Showing posts with label Rajiv Gandhi. Show all posts
Showing posts with label Rajiv Gandhi. Show all posts

Wednesday, September 21, 2022

 फसलेली, अल्पकालीन ठरलेली, मोडून काढलेली राजकीय बंडाळी

गेल्या सहा दशकांच्या काळात महाराष्ट्राने अनेक यशस्वी, फसलेली, अल्पकालीन ठरलेली, मोडून काढलेली, केवळ मनात असलेली राजकीय बंडाळी अनुभवली आहे. महाराष्ट्रात किंबहुना त्याकाळात सगळ्या देशात गाजलेले एक मोठे बंड म्हणजे शरद पवार यांनी काँग्रेसचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना घालवून जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्ष यांच्या मदतीने १९७८ साली सत्ता हस्तगत केली तेव्हाचे. 
 
तेव्हापासून भारतीय राजकारणात शरद पवार हेच केवळ एकमेव विश्वासघातकी, बेभरवशाचे, पाठीत खंजीर खुपसणारे आणि बाकीच्यांनी सत्तेसाठी अनेकदा पक्ष, आघाडी बदलली, पुनरागमन केले ते मात्र अगदी साधू, संत असे चित्र निर्माण केले आहे हे खूप हास्यापद आहे. आपल्याच नेत्यांविरुद्ध, पक्षांविरुद्व बंड करुन, पारंपारिक विरोधकांशी हातमिळवणी करुन सत्तेवर येणाऱ्या राजकीय नेत्यांची देशात भलीमोठी यादीच आहे.
 
आपल्या संसदीय लोकशाहीत पक्षाविरुद्ध किंवा नेत्यांविरुद्ध बंडाळीचा गौरवशाली इतिहास तसा फार जुना आहे. पक्षातील बुजुर्ग नेत्यांनी 'गुंगी गुडिया' म्हणून पंतप्रधानपदावर प्रतिष्ठापना केल्यावर लगेचच इंदिरा गांधींनी या नेत्यांविरुद्ध बंडाळी केली होती. 
 
काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करुन खुद्द पंतप्रधान गांधी यांनी आपला स्वतःचा उमेदवार वराहगिरी वेंकट गिरी यांना १९६९ साली राष्ट्रपतिपदी निवडून आणले होते. यापेक्षा यशस्वी बंडाळीचे दुसरे कुठले मोठे उदाहरण देता येईल?
 
शरद पवार यांच्याआधीच महाराष्ट्रातील काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आणीबाणीनंतर इंदिरा गांधींविरुद्ध बंड करून, आपलाच पक्ष खरा असा दावा करून त्यांना पक्षातूनच बाहेर काढले होते हे अनेकांना माहितही नसेल. यापैकी काहींनी स्वतःचा पक्ष काढला होता. इंदिराजींना काँग्रेस पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या या नेत्यांमध्ये यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील वगैरे होते. 
 
आणिबाणीच्या काळात इंदिराजींनी ज्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवले त्या शंकरराव चव्हाण यांनी तर इंदिरा गांधींचा पराभव झाल्यानंतर खासदार बाळासाहेब विखे यांच्याबरोबर महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस हा पक्षच काढला होता. 
 
इंदिराबाई लोकसभेच्या अधिक जागा मिळवून सत्तेवर परतल्याबरोबर शरद पवार वगळता ही सर्व नेतेमंडळी काँग्रेसमध्ये पुन्हा दाखल झाली होती. महाराष्ट्राप्रमाणेच देशभर सगळीकडेच असेच चित्र होते. 
 
या बंडांचा इतिहास पाहता सत्तेतल्या प्रथम क्रमांकाच्या जागेवर नजर असलेल्या, सत्तेत दुसऱ्या स्थानांवर असलेल्या व्यक्तींकडून किंवा आपल्याला सत्तेतून डावलले जात असल्याची भावना असलेल्या व्यक्तींकडून अशी बंडाळी होत असते असे दिसते. अनेकदा ही बंडाळी सत्ताप्रमुख असलेल्या नेत्यांच्या सर्वाधिक जवळच्या आणि विश्वासू व्यक्तींकडूनच होते हे आणखी एक विशेष. 
 
पंतप्रधान मोरारजी देसाईंची जागा घेणारे चौधरी चरणसिंग, पंतप्रधान राजीव गांधींचे जवळचे नेते विश्वनाथ प्रताप सिंग, चंद्रशेखर अशी देशपातळीवर काही उदाहरणे देता येतील. 
 
राज्यात छोटेमोठे बंड करणारे, कुठल्याशा नावाने पक्ष किंवा विचारमंच काढणाऱ्यांची संख्या भरपूर आहेत. पंतप्रधान राजीव गांधींच्या नजरेतून उतरल्यावर बाळासाहेब विखे यांनी पक्षांतर्गत असाच मंच काढला होता, गोविंदराव आदिक यांनीही असाच प्रयत्न केला होता. आपले उपद्रवमुल्य पक्षश्रेष्ठींच्या नजरेत आणून देण्याचा माफक हेतू यामागे असायचा. 
 
महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री झालेले वसंतदादा पाटील हे कायम राजकीय युद्धाच्या किंवा बंडाळीच्या पावित्र्यात असत. आणिबाणीनंतर काँग्रेसच्या पराभवानंतर वसंतदादा यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा अर्स काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस यांच्या युतीचे सरकार चालवले आणि त्यानंतर शरद पवार यांनी. 
 
पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात शरद पवार काँग्रेसमध्ये परतल्यावर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले, तेव्हा पायउतार झालेल्या वसंतदादांनी आपला बंडाचा झेंडा कायम ठेवला. त्यांना राज्याबाहेर ठेवण्याच्या हेतूने राजीव गांधींनी त्यांची राजस्थानला राज्यपालपदी नेमणूक केली तर तिथल्या राजभवनातून मुख्यमंत्री पवार यांना आणि राजीव गांधींना त्रास देण्याचे काम वसंतदादांनी चालूच ठेवले. मात्र त्यातूनही पुरते समाधान होईना तेव्हा राज्यपालपदाचा चक्क राजीनामा देऊन ते महाराष्ट्रात परतले होते ! 
 
काँग्रेस काळात मुख्यमंत्री शरद पवार यांच्याविरुद्ध बंडाळी करुन त्यांचे सहकारी असलेले रामराव आदिक, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख हे दिल्लीत हाय कमांडला भेटायला गेले होते, मात्र या सर्वांना लगेचच उपरती झाली आणि हे बंड शमले. 
 
राज्यात अनेक वर्षे मंत्री असलेले विलासराव देशमुख हे आपल्या लातूर मतदारसंघात १९९५ साली निवडणूक हरले आणि त्यानंतर त्यांनी त्याकाळात सत्तेवर असलेल्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर विधान परिषदेवर येण्याचा प्रयत्न केला, ही निवडणुकसुद्धा ते हरले. 
 
पुढच्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर आल्यावर हेच विलासराव देशमुख काँग्रेसचे मुख्यमंत्री एकदा नव्हे दोनदा बनले. राजकारणात अशा अविश्वनसनीय अनेक घटना होतात. 
 
छगन भुजबळ हे शिवसेनेत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविरुद्ध बंडाळी करणारे पहिले मोठे नेते. या बंडानंतर शिवसैनिकांचा उद्रेक टाळण्यासाठी त्यांना अनेक दिवस भूमिगत राहावे लागले होते, नंतरच्या विधानसभा निवडणुकीत तरुण शिवसेना नेते बाळासाहेब नांदगावकर यांनी त्यांचा माझगावमध्ये पराभव केला होता, आणि भुजबळ यांना नाशिक जिल्ह्यात सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला होता. 
 
शिवसेनेविरुद्व गद्दारी करणाऱ्या भुजबळ यांना निवडणुकीत पराभूत करणारे नांदगावकर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राज ठाकरे यांच्याबरोबर आहेत.
 
भुजबळ यांच्या तुलनेत नारायण राणे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फार मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला नाही, कारण राणे आपल्या कोकण बालेकिल्ल्यात राजकीयदृष्ट्या सुरक्षित होते. त्यांच्याबरोबरच्या निम्हण वगैरे नऊ आमदारांनी टप्प्याटप्प्याने राजीनामे देत नंतर काँग्रेसच्या तिकिटांवर निवडून आले. 
 
भारतीय जनता पक्षाने राणेंचा आणि काँग्रेसचा हाच फॉर्मुला आपल्या `ऑपरेशन लोटस' साठी गोवा, कर्नाटक वगैरे राज्यांत वापरला आहे. 
 
भारतीय वायुदलाचे माजी पायलट असलेले सुरेश कलमाडी एकेकाळी शरद पवार यांचा `खास माणूस' म्हणून ओळखले जायचे. पवारांनी कलमाडी यांना दोनदा राज्यसभेत पाठवले, पवार महाराष्ट्रात आणि कलमाडी दिल्लीत असा त्यावेळी व्यवहार असायचा ( नंतर प्रफुल्ल पटेल यांनी ती जागा सांभाळली.) नव्वदच्या दशकाच्या अखेरीस पवार आणि कलमाडी यांचे बिनसले आणि कलमाडी यांनी शरद पवार यांच्याविरुद्ध अघोषित बंड पुकारले. 
 
पवार यांनी १९९९ साली काँग्रेस सोडली तेव्हा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात जाणार नाही याची कलमाडी यांनी पुरेपूर काळजी घेतली. विठ्ठलराव गाडगीळ यांच्यानंतर पुणे शहराचे `कारभारी' म्हणून सुरेश कलमाडी यांनी जागा घेतली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे महापालिकेत सत्ता मिळवण्यास कलमाडी यांच्यामुळे अंमळ उशीरच लागला. 
 
केंद्रातल्या २०१४च्या सत्तांतराआधी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे अनेक महिने आतल्या आत धुमसत होते. प्रमोद महाजन यांच्या अकाली निधनानंतर पक्षातल्या काही नेत्यांनी त्यांची कोंडी केली, त्यांना अडगळीत टाकले आहे अशी त्यांची भावना झाली होती. याबद्दल अधूनमधून प्रसारमाध्यमांतून त्यांची वक्तव्ये यायची. बंड करुन पक्ष सोडण्याचाही त्यांनीं विचार केला होता, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना या निर्णयापासून परावृत्त केले ते म्हणतात. 
 
पक्षातल्या आपल्या जवळच्या साथीदारांकडूनच आपल्याला दगाफटका होऊ शकतो हे चाणाक्षपणे ओळखून अशा संभाव्य सगळ्या प्रतिस्पर्ध्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्धतशीरपणे एकापाठोपाठ काटा काढला. 
 
`ओबीसींचे मुख्यमंत्री' असा शब्द उच्चारणारे एकनाथ खडसे यात सर्वप्रथम होते, `पहिली महिला मुख्यमंत्री' असे म्हणणाऱ्या पंकजा मुंडे, 'मराठा मुख्यमंत्री'चे दावेदार विनोद तावडे यांची वर्णी नंतर लागली आणि बाकीचे मग सुतासारखे सरळ झाले. 
 
फडणवीस यांना या घडीला पक्षांतर्गत एकही स्पर्धक नाही यातच सर्व काही आले. 
 
अडीच वर्षांपूर्वीचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आणि आपले काका शरद पवार यांच्याविरुद्धचे फसलेल्या किंवा वेळीच आवरते घेतलेल्या बंडाचे गौडबंगाल राजकीय विश्लेषकांना आजही समजले नाही. या रात्रीच्या आणि पहाटेच्या खेळातले मुख्य खेळाडू अजित पवार, देवेन्द्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हेच भविष्यकाळात, या बंडातील खेळी कुणाची आणि काय होती यावर प्रकाश टाकू शकतील. मात्र असे होणे असंभव दिसते. 
 
भारतीय जनता पक्षामध्ये पक्षांतर्गत किंवा सरकारविरोधी बोलण्याची हिम्मत एक सुब्रह्मण्यम स्वामी यांच्याशिवाय इतर कुणीही करु शकत नाही. अशी हिम्मत तेव्हाचे भाजपचे खासदार नाना पटोले यांनी दाखवली आणि पक्षाचा अन पदाचा राजिनामा देऊन ते काँग्रेसमध्ये आले. आपली बंडाची खुमखुमी कायम आहे हे पटोले अधूनमधून दाखवत असतात. 
 
भाजपने गेल्या काही वर्षांत एकामागून एक अशा अनेक राज्यांत आपले सरकार स्थापन करण्याचा सपाटा लावला आहे. मात्र यापैकी एकही राज्यांत मुख्यमंत्र्यांविरुद्ध कधी कुरबुर ऐकू येत नाही. उलटपक्षी हा पक्षच आपणहून कसलीही पूर्वसूचना न देता या राज्यांतील मुख्यमंत्र्यांची उचलबांगडी करत असतो. 
 
काँग्रेसच्या काळात काय घडायचे हे आठवून पहा. त्याकाळात काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे पक्ष निरीक्षक या नावाची एक फौज कायमस्वरूपी तैनात असायची. कुठ्ल्या न कुठल्या राज्यांत मुख्यमंत्र्यांविरुद्ध तक्रारी असायच्या आणि जी के मूपनार, वायलर रवी, आर एल भाटिया वगैरे पक्षाचे सरचिटणीस ही आग बुझवायला तातडीने रवाना होत. 
 
अनेकदा हे पक्षांतर्गत बंडखोर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पोसलेले असायचे, राज्यातले मुख्यमंत्री स्वयंभू होऊ नये म्हणून ! हल्ली भाजपच्या राजवटीमध्ये कुठल्याही राज्यांत असे स्वयंभू, मनसबदार मुळी नसतातच. 
 
यशस्वी बंद करण्यात, योग्य वेळी बंडाची तलवार म्यान करण्याचे भान असलेला आणि आपल्याविरुद्धचे बंड मोडून काढण्याचा अनुभव शरद पवार यांच्यासारखा इतर कुणालाही नाही. 
 
सत्तरच्या दशकात पहिले यशस्वी बंड करुन सत्तेवर आल्यावर १९९९ साली पवारांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरुद्ध बंड करून दुसऱ्यांदा नवीन पक्ष काढला. मात्र केवळ सहा महिन्यात काँग्रेस आणि सोनिया यांच्याशी हातमिळवणी करुन त्यांनी आपला सवतासुभा कायम ठेवला तो आजतागायत. लालू प्रसाद यादव यांच्यानंतर काँग्रेसशी एकनिष्ठ राहणारे देशातले ते दुसरे मोठे राजकारणी नेते. 
 
यावेळच्या महाविकास आघाडी सरकारविरुध्द्च्या ताज्या बंडातसुद्धा शरद पवार आपले राजकीय कौशल्य आणि अनुभव कसा पणाला लावतात (किंवा लावत नाहीत), हे पाहावे लागेल.  
 
Camil Parkhe 

Thursday, September 15, 2022

 इंग्लंडच्या राणी साहिबा एलिझाबेथ द्वितीय.

 जगातल्या तीन पदांवरील व्यक्तींविषयी गेली काही दशके आंतरराष्ट्रीय पातळीवर कायम औत्सुक्य राहिलं आहे. ही तीन पदे म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, रोमस्थित पोप आणि इंग्लंडच्या राणी साहिबा एलिझाबेथ द्वितीय.

आता एलिझाबेथ राणी काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे आणि प्रिन्स चार्ल्स राजे झाल्यानंतर या पदाविषयी भविष्यकाळात असं औत्सुक्य राहील काय याविषयी शंका आहे. 
 
पोप जॉन पॉल दुसरे यांच्या सत्तावीस वर्षांच्या पेपसीच्या काळानंतर आणि पोप बेनेडिक्ट आल्यानंतर या पदाचे वलय कमी झाले होते. पोप जॉन पॉल यांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रांत आपली मोठी छाप उमटवली होती. जगभर अनेक राष्ट्रांना आणि राष्ट्रप्रमुखांना भेटी देण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 
 
भारताच्या दोन दौऱ्यांत पोप जॉन पॉल पंतप्रधान राजीव गांधी आणि पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भेटले होते. त्यांचा मायदेश पोलंड आणि इतर देशांतील कम्युनिस्ट राजवट संपवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. पोप बेनेडिक्ट सोळावे यांच्या धक्कादायक निवृत्तीनंतर त्यांची जागा घेणाऱ्या पोप फ्रान्सिस यांनी या पदाला पुन्हा गत वलय मिळवून दिलं आहे. राजे चार्ल्स इंग्लंडच्या राजेपदाबाबत असं काही करतील का हे आता पाहावं लागेल. 
 
जगभर आपल्या पदाचा वापर करुन आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली मोहोर उमटवण्याचं कर्तुत्व फार मोजक्या व्यक्तींचं असतं. एके काळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री हेन्री किसिंजर हे याबाबतीत प्रसिद्ध होते. यामुळेच पद सोडल्यानंतर सुद्धा जगभर त्यांची व्याख्यानं होत असत. त्यांच्या पुस्तकांना मागणी असते. नव्वदी पार केलेल्या किसिंजर यांनी अलीकडेच एक नवं पुस्तक लिहिलं आहे. 
 
पंतप्रधान पंडित नेहरु आणि त्यांच्यानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पण जगभर नाव कमावलं होतं आणि बांगलादेश निर्मितीनंतर इंदिराबाईंनी जगभर आपला वचकसुद्धा निर्माण केला होता.
इंग्लंडचा राजा अथवा राणी इंग्लंडबरोबरच ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि इतर काही स्वतंत्र, सार्वभौम देशांचा राजा/ राणी किंवा राष्ट्रप्रमुख असतो. 
 
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेत अमेरिका आणि इंग्लंडच्या राज्यघटनांच्या काही चांगल्या तरतुदींचा समावेश केला आहे. मात्र इंग्लंडच्या राणीला इंग्लंडच्या इतर पूर्वीच्या वसाहती राष्ट्रांप्रमाणे भारताच्या राष्ट्रप्रमुख म्हणून कायम ठेवले नाही. कॉमनवेल्थ परिषदेचा एक सदस्य म्हणून राणीला या परिषदेच्या पदसिद्ध अध्यक्ष म्हणून स्वीकारले, बस इतकेच. 
 
पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सत्तेवर पुनरागमन झाल्यानंतर भारतात कॉमनवेल्थ राष्ट्र प्रमुखांची परिषद झाली. इंग्लंडची राणी या परिषदेच्या पदसिद्ध अध्यक्ष. त्यावेळी प्रिन्स फिलिप यांच्यासह त्या नवी दिल्लीत आल्या होत्या. महाराष्ट्र टाइम्सने श्रीपाद ब्रह्मे यांच्या लेखाबरोबर आज हा फोटो वापरला आहे. 
 
या कॉमनवेल्थ परिषदेचे राष्ट्र प्रमुख नंतर गोव्यात चार दिवसांसाठी आले. ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर अर्थात होत्याच. या ऐतिहासिक परिषदेचे वार्तांकन मी `द नवहिंद टाइम्स'साठी केलं. राणीसाहेब आणि प्रिन्स फिलिप मात्र दिल्लीहून लंडनला परतले होते. या दोघांविषयी वार्तांकन करण्याची माझी संधी हुकली.
 
प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायना स्पेंसर यांच्या जगभर गाजलेल्या शाही विवाहाचे आमच्या पणजी इथल्या `द नवहिंद टाइम्स' इंग्रजी दैनिकाने कसे केले, या लग्नाचा फोटो आम्ही त्याकाळात दुसऱ्याच दिवशी कसा वापरला याविषयी मी इथं लिहिलं आहेच. त्याकाळात दुसऱ्या शहरांतल्या, देशांतल्या घटनांचे फोटो चारपाच दिवसांनंतर मिळायचे.
राणी साहिबा आपल्या हयातीतच अगदी पदग्रहण केल्यापासून एक दंतकथा बनल्या होत्या. तसं पाहिलं तर हे इंग्लंडची राणी किंवा राजा हे पद अगदी विचित्र आहे. घटनात्मक आहेच शिवाय वंश परंपरेनुसार. शिवाय राजा आणि राणी हे इंग्लंडच्या चर्चचे प्रमुख म्हणजे पोपच. आहे की नाही गंमत ?
 
धर्मप्रमुख म्हणून इंग्लंडच्या आर्च बिशप ची नेमणूक राणी किंवा राजा करतो, जसं पोप बिशप आणि कार्डिनल यांची नेमणूक करतात तसे. इंग्लंड हे धर्माधिष्ठित राष्ट्र आहे. चर्च ऑफ इंग्लंड हा इंग्लंडचा राजधर्म आहे, त्या अर्थाने इंग्लंड हे सेक्युलर राष्ट्र नाही हे अनेकांना माहितीही नसते. 
 
ख्रिस्ती धर्मात चर्च ऑफ इंग्लंड किंवा अँग्लिकन चर्च हा नवा पंथ निर्माण झाला तो इंग्लंडच्या राजामुळेच. राजा आठव्या हेनरीच्या घटस्फोटाला पोप क्लेमेंट सातवा मान्यता देईना, म्हणून या राजाने सोळाव्या शतकात हा पंथ स्थापन केला. 
 
या राजघराण्यातील सर्व विवाह, बाप्तिस्मा, अंत्यविधी अत्यंत काटेकोरपणे विशिष्ट चर्चमध्ये होत असतात. इंग्लंडचा भावी राजा किंवा राणी धार्मिक नसेल किंवा नास्तिक असेल, किंवा दुसऱ्या धर्माचा, पंथाचा असला तर अँग्लिकन चर्चचा धर्मप्रमुख कसा बनेल असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
 
एलिझाबेथ राणी साहिबा फार बोलत नसायच्या, मात्र त्यांचं सूचक मौनसुद्धा बातमी बनायची. त्यांचा पेहराव, कॅप, गळ्यातला हार याविषयी लिहिलं जायचं. त्यांच्या शेजारी कोण आणि कसे म्हणजे कुठल्या क्रमाने उभे
 
राणीला भेटायला कसं जायचं, तिथं कसं वागायचं याविषयी खूप शिष्टाचार असायचे, राणीच्या हातात नेहेमी हातमोजे असायचे. राणीसाहिबावर असं खूप लिहिलं गेलं आहे. तरी त्यांच्या बाबतचे औत्सुक्य कमी होत नाही. 
 
त्यामुळं `इंडियन एक्स्प्रेस'मधला त्यांच्या विषयीचा लेख मी अधाशाप्रमाणे वाचून काढला. नंतर ही ओबिट लिहिणाऱ्या बातमीदाराचं नाव पाहिलं आणि `न्यूयॉर्क टाइम्स'चा तो लेख आहे हे पण पाहिलं. 
 
मृत्यूलेख लिहिणं हे एक खास कसब असतं.

 
Camil Parkhe, September 9, 2022

Tuesday, August 3, 2021

 

जगभर कुतूहल असणारी तिसरी व्यक्ती म्हणजे रोमन कॅथोलिक पंथाचे प्रमुख पोप!
पडघम - विदेशनामा
कामिल पारखे
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, रोमन कॅथोलिक पंथाचे प्रमुख फ्रान्सिस पोप आणि इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ (दुसऱ्या)
  • Wed , 21 July 2021
  • पडघमविदेशनामाअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षPresident of the United Statesजो बायडेनJoe Bidenफ्रान्सिस पोपPope FrancisपोपPopeराणी एलिझाबेथ (दुसऱ्या)Queen Elizabeth II

गेली काही दशके तीन पदांवरील व्यक्तींविषयीं जगातील अनेक लोकांमध्ये अपार कुतूहल असते. या तीन पदांवरील व्यक्ती वर्षभर या ना त्या कारणाने, निमित्ताने जगभरातील प्रसारमाध्यमांत झळकत असतात. त्या म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ दुसऱ्या आणि रोमन कॅथोलिक पंथाचे प्रमुख आणि व्हॅटिकन सिटी राष्ट्राचे प्रमुख पोप. अमेरिका ‘सुपरपॉवर’ असल्याने त्या देशाचे प्रमुख नेहमीच जगातल्या प्रसारमाध्यमांत झळकत राहणार, हे साहजिकच आहे. इंग्लंडच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नसायचा तेव्हापासूनच या साम्राज्याची वारसदार असलेली आणि आता वयाच्या शंभरीकडे वाटचाल करणारी राणी एलिझाबेथ दुसरी ही सत्तर वर्षांपासून आपला मुकुट कायम राखून आहे. या दीर्घ कालखंडात शुभ्र हातमोजे घालून त्यांनी जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांशी, विविध क्षेत्रांतील सेलिब्रिटींशी हस्तांदोलन करण्याचा जो विक्रम केला आहे, तो इतर कुणीही राष्ट्रप्रमुख भविष्यात कधीही मोडू शकेल असे दिसत नाही.

पोप यांच्यासंबंधीच्याही बातम्या जगातील अनेक प्रमुख नियतकालिकांत आणि बीबीसीसारख्या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांमध्ये आठवड्यातून निदान एकदा तरी झळकत असतात. त्याशिवाय  नाताळ, गुड फ्रायडे, ईस्टर व इतर सणानिमित्त आणि त्यांच्या परदेशदौऱ्यानिमित्त पोप यांच्या कार्यक्रमांना आणि प्रवचनांना संपूर्ण जगभर व प्रादेशिक प्रसारमाध्यमांतही हमखास प्रसिद्धी मिळते. यातूनही पोपपदाचे जागतिक महत्त्व अधोरेखित होत असते.   

व्हॅटिकन सिटी राष्ट्राचे प्रमुख असलेले पोप यांच्याकडे खरे तर स्वतःचे सैन्य वा खास पोलीस यंत्रणाही नाही, तरी त्यांना संपूर्ण जगभर आदर आणि मान आहे. याचे कारण जगात सर्वाधिक संख्येने असलेल्या रोमन कॅथोलिक पंथाचे ते आचार्य आहेत. त्यामुळेच २७ वर्षे पोपपदावर असलेल्या पोप जॉन पॉल दुसरे यांना राष्ट्रप्रमुख या नात्याने जगातील अनेक राष्ट्रांना भेटी देण्याचा, सर्वाधिक राष्ट्रप्रमुखांना त्यांच्या देशांत किंवा व्हॅटिकन सिटीमध्ये भेटण्याचा मान मिळाला. सध्याचे पोप फ्रान्सिस पोप जॉन पॉल दुसरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून जुने अनेक संकेत आणि पुरातन भिंती मोडीत काढत विविध राष्ट्रांत जाऊन परधर्मियांच्या नेत्यांना भेटून सुसंवाद साधत आहेत.

पोप हे ख्रिस्तमंडळाचे म्हणजे कॅथोलिक चर्चचे प्रमुख, एका अर्थाने येशू ख्रिस्ताचे या भूतलावरील प्रतिनिधी. येशू ख्रिस्ताच्या बारा प्रेषितांमध्ये एक असलेला सेंट पिटर किंवा संत पेत्र हा पहिला पोप. ख्रिस्ती धर्माच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत २६० पोप होऊन गेले आहेत. रोममध्ये मी असताना सेंट पिटर्स बॅसिलिकामध्ये या सर्व पोपमहाशयांच्या नावांची, कालखंडांची यादीच संगमरवरी दगडावर कोरलेली पाहिली, तेव्हा पटकन त्या यादीचं छायाचित्र काढलं.  

‘बायबल’मध्ये येशू ख्रिस्ताने पहिला पोप असलेल्या सेंट पिटरला स्वर्गाच्या चाव्या दिल्या, असा उल्लेख आहे. सेंट पिटरच्या कुठल्याही पुतळ्यात स्वर्गाच्या चाव्या असतातच. सेट पिटरचा पुतळा ओळखण्याची ती एक खूणच. व्हॅटिकन सिटीतल्या भव्य सेंट पिटर्स स्वेअरमध्ये सेंट पिटर आणि सेंट पॉल यांचे दोन भव्य पुतळे आहेत. त्यात सेंट पिटरच्या हातात स्वर्गाच्या या चाव्या आहेत, तर ख्रिस्ती धर्माला तत्त्वज्ञानाचा आणि धर्मसिद्धान्ताचा पाया उभारणाऱ्या सेंट पॉलच्या हातात ‘बायबल’ आहे.      



पॅलेस्टाईन राष्ट्राची स्थापना होण्याआधीच ‘पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन’ (पीएलओ)चे नेते यासर अराफत यांना या अस्तित्व नसलेल्या राष्ट्राचे प्रमुख म्हणून भारताने आणि इतर काही देशांनी मान्यता दिली होती. त्यांना राष्ट्रप्रमुख म्हणून शिष्टाचारानुसार वागवले जायचे. तीच गोष्ट तिबेटी बौद्धांचे नेते असलेल्या दलाई लामांची. राष्ट्रप्रमुख म्हणून पोप यांचे स्थान मात्र यासर अराफत किंवा दलाई लामा यांच्याहून आगळेवेगळे असे आहे. 

खरे पाहिले तर व्हॅटिकन सिटी हे सार्वभौम राष्ट्र म्हणजे एक गंमतीची बाब आहे. तिथे सातशेआठशे नागरिकही असतात, ते म्हणजे तिथले राहणारे कार्डिनल आणि पोपमहाशयांच्या कार्यालयातील अधिकारीवर्ग. या राष्ट्राची चतुःसीमा पुण्यातल्या डेक्कन जिमखान्याएवढीही नाही. तरीही मध्ययुगीन काळापासूनचा युरोपच्या इतिहासाचा परिपाक आणि पोपमहाशयांचे जागतिक स्तरावरचे धार्मिक, राजकीय आणि नैतिक पातळीवरचे स्थान लक्षात घेऊन बहुसंख्य राष्ट्रांनी आणि संयुक्त राष्ट्र दलानेसुद्धा त्यांना राष्ट्रप्रमुखाचा दर्जा दिला आहे. याच नात्याने ते संयुक्त राष्ट्र दलाच्या सभेला संबोधित करत असतात. भारतानेही व्हॅटिकन सिटीला सार्वभौम राष्ट्र म्हणून आणि पोप यांना राष्ट्रप्रमुख म्हणून मान्यता दिली आहे.

लौकिकार्थाने भौगोलिक सीमा, लष्कर, नागरिकत्व, चलनी नोटा वा पासपोर्ट नसलेल्या राष्ट्राचे प्रमुख असलेले पोप हे सर्वार्थाने आगळेवेगळे राष्ट्रप्रमुख ठरतात. या राष्ट्राची संकल्पनाच केवळ प्रतीकात्मक असल्याने कुठल्याही राष्ट्रात जन्मलेली आणि कुठल्याही राष्ट्राचे नागरीकत्व असलेली व्यक्ती अगदी एका क्षणात म्हणजे पोपपदी निवड झाल्याक्षणी या व्हॅटिकन सिटीचे राष्ट्रप्रमुख बनते. सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने भारतात २००४ साली सत्ता मिळवल्यावर कळीचा मुद्दा ठरलेला परकीय नागरिकत्वाचा विषय येथे अगदीच गैरलागू ठरतो. पोपपदावर आलेली व्यक्ती वैश्विक असते, त्यांचे अनुयायी संपूर्ण जगभर अगदी धर्मावर आणि कॅथोलिक पंथावर अधिकृत बंदी असलेल्या चीनसारख्या देशांतही असतात.   

चर्चच्या कॅनन लॉनुसार  जगभरातील बिशप वयाच्या ७५व्या वर्षी आणि कार्डिनल वयाच्या ८०व्या वर्षी निवृत्त होतात. नवीन पोपची निवड करण्याच्या प्रक्रियेत केवळ ८० वर्षे वयाखालील कार्डिनल सहभागी होतात आणि त्यांच्यापैकी कुणाचीही पोप म्हणून निवड होऊ शकते. अर्जेंटिनाचे कार्डिनल जॉर्ज मारिओ बेर्गोग्लिओ २००८ साली पोपपदाच्या निवडणुकीत मतदानासाठी एक ब्रिफकेस घेऊन, विमानाचे परतीचे तिकिट घेऊन व्हॅटिकनला आले आणि त्यांचीच पोपपदी निवड झाल्याने आणि पोप फ्रान्सिस असे नाव घेतलेल्या त्यांनी गेली तेरा वर्षे आजपर्यंत मायदेशी पाऊलही ठेवलेले नाही.    

पोप जॉन पॉल दुसरे यांच्या आधीचे पोप म्हणजे जॉन पॉल पहिले यांची कारकिर्द केवळ ३३ दिवसांची होती. पोप पॉल सहावे यांचे निधन झाल्यानंतर २६ ऑगस्ट १९७८ रोजी जॉन पॉल पहिले पोपपदावर आले. त्यानंतर एक महिन्याभरातच झालेल्या त्यांच्या अचानक निधनाने संपूर्ण जगाला बसलेला धक्का मला आजही आठवतो. चर्चच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक कमी काळ जॉन पॉल पहिले पोपपदावर होते. 

सेंट पिटरने आणि इतर अनेक ख्रिस्ती लोकांनी रोममध्ये हौतात्म्य स्वीकारल्यानंतर अचानक बदल झाला आणि रोमन सम्राटानेच ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे रोमन साम्राज्याचा हा अधिकृत धर्म बनला. जेरुसलेम व इस्राएल या येशू ख्रिस्ताच्या कर्मभूमीपेक्षा रोमला अधिक महत्त्व आले. रोम शहर ख्रिस्ती धर्माचे प्रमुख पीठ आणि पवित्र भूमी बनले.

रोमविषयी ‘रोम वॉज नॉट बिल्ट इन ए सिंगल डे’ अशी एक म्हण आहे. सतराव्या शतकाच्या सुरुवातीस म्हणजे १६०४ साली मराठीतील महाकाव्य ‘क्रिस्तपुराण’ गोव्यात रचणाऱ्या ब्रिटिश धर्मगुरू थॉमस स्टिफन्स यांनी या म्हणीचे ‘एके दिवशी रोमनगरी I उभविली नाही I’ असे मराठमोळे भाषांतर केले आहे!

गेले काही शतके ख्रिस्ती धर्माचे प्रमुख आचार्य म्हणून आणि विशेषतः मध्ययुगीन काळात पोप यांच्या हातात अमर्याद सत्ता होती. युरोपातील अनेक देशांतील राजसत्ता त्यांच्या ओजळीने पाणी पित होती, हे  इतिहासातील अनेक घटनांवरून दिसते. मध्ययुगीन काळात तर पोप अलेक्झांडर सहावा याने तर वसाहतीसाठी नव्या जगाची पोर्तुगाल आणि स्पेन या दर्यावर्दी राष्ट्रांमध्ये चक्क वाटणीच करून दिली होती! त्या काळातला चर्चचा आणि चर्चच्या पोपसारख्या धर्माधिकाऱ्यांचाही इतिहास फारसा अभिमानास्पद नाही. 

आपल्या घटस्फोटास कॅथोलिक चर्च मान्यता देत नाही, असे पाहिल्यावर इंग्लंडच्या राजा आठवा हेन्रीने पोप आणि कॅथोलिक चर्चपासूनच घटस्फोट घेत सोळाव्या शतकात इंग्लंडमध्ये स्वतःचे अँग्लिकन चर्च स्थापन केले आणि इंग्लंडच्या राजास (किंवा राणीस) त्या चर्चचे प्रमुख म्हणजे एका अर्थाने पोपच बनवले. ही व्यवस्था आजतागायत चालू आहे. सर्व जगातील लोकशाहीप्रधान व्यवस्थेचे मूळ असलेल्या इंग्लंड हा देश धर्माधिष्ठित असून इंग्लंडची राणी (अथवा राजा) चर्च ऑफ इंग्लंडची प्रमुख आहे, हे अनेकांना ठाऊकही नसेल.

त्यानंतर जर्मनीत धर्मगुरू मार्टिन ल्युथर किंगने धार्मिक बंड केल्यानंतर विविध प्रोटेस्टंट पंथ निर्माण झाले आणि पोपच्या अमर्याद सत्तेला अंकुश बसला. रेनॉयस्सन्सच्या काळात चर्च आणि धर्मसत्ता यांची फारकत होत गेली आणि पोप हे पद केवळ सन्माननीय पद राहिले, मात्र याच काळात नैतिक प्रश्नांवर म्हणजे अबॉर्शन, समलिंगी संबंध आणि लग्न, फाशीची सजा, युद्ध, मानवी हक्क, पर्यावरण वगैरे प्रश्नांवर देशसीमांच्या पलीकडे भूमिका घेणारी नैतिक सत्ता यादृष्टीने चर्च आणि पोप यांच्याकडे पहिले गेले आहे. युरोपात आणि इतर पाश्चात्य देशांत आजही कागदोपत्री बहुसंख्य ख्रिस्ती लोकसंख्या असल्याने पोप यांचे याबाबतीतील स्थान तसे अबाधित राहिले आहे. 

जगात विमानसेवा सुरू झाल्यानंतर जगभरातील कॅथोलिक पंथियांचे आचार्य असलेल्या पोप यांची भ्रमंती सुरू झाली. पोप पॉल सहावे यांनी १९६४ साली रोमहून इस्राएलकडे विमानाने प्रयाण केले, तेव्हा त्यांनी चर्चच्या इतिहासातील अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले. विमानाने प्रवास करणारे ते पहिले पोप, त्याशिवाय त्यापूर्वी दीडशे वर्षे आधी कुठल्याही पोपने इटलीबाहेर पाऊल ठेवले नव्हते. इस्राएल ही येशू ख्रिस्ताची जन्मभूमी, ख्रिस्ती धर्माचे तीर्थक्षेत्र, पवित्र भूमी. मात्र पोप पॉल सहावे यांच्याआधी कुठल्याही पोपने या पवित्र भूमीवर प्रवेश केला नव्हता.

पोप पॉल हे विमानातून इस्राएलच्या भूमीवर उतरले, तेव्हा या पवित्र भूमीचे चुंबन केले, ख्रिस्ताच्या पावनस्पर्शाने पुनीत झालेल्या या धरतीला त्यांनी वंदन केले. (पोप पॉल सहावे भारताच्या भेटीवर १९६४ साली आले, तेव्हासुद्धा मुंबई विमानतळावर जमिनीचे चुंबन घेऊन त्यांनी आपला दौरा सुरू केला होता.) पोप जॉन पॉल दुसरे यांच्याप्रमाणेच त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी म्हणजे पोप बेनेडिक्ट आणि आताचे पोप फ्रान्सिस यांनीही होली लँड इस्त्रायलला भेट दिली आहे.

ज्यु आणि ख्रिस्ती धर्मांसाठी तसेच इस्लाम धर्मांसाठी येरुशलेम आणि इस्राएलचे किती महत्त्वाचे स्थान आहे ते सांगायलाच नको. ज्यु लोकांसाठी इस्राएल म्हणजे देवाने वचन दिलेली भूमी -  किंवा ‘प्रॉमिस्ड लँड’. येशू ख्रिस्त या प्रदेशात जन्मला आणि फिरला. ज्यू आणि ख्रिस्ती धर्मियांचा देव (खरे पाहता मुस्लिमांचाही) एकच आहे असेही मानले जाते. या तिन्ही धर्मियांसाठी प्रेषित असलेल्या अब्राहाम याचे वर्णन या तिन्ही श्रद्धावंतांचा  ‘फादर इन फेथ’  म्हणजे श्रद्धेमध्ये  पिता असे केले जाते.

रोम हे ख्रिस्ती धर्मियांची नवी पवित्र भूमी बनलेली असली तरी येरुशलेम आणि इस्राएलचे महत्त्व अबाधित राहतेच. हे महत्त्व अधोरेखित करणारा हा गंमतीदार किस्सा  आहे.  

ज्यु धर्मियांचे येरुशलेम येथील प्रमुख धर्मगुरु ‘रब्बी’ एकदा रोमला पोपला भेटले. या भेटीदरम्यान पोप यांनी रब्बी यांना ‘देवाशी टेलिफोनवर बोलायचे आहे का?’ असे विचारले. त्यानंतर पोप यांच्या लॅण्डलाइन फोनवरून रब्बी काही काळ देवाशी बोलले. नंतर त्यांनी पोप यांना झालेल्या कॉलच्या फीची रक्कम विचारली आणि चारशे डॉलर्स ही रक्कमही त्यांनी पोप यांना दिली. पोप स्वतः इस्त्रायलला येरुशलेम येथे आल्यानंतर त्यांनाही तेथून रब्बी यांच्या लॅण्डलाइनवरून देवाशी संभाषण करण्याची संधी मिळाली. ‘कॉलचे चार्जेस किती?’ असे त्यांनी विचारल्यावर रब्बी म्हणाले, ‘हा लोकल कॉल होता, नो चार्जेस!’  

पोलिश पोप जॉन पॉल दुसरेयांच्यामुळे पोलंडमधील हुकूमशाही कम्युनिस्ट राजवट उलथवून कामगार नेते लेक वालेसा यांची लोकनियुक्त राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड होण्यात  मदत झाली.  इतकेच नव्हे तर पोप जॉन पॉल यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे पूर्व युरोपातील सर्व राष्ट्रांत कम्युनिस्ट हुकूमशाहीचा डोलारा कोसळून लोकशाही व्यवस्था प्रस्थापित झाली, हे आज इतिहासकारांनी मान्य केले आहे.

पोप जॉन पॉल दुसरे हे पोपपदावर आल्यानंतर काही वर्षांतच १९८१ साली सेंट पिटर्स चौकात पोपमोबाइलमधून फिरत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि ते खाली कोसळले. पोटात गोळ्या लागूनही पोप यातून आश्चर्यकारिकरीत्या बचावले आणि त्यांनी २७ वर्षे या सर्वोच्च पदावर राहण्याचा विक्रम केला.

पोप जॉन पॉल यांच्याप्रमाणेच याच काळात म्हणजे १९८१ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रेनाल्ड रीगन यांच्यावर गोळीबार होऊन त्यांच्या छातीत गोळ्या घुसल्या होत्या. यशस्वीरीत्या उपचार होऊन रीगन बचावले. पोप जॉन पॉल दुसरे आणि राष्ट्राध्यक्ष रीगन यांच्याप्रमाणे भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावरही १९८४ साली असाच भीषण गोळीबार झाला, मात्र त्यांच्या शरीररक्षकाने त्यांच्या शरीराची अक्षरशः चाळण केल्याने इंदिराजी यातून बचावल्या नाहीत.

पोलंडचे नागरिक असलेल्या पोप जॉन पॉल दुसरे यांच्या रूपाने इटलीबाहेरचे कार्डिनल पोपपदावर आले आणि याबाबत इटलीची तीनशे वर्षांची मक्तेदारी मोडली, त्यांनतर जर्मनीचे कार्डिनल पोप बेनेडिक्ट बनले आणि आताचे पोप फ्रान्सिस तर युरोप खंडाबाहेरचे पहिलेच पोप असून थेट लॅटिन अमेरिकेतील अर्जेंटिनाचे  आहेत. 

राजीव गांधी पंतप्रधान असताना पोप जॉन पॉल दुसरे हे १९८६ साली भारत दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांच्या मिरामार बीचजवळच्या कंपाल ग्राऊंडवर झालेल्या मिस्साविधीला ‘नवहिंद टाईम्स’चा बातमीदार म्हणून मी हजर होतो. शाही विधी काय असतो, याचा तो समारंभ उत्तम नमुना होता. पोप यांच्यांसाठी खास मंडप उंचावर उभारलेला होता. त्यांच्यापासून कितीतरी दूर अंतरावर मात्र उंचावरील दुसऱ्या मंडपात पत्रकार कक्ष होता. भारतासह आशिया खंडातील आणि जगभरातील  करड्या पोशाखातील, लाल हॅटमधील अनेक कार्डिनल, शंभराहूनही अधिक  बिशप आणि हजारभर धर्मगुरू पुढच्या रांगेत आणि त्यामागे भाविकांची अलोट गर्दी, असे ते दृश्य आजही माझ्या नजरेसमोर आहे.   

त्या काळात या ‘पोपमोबाइल’विषयी बरीच चर्चा झाली. या दहा दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी दोन खास डिझाईन केलेल्या ‘पोपमोबाईल’ होत्या. पोप यांच्या आगमनाआधी प्रत्येक समारंभाच्या ठिकाणी दोनपैकी एक बुलेटप्रुफ पोपमोबाईल विमानाने आधीच आणून ठेवली जायची. भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या त्या प्रसिद्ध रथयात्रेआधीचा हा प्रसंग आहे. त्यामुळे या खास डिझाईन केलेल्या पोपमोबाईलचे विशेष अप्रूप होते. आजही जगभर पोप अशाच पद्धतीच्या पोपमोबाईलमधून  भाविकांना दर्शन देतात,          

पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात १९९९ साली पोप जॉन पॉल दुसऱ्यांदा भारत भेटीवर आले. पोप यांना वाजपेयी भेटले होते. आधीच्या भेटीत पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी पोप जॉन पॉल यांची भेट घेतली होती.

पोप यांना संबोधित करताना आदराने `होली फादर' असे म्हटले जाते. मराठीत बिशपांना महागुरुस्वामी म्हटले जाते तसे पोप यांना परमगुरुस्वामी असे म्हटले जाते. हरेगावला सेंट तेरेजा स्कुलच्या बोर्डिंगमध्ये असताना आणि श्रीरामपूरच्या देवळात मिस्सामध्ये वर्षांतून काही वेळेस खालील गायन गायले जायचे....

परमगुरुस्वामीला देव नित्य सुखी ठेवो
मेंढपाळ सद्गुरू तो चिरंजीवी जगी होवो //


इटली येथील वास्तव्यात मला रोम आणि व्हॅटिकन सिटी येथे भरपूर फिरता आले. तेथील ती भव्य सेंट पिटर्स बॅसिलिका, तो जगप्रसिद्ध सेंट पिटर्स स्केअर, व्हॅटिकन म्युझियम, मायकल अँजेलो या चित्रकाराने रंगवलेले सिस्टाईन चॅपेल पाहताना डोळे अक्षरशः फिरतात आणि मती गुंग होते, इतके हे सर्व अगदी प्रेक्षणीय आहे. त्या ठिकाणचे ऐतिहासिक महत्त्व माहीत असल्याने, त्याविषयी खूप वाचलेले असल्याने तर तिथे फिरताना काय पाहू आणि किती पाहू अशा संभ्रमात मी पडलो होतो. या सेंट पिटर्स चौकातच एका इमारतीच्या उंच मजल्यावरील बाल्कनीतून दर रविवारी आणि आठवड्यातून काही दिवस तसेच सणासुदीला  पोपमहाशय तेथे जमलेल्या  हजारो भाविकांशी संवाद साधत असतात.

कुटुंबासह मी रोमच्या सहलीवर असतानाची ही गोष्ट. जवळजवळ आठवडाभर आमचा मुक्काम रोममध्ये होता. बुधवारी सेंट पिटर्स चौकात पोप बेनेडिक्ट यांचे बाल्कनीतून दर्शन होईल, तेव्हा त्यादिवशी रोममध्येच थांबणार का? असे मला विचारण्यात आले, आमच्यापाशी दुसरा पर्याय होता तो सोमवारी व्हेनिसला जाऊन तिथे काही दिवस मुक्काम करण्याचा. 

मी ताबडतोब दुसऱ्या पर्यायाची निवड केली. जॅकलीन आणि मुलगी आदितीसह व्हेनिसला भरपूर हिंडलो. त्या प्रसिद्ध पर्यटनस्थळाच्या भेटीचा अनुभव पाहता मी पोप यांच्या दर्शनाऐवजी व्हेनिसभेटीची निवड केली याबद्दल आजही बिलकुल खंत वाटत नाही. त्याचे एक कारण म्हणजे पोप जॉन पॉल दुसरे यांचे गोव्यात  मी अगदी जवळून दर्शन घेतले होतेच. सेंट पिटर्स चौकात पोप फार उंचावरच्या गॅलरीतून भाविकांशी संवाद साधत असल्याने त्यांचे जवळून असे दर्शन होतच नाही. पाहू या, इन्शाअल्ला परत कधी रोम भेटीचा योग आला तर सेंट पिटर्स स्केअरमध्ये पोपदर्शनाचा अनुभव नक्कीच घेईन.       

व्हॅटिकनच्या खाजगी विभागाच्या प्रवेशद्वारातच खास पारंपरिक टोपी आणि रंगीबेरंगी पोशाखात हातात भाला घेऊन स्मार्टपणे उभे असलेले उंचपुरे गार्डस सर्वांचे लक्ष वेधून घेतात. पोपमहाशयांची सुरक्षाव्यवस्था सांभाळणारे हे स्विस गार्डस. गेली पाच शतके स्वित्झर्लंड या देशातील तिशीच्या आतील युवक पोपमहाशयांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहेत. अर्थांत हे तसे ‘सेरेमोनियल गार्ड’ म्हणजे शोभेचे गार्ड म्हणता येईल.

सेंट पिटर बॅसिलिका हे सेंट पिटरच्या समाधीवर उभारलेले चर्च आहे. सेंट पिटर बॅसिलिकातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे ऐतिहासिक सेंट सिस्टाईन चॅपेल. नव्या पोपची निवड करण्यासाठी येथे जगभरातील कार्डिनलांची बैठक होते. पोपपदाची गादी रीक्त झाल्यावर जगभरातील कार्डिनल सिस्टाईन चॅपेलमध्ये नवे पोप निवडण्यासाठी एकत्र येतात. 

पोपपदाची निवडणूक हा खरे तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. सिस्टाईन चॅपेलमध्ये होणारी ही निवडणूक आगळीवेगळी असते, येथे उमेदवार लॉबिंग वा स्वतःचा प्रचार करत नसतात. ही निवडणूक एक दिवसात संपू शकते किंवा मतैक्य होईपर्यंत काही आठवडेही चालू शकते. कार्डिनलांशिवाय इतर कोणालाही त्या आतून बंद असलेल्या सिस्टींन चॅपेलमध्ये कोणालाही प्रवेश नसतो. सिस्टाईन चॅपेलमध्ये पोपपदावर मतैक्य कसे झाले, कितीदा मतदान झाले, कोण उमेदवार होते, याची माहिती बाहेर कधीही येत नाही. 

कार्डिनलची ही कॉन्क्लेव्ह (बैठक) चालू असताना सेंट पिटर बॅसिलिकाच्या चिमणीतून काळा धूर निघाला, म्हणजे नव्या पोपसंदर्भात अजून मतैक्य झालेले नाही. ही बैठक अनेक दिवस चालू शकते. चिमणीतून पांढरा धूर येऊ लागला, म्हणजे चौकात जमलेल्या हजारो लोकांना आणि संपूर्ण जगाला कळते की, नव्या पोपची निवड झाली आहे. 

ताजे गवत जाळले कि काळा धूर येतो आणि सुकलेले गवत जाळल्यावर पांढरा धूर येतो.

असा पांढरा धूर चिमणीतून बाहेर आल्यावर काही क्षणांत पोपपदी निवड झालेल्या कार्डिनलना बाल्कनीत आणले जाते सेंट पिटर्स चौकात जमलेल्या आणि सर्व जगाला मग सांगितले जाते, ''वूई हॅव्ह अ पोप !''

आणि काही क्षणांत पोपपदी निवड झालेल्या कार्डिनलना बाल्कनीत आणले जाते आणि ते पोप म्हणून आपले नवे नाव सांगतात. पोपपदाची निवड कशी होती यावर ‘शूज ऑफ द फिशरमॅन’ हा एक अत्यंत गाजलेला चित्रपट आहे. 

काही वर्षांपर्यंत या वेळी नूतन पोपमहाशयांच्या डोक्यावर वर क्रूस असलेला रत्नजडित मोठा मुकुट चढवून त्यांचा राज्याभिषेक केला जाई. अलीकडच्या काळात सरंजामपद्धतीचे प्रतीक असणारा हा मुकुट पोप घालत नाहीत. इंग्लंडची राणीसुद्धा हल्ली अगदी प्रतीकात्मक स्वरूपात एक छोटासा मुकुट केवळ शाही समारंभाला घालतात. 

इंग्लंडच्या गादीवर येणारा राजा अथवा राणी आपले नवे नाव धारण करतात, जसे आताची राणी एलिझाबेथ दुसरी, तसे पोपपदावर येणारे कार्डिनल आपली जुनी ओळख टाकून नवे नाव घेतात. याआधीचे निवृत्त पोप हे बेनेडिक्ट सोळावे तर अर्जेंटिनाचे कार्डिनल जॉर्ज बेर्गोग्लिओ यांनी पॉप झाल्यावर फ्रान्सिस नाव धारण केले, ते फ्रान्सिस नावाचे पहिलेच पोप आहेत. सोसायटी ऑफ जिझस (जेसुइटस) या कॅथोलिक धर्मगुरूंच्या संघटनेचे पोपपदावर आलेले ते पहिलेच सदस्य आहेत.

सोसायटी ऑफ जिझस (जेसुईट किंवा येशूसंघीय) या धर्मगुरूंच्या संघटनेचे जगभर शिक्षण, समाजकार्य वगैरे क्षेत्रांत मोठे योगदान आहे. दहशतवादाच्या आरोपात अलीकडेच तुरुंगात निधन झालेले फादर स्टॅन स्वामी हेसुद्धा जेसुईटच होते. जेसुईटांच्या जगभरच्या कार्याच्या मोठ्या जाळ्यामुळे संस्थेचे प्रमुख असलेले सुपिरियर जनरल यांना चर्चमध्ये पोप यांच्याखालोखाल महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे शुभ्रवस्त्रधारी पोप यांच्यासमोर काळा झगा घालणाऱ्या जेसुईट फादर जनरल यांना ‘ब्लॅक पोप’ असेही म्हटले जायचे.

काही वर्षांपूर्वी अडॉल्फो निकोलस हे जेसुईट सुपिरियर जनरल (ब्लॅक पोप) असताना भारतदौऱ्यावर आले, तेव्हा पुण्यात मी त्यांची मुलाखत घेतली होती. चर्चच्या इतिहासात आता पहिल्यांदाच पोप आणि ब्लॅक पोप हे दोघेही जेसुईट आहेत!

पोप यांना राष्ट्रप्रमुख म्हणून मान्यता दिलेल्या राष्ट्रांत पोपमहाशयांचे त्या राष्ट्रातील प्रतिनिधी (प्रो- नन- शिओ) असलेले आर्चबिशप किंवा बिशप यांना अधिकृतरीत्या राजदूताचा दर्जा असतो. त्यामुळे सूत्रे हाती घेण्याआधी राजदूत म्हणून आपले अधिकारपत्र ते भारताच्या राष्ट्रपतींना किंवा इतर राष्ट्रप्रमुखांना सादर करत असतात. व्हॅटिकन सिटीची स्वतःची अशी राजप्रतिनिधिक स्तराची सेवा असते. त्यातील धर्मगुरू, बिशप किंवा आर्चबिशप यांना राजदूत म्हणून जगाच्या कानाकोपऱ्यातील देशांत पाठवले जाते. वसईचे सद्याचे बिशप फेलिक्स मच्याडो यांनीही पूर्वी व्हॅटिकन सिटीच्या एका शाखेत उपसचिवपदावर काम केले आहे. पोप बेनेडिक्ट यांच्याशी त्यांचा त्या काळी निकटचा संबंध असे.       

पोपचे हे प्रतिनिधी-राजदूत त्या देशातील कॅथोलिक चर्च आणि पोप यांच्यांतील दुवा असतात. उदाहरणार्थ, भारतातील कार्डिनल आणि विविध राज्यातील बिशपपदांवरील नेमणुका, चर्चसंबंधी विविध विषय याबाबत पोपच्या या प्रतिनिधींचा सल्ला व मत निर्णायक ठरते.    

येशू ख्रिस्ताचा शिष्य सेंट पिटर याचा पोप म्हणून वारसदार असलेले पोप कधीही चुका करू शकत नाही, असा एक नंतर वादग्रस्त ठरलेला धर्मसिद्धांत (डॉग्मा) दोन शतकापूर्वी चर्चमध्ये संमत झाला होता. दुसऱ्या व्हॅटिकन कौन्सिलनंतर चर्चमध्ये झालेल्या वैचारिक सुधारणानंतर ‘पेपल इन्फालीबिलीटी’ या डॉग्मावर आता कुणी बोलतही नाही.

गॅलिलिओ आणि इतर वैज्ञानिकांविषयी चर्चची भूमिका, काही देशांत इन्क्विझिशनचा झालेला अतिरेक, दुसऱ्या महायुद्धात ज्यूंचा झालेला संहार याबाबत चर्चची बोटचेपी भूमिका, तसेच गेल्या काही दशकांत युरोपात आणि अमेरिकेत धर्मगुरूंकडून मुलांवर झालेले लैगिक अत्याचार या प्रकरणांमुळे चर्चची मानहानी झाली. त्याबद्दल पोप जॉन पॉल दुसरे, पोप बेनेडिक्ट आणि पोप फ्रान्सिस यांनी खंत आणि खेद व्यक्त करून संबंधित पीडित व्यक्तींची आणि त्यांच्या नातलगांची माफी मागितली आहे.     

पोपमहाशय परदेशदौऱ्यावर निघतात, तेव्हा इतर राष्ट्रप्रमुखांप्रमाणे त्यांच्याबरोबरसुद्धा पत्रकारांचा काफिला असतो. रोमकडे परतीच्या प्रवासात पोप जॉन पॉल पत्रकारांशी खुला संवाद साधत असत. पोप फ्रान्सिस यांनीही परंपरा चालू ठेवली आहे. आम्हा पत्रकारांसाठी अशा दीर्घकाळ चालणाऱ्या पत्रकार परिषदा म्हणजे मोठी पर्वणीच असते.

या पत्रकार परिषदेत चर्चच्या दृष्टीने कळीचे मुद्दे असणाऱ्या काही प्रश्नांची हमखास उजळणी होते. समलिंगी संबंध या प्रश्नावर ‘त्यांचा न्याय करणारा मी कोण?’ असा उलटपक्षी प्रश्न पत्रकारांना विचारून पोप फ्रान्सिस यांनी संबंधितांची सहानुभूती मिळवली आहे. मात्र गर्भपात, कॅथोलिक धर्मगुरूंचे अविवाहितपणाचे व्रत, स्त्रियांना धर्मगुरूपदाची दीक्षा, यांवर पोप फ्रान्सिस यांनी आपल्या पूर्वसूरींची कर्मठ भूमिका चालू ठेवली आहे.    

व्हॅटिकन सिटीतील ड्रेस कोड विषयीही सांगितले पाहिजे. चर्चच्या सर्व धर्मगुरूंचा, बिशपांचा, कार्डिनल्सचा आणि नन्सचाही विशिष्ट झगा असतो. धर्मगुरू आणि बिशप सफेद किंवा करड्या रंगाचा झगा घालतात. कार्डिनलांचा करड्या रंगाचा झगा, कमरेला लाल पट्टा आणि डोक्यावर छोटीशी लाल गोल टोपी (स्कल कॅप) असते. पोप मात्र सदैव पूर्ण पांढऱ्या झग्यात असतात आणि त्यांच्यासमोर इतरांनी पांढरा पोशाख वा झगा घालू नये असा संकेत आहे. जगातील सर्व बिशप पाच  वर्षातून एकदा आळीपाळीने पोप यांना व्हॅटिकन सिटीत भेटत असतात. त्या वेळी हे बिशप, कार्डिनल पोपसमोर नेहमी करड्या रंगाच्या झग्यांत असतात! पुण्याचे बिशप थॉमस डाबरे किंवा वसईचे बिशप फेलिक्स मच्याडो यांचे याआधीच्या आणि आताच्या पोपबरोबरचे फोटो पाहिले की, पोप यांच्याबाबतीतील या ड्रेस कोडविषयी कल्पना येईल.  

गेले वर्षभर करोना साथीमुळे जगभरातील प्रार्थनास्थळे बंद राहिली आहेत. व्हॅटिकन सिटीमधले सर्व व्यवहार, प्रार्थना आणि उपासनाविधी ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे केवळ ऑनलाईनच्या माध्यमातून पोपमहाशयांच्या तुरळक लोकांच्या हजेरीत सेंट पिटर्स बॅसिलिकात होणाऱ्या मिस्साविधीला मी उपस्थित राहत होतो. आता पोप फ्रान्सिस दर रविवारी आणि इतर काही दिवशी पुन्हा आपल्या गॅलरीत येऊन सेंट पिटर्स चौकात वाढत चाललेल्या भाविकांना संबोधित करत आहेत. मागच्या आठवड्यात त्यांच्यावर सर्जरी होऊन या रविवारी ते पुन्हा भाविकांना भेटले. तिथली लोकांची गर्दी, त्यांचा उत्साह आणि जल्लोष पोपविषयीच्या त्यांच्या भावनांबद्दल बरेच काही सांगून जातो.

गेली काही शतके फक्त इटलीच्या कार्डिनलचीच पोपपदावर निवड व्हायची, याचे कारण म्हणजे पोपपदाच्या निवडणुकीत भाग घेणाऱ्या कॉलेज ऑफ कार्डिनल्समध्ये इटलीच्या कार्डिनलांचाच अधिक भरणा असायचा. आतापर्यंत केवळ युरोपियन आणि सध्याचे पोप फ्रान्सिस यांच्या रूपाने युरोपाबाहेरील लॅटिन अमेरिकेतील व्यक्तीला म्हणजे केवळ गौरवर्णीय पोपपद मिळालेले आहे.  

पोप जॉन पॉल दुसरे, पोप बेनेडिक्ट सोळावे आणि आताचे पोप फ्रान्सिस यांनी कॉलेज ऑफ कार्डिनलचा पारंपरिक चेहरामोहरा बदलून टाकण्यासाठी अशियाई आणि आफ्रिकन बिशपांची कार्डिनलपदी नेमणूक केल्याचे स्पष्ट दिसते. पोप फ्रान्सिस यांनी बांगलादेशी आर्चबिशप पॅट्रिक डी  रोझारिओ यांची बांगलादेशचे पहिले कार्डिनल म्हणून २०१६ साली नेमणूक केली, २०२० साली कार्डिनलपदावर नेमणूक झालेले विल्टन डॅनियल ग्रेगरी हे अमेरिकेतील पहिलेच आफ्रिकन-अमेरिकन कार्डिनल ठरले आहेत. अर्थात आधी आफ्रिकेतील अनेक कृष्णवर्णियांची कार्डिनलपदावर नेमणूक झालेली आहे.

मुंबईचे पहिले भारतीय बिशप व्हॅलेरियन ग्रेशियस हे १९५३ साली भारताचे आणि आशिया खंडातलेही पहिले कार्डिनल बनले. मुंबईचे सायमन पिमेंटा हे पहिले मराठीभाषक कार्डिनल. भारताच्या कार्डिनलची संख्या सहापर्यंत पोहोचली आहे. सद्याचे मुंबईचे कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस हे तर पोप फ्रान्सिस यांच्या आठ-सदस्यीय सल्लागार मंडळात आहेत. २००८ला पोप बेनेडिक्ट यांनी राजीनामा दिल्यावर झालेल्या पोपपदाच्या निवडणुकीत कार्डिनल ओसवाल्ड ग्रेशियस यांचे नाव चर्चेत होते.

कार्डिनलांच्या संख्येत आशियाई, आफ्रिकन किंवा कृष्णवर्णीय कार्डिनल अगदी नगण्य असले तरी मतपेटीतून आणि सेंट पिटर्स बॅसिलिकेच्या चिमणीतून येणाऱ्या पांढऱ्या धुरातून काही धक्कादायक निवडीचा संदेश येऊ शकतो, हे अलीकडच्या काही दशकांत दिसून आले आहे.

१९७०च्या दशकात पोलंड या तेव्हाच्या कम्युनिस्ट राजवटीतील क्रेकॉव येथील कार्डिनल कॅरोल जोसेफ वोझत्याला यांची पोप जॉन पॉल दुसरे म्हणून निवड करून या कॉलेज ऑफ कार्डिनल्सने जे धक्कातंत्र वापरले, ते त्यानंतर जर्मन कार्डीनल जोसेफ अलोशियस रॅतझिंगर (पोप बेनेडिक्ट सोळावे) आणि नंतर अर्जेंटिनाचे कार्डिनल जॉर्ज मारिओ बेर्गोग्लिओ  (पोप फ्रान्सिस) यांना निवडून आजतागायत चालू राहिले ठेवले आहे.   

त्यामुळेच भारतातील, आशियातील, आफ्रिकेतील किंवा इतर बिगर-पाश्चात्य कार्डिनल पोपपदावर येऊ शकतात, ही आता अशक्यप्राय बाब राहिलेली नाही. एके दिवशी एखादा भारतीय म्हणजे अगदी मुंबईतील मराठीभाषक कार्डिनलसुद्धा व्हॅटिकन सिटीमध्ये पोप आणि या चिमुकल्या राष्ट्राचा राष्ट्रप्रमुख होऊ शकतो. आणि हा दावा म्हणजे केवळ स्वप्नरंजन, सैद्धान्तिक किंवा तात्त्विक पातळीवर नाही, असे भविष्यात कधीही होऊ शकते. सोनियाचा तो दिवस लवकर यावा हीच अपेक्षा ! 


Saturday, May 22, 2021

Rajiv Gandhi would have been alive today if security guards were as alert as in my case...

As a journalist, I have been privileged to have come into close contact, interacted, interviewed or even shaken hands with prime ministers, former prime ministers or would-be prime ministers. These comprise Indira Gandhi, P. V. Narasinha Rao, Atal Behari Vajpayee, Rajiv Gandhi, Vishwanath Pratap Singh and Chandra Shekhar in the same order.
I am sure not many journalists of the new generation would be able to equal this feat.
Among the above mentioned former prime ministers, the entire public life and political career of Rajiv Gandhi was the shortest one, only 11 years, and journalists of my generation were witness to his entire career.
Rajiv Gandhi came into the public gaze for the first time in 1980 after the accidental death of his younger brother, Sanjay Gandhi, whom Prime Minister Indira Gandhi had groomed as her political heir. Much against his wishes, Rajiv then had had to give up his career as a pilot to step into the shoes of his younger brother to be the Congress general secretary and also an MP from Amethi. After the brutal assassination of his mother three years later, he was destined to be India’s prime minister, the youngest to be occupy the seat, at 40.
The Rajiv Gandhi government announced demarcation of Goa, Daman and Diu Union Territory and full statehood to Goa in 1987. I was then completing a diploma in journalism in Russia and Bulgaria. But I was back in Goa before the Goa statehood ceremony.
Prime Minister Rajiv Gandhi attended the statehood ceremony at Campal ground near Miramar on the banks of Mandovi in Panjim. I however missed the opportunity to cover the prime minister’s function as only two reporters from `The Navhind Times' were allotted the press passes.


However, I got the opportunity to cover the prime minister’s function when I joined `The Indian Express' in Pune two years later. The Rajiv Gandhi government had completed its five-year term and general elections were to be held in December 1989. The prime minister was scheduled to address an election rally in Pune and I was issued a reporter’s pass to cover the poll meeting.
As a security measure, all reporters were instructed not to carry anything with us except a notepad and a pen. The entire election meeting venue was barricaded with bamboo sticks and at each entrance, people were thoroughly screened by the security personnel.
Our team of journalists too was stopped at the entrance leading to the press section. The reporters too were being allowed to go ahead only after undergoing frisking. When my turn came, the security person detected something into my trouser pocket. He looked questioningly at me as I took out the small object from the pocket. It was a camera roll which I had planned to take to a photo studio for developing colour photo prints.
My face turned pale and I fumbled for words as the security men told me firmly that I cannot proceed to the press section along with that object. I did not carry a photographer’s pass and there was no reason for me to carry the camera roll at the venue of the prime minister’s rally.
``No, no, I was not to drop that suspicious object at the rally venue, I would have to go back and dispose it off at some other place,'' I was curtly told.
By this time, other reporters had proceeded to the press section. Cursing myself for the folly, I turned back, walked through the bamboo barricades for almost half a kilometre and then flung the camera roll far off into the tress along the road. I rushed back, was again frisked by the security men and allowed to join my fraternity members at the press section.
It was getting dark and as I settled into my seat, there was sudden hectic movement at a corner near the raised pandal. `Rahul Gandhi has come’, were the words being said by some people with unconcealed excitement.
I saw a bespectacled teenager, clad in white pyjama and white Nehru shirt stepping down briskly from a makeshift ladder. Rahul disappeared from our sight even before the team of photographers could adjust their camera shutters.
When Prime Minister Rajiv Gandhi began his speech, it was past 7 pm. In the lit up podium, we from the press section could see him clearly, turning to various directions to establish rapport with the large assembly. Sometimes he paused to sip water kept near him, occasionally he wiped out sweat from his face with the white scarf around his neck.


My Indian Express colleague reporter Naren Karunakaran was assigned to cover the speech while my assignment was to report sidelines of the election rally.
The next day, The Indian Express carried the prime minister’s speech and photo on the front page and continuation of the story and rally highlights were carried on the inside pages.
In the sidelights, I had mentioned presence of young Rahul Gandhi. I had also mentioned that Prime Minister Rajiv Gandhi was visibly tense with the prevalent hostile political atmosphere against his government as he continued to wipe out the sweat on his face and repeatedly drank water during his speech.
Our newspaper, forever known for its an anti-establishment stance, had typically carried this small sidelight prominently in a box item.
A couple of days later, we journalists in Pune travelled in cars to attend some event. As soon as he settled into the seat beside the car driver, Kiran Thakur of The Indian Post asked me,

“Camil, who filed the box news story on Rajiv Gandhi in The Indian Express?”
When I replied that it was my story, he said. “But isn’t it natural for an orator speaking for over half an hour to sip water in between or clean his face with a cloth? It was not proper to infer from this act that Rajiv was tense or scared because of the hostile political atmosphere.
Camil, let me tell you frankly it was ethically not right. That is not journalism!”
There was truth in what Kiran Thakur, who later became the head of the journalism course at Savitribai Phule Pune University, was telling. I could not defend or justify the box news item. To this date, I am ashamed of the content of the box news story I had filed that day.
The Congress led by Rajiv Gandhi lost power in the 1989 elections and Vishwanath Pratap Singh was elected the next prime minister.
A few months later, Rajiv Gandhi, now leader of the Opposition, addressed a press conference at the Mahratta Chamber of Commerce and Industries hall on Tilak Road in Pune. Senior journalists including Gopalrao Patwardhan, Kiran Thakur and Rajiv Sabade had penned down a few questions in English and Hindi for Gandhi and distributed them among us journalists.
On behalf of The Indian Express, I too read out a question and Rajiv Gandhi replied to it.
At the end of the press meet, Rajiv Gandhi stood at the hall entrance and shook hands with all the press personnel present there.
When it was my turn, I introduced myself as “Camil Parkhe from Indian Express.”
He smiled as he shook hands with me. That smiling face of Rajiv Gandhi is fresh in my mind to this date.
Nearly two years later, Rajiv Gandhi was assassinated at an election rally at Sriperumbudur, near Chennai. As it became clear that a teenager girl, Dhanu welcoming the former prime minister with a garland was his assassin, an earlier incident flashed before me.
I instinctively recalled the scene when I was denied entry at Rajiv Gandhi election rally in Pune because I carried a camera roll in my trouser pocket.
The refusal of the security personnel to allow me to carry that tiny object to the press section which was around 200 metres away from the dais was a very minor incident. Although initially upset, I had totally forgotten the incident because after disposing of the objectionable object, I was able to attend the election rally.
This otherwise insignificant event immediately turned memorable for me in the contest of the circumstances in which Rajiv Gandhi was brutally assassinated.
Had the security personnel been as alert and vigilant then, the assassination of Rajiv Gandhi at the hands of the human bomb in the person of Dhanu would have been averted.
Today is 30th death anniversary of Rajiv Gandhi...
Tributes to this leader who would have been in his 70s today....

Monday, January 28, 2019

प्रियंका गांधी : नेहरू-गांधी घराण्यातील नवा चेहरा रिंगणात






प्रियंका गांधी : नेहरू-गांधी घराण्यातील नवा चेहरा रिंगणात
पडघम - देशकारण 
कामिल पारखे
  • नेहरू-गांधी घराणं आणि प्रियंका गांधी
  • Thu , 24 January 2019
  • पडघमदेशकारणनेहरू-गांधी घराणंNehru-Gandhi Familyप्रियंका गांधीPriyanka Gandhiसोनिया गांधीSonia Gandhiराजीव गांधीRajeev Gandhiराहुल गांधीRahul Gandhiकाँग्रेसCongress
इंदिरा गांधी यांना प्रत्यक्ष आणि अगदी जवळून पाहण्याचा योग मला लाभला, तेव्हा एक सामान्य नागरीक म्हणून मी त्यांचा एका कट्टर विरोधक होतो. या कट्टर विरोधाला अर्थातच आणीबाणी-पर्वाची पार्श्वभूमी होती. आणीबाणीनंतर मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली जनता पार्टीचे सरकार आले होते. मोरारजींचे सरकार कोसळल्यानंतर आलेले चरणसिंग सरकारसुद्धा अल्पजीवी ठरले. चरणसिंगांनी राजीनामा देऊन निवडणुका जाहीर केल्या होत्या. या दरम्यान इत्तर सर्व पक्षांच्या विखारी टीकेचे लक्ष्य बनलेल्या इंदिरा गांधी स्वतः:चा नवीन इंदिरा काँग्रेस पक्ष स्थापून निवडणूक प्रचारदौऱ्यात उतरल्या होत्या. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांना वाळीत टाकले होते, तरीही न डगमगता इंदिरा गांधींनी प्रचारासाठी देश पिंजून काढला होता. त्यांच्या त्या गाजलेल्या झंझावाती प्रचारदौऱ्याचा एक भाग म्हणून त्या गोव्यात आल्या होत्या आणि त्या वेळी मला अगदी जवळून, काही फुटांच्या अंतरावरून त्यांना पाहता आले होते. 
केंद्रातून सत्ताभ्रष्ट झाल्यानंतर अगदी मोजके पक्षनेते बरोबर असताना इंदिरा गांधींनी जवळजवळ एकहाती प्रचाराची धुरा सांभाळली. या काळात त्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नव्हते. चार्टर्ड विमान पुरवणारे उद्योगपती त्यांच्याबरोबर नव्हते. त्यामुळे जमेल तेव्हा प्रवासी विमानाने जाऊन आणि अनेकदा मोटारीने अनेक तासांचा प्रवास करून त्यांनी निवडणूक सभा घेतल्या. अशाच प्रकारे बहुधा कर्नाटकातून गोव्यात आल्यानंतर पणजीला मांडवी नदीच्या तीरावर असलेल्या मांडवी हॉटेलात प्रवेश करताना मी त्यांना पाहिले. त्यानंतर एका तासाने पणजीतील कम्पाला ग्राऊंडवर पार पडलेल्या त्यांच्या सभेलाही मी हजर होतो.
जनता पक्षाच्या सरकारच्या अनागोंदी कारभारावर त्यांनी घणाघाती हल्ला केला. इंदिरा गांधींच्या त्या वीसेक मिनिटांच्या भाषणाने तोपर्यंत माझ्या मनात जनता पक्षाविषयी असलेले थोडेफार प्रेमही नाहीसे झाले. इंदिरा गांधींच्या त्या जोरदार देशभरातील प्रचारदौऱ्याने जनता पार्टीचा एकदम धुव्वाच उडाला आणि इंदिरा गांधी त्यांना तोपर्यंत कधीही न मिळालेल्या मताधिक्याने आणि लोकसभेच्या अधिक जागा मिळवून पुन्हा सत्तेवर आल्या. 
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
पंतप्रधान झाल्यानंतर इंदिरा गांधी पुन्हा गोव्यात आल्या, त्या कॉमनवेल्थ राष्ट्रांच्या प्रमुखांच्या १९८३ साली झालेल्या बैठकीचे यजमान म्हणून. त्यावेळी मी ‘द नवहिंद टाइम्स’ या पणजीतील इंग्लिश वृत्तपत्राचा बातमीदार होतो. ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्यासह चाळीस राष्ट्रांचे प्रमुख यावेळी गोव्यात आले होते. त्यानंतर पुढल्याच वर्षी १९८४च्या ऑक्टोबरात इंदिरा गांधींची दिल्लीत हत्या झाली आणि राजीव गांधी पंतप्रधान झाले.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी १९८९ च्या अखेरीस प्रचार सुरू झाला, तेव्हा मी पुण्यात ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये बातमीदार होतो. पंतप्रधान राजीव गांधींची सर परशुरामभाऊ कॉलेजच्या मैदानावर प्रचारसभा होती. बोफोर्स तोफेने त्यावेळी गदारोळ उठवला होता. पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर पंतप्रधानांच्या दौऱ्यात कडक सुरक्षा असायची. व्यासपीठासमोरच असलेल्या पत्रकारांसाठी असलेल्या कक्षात मी पोहोचलो. पंतप्रधानांच्या भाषणाची बातमी लिहिण्याची जबाबदारी माझे सहकारी पत्रकार नरेन करुणाकरन यांची होती, तर सभेचे हायलाईट्स किंवा क्षणचित्रे मी लिहिणार होतो. त्यामुळे माझी नजर सगळीकडे फिरत होती. त्याच वेळी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला काही गडबड दिसली. त्या बाजूने व्यासपीठावर चढण्यासाठी जिना तयार केला होता. “राहुल गांधी आला आहे,” असे कुणी तरी म्हटले आणि पत्रकारांपैकी आम्ही काही जण त्यादिशेने धावलो. पांढरा कुर्ता आणि पायजमा घातलेला विशीतला एक तरुण झपझप चालत जिन्याची पावले उतरत होता. काही क्षणात राहुल आमच्या नजरेआड झाला आणि एकाही फोटोग्राफरला त्याची छबी घेता आली नाही.
१९८९च्या या निवडणुकीत राजीव गांधींच्या काँग्रेस पक्षाचा दणदणीत पराभव झाला. त्यानंतर अल्पकाळासाठी भारतीय जनता पक्ष आणि डाव्यांच्या पाठिब्यावर विश्वनाथ प्रताप सिंगांचे आणि नंतर काँग्रेसच्या पाठिंब्यावर चंद्रशेखर यांचे सरकार आले. सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर राजीव गांधी पुण्यात आले होते आणि टिळक रोडवरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या सभागृहात त्यांची पत्रकार परिषद झाली, तेव्हा मी तेथे हजर होतो. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या वतीने प्रश्न विचारण्याची मला संधी देण्यात आली होती. पत्रकार परिषद संपल्यानंतर उपस्थित असलेल्या वीस-पंचवीस पत्रकारांपैकी प्रत्येकाशी राजीव गांधींनी हस्तांदोलन केले. अशा वेळी काय म्हणायचे, काय अभिवादन करायचे हे मला ऐनवेळी सुचलेच नाही. स्मित करीत राजीव गांधींनी हस्तांदोलन केले तेव्हा आपण इतरांशी स्वतःची ओळख करून देतो तसे मी म्हटले – ‘कामिल पारखे, इंडियन एक्सप्रेस’.. आज मागे वळून पाहताना मी त्यांना ‘गुड इव्हिनिंग, सर’ असे अभिवादन करायला हवे होते, असे वाटते.  
१९९१ ला काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यानंतर चंद्रशेखर सरकार कोसळले आणि निवडणुका जाहीर झाल्या. निवडणूक प्रचार दौऱ्यात राजीव गांधींची हत्या झाली. या हत्येमुळे लोकसभेच्या राहिलेल्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. दुसऱ्या निवडणुकीच्या फेऱ्यात राजीव गांधींच्या हत्येमुळे काँग्रेसविषयी सहानुभूती लाट निर्माण झाली. काँग्रेसला बहुमताच्या आसपास जागा मिळाल्याने राजीव गांधींच्या हत्येनंतर अचानक काँग्रेसध्यक्ष बनलेले पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान बनले आणि त्यांनी पंतप्रधानपदाचा पाच वर्षांचा काळही पूर्ण केला. 
राजीव गांधींच्या हत्येनंतर म्हणजे १९९१ पासून तो १९९६ पर्यंत काँग्रेस पक्षात गांधी घराण्यातील कुणीही सक्रीय नव्हते. निवडणुकीत काँग्रेस पक्षाची पुरती धूळधाण उडाल्यानंतर सीताराम केसरी यांच्याकडून सोनियांनी पक्षाची सूत्रे  स्वतःकडे घेतली. १९९९च्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएला बहुमत मिळाले. त्याच वेळी झालेल्या निवडणुकात महाराष्ट्रात मात्र शिवसेना-भाजप सरकारचा पराभव करून काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार आले आणि ते पंधरा वर्षे टिकले.
येथून पुढे सोनियांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा भरारी घेतली आणि काँग्रेस पक्षाची सरकारे अनेक राज्यांत पुन्हा आली. २००४च्या निवडणुकांपूर्वी भाजपासाठी सगळीकडे ‘शायनिंग इंडिया’ आणि ‘फिल गुड’ अशी परिस्थिती असतानाही काँग्रेसला केंद्रात सत्ता मिळाली. सोनियांनी डॉ. मनमोहन सिंहांची पंतप्रधानपदी निवड केली. केंद्रात सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख या नात्याने त्या देशातील सर्वाधिक सत्ता त्यांच्याकडे आली.  काँग्रेस २००९ च्या निवडणुकीत पुन्हा सत्तेवर आला.
नेहरू-गांधी घराणे हे देशातील एक प्रमुख घराणे आहे असे अनेकदा म्हटले जाते. गेले कित्येक वर्षे भाजपच्या वळचणीला असलेले मनेका गांधी आणि वरुण गांधी हेसुद्धा या घराण्याचाच भाग असले तरी सोनिया आणि राहुल यांनाच या घराण्याचे राजकीय वारसदार समजले जाते.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या पुणे आवृत्तीत  मी असताना संपादकीय विभागातील एका बैठकीत झालेली घटना मला आठवते. प्रियांका गांधी यांना पहिल्यांदाच अपत्यप्राप्ती झाली होती आणि या घटनेस न्यूज व्हॅल्यू आहे की नाही आणि असल्यास ही बातमी  कुठल्या पानावर छापावी यासंबंधी आम्हा पत्रकारांत मतभेद होते. बराच काळ वादावादी झाल्यानंतर निवासी संपादक रवी श्रीनिवासन यांनी आपला व्हेटो अधिकार वापराच्या जोरावर ही बातमी पहिल्या पानावर बॉक्स स्वरूपात छापली जाईल असे जाहीर केले. “आफ्टर ऑल, द चाईल्ड इज बॉर्न इन द नेहरू-गांधी फॅमिली!” असे त्यांचे स्पष्टीकरण होते. 
स्वतंत्र भारताच्या सत्तर वर्षांच्या इतिहासात नेहरू-गांधी घराण्याने तीन पंतप्रधान दिले आहेत आणि त्यांच्या सत्तेचा एकूण कालावधी जवळजवळ चाळीस वर्षांचा होता. त्याशिवाय सोनिया गांधी यांच्या हातात देशाची सूत्रे दहा वर्षे होती.
प्रियंका गांधी यांची आता काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून निवड झाल्याने भारतीय राजकारणाला निश्चितच नवे वळण मिळणार आहे. यावेळी पहिल्यांदाच नेहरू-गांधी घराण्यातील तीन व्यक्ती एकाच वेळी राजकारणात सक्रिय असताना दिसत आहेत. त्यांच्या आगमनामुळे केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे तर संपूर्ण देशात राजकीय समीकरणे बदलू शकतात. प्रियंका यांच्या राजकीय क्षेत्रातील अधिकृत आगमनाने पुन्हा एकदा नेहरू-गांधी घराणेशाहीची काही काळ चर्चा सुरू राहिल.   
आपल्या देशात राज्यपातळीवर अनेक घराण्यांनी दीर्घकाळ सत्ता भोगली आहे. तामिळनाडूमध्ये एम. करुणानिधी यांचे कुटुंब आणि नातलग, पंजाबमध्ये सुरजित सिंग बर्नाला यांचे घराणे, ओडिशामध्ये आधी बिजू पटनाईक आणि आता नवीन पटनाईक, हरियाणा येथे देविलाल यांची तिसरी पिढी आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दोन्ही प्रमुख स्थानिक पक्ष दोन घराण्यांतील आहेत. आंध्र प्रदेशात एन. टी. रामा राव यांचे जावई चंद्राबाबू नायडू यांच्या  हाती सत्ता आहे. बिहारने दीर्घकाळ लालू घराण्याच्या सत्तेस पसंती दिली आहे. उत्तर प्रदेशात मुलायम सिंह यादवांची दुसरी पिढी आली आहे. महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांची  तिसरी पिढी राजकारणात स्थिर झाली आहे, तर शरद पवार, गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांची दुसरी पिढी प्रस्थापित झाली आहे. काँग्रेसचे अशोक चव्हाण हे त्यांच्या कुटुंबातील दुसरे राजकीय वारसदार तर पृथ्वीराज चव्हाण हे त्यांच्या कुटुंबातील तिसरे वारसदार आहेत. त्यामुळे विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि भारतीय मतदारांनी घराणेशाही पूर्णतः स्वीकारली आहे, हे मान्यच करायला हवे. राष्ट्रीय पातळीवरील पक्षांत आणि सत्तेत मात्र नेहरू-गांधी घराण्याचाच वरचष्मा राहिला आहे, हेच आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे असे फार तर म्हणता येईल. 
.............................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com