Showing posts with label Prince Charles. Show all posts
Showing posts with label Prince Charles. Show all posts

Saturday, September 24, 2022

 जगभर, भारतात  गाजलेली लग्ने 

 

गोव्यात कॉलेजात असताना आणि नवहिंद टाइम्स मध्ये बातमीदार असताना लंडनमध्ये साखरपुडा होऊन तिथेच झालेले प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायना स्पेंसर यांचे लग्न तेव्हा जगभर गाजले. जगभरच्या नियतकालिकांत या `फेरी टेल' म्हणून गणल्या जाणाऱ्या लग्नाविषयी कितीतरी दिवस रकानेच्या रकाने लिहिले जात होते. `विसाव्या शतकाचे मोठे लग्न' असे वर्णन त्यावेळी केले गेले होते.

पुण्यात इंडियन एक्सप्रेसच्या कॅंपातल्या ऑफिसात होतो तेव्हा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले विजयसिंह मोहिते पाटील आमच्याशी गप्पा करायला आले होते. ते गेल्यानंतर मग मी माझ्या सहकाऱ्यांना या मंत्रीमहोदयांच्या लग्नाची गोष्ट सांगितली तेव्हा सगळे जण थक्क झाले होते. 
 
अकलूजचे विजयसिंह मोहिते पाटलांचे सत्तरच्या दशकातले लग्न महाराष्ट्रभर गाजले होते ते त्यांचे वडील सहकारनेते शंकरराव मोहिते पाटील यांच्यामुळे. या लग्नासाठी वरपित्यांनी गावोगावच्या लोकांना आमंत्रण दिले होते. असं म्हणतात कि या लग्नाच्या आवतणासाठी घरटी आमंत्रण देण्याऐवजी ग्रामपंचायतीच्या बोर्डालाच कुंकू-तांदळाचा टिळा लावण्यात आला होता. आणि ही मंडळी खरंच लग्नाला आली पण.वऱ्हाडासाठी पाण्यासाठी विहिरींत बर्फाच्या लाद्या सोडण्यात आल्या होत्या, अशा अनेक दंतकथा आहेत. 
 
 
बहात्तरच्या दुष्काळात असे लग्न झाले याची तक्रार दिल्लीत खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधींकडे करण्यात आली होती. ``मी तर या सगळ्या गावातील लोकांच्या बारशाला, लग्नांना, मयतीला गेलेलो आहे, मग त्यांना घराच्या लग्नाचे आमंत्रण द्यावे लागणार ना?'' असे त्यांनीं इंदिराबाईंना आपल्या हिंदी भाषेत उत्तर दिले होते. 
 
महाराष्ट्र टाइम्सचे संपादक गोविंद तळवलकर यांनी या लग्नावर सडकून टीका करताना अग्रलेखात शंकरराव मोहिते पाटलांना 'लक्षभोजने' ही उपाधी लावली ती या नेत्याला कायमची चिकटली. 
 
सुप्रिया पवार आणि सदानंद सुळे यांचे बारामतीतले १९९१ सालचे लग्न गाजले ते वेगळ्या अर्थाने. 
 
वधुपिता होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार आणि वऱ्हाड मंडळींत पंतप्रधान चंद्रशेखर, माजी पंतप्रधान राजीव गांधी, जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला वगैरेंचा समावेश होता. 
 
 
मोस्ट सुटेबाल बॉय वा मोस्ट सुटेबल गर्ल त्यांची लग्ने गाजणारच. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या क्षितिजावर असे अनेक तारे आता अवतरले आहेत 
 
सत्तरच्या दशकात आजच्या सारखी समाजमाध्यमे नव्हती तरी राजेश खन्ना आणि `बॉबी’ डिंपल कपाडिया यांचे लग्न अनेकांच्या पचनी पडले नव्हते. त्याच्या बरेच वर्षे आधी `मदर इंडिया'त सुनिल दत्तच्या आईची भूमिका केल्यानंतर नर्गिसने सुनील दत्तशी लग्न केल्यावर अशाच काही कोलाहल झाला होता असे म्हणतात 
 
महाराष्ट्रातल्या एका आमदाराच्या घरातल्या लग्नाची चर्चा मागच्या आठवड्यात वृत्त वाहिनींवर झाली. काय ते लग्न आणि काय ते एकेकाचे आहेऱ .. 
 
कालपरवा विश्वसुंदरी सुश्मिता सेन आणि `आयपीएल' जनक ललित मोदी यांचे एकत्रित फोटो झळकल्यावर अशीच नवी चर्चा झाली.  

Camil Parkhe

Thursday, September 15, 2022

 इंग्लंडच्या राणी साहिबा एलिझाबेथ द्वितीय.

 जगातल्या तीन पदांवरील व्यक्तींविषयी गेली काही दशके आंतरराष्ट्रीय पातळीवर कायम औत्सुक्य राहिलं आहे. ही तीन पदे म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, रोमस्थित पोप आणि इंग्लंडच्या राणी साहिबा एलिझाबेथ द्वितीय.

आता एलिझाबेथ राणी काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे आणि प्रिन्स चार्ल्स राजे झाल्यानंतर या पदाविषयी भविष्यकाळात असं औत्सुक्य राहील काय याविषयी शंका आहे. 
 
पोप जॉन पॉल दुसरे यांच्या सत्तावीस वर्षांच्या पेपसीच्या काळानंतर आणि पोप बेनेडिक्ट आल्यानंतर या पदाचे वलय कमी झाले होते. पोप जॉन पॉल यांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रांत आपली मोठी छाप उमटवली होती. जगभर अनेक राष्ट्रांना आणि राष्ट्रप्रमुखांना भेटी देण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 
 
भारताच्या दोन दौऱ्यांत पोप जॉन पॉल पंतप्रधान राजीव गांधी आणि पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भेटले होते. त्यांचा मायदेश पोलंड आणि इतर देशांतील कम्युनिस्ट राजवट संपवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. पोप बेनेडिक्ट सोळावे यांच्या धक्कादायक निवृत्तीनंतर त्यांची जागा घेणाऱ्या पोप फ्रान्सिस यांनी या पदाला पुन्हा गत वलय मिळवून दिलं आहे. राजे चार्ल्स इंग्लंडच्या राजेपदाबाबत असं काही करतील का हे आता पाहावं लागेल. 
 
जगभर आपल्या पदाचा वापर करुन आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली मोहोर उमटवण्याचं कर्तुत्व फार मोजक्या व्यक्तींचं असतं. एके काळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री हेन्री किसिंजर हे याबाबतीत प्रसिद्ध होते. यामुळेच पद सोडल्यानंतर सुद्धा जगभर त्यांची व्याख्यानं होत असत. त्यांच्या पुस्तकांना मागणी असते. नव्वदी पार केलेल्या किसिंजर यांनी अलीकडेच एक नवं पुस्तक लिहिलं आहे. 
 
पंतप्रधान पंडित नेहरु आणि त्यांच्यानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पण जगभर नाव कमावलं होतं आणि बांगलादेश निर्मितीनंतर इंदिराबाईंनी जगभर आपला वचकसुद्धा निर्माण केला होता.
इंग्लंडचा राजा अथवा राणी इंग्लंडबरोबरच ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि इतर काही स्वतंत्र, सार्वभौम देशांचा राजा/ राणी किंवा राष्ट्रप्रमुख असतो. 
 
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेत अमेरिका आणि इंग्लंडच्या राज्यघटनांच्या काही चांगल्या तरतुदींचा समावेश केला आहे. मात्र इंग्लंडच्या राणीला इंग्लंडच्या इतर पूर्वीच्या वसाहती राष्ट्रांप्रमाणे भारताच्या राष्ट्रप्रमुख म्हणून कायम ठेवले नाही. कॉमनवेल्थ परिषदेचा एक सदस्य म्हणून राणीला या परिषदेच्या पदसिद्ध अध्यक्ष म्हणून स्वीकारले, बस इतकेच. 
 
पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सत्तेवर पुनरागमन झाल्यानंतर भारतात कॉमनवेल्थ राष्ट्र प्रमुखांची परिषद झाली. इंग्लंडची राणी या परिषदेच्या पदसिद्ध अध्यक्ष. त्यावेळी प्रिन्स फिलिप यांच्यासह त्या नवी दिल्लीत आल्या होत्या. महाराष्ट्र टाइम्सने श्रीपाद ब्रह्मे यांच्या लेखाबरोबर आज हा फोटो वापरला आहे. 
 
या कॉमनवेल्थ परिषदेचे राष्ट्र प्रमुख नंतर गोव्यात चार दिवसांसाठी आले. ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर अर्थात होत्याच. या ऐतिहासिक परिषदेचे वार्तांकन मी `द नवहिंद टाइम्स'साठी केलं. राणीसाहेब आणि प्रिन्स फिलिप मात्र दिल्लीहून लंडनला परतले होते. या दोघांविषयी वार्तांकन करण्याची माझी संधी हुकली.
 
प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायना स्पेंसर यांच्या जगभर गाजलेल्या शाही विवाहाचे आमच्या पणजी इथल्या `द नवहिंद टाइम्स' इंग्रजी दैनिकाने कसे केले, या लग्नाचा फोटो आम्ही त्याकाळात दुसऱ्याच दिवशी कसा वापरला याविषयी मी इथं लिहिलं आहेच. त्याकाळात दुसऱ्या शहरांतल्या, देशांतल्या घटनांचे फोटो चारपाच दिवसांनंतर मिळायचे.
राणी साहिबा आपल्या हयातीतच अगदी पदग्रहण केल्यापासून एक दंतकथा बनल्या होत्या. तसं पाहिलं तर हे इंग्लंडची राणी किंवा राजा हे पद अगदी विचित्र आहे. घटनात्मक आहेच शिवाय वंश परंपरेनुसार. शिवाय राजा आणि राणी हे इंग्लंडच्या चर्चचे प्रमुख म्हणजे पोपच. आहे की नाही गंमत ?
 
धर्मप्रमुख म्हणून इंग्लंडच्या आर्च बिशप ची नेमणूक राणी किंवा राजा करतो, जसं पोप बिशप आणि कार्डिनल यांची नेमणूक करतात तसे. इंग्लंड हे धर्माधिष्ठित राष्ट्र आहे. चर्च ऑफ इंग्लंड हा इंग्लंडचा राजधर्म आहे, त्या अर्थाने इंग्लंड हे सेक्युलर राष्ट्र नाही हे अनेकांना माहितीही नसते. 
 
ख्रिस्ती धर्मात चर्च ऑफ इंग्लंड किंवा अँग्लिकन चर्च हा नवा पंथ निर्माण झाला तो इंग्लंडच्या राजामुळेच. राजा आठव्या हेनरीच्या घटस्फोटाला पोप क्लेमेंट सातवा मान्यता देईना, म्हणून या राजाने सोळाव्या शतकात हा पंथ स्थापन केला. 
 
या राजघराण्यातील सर्व विवाह, बाप्तिस्मा, अंत्यविधी अत्यंत काटेकोरपणे विशिष्ट चर्चमध्ये होत असतात. इंग्लंडचा भावी राजा किंवा राणी धार्मिक नसेल किंवा नास्तिक असेल, किंवा दुसऱ्या धर्माचा, पंथाचा असला तर अँग्लिकन चर्चचा धर्मप्रमुख कसा बनेल असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
 
एलिझाबेथ राणी साहिबा फार बोलत नसायच्या, मात्र त्यांचं सूचक मौनसुद्धा बातमी बनायची. त्यांचा पेहराव, कॅप, गळ्यातला हार याविषयी लिहिलं जायचं. त्यांच्या शेजारी कोण आणि कसे म्हणजे कुठल्या क्रमाने उभे
 
राणीला भेटायला कसं जायचं, तिथं कसं वागायचं याविषयी खूप शिष्टाचार असायचे, राणीच्या हातात नेहेमी हातमोजे असायचे. राणीसाहिबावर असं खूप लिहिलं गेलं आहे. तरी त्यांच्या बाबतचे औत्सुक्य कमी होत नाही. 
 
त्यामुळं `इंडियन एक्स्प्रेस'मधला त्यांच्या विषयीचा लेख मी अधाशाप्रमाणे वाचून काढला. नंतर ही ओबिट लिहिणाऱ्या बातमीदाराचं नाव पाहिलं आणि `न्यूयॉर्क टाइम्स'चा तो लेख आहे हे पण पाहिलं. 
 
मृत्यूलेख लिहिणं हे एक खास कसब असतं.

 
Camil Parkhe, September 9, 2022

Wednesday, August 15, 2018

दोन लग्नांच्या फोटोंची गोष्ट


गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१८

दोन लग्नांच्या फोटोंची गोष्ट
बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८      



कामिल पारखे
goo.gl/GvGRs5  

हजार शब्दांच्या तोलाचा असल्याने फोटोला वृत्तपत्रविश्वात खूप महत्त्व आहे. आज तंत्रज्ञानामुळे फोटो मिळवणे सोपे असले तरी एकेकाळी यासाठी किती सायास करावे लागत हे सांगणाऱ्या आठवणी.
प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायना स्पेन्सर यांचे लग्न ठरले, तेव्हाच ते विसाव्या शतकातील सर्वांत मोठे शाही, सेलेब्रिटी लग्न असेल असे म्हटले जात असे. जगभरातील प्रसारमाध्यमांतून या होणाऱ्या विवाहाविषयी प्रचंड गाजावाजा केला गेला. त्यात तसे वावगे असे काहीही नव्हते. त्यापूर्वी म्हणजे तीन दशकांपूर्वी १९४७ मध्ये आताच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा स्वतःचा विवाह झाला तेव्हा ग्रेट ब्रिटन हे  जगातले एक प्रमुख राष्ट्र असले तरी प्रसारमाध्यमे आताइतकी जनसामान्यांपर्यंत पोहोचलेली  नव्हती. मात्र १९८०च्या सुरुवातीच्या काळात प्रिन्स चार्ल्स आणि डायना यांची एंगेजमेंज वा साखरपुडा झाला तोपर्यंत रेडिओ सामान्य माणसांपर्यंत पोहोचला होता, वृत्तपत्रे शहरांत आणि खेड्यापाड्यांत जाऊ लागली होती आणि ब्लँक अँड व्हाईट टेलिव्हिजनचे  भारताच्या काही प्रमुख शहरांत आगमन झाले होते. एके काळी ब्रिटिश साम्राज्यावरील सूर्य मावळत नसे. त्यामुळे ब्रिटिश राजघराण्याविषयी जगातील  अनेक देशांत  कुतूहल होते. एके काळी ब्रिटिशांनी जेथे राज्य केले होते त्या देशांत आणि इतरही ठिकाणी हा विवाह ठरला, तेव्हापासूनच पुढील काही महिने हे लग्न म्हणजे एखाद्या परिकथेतील गोड सोहोळा,  'फेरीटेल वेडिंग' आहे असेच वृत्तपत्रांतून आणि इतर प्रसारमाध्यमातून रंगविले जात होते. याचे एका कारण म्हणजे खुद्द डायना यांचे व्यक्तिमत्व होते. प्रिन्स चार्ल्सने तिशी पार केली असली तरी लेडी डायना स्पेन्सर लग्नाच्या वेळी केवळ वीस वर्षांची  होती. प्रसारमाध्यमातून ब्रिटिश राजघराण्याच्या परंपरा, या शाही विवाहाची पूर्वतयारी, डायना यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी वगैरे संदर्भात भरपूर काही लिहिले जात होते. या शाही लग्नानिमित्त स्मरणिका ठरतील अशा अनेक वस्तू बाजारात आल्या होत्या. दिनांक २९ जुलै १९८१ रोजी पार पडलेला हा विवाह त्या काळात जगभरातील सर्वाधिक लोकांनी टेलीव्हिजनवर पाहिलेली घटना होती. 
जगभर लोकांच्या कुतूहलाचा विषय बनलेल्या  या घटनेचा वृत्तांत देण्यासाठी गोव्यात पणजी येथील 'द नवहिंद टाइम्स'मधील आमच्या संपादकांनी - बिक्रम व्होरा यांनी -  मोठी व्यूहरचना केली होती.  द नवहिंद टाइम्स हे त्यावेळी गोव्यातील एकमेव इंग्रजी वृत्तपत्र होते. गोमंतक, नवप्रभा आणि राष्ट्रमत ही स्थानिक मराठी वृत्तपत्रे होती. महाराष्ट्रातील मराठी दैनिकांनी तोपर्यंत गोव्यात प्रवेश केला नव्हता. या सर्व वृत्तपत्रांना  लग्नाची बातमी पीटीआय वगैरे वृत्तसंस्थांकडून ताबडतोब मिळणे शक्य होते. मात्र छायाचित्रांच्या बाबतीत तसे नव्हते. १९८०च्या दशकाच्या सुरुवातीस राष्ट्रीय आणि प्रादेशिक वृत्तपत्रे फोटोंसाठी फार मोठया प्रमाणात प्रेस इन्फॉर्मशन ब्युरोवर (पीआयबी) अवलंबून  असत. दिल्ल्लीतून पीआयबीने पाठविलेली तीन-चार दिवसांपूर्वीच्या घटनांची  छायाचित्रे  सर्वच वृत्तपत्रे वापरत असत. या फोटोंचे ब्लॉक करुन नंतर ते छापले जात असत. हा ब्लॅक अँड व्हाईट छपाईचा जमाना होता, वृत्तपत्रांत रंगीत छपाई सुरू होण्यास आणखी दोन दशकांचा कालावधी लागणार होता. लंडन येथील या शाही विवाहसोहळ्याची छायाचित्रे त्याच दिवशी मिळणे अशक्यच होते. संपादक व्होरा यांनी मात्र आपल्या दैनिकात या राजघराण्यातील लग्नाचा फोटो दुसऱ्याच दिवशीच्या अंकात छापण्याचा चंग बांधला होता. 
त्याकाळात महाराष्ट्रात टेलीव्हिजनचे कार्यक्रम फक्त मुंबई आणि नजिकच्या परिसरात दिसत असे. जवळपास कुठे टेलिव्हिजन टॉवर्स नसल्याने गोव्यातही टेलीव्हिजनचे कार्यक्रम पाहता येत नसे. असे असले तरी आमचे संपादक बिक्रम व्होरा हे गोव्यात टेलीव्हिजन सुविधा असणाऱ्या अगदी बोटावर मोजणाऱ्या व्यक्तींमध्ये होते. त्यांनी मिरामार येथील आपल्या बंगल्यात मुंबई दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम पाहता यावे यासाठी आपल्या टेलिव्हिजनसाठी एक उंच अँटेना लावली होती. त्याशिवाय त्या अँटेनाला एका बुस्टरही लावला होता. त्यामुळे मुंबई दूरदर्शन केंद्राने प्रसारित केलेले सर्व कार्यक्रम त्यांना अगदी स्पष्टपणे पाहता येत असत. गोव्यात असलेल्या या दुर्मिळ सुविधेचा वापर करून या लग्नाचे छायाचित्र वापरण्याचे संपादक व्होरांनी ठरविले होते. 
त्यानुसार राजघराण्यातील लग्नाच्या तारखेच्या आधी काही दिवस फोटोग्राफर सतीश नायक याने संपादकांच्या घरी जाऊन रंगीत तालीम घेतली. टेलीव्हिजनसमोर कॅमेरा स्टॅन्ड लावून त्याने टेलीव्हिजनवर चाललेल्या कार्यक्रमाचे चांगल्यात  चांगले फोटो काढण्याचा सराव केला. त्यानंतर लग्नाच्या दिवशी संध्याकाळी दूरदर्शनच्या बातम्यांच्या वेळी सतिशसह संपादक आणि आम्ही काही बातमीदार टेलिव्हिजनसमोर श्वास रोखून उभे होतो. त्या लग्नाच्या बातम्या आणि चित्रे दाखविली जाऊ लागली तसे सतीश कॅमेराचा  खटका खटाखट दाबू लागला. लग्नाची चित्रे  चालू असेपर्यंत कॅमेराचे शटर वेगाने फिरत गेले. व्हिजुल्स संपेपर्यंत सतीश घामाघूम झाला होता. त्यानंतर तो फोटोच्या प्रिन्टस काढण्यासाठी निघून गेला आणि आम्ही इतर जण दैनिकाच्या ऑफिसात गेलो. 
एक तासानंतर सतीश फोटोंच्या प्रिन्टस घेऊन आला तेव्हा एकदम खुशीत होता. काही फोटो अगदी मस्त आले होते. संपादकांनी त्यापैकी एका फोटोची  छापण्यासाठी निवड केली. फोटो अर्थातच पान एकवरच  जाणार होता. दुसऱ्या दिवशीच्या नवहिंद टाइम्सच्या पान एकवर लग्नाच्या बातमीसह तो फोटो प्रसिद्ध झाला आणि फोटो कॅप्शनवर  'टेलिव्हिजन फोटो: सतीश नायक' अशी बायलाइनही होती! अशा प्रकारची बायलाईन वृत्तपत्रीय इतिहासात बहुदा पहिल्यांदाच वापरली गेली असेल. 
दुसऱ्या दिवशी गोव्यातील सर्वच वृत्तपत्रांनी चार्ल्स-डायनाच्या लग्नाची बातमी छापली पण त्या लग्नाचा फोटो केवळ नवहिंद टाइम्सकडेच होता! आमच्या दैनिकाने याबतीत बाजी मारली होती. संपादक बिक्रम व्होरांनी केलेले नियोजन कमालीचे यशस्वी ठरले होते. त्यानंतर पुढे अनेक दिवस म्हणजे पणजीत टेलीव्हिजन टॉवर येईपर्यंत काही विशेष बातम्यांसाठी या दैनिकात टेलीव्हिजन फोटोची बायलाईन्स असे. (संपादक बिक्रम व्होरा नंतर अनेक वर्षे आखाती देशांतील गल्फ न्यूज आणि खलीज टाइम्स या आघाडीच्या इंग्रजी  दैनिकांचे संपादक होते.)
महाराष्ट्रातही एक लग्न १९७०च्या दशकात खूप गाजले होते. अकलूजचे सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या चिरंजीवांचे त्यांनी मोठया थाटात केलेल्या लग्नामुळे त्यांना लक्षभोजने मोहिते पाटील अशी उपाधी चिकटली होती. (बहुधा गोविंद तळवलकरांनी प्रदान केलेली) या लग्नावर त्याकाळात वृत्तपत्रांनी टीकेची झोड उठवली होती. या लग्नासंबंधी अनेक आख्यायिका आहेत. असे म्हणतात की मोहिते पाटलांनी विविध ग्रामपंचायतींच्या फलकांवरच कुंकू लावून अख्ख्या गावाला लग्नाचे निमंत्रण दिले होते. वऱ्हाडी लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी विहिरीतच बर्फाच्या लादी टाकल्या होत्या. या लग्नाची तक्रार थेट पंतप्रधान इंदिरा गांधींकडेच गेल्यावर मोहिते पाटलांनी आपल्या हिंदीत मॅडमकडे स्पष्टीकरण केले होते. अकलूज तालुक्यातील अनेक  गावांतील जवळजवळ प्रत्येक कुटुंबातील लग्नांना ते हजर असल्याने  आपल्या घरातील लग्नासाठी या सर्वांना आमंत्रण देणे आवश्यकच होते असे ते म्हणाले होते. शंकरराव मोहिते पाटलांचा असा दांडगा जनसंपर्क होता!  सन १९९०च्या दरम्यान विजयसिंह मोहिते पाटील पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यावर इंडियन एक्सप्रेसच्या कार्यालयात आले होते तेव्हा त्यांच्या लग्नाची ही कथा मी माझ्या सहकारी बातमीदारांना सांगितली होती तेव्हा सर्वच जण चकित झाले होते हे आठवते.   
प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायना यांचा विवाहाचा गोव्यातील दैनिकात फोटो वापरताना नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला, अगदी तसाच प्रकार एक दशकानंतर शरद पवार यांची कन्या सुप्रिया यांच्या लग्नाबाबतही झाला होता. दिनांक ४ मार्च १९९१ ला बारामती येथे संध्याकाळी  झालेल्या या लग्नाचा फोटो दुसऱ्या दिवशीच्या इंडियन एक्सप्रेसच्या मुंबई-पुणे आवृत्तीत छापण्यासाठी आम्हाला खूप आटापिटा करावा लागला होता.  
या लग्नाला पंतप्रधान चंद्रशेखर, माजी पंतप्रधान राजीव गांधी वगैरे अनेक व्हीव्हीआयपी मंडळी उपस्थित होती. शरद पवार त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे राज्यातील विविध खात्यातील प्रमुखांना लग्नाचे निमंत्रण होतेच तसेच गावोगावच्या कार्यकर्त्यांनाही होते. त्याकाळात कोल्हापूरला केंद्रीय उद्योग खात्याचे संचालक असलेले आणि आता निवृत्तीनंतर चिंचवडला माझ्याशेजारी राहणारे विजय  देशपांडे या लग्नाला उपस्थित होते.  'त्याकाळात गावोगावचे कार्यकर्ते पवारांच्या घरच्या लग्नाची आपल्याला आलेली पत्रिका  आपल्या खिशात बाळगून अभिमानाने इतरांना दाखवत असत' असे ते सांगतात.  'कोल्हापुरातून आम्ही काही सरकारी अधिकारी या लग्नासाठी आलो होतो. लग्नास खूप लोक  हजर  होते तरी लग्न मात्र साधेपणाने  पार पडले. बटबटीत थाटमाट असा मुळीच नव्हता. लग्नास उपस्थित असलेल्या आम्हा सर्वांस एकएक पेढा दिला गेला, सर्वांना जेवण नव्हतेच, असे देशपांडे सांगतात.
पंतप्रधानांच्या उपस्थितीत  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलीचा बारामतीत झालेल्या या लग्नाचा फोटो पुण्यातून प्रकाशित होणाऱ्या दैनिकांत येणे आवश्यक होते. पण डेडलाईनची समस्या होती. संध्याकाळी लग्नाचे फोटो काढून झाल्यानंतर बारामतीतून फोटोग्राफर पुण्याला यायला किमान तीन तास लागले असते आणि इंडियन एक्सप्रेसची डेडलाईन संपली असती. त्याकाळात इंडियन एक्सप्रेसच्या पुणे आवृत्तीचा डेस्कचा स्टाफ मुंबईतच असायचा. प्रकाश कर्दळे पुणे आवृत्तीचे निवासी संपादक होते. आम्ही बातमीदार मुंबईला बातम्या पाठवायचो आणि तेथील डेस्कवरची माणसे  दैनिकाची सर्व पाने तयार करून पुण्याला छपाईसाठी पाठवत असत. (याच कारणामुळे  पुण्यातील आम्हा पत्रकारांना गणेश चतुर्थीनंतरच्या दिवसाची आणि अनंत चतुर्दशीनंतरच्या दिवसाचीही सुट्टी मिळायची. याचे कारण म्हणजे मुंबईत पेपर विक्रेते गणेश चतुर्थीनंतर तर पुण्यातील विक्रेते अनंत चतुर्दशीनंतर सुट्टी घेतात)  डेडलाईन पाळण्यासाठी बारामतीहून लग्नाचा फोटो पुण्यात लवकरात लवकर आणण्यासाठी इंडियन एक्सप्रेसने आपली यंत्रणा कामाला लावली होती. त्याकाळात नव्यानेच विकसित झालेले फॅक्स  मशिन घेऊन संगणक खात्याचे इंजिनियर मकरंद येरवडेकर बारामतीला गेले होते. फोटोग्राफरने फोटो काढल्यानंतर तिथेच 'डेव्हलप' करून त्यांचे प्रिंट्स काढले. त्यानंतर  येरवडेकर यांनी पुण्याच्या ऑफिसला हे फोटो  फॅक्स केले. इकडे पुण्याच्या ऑफिसात आम्ही फॅक्स मशिनपुढे श्वास रोखून फोटो कसा येतो हे पाहत होतो. एकदाचे ते लग्नाचे फोटो आमच्यासमोर झळकले आणि आम्ही हुर्र्रे करून अक्षरश: ओरडलोच!         
काही दिवसांपूर्वी  प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना यांचे दुसरे चिरंजीव प्रिन्स हॅरी  आणि मेगन मार्कल  यांच्या लग्नाचा सोहोळा टेलिव्हिजनवर लाईव्ह पाहत असताना  १९८१ च्या त्या 'फेरिटेल' लग्नसमारंभाची  आणि १९९१च्या  सुप्रिया सुळेंच्या लग्नाची साहजिकच आठवण झाली. या दोन्ही लग्नांचे फोटो वृत्तपत्रात ताबडतोब छापण्यासाठी आम्हाला किती प्रयत्न करावे लागले होते याची आठवण झाली. त्यानंतर आतापर्यंत तंत्रज्ञानाने जी मोठी झेप घेतली आहे त्याची त्या काळात कुणी कल्पनाही केली नव्हती.  

Sunday, November 20, 2016

The interesting history of big fat Indian weddings!

The interesting history of big fat Indian weddings!
CAMIL PARKHE | Sunday, 20 November 2016 AT 01:52 PM IST      
Send by email    Printer-friendly version
While the country is speaking about nothing but the demonetisation of high-value currency and most people are struggling to get enough cash from the banks, one individual was seen reportedly spending close to Rs 500 crore on his daughter’s wedding in Karnataka last week. Many questions were raised about how an individual can do this while the entire country is strapped for cash. This has brought the focus on big fat Indian weddings and the cash spent on weddings in India.

Marriages of the rich and powerful are matter of envy for the common people and they are also a matter much talked about. One of such marriages in Maharashtra took place at Akluj in Solapur district four decades ago but it is an event referred to even today when there is a talk of lavish marriage ceremonies of the rich. Cooperative and sugar baron Shankarrao Mohite Patil had hosted a grand celebration in the early 1970s on the occasion of his eldest son Vijaysinh (later deputy chief minister of Maharashtra). The marriage ceremony which lasted for a few days was attended by thousands of villagers from Solapur district, earning the nickname Sahasrabhojane Mohite Patil (one who fed thousands of people).

Prior to the marriage, Shankarrao Mohite Patil had visited several villages in Solapur district to invite the local people for the marriage and since it was impossible for him to meet each villager’s family in person, he applied the red tila (vermilion) on the boards of the respective village panchayat. The villagers too treated this an invitation that they could not turn down and attended the marriage and the subsequent reception enthusiastically. As the lavish marriage celebration took place in Maharashtra other parts of the country was hit by drought. So then prime minister Indira Gandhi had questioned Shankarrao Mohite Patil about the propriety of holding such a lavish celebration. The cooperative baron who had a large following in his district had then replied, “But madam, how could I not invite these people for my son’s marriage when I myself had attended almost all major functions in the families of my supporters?”

After the negative publicity attracted by the Akluj marriage, the politicians and others in Maharashtra have avoided turning the marriage ceremonies in their family into an extravaganza affair.

The marriage of Supriya Sule, daughter of NCP supremo Sharad Pawar, held in Baramati in early 1991 was an example in this regard. Although the marriage was attended by the then prime minister Chandra Shekhar, former prime minister Rajiv Gandhi and other political veterans, those who attended the wedding still recall how the ceremony was devoid of any pomp and show or obscene exhibition of wealth.

In Indian history, the marriage of Indira and Feroze Gandhi which took place just a few months before the 1942 Quit India movement cited an example of simplicity. The couple had worn khadi clothes and also a garland made of sandalwood and khadi. The ‘first family in Indian politics’ has kept this tradition of simplicity in marriage to this date.

The marriage of Prince Charles and Diana in 1981 was billed as the ‘marriage of the century’. More than a year before the royal wedding, the event had hogged the limelight in newspaper columns and other media and the UK had attracted a large number of tourists during those days. The souvenirs of the royal wedding were sold in large numbers at that time. It is an altogether a different matter that the much talked about the royal romance and the subsequent wedding ceremony later ended in a formal separation of the Prince and Princess of Wales.

The recent marriage ceremony which attracted negative publicity and widespread criticism was the one hosted by NCP leader Bhaskar Jadhav at Chiplun in Konkan region in 2013. The NCP Chief Sharad Pawar had then publicly chastised Jadhav for the obscene show of wealth when the State was reeling under severe drought situation.

The recent marriage of the daughter of former Karnataka minister and BJP leader G Janardhan Reddy at Bengaluru is estimated to have cost Rs 100 crore. The marriage was attended by over 50,000 and a large number VVIPs belonging to all political parties.

It may be said that there is nothing wrong with rich people spending money on various events as long as the spent money is legal. The extravaganza nonetheless does raise a question mark over the need and propriety of hosting the event in such a manner. Even those VVIPs who attend such an event either as an obligation or protocol do endorse such filthy show of wealth and prosperity. The public figures at least should avoid endorsing it. 

Friday, July 8, 2011

Royal family charm continues

Royal family charm
CAMIL PARKHE
Monday, May 09, 2011 AT 12:12 AM (IST)
Tags: Royal wedding, Kate Middleton, Prince William, Diana, Prince Charles
The marriage of British Prince William and Kate Middleton revived memories of the wedding of William's parents -- Prince Charles and Diana Spencer in 1981, when television sets had just began to enter people's homes. Soon after the announcement of the royal wedding, tabloids and other newspapers started filling their columns with details of the private life and romance of the would-be couple and the preparations for the wedding. Even earlier, it was the royal wedding of the present monarch, Queen Elizabeth II, and Prince Philip. But at that time the media's reach to the people was very limited and the monarch's wedding went unnoticed by a large percentage of the world population. The wedding of Prince Charles and Diana was the first major glamorous event after the boom in the print and electronic news industry. Journalists and specially photographers, now equipped with advanced technology, really tried hard to exploit it to the fullest while covering that event. The Charles-Diana wedding was rightly labelled as the wedding of the century. People across the world had never witnessed such pomp and show for a wedding.
Newspaper in Goa, where I had worked during those days, employed zinc blocks to print photos. This was the technology used by newspapers during those days. Colour printing was unheard of in the newspaper industry. The photographs of prime minister and ministers, supplied by the Press Information Bureau, used to be published by newspapers three or four days after the event. Every bit of news related to the royal wedding was used by newspapers and magazines for weeks prior to the wedding. The editor of the newspaper where I worked had a novel plan to cover the royal wedding. There were no TV towers in Goa then and Mumbai was too far to receive television signals. My editor erected a very tall antennae at his residence in Miramar in Panaji and fitted it with a booster. That enabled him to see black and white images on his television set. On the royal wedding day, the editor asked a photo journalist to set his camera in front of the television sets and capture images of the royal wedding. Next day, ours was the only our newspaper in Goa to have published pictures of the royal wedding!
Thirty years later, the world media covered every moment of another royal wedding live and in minute details. It shows that although the sun over the British empire has set long ago, the royal family's charm continues to hold sway over the world to this day.