्रमाण वसई तालुक्यात आहे. वसईत पोर्तुगीजांची सत्ता होती. पोर्तुगीजांच्या ताब्यातील आणि चिमाजीअप्पांनी चढाई केलेला वसईचा किल्ला अजूनही एक महत्त्वाचे ऐतिहासिक पर्यटनस्थळ आहे. वसईच्या या पोर्तुगीजांनीच मुंबई बेट इंग्रजांना लग्नात आंदण म्हणून दिले आणि हिंदुस्थानात इंग्रजी सत्तेचा शिरकाव झाला, हा इतिहास आहे. वसई तालुक्यात सर्वच खेड्यापाड्यांत कॅथॉलिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तेथे फिरताना चौकाचौकांतील क्रूस आणि मदर मेरीचे पुतळे पाहून नवागताला गोव्यात आल्याचा आभास होतो.
यामुळेच व्हॅटिकनने या तालुक्यासाठी १९९८ साली खास नवा धर्मप्रांत स्थापून तेथे थॉमस डाबरे या भूमिपुत्राची बिशप म्हणून नेमणूक केली होती. भौगोलिकदृष्ट्या भारतातील हा एक अगदी छोटा धर्मप्रांत! येथील ख्रिस्ती लोकांची स्वत:ची वेगळी बोलीभाषा आहे, आगळीवेगळी संस्कृती आहे. दोन दशकांपूर्वी अल्पसंख्याकांचा प्रतिनिधी महाराष्ट्र मंत्रिमंडळात हमखास असे. त्या काळी वसईतून किंवा मुंबईतून निवड झालेल्या ख्रिस्ती आमदाराची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात निवड होत असे.  
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
मुंबई आणि वसाईखालोखाल पुणे जिल्ह्यात आणि त्यापाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यात ख्रिस्ती समाजाची संख्या लक्षणीय आहे. पुणे जिल्ह्यातील ख्रिस्ती समाज मुंबईप्रमाणेच स्थलांतरित कुटुंबांचा आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातून कामधंद्यानिमित्त मोठ्या संख्येने पुणे आणि पिंपरी चिचंवड या उद्योगनगरीत स्थलांतरित झाले आहेत. याशिवाय या ख्रिस्ती समाजात गोवन, मूळचा गोवन असलेला सीमाभागेतील बार्देसकर समाज, मल्याळी, तामिळ वगैरे लोकांची संख्या लक्षणीय आहे. अहमदनगर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांतल्या काही ठिकाणी महापालिकेच्या निवडणुकीत या समाजाचे मतदान निर्णायक ठरू शकते अशी परिस्थिती आहे.  
अहमदनगर शहर आणि जिल्हा हे महाराष्ट्रीयन ख्रिस्ती जनतेचे ‘जेरुसलेम’ मानले जाते, इतके या परिसराचे या समाजाशी ऋणानुबंध आहेत. याचे कारण दोनशे वर्षांपूर्वी येथे प्रथमच मोठ्या प्रमाणात धर्मांतर होऊ लागले आणि धर्मांतराची ही लाट अनेक दशके चालू राहिली. त्याचे लोण नंतर शेजारच्या गोदावरीच्या तीरावरील औरंगाबाद जिल्ह्यात पसरले. त्यामुळेच या दोन जिल्ह्यांत गावोगावी चर्च आढळतात. या चर्चतर्फे मराठी-इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि दवाखाने चालवले जातात.  
मराठवाड्याच्या लातूर वगैरे जिल्ह्यातही ख्रिस्ती समाज आहे. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे सप्टेंबरच्या दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या मतमाऊलीच्या म्हणजे मारियामातेच्या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाज लाखोंच्या संख्येने येतो, तेव्हा मराठी ख्रिस्ती समाजाचे राज्यातील अस्तित्व, जनसंख्येचे प्रमाण आणि संभावित व्होट बँक यांचा थोडाबहुत अंदाज येतो. मतमाऊलीच्या यात्रेच्या वेळी मारियामातेच्या दर्शनाला फुले-हार आणि मेणबत्त्या घेऊन येणारे विविध पक्षांचे स्थानिक राजकीय पुढारी ढोल-ताशांच्या गजरात आपल्या आगमनाची वर्दी जमलेल्या गर्दीला करून देता असतात ते यामुळेच. 
पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील ख्रिस्ती जनता पूर्वाश्रमीची दलित असली तरी रिपब्लिकन पक्षांशी वा दलित चळवळीशी क्वचितच एकरूप झाली. दलित वर्गांतून ख्रिस्ती झालेली जनता अनेकदा ‘जय भीम’ आणि ‘जय ख्रिस्त’ या संबोधनाच्या पेचात अडकलेली असते. दादासाहेब रूपवतेंच्या काळात पहिल्यांदाच राज्यातील सत्ताधारी पक्षाला अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील एक व्होट बँक म्हणून ख्रिस्ती समाजाची ओळख पटली होती. नंतर मात्र हा समाज विशिष्ट पक्षाच्या दावणीला जुंपला गेला किंवा गृहित धरला गेला. राज्यातील प्रत्येक जातीजमातीला राजकीय नेतृत्व लाभले, तसे या समाजाचे  झाले नाही. त्यामुळे कदाचित असे झाले असेल.  
महाराष्ट्राच्या सीमेच्या असलेल्या कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि कर्नाटकातील बेळगाव या जिल्ह्यांत बार्देस्कर समाज या नावाने ओळखला जाणारा एक वेगळाच ख्रिस्ती समाजघटक आहे. घरांत कोकणी भाषा बोलणाऱ्या आणि डिसोझा, फर्नांडिस, गोन्सालवीस अशी पोर्तुगीज धाटणीची आडनावे धारण करणारा हा समाज मूळचा गोव्यातील बार्देस या तालुक्यातील. अठराव्या शतकामध्ये पोर्तुगीज राजवटीत बार्देस तालुक्यातील अनेक ख्रिस्ती कुटुंबांनी ब्रिटिश इंडियातील सीमाभागांत स्थलांतर केले आणि तेथेच आपले मूळ धरले. तेथे शेतजमिनी घेतल्या, मासेविक्रीचा व्यवसाय केला. मात्र गेली दोन-तीन शतके या बार्देस्कर मंडळींनी गोव्यातील आपल्या मूळ गावाशी, तेथील जमीनजुमल्याशी आणि कोकणी भाषेशीही फारकत घेतलेली नाही हे विशेष.
त्यांच्या गोवा या  मूळ वतनभूमीत मात्र त्यांची संभावना ‘घाटी’, ‘घाटावरचे’ अशीच केली जाते! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण तालुक्यांत आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड, इचलकरंजी तालुक्यांत बार्देस्कर समाजाची संख्या लक्षणीय आहे. या तालुक्यातील जुनी चॅपेल्स आणि चर्च शंभर-दोनशे वर्षांची जुनी आहेत. सीमाभागातील ही बार्देस्कर मंडळी खरे तर समाजशास्त्रज्ञांसाठी आणि कोकणी-मराठी भाषाअभ्यासकांसाठी संशोधनाचा विषय ठरू शकतात. या बार्देस्कर मंडळींपैकी अनेकजण आज पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबईत स्थायिक झाले आहेत.      
महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाज असा विविध शहरांत आणि जिल्ह्यांत विभागला आहे. एकच धर्म असलेला हा समाज कॅथॉलिक, प्रोटेस्टंट, ऑर्थोडॉक्स वगैरे पंथांत विभागला आहे. या समाजातील विविध प्रदेशांतील विविध समाजघटकांची संस्कृती, जीवनशैली, आर्थिक राहणीमान, भाषा आणि बोलीभाषाही विभिन्न आहेत. त्याचप्रमाणे मूळ हिंदू धर्मातील अठरापगड जातीजमाती पोटजाती ख्रिस्ती मानल्या जाणाऱ्या लोकांतही असतात. उदाहरणार्थ, सारस्वत, नायर, नंबुद्रीपाद, रेड्डी, महार, मातंग, भंडारी, क्षत्रिय, चर्मकार वगैरे वगैरे. आपल्या महाराष्ट्रात कांबळे, केळकर, टिळक, सोनकांबळे, वाघ, बनसोडे वगैरे ख्रिस्ती आडनावांवरून जाणकारांना त्यांच्या मूळ जातीचा लगेच संदर्भ लागतो, त्याचप्रमाणे गोन्सालवीस, मॅथ्यू, अब्राहाम, थॉमस, फर्नांडिस, नायडू, वर्गिस  संगमा, मुंडा या नावावरून त्या ख्रिस्ती व्यक्तीची मूळ प्रादेशिक पार्श्वभूमी चटकन लक्षात येते. 
वसईतील ख्रिस्ती समाजाचे लातूरच्या वा अहमदनगरच्या ख्रिस्ती समाजाशी किंवा मालवणच्या बार्देस्कर समाजाशी कुठलेच साम्य नाही. तसेच गोवन ख्रिस्ती लोकांचे तामिळ व मल्याळी ख्रिस्ती लोकांशी रोटीबेटीचे व इतर कसलेही संबंध नसतात. अगदी एकाच शहरात राहणारे हे लोक एकाच चर्चमध्ये दर रविवारी प्रार्थनेसाठी एकत्र येत असले तरीसुद्धा! एवढी वैविधता आणि विरोधाभास देशातील इतर कुठल्याही धार्मिक समुदायात आढळणार नाही. हा विरोधाभास असूनसुद्धा इतरांच्या म्हणजे बहुसंख्य समाजाच्या दृष्टिकोनातून हा ख्रिस्ती समाज हा एकगठ्ठा, एकजिनसी एक धार्मिक समूहच असतो. याचे कारण बहुतेकांना ख्रिस्ती धर्माच्या वैश्विक स्वरूपाची आणि त्याचप्रमाणे पंथीय भेदांची माहिती नसते. त्यामुळे अनेकदा काही विचित्र प्रसंग आणि गंमतीजमतीही होतात.  
तर असा हा महाराष्ट्रातील अठरापगड जातीजमातींचा, विभिन्न भौगोलिक संस्कृतींचा, वेगवेगळ्या बोलीभाषा आणि भाषा बोलणाऱ्या आणि विविध पंथांच्या ख्रिस्ती समाजाला देश वा महाराष्ट्र पातळीवरच्या निवडणुकीच्या संदर्भात व्होट बँक म्हणून एक समुदाय म्हणून संबोधता येईल काय? देशात लोकसंख्येच्या दोनअडीच टक्के प्रमाण असल्याने या समाजाला राजकीय पक्षांना दुर्लक्षित करता येणे शक्य नाही, हे अनेकदा दिसून आले आहे. मनोहर जोशी लोकसभेचे सभापती असताना त्यांच्या मुंबई लोकसभा मतदारसंघातून २००४ साली अल्पमतांच्या फरकाने निवडणूक हरले, तेव्हा त्या मतदारसंघात काही भागात लक्षणीय संख्या असलेल्या ख्रिस्ती मतदारांची नाराजी त्यांना भोवली, असा जाहीर ठपका त्यावेळी ठेवण्यात आला होता  
ख्रिस्ती समाजात प्रचंड वैविधता असली तरी त्यांना एकत्र गुंफणारे काही समान धागे आहेत. देशातील बहुसंख्य ख्रिस्ती समाज हा पूर्वाश्रमीच्या मागासवर्गीय आणि ईशान्य राज्यांत आदिवासी समाजांतून आला आहे. त्यांचे सण आणि उपासनापद्धती आणि अगदी आहारसुद्धा (मांसाहार आणि बीफसेवन) सर्वसाधारणपणे समान आहे. देशांत विविध ठिकाणी संघ परिवाराच्या माध्यमातून होणाऱ्या हल्ल्यांचे हा समाज लक्ष्य बनलेला आहे. या सगळ्या बाबींचा परिपाक म्हणून एक व्होट बँक म्हणून एका विशिष्ट पक्षाला व विचारधारेला मते देण्याची या समाजाची अगदी जुन्या काळापासूनची परंपरा आहे. गेल्या काही वर्षांत मात्र गोव्यात आणि अगदी अलीकडेच ईशान्य प्रांतांतील ख्रिस्ती बहुसंख्य असलेल्या राज्यांतील मतदारांनीही भाजपसारख्या खुलेपणाने हिंदुत्ववादी राजकारण करणाऱ्या पक्षाला मते दिली आहेत! अर्थात तिथल्या निवडणुकांत भाजपने विकासावर भर देऊन हिंदुत्व, घरवापसी, बीफ बॅन वगैरे मुद्दे गुंडाळून ठेवले होते.  
गेल्या वर्षी दिल्लीचे आर्चबिशप अनिल कुटो यांनी आपल्या धर्मप्रातांतील ख्रिस्ती जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. गोव्याचे आर्चबिशप फिलिप नेरी फेराव यांनीही आपल्या पास्टरल पत्रात देशाची राज्यघटना धोक्यात आहे, असे विधान केले होते. या दोन्ही घटनांनंतर त्यावेळी मोठा गहजब माजला होता. देशातील राजकीय परीस्थितीबाबत चिंता व्यक्त करण्याचे काही कारण नाही, असाच त्यावेळी सगळ्यांचा सूर होता. मात्र काही महिन्यानंतर चित्र पालटले आणि आता राजकीय नेत्यांबरोबरच इतरही अनेक जण असाच सूर आळवत आहे हे विशेष! देशातील ख्रिस्ती जनता अल्पसंख्य असली तरी पूर्णतः दुर्लक्षित करण्यासारखी नाही हे यावेळी सिद्ध झाले.   
महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात म्हणजे एप्रिल २३ ला पुणे, अहमदनगर, शिर्डी, औरंगाबाद, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे. येथे ख्रिस्ती मतदारांची संख्या अगदी लक्षणीय आहे. चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यात एप्रिल २९ रोजी मुंबई आणि पालघर येथे मतदान होणार आहे. तेथे तर राज्यांतील सर्वाधिक ख्रिस्ती मतदार आहेत. महाराष्ट्रातील हे ख्रिस्ती मतदार एका विशिष्ट पक्षाला एकगठ्ठा मतदान करतात का, त्यांची समाज म्हणून इतर जातीजमातींप्रमाणे एक व्होट बँक असते काय, असे प्रश्न विचारात घेण्यासारखे आहेत. 
ख्रिस्ती समाजाचा राजकीय चेहरा म्हणून एकाही व्यक्तीला राज्यपातळीवर मान्यता मिळालेली नाही. पालघर जिल्ह्यात वसईत एखाद-दुसऱ्या आमदारकीवर या समाजाला समाधान मानावे लागते आहे. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर एखाद्या विशिष्ट समाजाने एखाद्या मतदारसंघात व राज्यपातळीवर कुठल्या उमेदवाराला वा पक्षाला मत दिले हे उघड होतेच. पुढील दोन टप्प्यांत होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील ख्रिस्ती मतदारांची सुप्त स्वरूपातील व्होट बँक कुणाला झुकते माप देते, हे २३ मेच्या निकालानंतर कळेलच. 
.............................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com

Wednesday, May 27, 2015

Our Lady of Perpetual Help Church

Our Lady of Perpetual Help Church attracts all
Reporters Name | CAMIL PARKHE | Monday, 11 May 2015 AT 01:33 PM IST
Send by email    Printer-friendly version
Pune: Our Lady of Perpetual Help Church located on Tadiwala Road enjoys a unique significance. It is one of the recently constructed churches in the city and attracts people from all over the city due to various socio-religious activities conducted on its premises.

Our Lady of Perpetual Help Church was built by then parish priest Fr Salvator Pinto and  inaugurated by then Pune Bishop Valerian D’Souza in 1990. The church is built in modern architectural style and therefore, the passersby rarely realise that the structure is a religious place.

Adjoining the church is the Nav Sadhana Diocesan Pastoral Centre where the Pune Catholic Diocese conducts marriage preparation courses for youths, seminars and other activities. People from various parishes in the city attend these functions. The congregation has a mixed population of Marathi-speaking, Konkani-speaking and Malayalam speaking p
arishioners.