Showing posts with label Gurien Jacquier. Show all posts
Showing posts with label Gurien Jacquier. Show all posts

Monday, May 12, 2025


भारतीय समाजव्यवस्थेत दलितांना किंवा पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांना पौरोहित्याचे अधिकार नसायचे, आजही नाहीतच.

नजिकच्या काळात हा अधिकार मिळण्याची धुसरही शक्यता नाही.
ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर मात्र या उपेक्षित समाजघटकांना धर्मगुरू होण्याचे आणि पर्यायाने धर्मग्रंथ वाचण्याचे, शिकवण्याचे अन पौरोहित्याचे इतर सर्व अधिकार मिळाले.
महाराष्ट्रात या समाजातील पहिले धर्मगुरू होण्याचा मान भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे अस्पृश्यता कायद्याने गाडण्याआधीच मिळाला.
नगर जिल्ह्यातील राहुरीजवळच्या चिंचोळे गावचे जोसेफ मोन्तेरो हे १९३० साली कॅथोलिक धर्मगुरू बनले.
महाराष्ट्रात प्रोटेस्टंट पंथांत मात्र हे खूप आधीच घडले होते.
तिथे ब्राह्मण असलेल्या नगरचे रामकृष्ण विनायक मोडक, हरिपंत रामचंद्र खिस्ती, नारायण वामन टिळक, नारायणशास्त्री शेषाद्री, नीळकंठशास्त्री गोऱ्हे यांच्याबरोबरीने बहुजन समाजातील बाबा पद्मनजी, कृष्णाजी रत्नाजी सांगळे भास्करराव उजगरे वगैरेना 'रेव्हरंड' पदाची दीक्षा आधीच मिळाली होती.
वैजापूर तालुक्यातील माळीघोगरगाव येथे फादर जोसेफ मोन्तेरो यांचे १९७९ साली निधन झाले.
मराठवाड्यातील हे माळीघोगरगाव हे माझे आजोळ. तेथेच फादर मोन्तेरो यांची समाधी त्यांचे गुरु फ्रेंच फादर गुरियन जाकियरबाबा यांच्या समाधीशेजारी आहे.
संगमनेर येथील थॉमस भालेराव हे 1965 साली पहिले स्थानिक येशूसंघीय किंवा जेसुईट धर्मगुरू बनले.
हेच फादर भालेराव १९८९ साली या दलित समाजातील पहिले आणि एकमेव कॅथोलिक बिशप बनले.
नाशिक डायोसिसचे पहिले बिशप भालेराव यांचे २०१५ साली निधन झाले.
त्यांच्यानंतर इतर कुठलीही स्थानिक दलित व्यक्ती आजपर्यंत कॅथोलिक बिशप बनलेली नाही.
प्रोटेस्टंट पंथात मात्र आज महाराष्ट्रात अनेक दलित बिशप्स आहेत.
भारतातल्या ख्रिस्ती समाजात स्थानिक विविध जातीजमाती आहेत. त्यामध्ये उच्चवर्णीय आहेत तसेच दलित आणि आदिवासी लोकांचे प्रमाण खूप आहे.
अनेक दलित आणि आदिवासी ख्रिस्ती व्यक्ती आतापर्यंत बिशप बनल्या आहेत.
पूर्व भारतातील आदिवासीबहुल राज्यांतील अनुसूचित जमातीतील काही व्यक्ती आतापर्यंत कार्डिनल्स झालेल्या आहेत.
भारतात दक्षिणेतील काही राज्यांत कॅथोलिक बिशपांमध्ये अनेक दलितसुद्धा आहेत.
मात्र अलीकडच्या काळापर्यंत या कॅथोलिक दलित बिशपांमधून कार्डिनलपदावर कुणीही पोहोचले नव्हते.
पोप फ्रान्सिस यांनी २०२२ साली हैदराबादचे आर्चबिशप अँथनी पुला यांची कार्डिनलपदी नेमणूक केली आणि कॅथोलिक चर्चच्या इतिहासात नवा विक्रम घडला.
अँथनी पुला यांच्या रुपाने कॅथोलिक चर्चमध्ये पहिल्यांदाच एखादी दलित व्यक्ती कार्डिनल बनली होती. .
गेली अनेक शतके अस्पृश्यता आणि जातीभेद या प्रथा भारतीय समाजपद्धतीचा एक अविभाज्य भाग राहिल्या होत्या, आजही यात फारसा फरक पडलेला नाही.
असे असले तरी ख्रिस्ती धर्मात जातीभेद आणि सामाजिक उच्चनीचता या गोष्टींना अजिबात स्थान नसते.
त्यामुळे एखादा दलित धर्मगुरू, बिशप किंवा कार्डिनल बनले याची चर्चतर्फे कधीही चर्चा किंवा वाच्यता केली जात नाही, टिमकी वाजवणे, गाजावाजा करणे तर दूरच राहिले.
बिशप थॉमस भालेराव आणि कार्डिनल अँथनी पुला यांच्याबाबत सुद्धा असेच धोरण स्वीकारले गेले होते.
मी स्वतः याबाबत लिहिणे याच कारणासाठी टाळले होते.
भारतचे पहिले दलित राष्ट्रपती के आर नारायणन यांना स्वतःला दलित म्हणवून घेणे आवडत नसे.
कुणाला आवडेल?
बिशपपदावरचे पद म्हणजे कार्डिनल.
कॅथोलीक धर्मातील सर्वोच्च असलेले पोपपद रिक्त झाल्यानंतर जगभरातील कार्डिनल्स एकत्र येऊन आपल्यापैकी एकाची पोप म्हणून निवड करतात.
आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले आणि पोपपद रिक्त झाले.
भारताच्या, चर्चच्या आणि जगाच्या इतिहासात आता पहिल्यादाच दलित समाजातील एक कार्डिनल अशा महत्त्वाच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत आहे.
मात्र आता पोप पदाच्या निवडणुकीत कार्डिनल अँथनी पुला सहभागी होत असल्याने याबाबत प्रसार माध्यमांत चर्चा होणे साहजिकच आहे.
आफ्रिकन वंशाच्या धर्मगुरूंना बिशप आणि कार्डिनल्स पद देण्यात आले तेव्हाही अशीच चर्चा झाली होती.
भारतात सद्या सहा कार्डिनल्स आहेत. त्यापैकी वयाची ऐंशी पूर्ण न केलेले चार कार्डिनल पोपपदाच्या निवडणुकीत सहभागी होत आहेत,
त्यामध्ये गोव्याचे कार्डिनल फिलिप नेरी फेरावसुद्धा आहेत. इतर दोन कार्डिनल्स केरळमधील आहेत.
वयाची ऐंशी पूर्ण न केलेले जगभरातील १३३ कार्डिनल्स सात मे रोजी नूतन पोप निवडण्यासाठी स्वतःला ऐतिहासिक सिस्टाईन चॅपेलमध्ये कोंडून घेतील.
ते बाहेर येतील ते नव्या पोपची निवड करुनच.
ही निवडणूक किती काळ चालेल याबाबत काहीच सांगता येत नाही.
एक दिवस, एक आठवडा किंवा अधिक काळ. मताधिक्य होईपर्यंत.
यावेळी युरोपऐवजी आशियन किंवा आफ्रिकन कार्डिनल पोपपदावर निवडून येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आशियन धर्मगुरु म्हणजे भारतीय कार्डिनल पोप झाले तर नक्कीच नवा इतिहास घडणार आहे.
किंवा दलित कार्डिनल पोप झाले तर?
त्यामुळेच पोपपदाच्या या निवडणुकीबद्दल संपूर्ण जगात खूप उत्कंठा आहे.

Thursday, December 21, 2023

 मोगलाई आणि अमरावती 

                                       

आम्ही मोगलाईतले म्हणजे मराठवाड्यातले. माझा जन्म आणि बालपण पश्चिम महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपुर येथे गेले तरी नाळ मात्र कायम गंगेपलिकडे असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या आजोळशी राहिली. या मोगलाईतली भामाठाण, पैठण, नागमठाण, वरखेड, बोरसर, लासूर, महालगाव वैजापूर, गंगापूर अशी अनेक नावे बाई-दादांच्या अन आजोळच्या लोंकांच्या बोलण्यातून कायम कानावर पडायची. गंमत म्हणजे वरीलपैकी बहुतेक ठिकाणी मी कधीही गेलेलो नाही वा त्यांचे भौगोलिक स्थान मला आजही माहित नाही.
अधूनमधून सणावाराला माळीघोगरगाव येथून पायपीट करत आमचे आजोबा म्हणजे गोविंदराव शिनगारे टिळकनगर श्रीरामपूरला स्थायिक झालेल्या मार्थाबाई आणि अनुसयाबाई या आपल्या दोन्ही लेकुरवाळ्या लेकींसाठी पुरणपोळ्यांचे आणि इतर खाद्यपदार्थांचे टोपले घेऊन दुपारी बारापर्यंत आमच्या घरी पोहोचायचे. बहुधा भल्या सकाळी गरमागरम पुरणपोळ्याचे टोपले फेट्यावर ठेवून घेऊन ते या पायी प्रवासाला निघत असत. या सगळ्या ऐकिव गोष्टी.
याचे कारण म्हणजे मी जन्मायच्या खूप वर्षे आधीच आजोबा अचानक गेले. एका सकाळी शेतमळ्यात घराबाहेर झोपलेल्या आजोबांचे शरीर काळेनिळे पडलेले दिसले होते, बहुधा विषारी सर्पदंशाने. आजीचे - आईची आई - जिच्याबाबत कधी एक शब्द ऐकलेला आठवत नाही, तिचे तर आजतागायत नावसुद्धा माहित नाही.
दहापंधरा वर्षांपूर्वी बाई असताना काहीही निमित्त नसताना मुद्दामच तिच्याबरोबर तिच्या माहेरी गेलो होतो. तेव्हा शांत्वनमामांच्या थोरल्या मुलाला माझ्या मामेभाऊ शाहूला सहज `आपले शेत कुठपर्यंत आहे ? ' असे विचारले तेव्हा त्याने दोन दिशेला हात उभारुन लांबवरपर्यंतची शेतीची जागा दाखवली होती. ``बहुधा साठ-पासष्ट एकरांपर्यंत असावी,'' असे तो म्हणाला होता.
विशेष म्हणजे ही हाडुळकीची शेती नव्हती. तेव्हा त्यावेळी नाशिकजवळच्या नांदूर-मधमेश्वर धरणाचे पाणी नुकतेच घोगरगावाला पोहोचले होते. तशी शेतात विहीर होती, गरजेनुसार मोटेने पिकांना पाणी दिले जात होते.
विहिरीतून चार बैलांच्या मदतीने मोटेने विहिरीतून पाणी काढून या शेतातल्या भाजीपाल्यांना, वांगे, काकडी वगैरेंना पाणी दिले जाताना मी पाहिले आहे. आता धरणाच्या पाण्याने शेती पूर्णतः बागायती झाल्याने सालातून तीनदा पीक घेणे आज शक्य झाले आहे. आम्ही श्रीरामपूरला परतताना शाहूभाऊने आमच्या नजरेसमोर जमीनीतून उपटलेला डहाळ, गव्हाच्या कोवळ्या लोंब्या असे कायकाय दिले होते.
बाईची ही तिच्या माहेरची शेवटची गाठभेट ठरली. त्यानंतर घोगरगावातल्या त्या शेतमळ्यात आजपर्यंत मी पाय ठेवलेला नाही.
आता नक्की संदर्भ आठवत नाही मात्र आमच्या आईवडलांच्या संभाषणात अनेकदा येणारा एक शब्द म्हणजे `मोगलाई' हा होता. मोगलाई हा शब्द ऐकून तेव्हा शालेय वयातला मी अचंबित व्हायचो. (तिथल्या `राजवाडा' या शब्दाचा नेमका अर्थ मला तसा फार लवकर समजला होता).
`आम्ही मोगलाईतले', `मोगलाईतला अमुकअमुक परिसर' असे शब्दप्रयोग व्हायचे. ''ही काय मोगलाई हाई काय?'', ''मोगलाई लागून गेली काय?'' असे वाक्प्रचार कानावर पडायचे.
दिल्लीतले मुघल साम्राज्य आणि औरंगाबाद जिल्ह्यातली मोगलाई ही नक्की काय भानगड आहे, असा मला प्रश्न पडायचा. नंतरनंतर कळायला लागले कि ही मोगलाई म्हणजे हैदराबाद निजामाच्या अमलाखालील मराठवाडा वगैरे प्रदेश म्हणजे मोगलाईतील भाग. अहमदनगर जिल्ह्यातल्या सीमेवरची गोदावरी म्हणजे गंगा ओलांडली कि हा मोगलाईचा भाग सुरु व्हायचा.
घोगरगावच्या फादर गुरियन जाकियरबाबांचे मी चरित्र लिहायला घेतले तेव्हा अगदी पहिल्यांदा 'मोगलाई' हा शब्द त्याच्या समर्पक अर्थासह तोही इंग्रजी पुस्तकांत मी पहिल्यांदा वाचला आणि या शब्दाविषयीच्या माझ्या कुतूहलाला अखेरीस पुर्णविराम मिळाला.
मी वाचलेल्या कुठल्याही मराठी पुस्तकांत `मोगलाई' या शब्द या अर्थाने वापरलेला माझ्या वाचनात आलेला नाही. मी वाचलेले बहुतेक लेखक पुण्यामुंबईतले, पश्चिम महाराष्ट्रातले आणि कोकणातले असावेत यामुळेही हे असेल कदाचित.
दुसरा नेहेमी कानावर पडणारा शब्द म्हणजे अमरावती आणि अमरावतीचे बिशप. त्याकाळात औरंगाबाद जिल्हा आणि गोदावरी नदीपलीकडचा परिसर अमरावती डायोसिसमध्ये म्हणजे धर्मप्रांतात होता. औरंगाबाद धर्मप्रांताची निर्मिती खूप अलिकडची, १९७७ सालची, पण तोपर्यंत मी माझे घर आणि श्रीरामपूर सोडून गोव्यात फादर होण्यासाठी गेलो होतो
ऐंशीच्या दशकाआधी खूप, खूप वर्षांपुर्वी अखंड नागपूर धर्मप्रांत होता. नागपूरचे फ्रान्सलियन बिशप यांच्या अखत्यारीतला. फ्रेंच असलेले फ्रान्सलियन धर्मगुरु विशाखापट्टणम येथून मिशनकार्य करण्यासाठी नागपूर आणि वऱ्हाडात पोहोचले होते आणि तेथून ते मोगलाईचे अखेरचे टोक असलेले औरंगाबाद जिल्ह्यात माळीघॊगरगाव येथे १८९२ साली काम करण्यासाठी पोहोचले होते. ही त्यांची मिशनकामाची सीमाहद्द कारण तेथून पुढे अहमदनगर आणि पश्चिम महाराष्ट्रात आणि मुंबईत जर्मन असलेल्या जेसुईट धर्मगुरुंची हद्द.
युरोपातल्या एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या दर्यावर्दी देशांत आपापसांत झगडे नको म्हणून मध्ययुगात पोपमहाशयांनी संपूर्ण जगाची चक्क दोन भागांत वाटणी केली होती ! एक-दुसऱ्यांच्या हद्दीत आक्रमण टाळण्यासाठी.
मोगलाईतल्या गंगेपलीकडे अहमदनगर, पुण्या-मुंबईत जर्मन जेसुईट प्रॉव्हिन्सचे जर्मन, स्विस, ऑस्ट्रेलियन धर्मगुरू कार्यरत होते त्याप्रमाणे विदर्भात, अमरावती आणि मराठवाड्यात फ्रान्समधल्या फ्रान्सलियन संस्थेचे धर्मगुरू कार्यरत होते. या संस्थेच्या कागदपत्रांतून आणि रोजनिशीतून विसाव्या शतकातील येथील ख्रिस्ती मिशन कामाबाबत, शैक्षणिक संस्थाबाबत माहिती मिळते.
फ्रेंच फ्रान्सलियन धर्मगुरु फ्रान्सिस मॉगे ( Francis Moget) यांनी Vagabonds for God : A story of the Catholic Church in India (1846-1907) प्रकाशनवर्ष १९९० आणि Shepherds for Christ : A story of the Catholic Church in Central India 1907-1960) प्रकाशनवर्ष १९९४ हे दोन ग्रंथ विविध संदर्भ आणि रोजनिशींच्या आधारे लिहिलेले आहेत.
सामाजिक आणि आर्थिक जीवन अभ्यासण्यासाठी अशा प्रकारचा ऐतिहासिक दस्तऐवज किती महत्त्वाचा आहे हे सांगायलाच नको. याच दोन पुस्तकांच्या आधारावर मी स्वतः ``घोगरगावचे जाकियरबाबा : मराठवाडा कॅथोलिक धर्मप्रांताचा इतिहास' हे पुस्तक मराठी आणि इंग्रजीत लिहिले आहे.
पहिल्या महायुद्धात आणि दुसऱ्या महायुध्दातसुद्धा तत्कालीन ब्रिटिश सरकारने भारतातल्या सर्व शत्रुराष्ट्रातील नागरिकांना म्हणजे जर्मन जेसुईट धर्मगुरूंना तुरुंगात वा छावणीत टाकले होते. अशा कठीण आणि युद्धस्थसमयी मोगलाई, अमरावती आणि नागपूर येथील फ्रेंच असलेले फ्रान्सलियन धर्मगुरु फादर गुरियन जाकियर आणि मेरी बेर्जे पुण्यातल्या आणि इतर जर्मन जेसुइट धर्मगुरूंच्या मदतीला धावले आणि येथील चर्चचे काम पाहिले.
यापैकी फादर बेर्जे यांनी १९१७ साली जन्मलेल्या माझ्या वडलांचा माळीघोगरगाव येथे बाप्तिस्मा केला होता. बाप्तिस्मा सर्टिफिकेटवर फादर बर्जे यांचे आणि गॉडफादरचेही नाव आहे. आपल्याकडे लग्नात नवरीला उचलून मांडवात आणण्यासाठी नवरीच्या मामाची - खऱ्या किंवा मानलेल्या - मामाची गरज असते तसेच बाप्तिस्मा करताना गॉडफादर ( आणि कधीकधी गॉडमदरसुद्धा) पाहिजेच.
पहिल्या महायुद्धात जर्मन शत्रूराष्ट्राचे नागरिक असलेले पुण्याचे बिशप हेन्री डोरींग रोममध्येच अडकल्याने त्यांच्या अनुपस्थितीत नागपूरचे बिशप फ्रान्सिस कॉपेल बैलगाडीने प्रवास करत मजल दरमजल करत पुण्याला, खडकी, संगमनेर आणि राहाता येथे तीन वेळेस म्हणजे १९१६, १९१७ आणि १९१९ला आले होते !
अन याची परतफेड म्हणून महायुद्ध संपल्यानंतर १९२६ला जपानमधील हिरोशिमातून भारतात परतलेल्या पुण्याचे आर्चबिशप हेन्री डोरींग हे ८ जानेवारी १९३३ रोजी मोगलाईतल्या माळीघोगरगावला मुलांमुलींना कन्फर्मेशन सांक्रामेंत देण्यासाठी पोहोचले होते. कारण नागपूरचे बिशप कॉपेल त्यावेळी आजारी होते.
कॅथोलिक लोकांच्या जीवनात धर्मप्रांत आणि बिशप यांचे एक अतूट नाते असते कारण आयुष्यात किमान एकदा तरी भाविक लोक काही क्षण बिशपांच्या अगदी जवळ येत असतात. याचे कारण म्हणजे सप्त स्नानसंस्कारांपैकी एक असलेल्या दृढीकरण किंवा confirmation हे सांक्रामेंत केवळ बिशपमहोदयच देऊ शकतात. बाप्तिस्मा, लग्नविधी, अंत्यसंस्कार वगैरे सांक्रामेंतासाठी कुठलाही दिक्षित धर्मगुरु पौराहित्य करू शकतो.
इतर धर्माच्या तुलनेत ख्रिस्ती धर्मात सश्रद्ध लोकांच्या जीवनात धर्मगुरूंचे अधिक महत्त्वाचे स्थान असते. विशेष महत्त्वाचे म्हणजे ख्रिस्ती धर्मात कुणाही व्यक्तीला- हो कुणालाही - धर्मगुरु होता येते, हे पद किंवा अधिकार विशिष्ट समाजघटकाचे नसतात. आता माझेच उदाहरण आहे. कधीकाळी मीसुध्दा गोव्यात फादर होण्यासाठी गेलो नव्हतो का?
तर एकेकाळी अमरावती धर्मप्रांत खूप महत्त्वाचा होता कारण या हद्दीत ख्रिस्ती लोकसंख्या भरपूर होती, या भागात अनेक ख्रिस्ती मंदिरे होती. माझ्या आजोळी माळीघोगरगाव येथे 1927 साली गॉथिक वास्तू शैलीत बांधलेले भव्य आणि सुंदर चर्च आहे. चर्चचे नाव आहे ख्रिस्त राजा मंदिर.... Church of Christ the King... आजही अशाप्रकारचे भव्य आणि सुंदर बांधकाम नवलाईची बाब ठरते. या बांधकामासाठी नेवाशाहून खास काळे पाषाण मागवण्यात आले होते.
या भागातील ख्रिस्ती लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होण्याची अनेक सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक कारणे आहेत.
तर सांगायचा मुद्दा असा कि आम्ही जसे मोगलाईतले तसेच एकेकाळच्या अमरावती धर्मप्रांतातले सुद्धा .
मागच्या आठवड्यात अमरावती येथील बिशपांचे कॅथेड्रल किंवा आसनपीठ (कॅथेड्रॉ म्हणजे आसन, seat ) असलेल्या चर्चमध्ये दुपारी पाचच्या दरम्यान चर्चबेलचा घंटानाद झाला.
त्याचवेळेस व्हॅटिकन सिटीमध्ये सेंट पिटर्स बॅसिलिकामध्येसुद्धा घंटानाद झाला होता.
अमरावती डायोसिसच्या नव्या बिशपांची पोप फ्रान्सिस यांनी नेमणूक केली हे जाहीर करण्यासाठी हा घंटानाद होता.
अमरावतीच्या नव्या बिशपांच्या नेमणुकीची बातमी इथेच फेसबुकवर लगेचच पाचदहा मिनिटांत मला कळाली आणि अमरावतीशी असलेल्या माझ्या खूप जुन्या नातेसंबंधांना उजाळा मिळाला.
अमरावती धर्मप्रांताचे हे नवे बिशप आहेत पुणे धर्मप्रांताचे आताचे व्हिकर जनरल (धर्मसत्तेत पदश्रेणीत बिशपानंतर दुसऱ्या क्रमांकाचे) फादर मॅल्कम सिक्वेरा.
पुढच्या महिन्यात प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला, २५ जानेवारीला, अमरावतीचे नवे बिशप म्हणून त्यांचा दीक्षाविधी होईल.

Camil Parkhe

Saturday, May 22, 2021

Christians, missionaries and Dalits


66

Covering Goa since 1963

Frederick Noronha

Camil Parkhe featured in these columns only very recently, so it might seem like overdoing it a bit to feature the journalist here once again. Yet, in a way, I’d argue, it’s justified.

Camil’s was an often-appearing by-line in The Navhind Times of the 1980s. Just out of college at that time, he soon got into the world of journalism. Some of us who had an eye on entering this very field would envy people like him or John Aguiar. (The latter was another student-reporter, who retired from government service only just recently.)  While the rest of us could only dream of entering the media, they were already there.

After reporting for the NT for some time, Camil Parkhe simply vanished from the Goa horizon. Or so it seemed. We occasionally got reports of his shifting back to his native places in Ahmednagar (home to 19 sugar factories, and the birthplace of the now-sometimes controversial cooperatives). Or Pune.  But it was only when Facebook grew phenomenally across India, that old-time friends started getting connected once again.

After exchanging a few texts, this time Camil sent across an interesting collection of his books. Two things struck me immediately about these.

The first was that Maharashtra, perhaps due to its size, unlike Goa, has this trend of coming out with some small, rather inexpensive, simply printed books. This allows a whole lot of authors to express a whole lot of ideas. Interesting….

In Goa, despite this being the first home in Asia to print in the mid-sixteenth century, getting into print can still pose challenges. It has been rather tough even in recent centuries to come out with books and to successfully market the same.

Secondly, Camil Parkhe continues to be multilingual, both in speaking and in writing. So, his books are in English and in Marathi, and he seems to slip from one to the other rather effortlessly.

In a way, this also reflects the different times and style by which religious conversions took part in diverse parts of the county. While people outside Bombay-Bassein parts of Maharashtra changed their religion, it wasn’t always the sixteenth century. And it was not strongly felt that faith, culture and language were all treated as a single package.

Anyway, because of Camil’s connections with our region, his texts will go into my Goa books collection.  As mentioned earlier, he had come down to Goa as a young college student. His goal then was to become a Jesuit priest, though he later changed plans. So, he took to journalism instead, both here and in Maharashtra, till the pandemic led to job-losses.

One book I would have been interested in reading is in Marathi, ‘Badalta Patrakita’, or ‘Changing Journalism’. More so, since the media discusses the whole world, but never or seldom looks inward at itself. It’s always interesting to read comments on the media.

Three of Camil’s other books are interesting, however, and might be a bit more relevant to us, more so at this time of the year. These books discuss a missionary priest in Ghogargaon, the Dalit Christian’s “right to reservation”, and the Contributions of Christian Missionaries in India.

The last perhaps has the most potential ruffle feathers.  In India, the discourse over religion and politics has changed a lot over the decades. This subject is no longer seen with the same approach as it was done in the 1950s, 1960s or 1970s.

“Missionaries” has become a kind of a bad word nowadays. Permission for foreign propagators of the faith is hard to come by. Which is why we have only a smattering of foreigners working in educational or other institutions in India, unlike earlier.

This is a mixed blessing, a good thing and a bad thing simultaneously, as it were. The Church is forced to depend on its own resources, to build its own. But, at the same time, the skills from overseas – some well-intentioned ones, maybe a few misguided – are not there.

I knew Gaston Roberge, a French-Canadian Jesuit who spent a lifetime in India (in Calcutta-Kolkata), did so much for the world of understanding film till he passed away recently. Scores of others worked in the fields of science, education, health and more.

It is not always easy to understand the motivation of these men and women, who leave their homes and countries, to go and work in another distant corner of the globe. Are they just misguided? Fanatical? Do they really want to help? Do they have a neo-colonial approach towards things? Or elements of all?

Yet, at the same time, the word “missionary””does have some negative connotations attached to it. By the dictionary meaning, it refers to “a Christian who has been sent to a foreign country to teach people about Christianity”. Foreign? Sent? Teach? These words could indeed sound condescending, at the very least.

South Asia is one of those regions of the world which doesn’t quite like the idea of changing one’s religions. There is no ‘free market’ for the world of religious beliefs, it would seem, in these parts.  (Oddly enough, in these changing times, Christian Indian religious priests and nuns are going out to other parts of the globe, instead of others from elsewhere coming in here. This is also true for other religions including Hinduism as well, whose movements, from ISKCON to Rajneesh and more, have been reaching out to the Western world for maybe half a century now.)

In this context, Camil Parkhe goes against the tide with his book titled ‘Contributions of Christian Missionaries in India’. It was published in 2007 by the Gujarat Sahitya Prakash, a Christian publisher, in times when there was less information available online.

This book lists the women’s pioneer Ramabai Saraswati; the pioneering Marathi-Konkani litterateur, Thomas Stephens SJ; the father of inculturation, Robert de Nobili; the first Marathi missionary, Fr Nahemiah Nilakanthashastri Gore; journalist-kirtankar, Satyavan Namdeo Survanshi; Padma Bhushan Fr Camil Bulcke; poet-missionary, Rev Narayan Vaman Tilak; Bharat Ratna Mother (now St) Teresa; Tamil poet, Joseph Beschi; Graham Staines who cared for the lepers but was burnt alive; rural development pioneer, Fr Herman Bacher; historian, Fr Henry Heras; linguist-social reformer, William Carey; Padma Visbhushan Valerian Cardinal Gracias; the first Marathi novelist, Rev Baba Padmajee; social worker Manorama Madhavi; editor-missionary, Archbishop Henry Doering; research scholar, Rev Justin Abbot and inter-religious dialoguer, Fr Matthew Lederle.

‘Fr Gurien Jacquier of Ghogargaon’ is a story of a little-known French Fransalian priest from the late 19th century, who changed the lives of Camil’s maternal family and an entire village. It is narrated in a catchy, journalistic style, and makes it tough to not get drawn in. The third book is also a brief but blunt book about why Dalit Christians should not be deprived of reservations.

Camil’s list of “missionaries” above may seem like a long list, but with easier access to online information now, it is clearly the tip of the iceberg.

A religion, any religion – and even secular ideologies – are a mix of good and bad. A tree will be known by its fruits, or so says the parable.

These are times of globalisation, misunderstandings and even enhanced inter-religious conflict. In such a situation, perhaps what’s the need of the hour is to reinforce the positive, weed out the negatives, and build in a way that benefits everyone.