Showing posts with label V P Singh. Show all posts
Showing posts with label V P Singh. Show all posts

Wednesday, October 12, 2022

एक उद्योगपती म्हणून शंतनुराव किर्लोस्कर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहेत. उद्योगक्षेत्रात सहा दशकांहून अधिक काळ भरीव कामगिरी करणाऱ्या देशात ज्या काही मोजक्या व्यक्ती आहेत त्यांमध्ये शंतनुरावांचा समावेश होतो. वृत्तपत्रांमधील वा इतर कुठल्याही छायाचित्रांतील महनीय व्यक्तींच्या गर्दीमध्ये शंतनुरावांना ओळखण्याची पक्की खूणगाठ म्हणजे त्यांच्या गळ्याभोवती असणारा तो बो-टाय.

पण शंतनुरावांच्या व्यक्तिमत्त्वातील बो-टाय हेच केवळ वैशिष्ट्य मुळीच नाही. '

`शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर' हे नाव वगळले तर या उद्योगमहर्षीच्या व्यक्तिमत्त्वामध्ये परंपरागत असे दुसरे काहीच नाही, असे एका इंग्रजी नियतकालिकाने म्हटले आहे ते उगाच नाही. " आमच्या इंग्रजी वृत्तपत्रसृष्टीत S L Kirloskar या नावानेच त्यांचा उल्लेख व्हायचा..

शंतनुरावांच्या पुण्यातल्या मॉडेल कॉलनीतल्या बंगल्याचे नाव `लकाकी' -- लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर या नावाचे लघुरुप. तिथं त्यांना मी एका सकाळी भेटलो होतो.
“तुम्हाला बो-टाय का आवडतो ? " असा एक प्रश्न त्यांना मुलाखतीत विचारला गेला होता.
“ तुम्हाला या प्रश्नासाठी कोणते उत्तर अपेक्षित आहे- चांगले की वाईट ? " असाच मिश्किल प्रतिप्रश्न शंतनुरावांनी त्या प्रश्नकर्त्याला केला.
'दोन्ही प्रकारची उत्तरे चालतील. "मुलाखतकर्ता म्हणाला.
" त्याचे असे आहे.” शंतनुराव उत्तरले, "नेहमी वापरात असलेल्या टायप्रमाणे बो -टाय सूप पिण्याच्या कपामध्ये पडून भिजत नाही. या प्रश्नाचे दुसरे उत्तर सरळच आहे. मला बो-टाय वापरायला आवडते! "
या प्रश्नाच्या दुसऱ्या प्रकारच्या उत्तरातच शंतनुरावांचा आपला जीवनविषयक दृष्टीकोन प्रतिबिंबित होतो.
आपल्या मनास पटतात त्याच मतांचा पाठपुरावा शंतनुरावांनी जग काय म्हणेल याची पर्वा न करता सातत्याने केला आहे.
एक नास्तिक आणि पूर्णत: बौद्धीकवादी म्हणून ते सुपरिचित आहेत. समाजवादी विचारांचा या देशात स्वातंत्र्यानंतर तब्बल चाळीस वर्षे अत्यंत गाढा पगडा असताना 'नफा मिळविण्यात वाईट असे काहीच नाही' असे अनेक दशके इतरांचा रोष ओढून मांडणारी ही व्यक्ती. केंद्रभूत आर्थिक नियोजनास असणारा त्यांचा प्रखर विरोध तर सर्वांनाच सुपरिचित आहे.
आयुष्याची नव्वदी पार केलेल्या शंतनुरावांनी सुख-दुःखाचे अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले आहेत. ते अनुभवतांना आणि त्याचप्रमाणे त्यांना उजाळे देताना त्यांनी जी कमालीची स्थितप्रज्ञता बाळगली याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटणे साहजिकच आहे. पण 'सो व्हाट?' (त्यात विशेष असे काय ?) असे म्हणून त्याबद्दल स्वतः कडे विशेष मोठेपणा स्विकारण्यास शंतनुराव झटकन नकार देऊन मोकळेही होतात.
शंतनुरावांचा जीवनविषयक दृष्टीकोन हा पूर्णतः बुद्धीप्रामाण्यवादावर आधारलेला आहे. रूढीवादाविरुद्ध त्यांची स्वतःची अशी खास ठाम मते आहेत. मात्र त्याविषयी कसल्याही प्रकारचा गाजावाजा न करता आपल्या प्रदीर्घ आयुष्यातील विविध प्रसंगांमध्ये रोखठोख भूमिका घेऊन त्यांनी आपल्या वा पुरोगामीत्वाची झलक दाखविली आहे.
शंतनुराव तरुणपणी अमेरिकेत शिकत असतांना घडलेला एक प्रसंग त्यांच्या परखड मतांविषयी बरेच काही सांगून जातो.
शंतनुरावांच्या एका शिक्षकाने वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना धर्म या विषयावर निबंध लिहावयास सांगितला होता. त्या शिक्षकाने शंतनुरावांचा निबंध वाचला. शंतनुरावांना त्यांनी जवळ बोलाविले आणि त्या निबंधातील काही ओळींवर बोट ठेवून म्हटले, " या ओळी तू मोठ्याने वाच अन् त्यात तू जे काही म्हटले आहे, त्यावर तुझा स्वतःचा तरी विश्वास बसतो काय ते मला सांग. "
जगामधील सर्व धर्म ज्यावेळी स्थापन झाले त्यावेळी ते त्या काळच्या समाजाला कितीही उपयुक्त ठरले असले तरी आधुनिक मानवास धर्माची काडीमात्र गरज नाही, असे मत शंतनुरावांनी या आपल्या निबंधात मांडले 'होते.
"पंचमहाभूतांविषयी आज विज्ञानाद्वारे प्रचंड माहिती उपलब्ध असताना पाऊस कसा पडतो, भूकंप कसे घडतात, याविषयी विज्ञान स्पष्टीकरण देत असताना पर्जन्यदेव वा इतर देवतांच्या दंतकथा अगदीच रानटी वाटतात. परमेश्वराने हे संपूर्ण विश्व सहा दिवसांत निर्माण केले आणि देवाने मातीच्या पुतळ्याच्या नासिकेत प्राण फुंकून मानवास निर्माण केले या कथांवर उत्क्रांतीवादाचा अभ्यास केलेली व्यक्ती कधीही विश्वास ठेवू शकणार नाही. या सर्व कथा त्या जुन्या काळातील लहान मुलांना झोपविण्यासाठी सांगितल्या गेलेल्या गोष्टी असाव्यात, असेच माझे स्पष्ट मत आहे. ' असे शंतनुरावांनी या निबंधात लिहिले होते.
आपल्याला जे काही पटले तेच मत ठामपणे मांडण्याची ही वृत्ती शंतनुरावांनी आपल्या पुढील आयुष्यात कायम ठेवलेली दिसते. मृत्यूनंतर आपला देह वैद्यकीय शिक्षणासाठी दान करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी त्यांनी घेतला, त्यावेळी या निर्णयासंबंधी वृत्तपत्रात उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या
देहदान करण्याची कृती निश्चितच उदात्त; पण किर्लोस्करांसारख्या महनीय व्यक्तीचा मृतदेह विच्छेदनासाठी वैद्यकीय विद्यार्थ्यांकडे सोपविणे खरेच योग्य ठरेल काय? असा एक प्रश्न या चर्चेत उभा करण्यात आला होता.
वैद्यकीय विद्यार्थ्यांना शरीरशास्त्राच्या अभ्यासासाठी मृतदेहांची अत्यंत निकडीची गरज असते. पण मृतदेह मिळत नाही या कारणामुळे भारतातील बहुतेक वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मृतदेहाच्या मॉडेल्सद्वारे मानवी शरीररचना समजावून घ्यावी लागते. या महाविद्यालयांसाठी मृतदेह उपलब्ध करून दिले तर विद्यार्थ्यांना विच्छेदन करता येईल, त्यांचा अनुभव वाढेल आणि देशात अधिक कुशल आणि प्रशिक्षित डॉक्टर निर्माण होतील हे उघड आहे.
ही बाब लक्षात घेऊन पुण्यात काही वर्षांपूर्वी ग. म. सोहोनी यांनी लोकांनी आपला वा आपल्या नातलगांचा मृतदेह वैद्यकीय शिक्षणांसाठी दान करावा यासाठी देहदान चळवळ सुरू केली. ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब गोरे हे या चळवळीचे संस्थापक-अध्यक्ष. सोहोनींच्या प्रयत्नांमुळे अनेक व्यक्ती देहदानासाठी पुढे आल्या.
एके दिवशी 'किर्लोस्करांनीही मृत्यूत्तोर आपला देह वैद्यकीय शिक्षणासाठी दान केला' असे वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले अन् अनेकांना धक्काच बसला.
दान केलेल्या मृतदेहांची वैद्यकीय विद्यार्थी चिरफाड करतात, हे मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये बराच काळ अभ्यासासाठी ठेवले जातात. विच्छेदन केल्यानंतर शवाच्या एकेका भागांची विल्हेवाट लावली जाते त्यामुळे या मृतदेहांचेदहन अथवा दफन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
याच कारणामुळे ``देहदानाची कल्पना उदात्त आहे हे सर्वमान्य असले, तरी यात मृतदेहाचे होणारे हाल लक्षात घेता निदान किर्लोस्करांसारख्या आदरणीय महनीय व्यक्तीने तरी आपला मृतदेह वैद्यकीय शिक्षणासाठी दान करू नये'' असे विनंतीवजा पत्र त्या काळात एका डॉक्टर महाशयांनी किर्लोस्करांना लिहिले होते.
या पत्रात आणि त्या निमित्ताने वृत्तपत्रात झालेल्या चर्चेस किर्लोस्करांनी दिलेल्या उत्तराने त्यांच्या स्वभावाची साक्ष पटते. " देहदानाच्या माझ्या निर्णयामुळे एवढा वाद निर्माण होण्याचे कारणच काय ? " असे त्यांनी म्हटले होते.
देहदानाविषयीची आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणतात
माझ्या शरीरावर आत्तापर्यंत बारा-चौदा लहान आणि मोठ्या स्वरूपांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या प्रत्येक शस्त्रक्रियेच्या वेळी वैद्यकशास्त्राने केलेल्या भरीव प्रगतीबद्दल मला अचंबा वाटलेला आहे. दहन अथवा दफन केल्याने मृतदेहाचा काहीही उपयोग होत नाही. दहनातून माझ्या देहाची राख होण्याऐवजी या शरीराचा वैद्यकशास्त्राच्या प्रगतीसाठी काही उपयोग होत असेल, तर देहदान करण्याचा माझा निर्णय योग्यच आहे असे मला वाटते. "
गांधीजींच्या चळवळीतील काही सिद्धांत किर्लोस्करांमधील उद्योजकास कधीच पटले नाही. गांधीवादाच्या आचरणातून आध्यात्मिक आणि भौतिक प्रगती साधता येईल, एक नवे ' रामराज्य' आणता येईल हा दावाच किर्लोस्करांना मान्य नव्हता. सुवर्णयुग म्हणून संबोधल्या गेलेल्या त्या रामराज्याची आणि विसाव्या शतकातील रेल्वे, रस्ते आणि विविध साधन सोयींनी समृद्ध असलेल्या समाजाशी तुलनाच कशी करता येईल असा त्यांचा प्रश्न.
गांधीवादावर विश्वास ठेवणारे आदर्शवादी इतिहासातील घटनांकडे केवळ कानाडोळाच करत नाही तर या आधुनिक काळातील वास्तवतादेखील नाकारतात, असे किर्लोस्करांचे स्पष्ट मत होते. ब्रिटीशांच्या ताब्यात भारत गेला या घटनेचे विश्लेषण करताना त्यांनी म्हटले होते की, यंत्रे ताब्यात असलेल्या एका देशाने दुसऱ्या यंत्रहीन देशावर स्वामित्व मिळविण्याचा हा प्रकार होता.
पुणे शहर आज अनेक औद्योगिक प्रकल्पांसाठी प्रसिद्ध आहे. देशातील आणि राज्यातील अनेक शहरांमध्ये विविध बड़े औद्योगिक प्रकल्प आणण्यासाठी स्थानिक नेत्यांमध्ये स्पर्धाही चाललेली दिसून येते. या पार्श्वभूमीवर केवळ पन्नास वर्षांपूर्वी पुण्यातील सांस्कृतिक आणि शैक्षणिक वातावरण बिघडू नये, या कारणाखाली स्थानिक नोकरशहांनी किर्लोस्करांना येथे उद्योगप्रकल्प उभारण्यास परवानगी नाकारली होती
ही घटना आहे दुसऱ्या महायुद्धानंतरची. पुण्यात किंवा पुण्याशेजारी किर्लोस्कर ऑईल इंजिन्सच्या कारखान्यासाठी जागा मिळविण्यासाठी शंतनुरावांचे चिकाटीचे प्रयत्न चालू होते. मात्र त्यावेळचे पुण्यातील कलेक्टर या योजनेमध्ये झारीतील शुक्राचार्यासारखे आडवे आले. पुणे हे एक पेन्शनरांचे शहर आहे, येथील जीवन अगदी संथगतीने चालते. पुण्याचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील शैक्षणिक वातावरण. येथे कारखान्यांस परवानगी दिली तर औद्योगिकीकरणामुळे पुण्यातील परंपरागत वातावरणच मुळी बिघडून जाईल. त्यामुळे किर्लोस्करांच्या उद्योग प्रकल्पास सरकारने मान्यता देऊ नये, असा शेरा या कलेक्टर महाशयांनी सरकारदरबारी सादर केला होता.
अखेरीस मुंबई प्रांताच्या सचिवालयाकडे हे प्रकरण नेऊन किर्लोस्करांनी पुण्यातच आपल्या उद्योग प्रकल्पासाठी परवानगी मिळविली आणि किर्लोस्कर उद्योग साम्राज्य इथेच आकारास आले.
या उद्योग प्रकल्पानंतर इतरही अनेक कारखाने पुण्यात आले आणि एक औद्योगिक नगर म्हणून पुण्याची वाढ झाली.
" ज्यावेळी या देशामध्ये नफा मिळविणे यात वाईट असे काही मानले जाणार नाही, त्या दिवसापासून या देशाच्या प्रगतीची वाटचाल सुरू होईल." हे किर्लोस्करांचे एक प्रसिद्ध वाक्य.
“नफा मिळविणे हे कुठल्याही उद्योगाचे मुख्य उद्दिष्ट असावे आणि केवळ नफा याच कसोटी व कुठल्याही उद्योगधंद्याची कार्यक्षमता मोजली पाहिजे. 'ना नफा, ना तोटा' या सरकारच्या आत्मघातकी धोरणाविषयी आम्हाला मुळीच आत्मीयता वाटत नाही, कारण या धोरणाची फलश्रुती नेहमीच 'नफा नाहीच पण भरमसाठ तोटा' यातच होत असते." असे किर्लोस्करांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे.
शंतनुरावांच्या जीवनातील एक अत्यंत कसोटीचा प्रसंग म्हणजे त्यांच्या उद्योगसंस्थांवर १९८५ साली सरकारी अधिकाऱ्यांनी घातलेल्या धाडी. राजीव गांधी यांच्या कॅबिनेटमध्ये त्यावेळी अर्थमंत्री असलेल्या व्ही. पी. सिंग यांच्या आदेशानुसार देशात आर्थिक गैरव्यवहारात गुंतलेल्या अनेक व्यक्ती आणि कंपन्यांवर धाडीचे सत्र सुरू झाले. सुरुवातीला या धाडीच्या सत्राचे समाजाच्या सर्वच क्षेत्रांकडून स्वागतही झाले.
मात्र एके दिवशी पुण्यामध्ये खुद्द किर्लोस्करांच्याच घरावर धाड पडली, किर्लोस्करांना अटक झाली, त्यांच्या सर्व कंपन्यांच्या कार्यालयातील कागदपत्रांची कसून तपासणी घेण्यात आली आणि अर्थखात्याच्या या मोहिमेबद्दल जनतेच्या आणि खुद्द वृत्तपत्रांच्याही अनुकूल मतात ताबडतोब बदल झाला.
किर्लोस्करांना अटक झाल्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती, मात्र देशातून बाहेर न जाण्यासंबंधी न्यायालयातर्फे त्यांच्यावर बंधन लादण्यात आले होते.
किर्लोस्करांविरूद्ध सरकारने केलेल्या या कारवाईचे फलित काय झाले ? किर्लोस्करांना अटक करण्यात आली या घटनेचे सगळ्याच क्षेत्रात तीव्र प्रतिसाद उमटले. या अटकेविरुद्ध केवळ मराठीच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील इंग्रजी वृत्तपत्रांतदेखील टिकेची झोड उठविण्यात आली होती. ( वृद्वताकडे झुकलेल्या शंतनुरावांना त्यावेळी चौकशीसाठी पोलीस चौकीत अनेक तास ठेवण्यात आले होते याबद्दल लोकांमध्ये संताप निर्माण झाला होता समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात शनिवारवाड्यासमोर निषेध सभाही झाली होती.)
किर्लोस्करांच्या जीवनातील दुसरे कसोटीचे प्रसंग म्हणजे गेल्या दशकात त्यांच्या दोन्ही चिरंजीवांचे काही वर्षांच्या अंतराने झालेले निधन. निवृत्तीच्या वयात शंतनुरावांनी त्यावेळी पुन्हा एकदा आपल्या उद्योगसंस्थांच्या जबाबदारीची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली व समोर आलेल्या विविध समस्यांना खंबीरपणे तोंड दिले.
पूर्णत: बुद्धीप्रामाण्यवादी असल्याने भावनाविवश होण्याची वा दैवावर सर्व हवाला ठेवून बसण्याची त्यांची मुळी प्रवृत्तीच नाही.
शंतनुरावांच्या पत्नींच्या म्हणजे यमूताई किर्लोस्करांच्या अखेरच्या आजाराचा तो प्रसंग. यमुताईंचा आजार बळावला, त्यातून त्या बरे होण्याची आशाच नव्हती. त्यावेळी शंतनुरावांनी आपल्या जवळच्या नातलगांना सांगितले, 'कृपा करून तुम्ही त्यांना आता दवाखान्यात नेऊ नका. यमूताईंना एक-दोन आठवडे वा महिनाभर कसेबसे जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करू नका."
एका मुलाखतीत मुलाखतकर्त्याने किर्लोस्करांना विचारले होते, “ तुमचा नशिबावर विश्वास आहे काय ?"
" नशीब! कसले नशीब ? "
किर्लोस्करांनी त्या मुलाखतकर्त्यासच प्रतिप्रश्न केला.
त्या प्रतिप्रश्नांतच किर्लोस्करांचे उत्तर आणि त्यांचा जीवनविषयक दृष्टीकोन सामावला होता."
" दैववाद म्हणजे अज्ञान. घेतलेल्या एखाद्या निर्णयाची वा त्या निर्णयामुळे होणाऱ्या परिणामांची जबाबदारी टाळण्यासाठी एक उत्तम पळवाट म्हणजे दैववाद" असे किर्लोस्करांनी म्हटले आहे.
समाज बदलायला फार वेळ लागतो तोपर्यंत समाजाच्या कलाने घेतले पाहिजे ही वृत्ती मला मान्य नाही, " असे किर्लोस्करांनी 'जेट युगातील मराठी माणूस' या आपल्या पुस्तकात म्हटले आहे.
समाजात दारिद्र्य आहे म्हणून ते स्विकारावयास हवे, अज्ञान आहे म्हणून ते स्विकारावयास हवे, परंपरेची गुलामगिरी अंगी भिनली आहे म्हणून ती स्विकारली पाहिजे, इतरांना जोराने चालता येत नाही, म्हणून स्वतः हळू चाललं पाहिजे, ही तत्वे त्यांना पटत नाही. "
प्रस्थापित वृत्ती स्विकारायच्या विरुद्ध असायचं कारण हे आहे की, सतत बदल करण्याची वृत्ती त्यामुळे नष्ट होते, " असेच त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
`उत्तुंग' व्यक्तिचित्रसंग्रहातील एक प्रकरण , लेखक कामिल पारखे (प्रकाशक संजय सोनवणी , १९९३ )
Camil Parkhe, August 1, 2022

Wednesday, September 21, 2022

 फसलेली, अल्पकालीन ठरलेली, मोडून काढलेली राजकीय बंडाळी

गेल्या सहा दशकांच्या काळात महाराष्ट्राने अनेक यशस्वी, फसलेली, अल्पकालीन ठरलेली, मोडून काढलेली, केवळ मनात असलेली राजकीय बंडाळी अनुभवली आहे. महाराष्ट्रात किंबहुना त्याकाळात सगळ्या देशात गाजलेले एक मोठे बंड म्हणजे शरद पवार यांनी काँग्रेसचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना घालवून जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्ष यांच्या मदतीने १९७८ साली सत्ता हस्तगत केली तेव्हाचे. 
 
तेव्हापासून भारतीय राजकारणात शरद पवार हेच केवळ एकमेव विश्वासघातकी, बेभरवशाचे, पाठीत खंजीर खुपसणारे आणि बाकीच्यांनी सत्तेसाठी अनेकदा पक्ष, आघाडी बदलली, पुनरागमन केले ते मात्र अगदी साधू, संत असे चित्र निर्माण केले आहे हे खूप हास्यापद आहे. आपल्याच नेत्यांविरुद्ध, पक्षांविरुद्व बंड करुन, पारंपारिक विरोधकांशी हातमिळवणी करुन सत्तेवर येणाऱ्या राजकीय नेत्यांची देशात भलीमोठी यादीच आहे.
 
आपल्या संसदीय लोकशाहीत पक्षाविरुद्ध किंवा नेत्यांविरुद्ध बंडाळीचा गौरवशाली इतिहास तसा फार जुना आहे. पक्षातील बुजुर्ग नेत्यांनी 'गुंगी गुडिया' म्हणून पंतप्रधानपदावर प्रतिष्ठापना केल्यावर लगेचच इंदिरा गांधींनी या नेत्यांविरुद्ध बंडाळी केली होती. 
 
काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करुन खुद्द पंतप्रधान गांधी यांनी आपला स्वतःचा उमेदवार वराहगिरी वेंकट गिरी यांना १९६९ साली राष्ट्रपतिपदी निवडून आणले होते. यापेक्षा यशस्वी बंडाळीचे दुसरे कुठले मोठे उदाहरण देता येईल?
 
शरद पवार यांच्याआधीच महाराष्ट्रातील काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आणीबाणीनंतर इंदिरा गांधींविरुद्ध बंड करून, आपलाच पक्ष खरा असा दावा करून त्यांना पक्षातूनच बाहेर काढले होते हे अनेकांना माहितही नसेल. यापैकी काहींनी स्वतःचा पक्ष काढला होता. इंदिराजींना काँग्रेस पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या या नेत्यांमध्ये यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील वगैरे होते. 
 
आणिबाणीच्या काळात इंदिराजींनी ज्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवले त्या शंकरराव चव्हाण यांनी तर इंदिरा गांधींचा पराभव झाल्यानंतर खासदार बाळासाहेब विखे यांच्याबरोबर महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस हा पक्षच काढला होता. 
 
इंदिराबाई लोकसभेच्या अधिक जागा मिळवून सत्तेवर परतल्याबरोबर शरद पवार वगळता ही सर्व नेतेमंडळी काँग्रेसमध्ये पुन्हा दाखल झाली होती. महाराष्ट्राप्रमाणेच देशभर सगळीकडेच असेच चित्र होते. 
 
या बंडांचा इतिहास पाहता सत्तेतल्या प्रथम क्रमांकाच्या जागेवर नजर असलेल्या, सत्तेत दुसऱ्या स्थानांवर असलेल्या व्यक्तींकडून किंवा आपल्याला सत्तेतून डावलले जात असल्याची भावना असलेल्या व्यक्तींकडून अशी बंडाळी होत असते असे दिसते. अनेकदा ही बंडाळी सत्ताप्रमुख असलेल्या नेत्यांच्या सर्वाधिक जवळच्या आणि विश्वासू व्यक्तींकडूनच होते हे आणखी एक विशेष. 
 
पंतप्रधान मोरारजी देसाईंची जागा घेणारे चौधरी चरणसिंग, पंतप्रधान राजीव गांधींचे जवळचे नेते विश्वनाथ प्रताप सिंग, चंद्रशेखर अशी देशपातळीवर काही उदाहरणे देता येतील. 
 
राज्यात छोटेमोठे बंड करणारे, कुठल्याशा नावाने पक्ष किंवा विचारमंच काढणाऱ्यांची संख्या भरपूर आहेत. पंतप्रधान राजीव गांधींच्या नजरेतून उतरल्यावर बाळासाहेब विखे यांनी पक्षांतर्गत असाच मंच काढला होता, गोविंदराव आदिक यांनीही असाच प्रयत्न केला होता. आपले उपद्रवमुल्य पक्षश्रेष्ठींच्या नजरेत आणून देण्याचा माफक हेतू यामागे असायचा. 
 
महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री झालेले वसंतदादा पाटील हे कायम राजकीय युद्धाच्या किंवा बंडाळीच्या पावित्र्यात असत. आणिबाणीनंतर काँग्रेसच्या पराभवानंतर वसंतदादा यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा अर्स काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस यांच्या युतीचे सरकार चालवले आणि त्यानंतर शरद पवार यांनी. 
 
पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात शरद पवार काँग्रेसमध्ये परतल्यावर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले, तेव्हा पायउतार झालेल्या वसंतदादांनी आपला बंडाचा झेंडा कायम ठेवला. त्यांना राज्याबाहेर ठेवण्याच्या हेतूने राजीव गांधींनी त्यांची राजस्थानला राज्यपालपदी नेमणूक केली तर तिथल्या राजभवनातून मुख्यमंत्री पवार यांना आणि राजीव गांधींना त्रास देण्याचे काम वसंतदादांनी चालूच ठेवले. मात्र त्यातूनही पुरते समाधान होईना तेव्हा राज्यपालपदाचा चक्क राजीनामा देऊन ते महाराष्ट्रात परतले होते ! 
 
काँग्रेस काळात मुख्यमंत्री शरद पवार यांच्याविरुद्ध बंडाळी करुन त्यांचे सहकारी असलेले रामराव आदिक, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख हे दिल्लीत हाय कमांडला भेटायला गेले होते, मात्र या सर्वांना लगेचच उपरती झाली आणि हे बंड शमले. 
 
राज्यात अनेक वर्षे मंत्री असलेले विलासराव देशमुख हे आपल्या लातूर मतदारसंघात १९९५ साली निवडणूक हरले आणि त्यानंतर त्यांनी त्याकाळात सत्तेवर असलेल्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर विधान परिषदेवर येण्याचा प्रयत्न केला, ही निवडणुकसुद्धा ते हरले. 
 
पुढच्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर आल्यावर हेच विलासराव देशमुख काँग्रेसचे मुख्यमंत्री एकदा नव्हे दोनदा बनले. राजकारणात अशा अविश्वनसनीय अनेक घटना होतात. 
 
छगन भुजबळ हे शिवसेनेत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविरुद्ध बंडाळी करणारे पहिले मोठे नेते. या बंडानंतर शिवसैनिकांचा उद्रेक टाळण्यासाठी त्यांना अनेक दिवस भूमिगत राहावे लागले होते, नंतरच्या विधानसभा निवडणुकीत तरुण शिवसेना नेते बाळासाहेब नांदगावकर यांनी त्यांचा माझगावमध्ये पराभव केला होता, आणि भुजबळ यांना नाशिक जिल्ह्यात सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला होता. 
 
शिवसेनेविरुद्व गद्दारी करणाऱ्या भुजबळ यांना निवडणुकीत पराभूत करणारे नांदगावकर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राज ठाकरे यांच्याबरोबर आहेत.
 
भुजबळ यांच्या तुलनेत नारायण राणे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फार मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला नाही, कारण राणे आपल्या कोकण बालेकिल्ल्यात राजकीयदृष्ट्या सुरक्षित होते. त्यांच्याबरोबरच्या निम्हण वगैरे नऊ आमदारांनी टप्प्याटप्प्याने राजीनामे देत नंतर काँग्रेसच्या तिकिटांवर निवडून आले. 
 
भारतीय जनता पक्षाने राणेंचा आणि काँग्रेसचा हाच फॉर्मुला आपल्या `ऑपरेशन लोटस' साठी गोवा, कर्नाटक वगैरे राज्यांत वापरला आहे. 
 
भारतीय वायुदलाचे माजी पायलट असलेले सुरेश कलमाडी एकेकाळी शरद पवार यांचा `खास माणूस' म्हणून ओळखले जायचे. पवारांनी कलमाडी यांना दोनदा राज्यसभेत पाठवले, पवार महाराष्ट्रात आणि कलमाडी दिल्लीत असा त्यावेळी व्यवहार असायचा ( नंतर प्रफुल्ल पटेल यांनी ती जागा सांभाळली.) नव्वदच्या दशकाच्या अखेरीस पवार आणि कलमाडी यांचे बिनसले आणि कलमाडी यांनी शरद पवार यांच्याविरुद्ध अघोषित बंड पुकारले. 
 
पवार यांनी १९९९ साली काँग्रेस सोडली तेव्हा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात जाणार नाही याची कलमाडी यांनी पुरेपूर काळजी घेतली. विठ्ठलराव गाडगीळ यांच्यानंतर पुणे शहराचे `कारभारी' म्हणून सुरेश कलमाडी यांनी जागा घेतली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे महापालिकेत सत्ता मिळवण्यास कलमाडी यांच्यामुळे अंमळ उशीरच लागला. 
 
केंद्रातल्या २०१४च्या सत्तांतराआधी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे अनेक महिने आतल्या आत धुमसत होते. प्रमोद महाजन यांच्या अकाली निधनानंतर पक्षातल्या काही नेत्यांनी त्यांची कोंडी केली, त्यांना अडगळीत टाकले आहे अशी त्यांची भावना झाली होती. याबद्दल अधूनमधून प्रसारमाध्यमांतून त्यांची वक्तव्ये यायची. बंड करुन पक्ष सोडण्याचाही त्यांनीं विचार केला होता, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना या निर्णयापासून परावृत्त केले ते म्हणतात. 
 
पक्षातल्या आपल्या जवळच्या साथीदारांकडूनच आपल्याला दगाफटका होऊ शकतो हे चाणाक्षपणे ओळखून अशा संभाव्य सगळ्या प्रतिस्पर्ध्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्धतशीरपणे एकापाठोपाठ काटा काढला. 
 
`ओबीसींचे मुख्यमंत्री' असा शब्द उच्चारणारे एकनाथ खडसे यात सर्वप्रथम होते, `पहिली महिला मुख्यमंत्री' असे म्हणणाऱ्या पंकजा मुंडे, 'मराठा मुख्यमंत्री'चे दावेदार विनोद तावडे यांची वर्णी नंतर लागली आणि बाकीचे मग सुतासारखे सरळ झाले. 
 
फडणवीस यांना या घडीला पक्षांतर्गत एकही स्पर्धक नाही यातच सर्व काही आले. 
 
अडीच वर्षांपूर्वीचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आणि आपले काका शरद पवार यांच्याविरुद्धचे फसलेल्या किंवा वेळीच आवरते घेतलेल्या बंडाचे गौडबंगाल राजकीय विश्लेषकांना आजही समजले नाही. या रात्रीच्या आणि पहाटेच्या खेळातले मुख्य खेळाडू अजित पवार, देवेन्द्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हेच भविष्यकाळात, या बंडातील खेळी कुणाची आणि काय होती यावर प्रकाश टाकू शकतील. मात्र असे होणे असंभव दिसते. 
 
भारतीय जनता पक्षामध्ये पक्षांतर्गत किंवा सरकारविरोधी बोलण्याची हिम्मत एक सुब्रह्मण्यम स्वामी यांच्याशिवाय इतर कुणीही करु शकत नाही. अशी हिम्मत तेव्हाचे भाजपचे खासदार नाना पटोले यांनी दाखवली आणि पक्षाचा अन पदाचा राजिनामा देऊन ते काँग्रेसमध्ये आले. आपली बंडाची खुमखुमी कायम आहे हे पटोले अधूनमधून दाखवत असतात. 
 
भाजपने गेल्या काही वर्षांत एकामागून एक अशा अनेक राज्यांत आपले सरकार स्थापन करण्याचा सपाटा लावला आहे. मात्र यापैकी एकही राज्यांत मुख्यमंत्र्यांविरुद्ध कधी कुरबुर ऐकू येत नाही. उलटपक्षी हा पक्षच आपणहून कसलीही पूर्वसूचना न देता या राज्यांतील मुख्यमंत्र्यांची उचलबांगडी करत असतो. 
 
काँग्रेसच्या काळात काय घडायचे हे आठवून पहा. त्याकाळात काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे पक्ष निरीक्षक या नावाची एक फौज कायमस्वरूपी तैनात असायची. कुठ्ल्या न कुठल्या राज्यांत मुख्यमंत्र्यांविरुद्ध तक्रारी असायच्या आणि जी के मूपनार, वायलर रवी, आर एल भाटिया वगैरे पक्षाचे सरचिटणीस ही आग बुझवायला तातडीने रवाना होत. 
 
अनेकदा हे पक्षांतर्गत बंडखोर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पोसलेले असायचे, राज्यातले मुख्यमंत्री स्वयंभू होऊ नये म्हणून ! हल्ली भाजपच्या राजवटीमध्ये कुठल्याही राज्यांत असे स्वयंभू, मनसबदार मुळी नसतातच. 
 
यशस्वी बंद करण्यात, योग्य वेळी बंडाची तलवार म्यान करण्याचे भान असलेला आणि आपल्याविरुद्धचे बंड मोडून काढण्याचा अनुभव शरद पवार यांच्यासारखा इतर कुणालाही नाही. 
 
सत्तरच्या दशकात पहिले यशस्वी बंड करुन सत्तेवर आल्यावर १९९९ साली पवारांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरुद्ध बंड करून दुसऱ्यांदा नवीन पक्ष काढला. मात्र केवळ सहा महिन्यात काँग्रेस आणि सोनिया यांच्याशी हातमिळवणी करुन त्यांनी आपला सवतासुभा कायम ठेवला तो आजतागायत. लालू प्रसाद यादव यांच्यानंतर काँग्रेसशी एकनिष्ठ राहणारे देशातले ते दुसरे मोठे राजकारणी नेते. 
 
यावेळच्या महाविकास आघाडी सरकारविरुध्द्च्या ताज्या बंडातसुद्धा शरद पवार आपले राजकीय कौशल्य आणि अनुभव कसा पणाला लावतात (किंवा लावत नाहीत), हे पाहावे लागेल.  
 
Camil Parkhe 

Tuesday, September 1, 2015

Quota politics

Quota politics
CAMIL PARKHE | Friday, 28 August 2015
Patel, Gujarat, riots, reservation, BJP, caste, Politics, Camil Parkhe, India, blog
The Patels from Gujarat are the latest community in the country to come on the streets to seek reservations for them. The massive agitation in the stronghold of the BJP has naturally unnerved the party, forcing Prime Minister Narendra Modi to make a fervent appeal to the community to maintain calm. The apex court in the country has already put restrictions on the percentage of quota that can be reserved for various castes and other communities. But that has not prevented politicians from playing to the gallery during the poll campaigns to assure quota to various communities. This has emboldened more and more communities in different parts of the country to seek reservations.
In Maharashtra, some leaders of the Maratha community had been demanding quota for their community. Knowing the legal positions, the Congress-NCP government during its 15-year-old consecutive rule in the state had ignored the demand. But the Prithviraj Chavan led government had announced quota for the Marathas and also for the Muslims just a few months before going to the assembly polls. As was expected, now the courts have struck down reservation for the Maratha caste while the BJP-Shiv Sena government has different views on the reservations for the minority Muslim community. As a part of the Lok sabha and Assembly polls campaign, the BJP had also assured reservations to the Dhangar community in Maharashtra. After coming to power both at the Centre and in the state, the party has not made any concrete moves in this regard.
The issue of quota has been controversial since the makers of the Constitution made provisions for the same in 1950s. The Sikhs, although not Hindus, were later included in the scheduled caste category to accommodate the dalits in this religious community. A few decades later even the dalits who had embraced Buddhism following in the footsteps of Dr Babasaheb Ambedkar were included in the Scheduled Caste category by the government led by V P Singh. Since then many states have passed legislations to provide the benefits of the reservation facility to the communities having significant vote banks. The issue of religion-based reservations, that is reservations for dalit Christians or the backward Muslims has also always remained controversial.
As long as the quota facility is available to some communities, the other communities will be tempted to seek similar benefits for themselves too, irrespective of their social, economic or political status. The politicians too will continue to make tall promises to their vote banks to capture or to retain power. At the same time, due to political reasons, there is no possibility of scrapping the prevalent quota system although these reservations were meant to be only for some specific period. It is a piquant situation the country has landed in and there does not seem to be any solution to the issue.

Tuesday, May 1, 2012

When V(VI)P came calling

When V(VI)P came calling
CAMIL PARKHE
Sakal Times
http://www.sakaaltimes.com/20120430/5689334243019542562.htm
Monday, April 30, 2012 AT 04:46 PM (IST)
Tags: Spice,   unplugged,   VIP Lounge, Sakal Times, Pune, Lohegaon, Camil Parkhe
  "Come on, help yourself with another biscuit. You are a young man, you need to eat well,” the prime minister said to me as he passed on a plate of biscuits to me. I took a biscuit as that seemed to be the only way to break the air of awkwardness that was prevailing in the VIP Lounge of the Lohegaon airport. I, along with just three-four journalists from Pune, was with the prime minister Vishwanath Pratap Singh, and all of us were killing time, as the New Delhi-bound Indian Airlines plane supposed to carry him, was yet to arrive at the airport.
This incident took place a couple of months after Singh had taken over the office of Prime Minister in the Janata Dal-led government. He was invited to address a campaign meeting for a by-election in the neighbouring Karnataka. The Raja of Mandi, who was then described as an epitome of value-based politics, had declared that he would not use a special plane to address a poll meeting of the party, but would travel in an ordinary plane. That is how the PM minus his usual government retinue was waiting at the VIP Lounge. About half an hour before that, some of us had received a call informing that the PM was making a halt at the Pune airport en route to Delhi and would meet the members of the press. Hurriedly, I had hitchhiked on a two-wheeler of another journalist to reach the airport. And here we were chatting with him and sipping the tea placed before us.
To be frank, given such a short notice, we journalists were hardly prepared for a half an hour-long question and answer session with the PM on any national or other issues. The Janata Dal’s Maharashtra unit president, Mrinal Gore, was there too and I could see that she was in the same boat. The firebrand socialist leader or the  ‘Paniwali Bai’ too didn’t have much to talk to the PM as some strange twists had only recently brought them politically together.
After 10 to 15 minutes, the conversation invariably whirled around the weather, giving a clear signal that we had run out of topics to discuss. And now, the PM was asking me to have another biscuit. To the relief of all, a government official announced that it was time for the prime minister to board the plane and we took the VVIP’s leave.
 The incident only reaffirmed the dictum that journalists should always be equipped with information to interview important people. And that even Prime Ministers should be equipped to strike interesting conversations with people, just in case such an eventuality occurs.