Showing posts with label missionaries. Show all posts
Showing posts with label missionaries. Show all posts

Saturday, January 6, 2024

अमेरिकन मराठी मिशनच्या अहमदनगर स्थापना दिन

 ‘‘गाढवाला वाचायला शिकवता येईल का? तसे असेल तरच एखादी स्त्री शिकू शकेल.’

दोनशे वर्षांपूर्वी ( नेमके म्हणजे २० डिसेंबर १८३१ साली ) अमेरिकन मिशनरींनी अहमदनगर येथे आपले केंद्र उघडले आणि धर्मप्रसाराचा एक भाग म्हणून तेथे शाळा सुरु केल्या.
रेव्ह. हॉलीस रीड यांच्या पत्नीने तिथे मुलींची शाळा सुरु करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना स्थानिक लोकांनी वरील प्रश्न विचारला होता.
अमेरिकन मराठी मिशनच्या अहमदनगर केंद्राचा आज २० डिसेंबर स्थापना दिन. त्यानिमित्त ज्येष्ठ लेखक अशोक हिवाळे यांनी जुन्या दस्तऐवजातून संकलन केलेली ही माहिती मी इथे देतो आहे.
``१८३१ मध्ये अहमदनगर मिशन ठाणे सुरू करणार्या पहिल्या मिशनरींपैकी रेव्ह. हॉलिस रीड हे एक मिशनरी होते. अमेरिकन मराठी मिशनच्या अहमदनगर केंद्राच्या १८८१ साली साजरा झालेल्या सुवर्णमहोत्सवानिमित्त रेव्ह. हॉलीस रीड यांनी अमेरीकेतून आपल्या आठवणी लिहून पाठवल्या होत्या. त्या स्मरणिकेतील हा भाग :
``२० डिसेंबर १८३१ रोजी आमच्या प्रारंभीच्या छोट्या टोळीने अहमदनगरमध्ये आमचे तंबू ठोकले; आमच्या टोळीत मिस्टर आणि मिसेस ग्रेव्हज, मिस्टर हर्वे, आणि मी आणि माझी पत्नी यांचा समावेश होता. मिस्टर ॲलन आणि मी अशा दोघांनी आधी दख्खन पठाराचा पुनर्विचार केला होता आणि हे ठिकाण पसंतीचे स्थान म्हणून निवडले होते.
आणि जेव्हा मी तुमच्या तरुण मुलींच्या बोर्डिंग स्कूलकडे पाहतो, तेव्हा त्या बोर्डिंगस्कूलची सर्व सोयींनीयुक्त इमारत, पुस्तके आणि फर्निचर आणि त्यातील आंतरराष्ट्रीय आदर्श पातळीचे (आयएसओ) विद्यार्थी, तेव्हा मला मिसेस रीड यांनी मुलींसाठी पहिली छोटी शाळा सुरू करण्यासाठी केलेले पहिले प्रयत्न आठवले.
पुन्हा, मोहरीच्या छोट्या दाण्याचे कसे झाड झाले आणि आकाशातील पक्षी त्याच्या फांद्यांमध्ये कसे वावरत आहेत याची मला आठवण झाली.
मुलींची शाळा सुरू करण्याच्या मिसेस रीडच्या प्रयत्नांकडे मूळ रहिवाशांनी एक परिपूर्ण मूर्खपणा म्हणून पाहिले आणि काहींनी त्यांची खिल्ली उडवली.
त्यांनी तिला विचारले की, ‘‘गाढवाला वाचायला शिकवता येईल का? तसे असेल तरच एखादी स्त्री शिकू शकेल.’’
तर्क आणि मन वळवण्याचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, तिने शेवटला उपाय म्हणून पैशांचा युक्तिवाद वापरला.
जी मुलगी दररोज शाळेला येईल तिला एक पैसा मिळेल. या युक्तिवादाचा उपयोग करून एक लहान शाळा स्थापन करण्यात आली. पैसे (कदाचित दहा पैसे) आठवड्याच्या शेवटी प्रत्येकीला दिले गेले.
लवकरच मुलींना शाळेला येण्यात स्वारस्य वाटू लागले - काही वाचायला शिकल्या. सुरुवातीला त्यांच्या पालकांना आश्चर्य वाटले, परंतु लवकरच या नवीन आणि अनपेक्षित विकासाचा अभिमानही वाटू लागला. आणि मग पैसा मिळो अगर न मिळो मुली शाळेत नियमितपणे येऊ लागल्या.''
परंतु प्रवाह नेहमीच सुरळीत वाहतो असे नाही. स्त्रीशिक्षण हे ब्राह्मण आणि उच्च जातींनी अतिशय संशयास्पद मानले होते आणि खालच्या जातींनीही ते अत्यंत अनिच्छेने व्यवहार्य किंवा आवश्यक म्हणून स्वीकारले होते. हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम होता. त्याची उपयुक्तता कोणीही पाहू शकत नव्हते आणि त्याच्या यशामुळे कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात अपयश आले नाही. त्यामुळे मुलींच्या शाळांकडे पुरोहित फारच संकुचितपणे पाहत. आणि अशा योजनांना मोडून काढण्यासाठी वेळोवेळी सर्व प्रकारची कटकारस्थाने आखली जात.
याचे एक उदाहरण पाहा : एके दिवशी सकाळी मिसेस रीड शाळेला नेहमीप्रमाणे भेट देत असताना, तिला एक वर्ग रिकामा आढळला. एकही विद्यार्थिनी दिसत नव्हती.
बाई आश्चर्यचकित होऊन तेथेच रेंगाळत असताना शिक्षक येऊन हजर झाले. आणि शाळेचा वर्ग रिकामा का आहे याचे कारण विचारले असता, त्याने सांगितले की, अशी अफवा पसरली आहे की मुलींना थोडेफार प्रशिक्षण देऊन व त्यांच्यात बदल करून त्यांना दूर पाठवून गुलाम म्हणून विकण्यासाठी त्यांच्या घरातून काढून एकत्र आणण्याचा बाईंचा हेतू होता. त्यामुळे त्यांचे पालक त्यांना शाळेतून घेऊन गेले. ''
१८७८ सालच्या मराठी मिशनचा अहवाल दयाळूपणे माझ्याकडे पाठवला आणि गेल्या ५० वर्षांपूर्वीच्या छोट्याशा सुरुवातीची सध्या सुरू असलेल्या विस्तृत आणि उदात्त कामाशी तुलना केली, तेव्हा मी आश्चर्याने आणि निर्विवाद कृतज्ञतेने उद्गारलो, ‘‘पाहा, देवाने केवढे कार्य केले आहे!’’
हा अहवाल पाहून माझे हृदय भरून आले आणि मी म्हटले, अरे! त्या येणार्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त मला तुमच्याबरोबर असायला पाहिजे होते. म्हणजे आपण सर्वांनी मिळून त्या प्रिय मिशनमध्ये असलेल्या देवाच्या सामर्थ्यशाली हाताने केलेले कार्य इतरांना सांगितले असते. मी तिकडे आलोच तर परत अमेरिकेला माघारी येणार नाही. परंतु माझा प्रिय बंधू हर्वे याच्या कबरेच्या बाजूला मला पुरण्यात यावे, अशी मी अपेक्षा करीन.''
अमेरिकन मराठी मिशनच्या अहमदनगर केंद्राच्या स्थापना दिनानिमित्त अहमदनगर येथे आज एक परिषद आयोजित करण्यात आली आहे.
Camil Parkhe December 20, 2023

Thursday, December 21, 2023

 

‘गाढवाला वाचायला शिकवता येईल का? तसे असेल तरच एखादी स्त्री शिकू शकेल.’

दोनशे वर्षांपूर्वी ( नेमके म्हणजे २० डिसेंबर १८३१ साली ) अमेरिकन मिशनरींनी अहमदनगर येथे आपले केंद्र उघडले आणि धर्मप्रसाराचा एक भाग म्हणून तेथे शाळा सुरु केल्या.
रेव्ह. हॉलीस रीड यांच्या पत्नीने तिथे मुलींची शाळा सुरु करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना स्थानिक लोकांनी वरील प्रश्न विचारला होता.
अमेरिकन मराठी मिशनच्या अहमदनगर केंद्राचा आज २० डिसेंबर स्थापना दिन. त्यानिमित्त ज्येष्ठ लेखक अशोक हिवाळे यांनी जुन्या दस्तऐवजातून संकलन केलेली ही माहिती मी इथे देतो आहे.
``१८३१ मध्ये अहमदनगर मिशन ठाणे सुरू करणार्या पहिल्या मिशनरींपैकी रेव्ह. हॉलिस रीड हे एक मिशनरी होते. अमेरिकन मराठी मिशनच्या अहमदनगर केंद्राच्या १८८१ साली साजरा झालेल्या सुवर्णमहोत्सवानिमित्त रेव्ह. हॉलीस रीड यांनी अमेरीकेतून आपल्या आठवणी लिहून पाठवल्या होत्या. त्या स्मरणिकेतील हा भाग :
``२० डिसेंबर १८३१ रोजी आमच्या प्रारंभीच्या छोट्या टोळीने अहमदनगरमध्ये आमचे तंबू ठोकले; आमच्या टोळीत मिस्टर आणि मिसेस ग्रेव्हज, मिस्टर हर्वे, आणि मी आणि माझी पत्नी यांचा समावेश होता. मिस्टर ॲलन आणि मी अशा दोघांनी आधी दख्खन पठाराचा पुनर्विचार केला होता आणि हे ठिकाण पसंतीचे स्थान म्हणून निवडले होते.
आणि जेव्हा मी तुमच्या तरुण मुलींच्या बोर्डिंग स्कूलकडे पाहतो, तेव्हा त्या बोर्डिंगस्कूलची सर्व सोयींनीयुक्त इमारत, पुस्तके आणि फर्निचर आणि त्यातील आंतरराष्ट्रीय आदर्श पातळीचे (आयएसओ) विद्यार्थी, तेव्हा मला मिसेस रीड यांनी मुलींसाठी पहिली छोटी शाळा सुरू करण्यासाठी केलेले पहिले प्रयत्न आठवले.
पुन्हा, मोहरीच्या छोट्या दाण्याचे कसे झाड झाले आणि आकाशातील पक्षी त्याच्या फांद्यांमध्ये कसे वावरत आहेत याची मला आठवण झाली.
मुलींची शाळा सुरू करण्याच्या मिसेस रीडच्या प्रयत्नांकडे मूळ रहिवाशांनी एक परिपूर्ण मूर्खपणा म्हणून पाहिले आणि काहींनी त्यांची खिल्ली उडवली.
त्यांनी तिला विचारले की, ‘‘गाढवाला वाचायला शिकवता येईल का? तसे असेल तरच एखादी स्त्री शिकू शकेल.’’
तर्क आणि मन वळवण्याचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, तिने शेवटला उपाय म्हणून पैशांचा युक्तिवाद वापरला.
जी मुलगी दररोज शाळेला येईल तिला एक पैसा मिळेल. या युक्तिवादाचा उपयोग करून एक लहान शाळा स्थापन करण्यात आली. पैसे (कदाचित दहा पैसे) आठवड्याच्या शेवटी प्रत्येकीला दिले गेले.
लवकरच मुलींना शाळेला येण्यात स्वारस्य वाटू लागले - काही वाचायला शिकल्या. सुरुवातीला त्यांच्या पालकांना आश्चर्य वाटले, परंतु लवकरच या नवीन आणि अनपेक्षित विकासाचा अभिमानही वाटू लागला. आणि मग पैसा मिळो अगर न मिळो मुली शाळेत नियमितपणे येऊ लागल्या.''
परंतु प्रवाह नेहमीच सुरळीत वाहतो असे नाही. स्त्रीशिक्षण हे ब्राह्मण आणि उच्च जातींनी अतिशय संशयास्पद मानले होते आणि खालच्या जातींनीही ते अत्यंत अनिच्छेने व्यवहार्य किंवा आवश्यक म्हणून स्वीकारले होते. हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम होता. त्याची उपयुक्तता कोणीही पाहू शकत नव्हते आणि त्याच्या यशामुळे कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात अपयश आले नाही. त्यामुळे मुलींच्या शाळांकडे पुरोहित फारच संकुचितपणे पाहत. आणि अशा योजनांना मोडून काढण्यासाठी वेळोवेळी सर्व प्रकारची कटकारस्थाने आखली जात.
याचे एक उदाहरण पाहा : एके दिवशी सकाळी मिसेस रीड शाळेला नेहमीप्रमाणे भेट देत असताना, तिला एक वर्ग रिकामा आढळला. एकही विद्यार्थिनी दिसत नव्हती.
बाई आश्चर्यचकित होऊन तेथेच रेंगाळत असताना शिक्षक येऊन हजर झाले. आणि शाळेचा वर्ग रिकामा का आहे याचे कारण विचारले असता, त्याने सांगितले की, अशी अफवा पसरली आहे की मुलींना थोडेफार प्रशिक्षण देऊन व त्यांच्यात बदल करून त्यांना दूर पाठवून गुलाम म्हणून विकण्यासाठी त्यांच्या घरातून काढून एकत्र आणण्याचा बाईंचा हेतू होता. त्यामुळे त्यांचे पालक त्यांना शाळेतून घेऊन गेले. ''
१८७८ सालच्या मराठी मिशनचा अहवाल दयाळूपणे माझ्याकडे पाठवला आणि गेल्या ५० वर्षांपूर्वीच्या छोट्याशा सुरुवातीची सध्या सुरू असलेल्या विस्तृत आणि उदात्त कामाशी तुलना केली, तेव्हा मी आश्चर्याने आणि निर्विवाद कृतज्ञतेने उद्गारलो, ‘‘पाहा, देवाने केवढे कार्य केले आहे!’’
हा अहवाल पाहून माझे हृदय भरून आले आणि मी म्हटले, अरे! त्या येणार्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त मला तुमच्याबरोबर असायला पाहिजे होते. म्हणजे आपण सर्वांनी मिळून त्या प्रिय मिशनमध्ये असलेल्या देवाच्या सामर्थ्यशाली हाताने केलेले कार्य इतरांना सांगितले असते. मी तिकडे आलोच तर परत अमेरिकेला माघारी येणार नाही. परंतु माझा प्रिय बंधू हर्वे याच्या कबरेच्या बाजूला मला पुरण्यात यावे, अशी मी अपेक्षा करीन.''
अमेरिकन मराठी मिशनच्या अहमदनगर केंद्राच्या स्थापना दिनानिमित्त अहमदनगर येथे आज एक परिषद आयोजित करण्यात आली आहे.
Camil Parkhe

Wednesday, December 13, 2023

 

महात्मा फुले यांच्या प्राथमिक जडणघडणीत दोन व्यक्तींचे महत्त्वाचे योगदान आहे, त्या दोन्हीही व्यक्तींबाबत आज काहीही माहिती उपलब्ध नाही. त्या दोन व्यक्ती म्हणजे गोविंदराव फुले यांचे शेजारी उर्दू शिक्षक गफार बेग मुनशी आणि धर्मोपदेशक किंवा सरकारी अधिकारी असलेले लिजिट साहेब. गोविंदरावांनी आपल्या हुशार मुलाचे शिक्षण पुन्हा सुरु करावे असा आग्रह या दोन सदगृहस्थांनीं केला, गोविंदरावांनी त्यांचे ऐकले आणि लहानगा जोतिबा स्कॉटिश मिशनरींच्या शाळेत जाऊ लागला आणि एका महात्म्याचा अशा प्रकारे जन्म झाला.

सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या व्यक्तिमत्त्वांची जडणघडण करणाऱ्या अनेक व्यक्तींच्या नावांचा फुले दाम्पत्त्यांच्या चरित्रांत अगदी ओझरता उल्लेख होतो, कधी तर अनुल्लेखाने त्यांना टाळले जाते. मात्र असे करण्याने सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांची समग्र चरित्रे आतापर्यंत लिहून झालेली नाहीत. या दोन महान व्यक्तींची ही एकप्रकारे उपेक्षाच आहे.
जोतिबा स्कॉटिश मिशनरींच्या शाळॆत शिकले, वडलांनी घराबाहेर काढल्याने आणि नंतर स्वतःच्या शाळा चालवताना अर्थार्जनासाठी स्कॉटिश मिशनरींच्या शाळेत जोतिबा अर्धवेळ शिक्षकाची नोकरी करत असत असेही उल्लेख अनेक चरित्रकार करतात.
स्कॉटिश शाळेत जोतिबांना शिकवणाऱ्या या स्कॉटिश मिशनरींची नावे मात्र कुठेही झळकत नाहीत.
जोतिबा फुले आपले मित्र सदाशिवराव गावंडे यांच्याबरोबर अहमदनगरला अमेरिकन मराठी मिशनच्या सिंथिया फरारबाई यांच्या मुलींच्या शाळेला भेट देतात, त्यांच्याशी सविस्तर बोलणे होऊन, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण पुण्यात मुलींच्या शाळा सुरु केल्या असे स्वतः जोतिबा लिहितात. धनंजय कीरलिखित महात्मा फुले चरित्रात यावर दोन-अडीच पाने आहेत.
फरारबाईंचे पूर्ण चरित्र कागदपत्रांच्या रुपात गेले एक शतकभर उपलब्ध आहे. तर या `मिस सिंथिया फरार' कोण याविषयी बहुतेक फुले चरित्रकार मौन बाळगतात.
उपलब्ध दस्तऐवजाच्या आधारे अलीकडेच सावित्रीबाईंच्या शिक्षिका असलेल्या सिंथिया फरारबाईंचे चरित्र आणि कार्य याविषयी माहिती देणारे पुस्तक मी स्वतः लिहिले आहे.
रेव्हरंड जॉन स्टीव्हन्सन यांच्यासह रेव्हरंड जेम्स मिचेल हे स्कॉटिश मिशनरी पुण्यात १८३० पासून कार्यरत होते. जेम्स मिचेल यांनी आपल्या निधनापर्यंत वीस वर्षे पुण्यातल्या स्कॉटिश मिशनची जवळजवळ एकखांबी धुरा वाहिली. जोतिबांना आपल्या स्कॉटिश शाळेत १८४१ ते १८४७ या काळात शिकवणाऱ्या जेम्स मिचेल आणि जॉन मरे मिचेल यांचे यांचे केवळ ओझरते उल्लेख फुले दाम्पत्याच्या चरित्रांत आढळतात.
मुलींच्या शाळा चालवणाऱ्या जोतिबांचा पुण्यात जंगी सत्कार झाला, त्याकाळच्या वृत्तपत्रांत त्या कार्यक्रमाला हजर असणाऱ्या प्रतिष्ठित देशी आणि परदेशी व्यक्तींच्या यादीत जोतिबाचे शिक्षक असलेल्या रेव्हरंड जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल यांचे नाव साहजिकच झळकते.
सावित्रीबाईंनीं पुण्यात स्कॉटिश मिशनरी मिचेलबाई यांच्याकडे अद्यापनाचे धडे घेतले असे हरी नरके आणि इतर अभ्यासक लिहितात. सर विल्यम हंटर शिक्षण आयोगासमोर साक्ष देताना आपल्या लेखी इंग्रजी निवेदनात आपण आपल्या शाळा मिचेलबाईंकडे चालवण्यासाठी दिल्या आणि त्या शाळा आजही (१८८२) चालू आहेत असे जोतिबा फुले म्हणतात.
तर नॉर्मल स्कुल चालवणाऱ्या या मिचेलबाई कोण? रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्या पत्नी असलेल्या ( मार्गारेट शॉ) मिचेलबाईंबद्दल उपलब्ध ग्रंथांत आणि दस्तऐवजात कितीतरी माहिती आहे, मात्र त्याकडे कानाडोळा करून मिचेलबाईंची उपेक्षा केली जाते.
रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्या मदतीसाठी मुंबईहून नंतर रेव्हरंड जॉन मरे मिचेल पुण्यात आले, मेजर थॉमस कँडी यांच्या गैरहजेरीत ते पूना कॉलेजचे (डेक्कन कॉलेज) प्रिन्सिपल आणि संस्कृत-मराठी विभागाचे प्रमुख होते.
महात्मा फुले यांचे एक महत्त्वाचे चरित्रकार असलेल्या धनंजय कीर यानी `चटईचा विटाळ' या संदर्भात जोतिबांनी जॉन मरे मिचेल यांच्या शाळेत पाठवलेल्या एका महार मुलाची अत्यंत हृदयद्रावक कथा सांगितली आहे.
रेव्हरंड जॉन मरे मिचेल यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलेली आणखी एक घटना धनंजय कीर यांनी सांगितली आहे.
कीर यांनी लिहिले आहे : `रेव्हरंड आदम व्हाईट यांनी एकदा पुण्याजवळील सरकारी शाळेला भेट दिली. त्या शाळेतील ब्राह्मण पंतोजीजवळ एक वेताची छडी होती. तिचा उपयोग ते पंतोजी अधूनमधून चांगलाच करीत. आदम व्हाईट यांनी त्या ब्राह्मण पंतोजीला विचारले की, 'ही ढेकळं तुमच्याजवळ कशाकरिता ठेवली आहेत?"
पंतोजी उत्तरले, "स्पृश्य मुलांच्याबाबतीत मी छडी वापरतो. जर मी छडीने महार मुलास मारले तर तो अस्पृश्य असल्यामुळे काठीबरोबर विटाळ येईल आणि माझे सर्व शरीर विटाळेल. म्हणून जेव्हा महार मुलगा मूर्खपणाने वागतो तेव्हा मी एक ढेकूळ घेतो आणि त्याच्याकडे फेकतो. जर चुकलं तर दुसरं मारतो."
या दोन्ही घटनांचे वर्णन कीर यांनी जॉन मरे मिचेल यांच्या आत्मचरित्राच्या आधारे केले आहे आपले आत्मचरित्र आणि इतर कितीतरी लिखाण करणारे जॉन मरे मिचेल यांच्या या साहित्याचा मात्र फुले चरित्रकार प्राथमिक चरित्रसाधने म्हणून मुळी विचारच करत नाहीत.
खूप जुनी, शंभर-दीडशे वर्षांपूर्वी अमेरिकन मराठी मिशनची आणि स्कॉटिश मिशनची पुण्यामुंबईत मराठीत आणि इंग्रजीत लंडनमध्ये आणि अमेरिकेत प्रकाशित झालेली अनेक पुस्तके आणि कागदपत्रे आजही उपलब्ध आहेत. मात्र या साहित्याचा फुले दाम्पत्याची प्राथमिक चरित्रसाधने म्हणून का वापर केला जात नाही याचे आश्चर्य वाटते.
जॉन मरे मिचेल यांचे सर्वात महत्त्वाचे कर्तृत्व म्हणजे त्यांनी भारतात केवळ मुस्लिम मुलींसाठी असलेली शाळा पुण्यात चालवली, या शाळेत तब्बल ७० मुली होत्या आणि त्याहून विशेष म्हणजे जॉन मरे मिचेल या मुलींना फी सुद्धा आकारत असत.
त्याकाळी म्हणजे १८६२ ला शाळेत येणाऱ्या मुलांमुलींसाठी पैशाची रक्कम, खाणेपिणे , कपडेलत्ते पुरवणे अशी आमिषे दाखवावी लागत, फुले दाम्पत्याला सुद्धा असे करणे भाग पडले होते.
मात्र जॉन मरे मिचेल यांची मुस्लिम मुलींसाठी शाळा भारतातील हा असा पहिला प्रयोग नव्हता. त्याआधी कितीतरी वर्षे आधी स्कॉटिश मिशनरी वजीर बेग यांनी पुण्यात केवळ मुस्लिम मुलींसाठी शाळा सुरु केली होती. रेव्हरंड वजीर बेग यांना भारतातील मुस्लिम मुलींच्या आधुनिक शिक्षणाचे जनक म्हणता येईल. ही शाळा अल्पावधीत - बहुधा अल्प प्रतिसादाने - बंद पडली होती.
ही सर्व माहिती अनेक पुस्तकांत उपलब्ध असली तरी स्त्रीशिक्षणाच्या ग्रंथांत आणि जवळजवळ सर्वच फुले दाम्पत्याच्या चरित्रांत या माहितीचा उल्लेखच आढळत नाही.
स्त्रीशिक्षणाबाबत फुले दाम्पत्याने केलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांची माहितीपूर्ण असलेली आणि समग्र म्हणावीत अशी चरित्रे आजही लिहिली जात नाही याचे वैषम्य वाटते.

Camil Parkhe

Saturday, August 26, 2023

 


मध्ययुगीन काळात, ब्रिटिश आमदानीत आणि नंतरही भारतातल्या ख्रिस्ती समाजात स्थानिक संस्कृतीतील विविध जातींनी आणि जमातींनी प्रवेश केला आणि तिथे आपले पाय मजबूत रोवले. हे कसे घडले त्याची ही त्याची ही कथा.
केरळ राज्यात ख्रिस्ती धर्म पहिल्या शतकापासून आहे. तिथले ख्रिश्चन लोक येशू ख्रिस्ताच्या बारा प्रेषितांपैकी एक असलेल्या संत थॉमसचा वारसा सांगतात. सोळाव्या आणि सतराव्या शतकांत युरोपियन मिशनरींनी गोव्यात, मुंबईजवळ पालघर जिल्ह्यात वसई येथे आणि दक्षिण भारतात मदुराई वगैरे परिसरांत धर्मप्रसार केला तेव्हा या धर्मांतरीत लोकांनी आपल्याबरोबर आपल्या जाती, जमाती आणि या जातीजमाजातींशी निगडित असलेल्या प्रथापरंपरा ख्रिस्ती समाजात आणल्या. ख्रिस्ती मिशनरींनी आणि त्यांच्या धर्माधिकाऱ्यांनी हे धकवून घेतले. पोर्तुगिजांची गोव्यात राजवट असल्याने तिथे धर्मांतरानंतर काही प्रमाणात या प्रथापरंपरांना आळा बसला, मात्र पोर्तुगीज राजवट या धर्मांतरीतांच्या मूळ जातीजमाती आणि त्यासंबंधी असलेल्या विविध प्रथा आणि परंपरा समुळपणे नष्ट करु शकली नाही हेसुद्धा तितकेच खरे.
दक्षिण भारतात ख्रिस्ती ब्राह्मणांनी जानवे घालणे, शेंडी राखणे, कपाळावर भस्म चोपडणे¸संन्याशी, गुरू म्हणून भगवी वस्त्रे परिधान करणे हे ख्रिस्ती धर्मतत्त्वांशी विसंगत की सुसंगत आहे याबाबत उहापोह मदुराईत आणि अगदी इटलीमधल्या रोमपर्यत चालला होता. या प्रकरणात असले हे प्रकार नवधर्मांतरीत ख्रिस्ती समाजात रूढ करणाऱ्या इटालियन जेसुईट फादर रॉबर्ट डी नोबिली यांचे धर्मगुरुपदाचे तसेच बाप्तिस्मा करण्याचे अधिकार निलंबित करण्यात आले होते.
मात्र याबाबत दीर्घकाळ चाललेल्या चौकशीनंतर रोमस्थित पोपमहाशयांनी अखेरीस रॉबर्ट डी नोबिली यांचे म्हणणे मान्य केले. अशाप्रकारे आडपडद्याने का होईना जातीव्यवस्थेने ख्रिस्ती समाजात प्रवेश केला आणि यथावकाश तेथे मग मजबूत बस्तान बसवले.
देशाच्या इतर भागांत मध्यगीन काळात आणि अव्वल ब्रिटिश अमदानीच्या काळात ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला आणि त्याकाळात हा धर्म खऱ्या अर्थाने राष्ट्रपातळीवरचा आणि इथल्या सर्व - वरच्या, मध्यम स्तरावरच्या आणि खालच्या गणल्या जाणाऱ्या - जातींचा आणि जमातींचा बनला.
ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलात असलेल्या मुंबई बंदरात तीन अमेरीकन मिशनरींनी १२ फेब्रुवारी १८१२ रोजी मुंबई बंदरात पाऊल ठेवला. ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलात असलेल्या भारतात ख्रिस्ती मिशनरींच्या कार्यावर असलेली बंदी ब्रिटीश संसदेने १८१३ला उठवली. त्यानंतर अमेरिकन आणि स्कॉटिश मिशनरींनी मुंबईत आणि नजिकच्या परिसरांत भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच आधुनिक पद्धतीच्या शाळा सुरु केल्या आणि भारतात ख्रिस्ती धर्मप्रसाराचे, आधुनिक शिक्षणाचे आणि त्यामुळे विविध क्षेत्रांतील प्रबोधनाचे नवे युग सुरु झाले.
आधुनिक भारतात प्रवेश करणारे आद्य परदेशी मिशनरी असलेल्या गॉर्डन हॉल यांनी आपल्या घरात आश्रय दिलेल्या एका आफ्रिकन मुलाचा -डॅनियलचा - १२ जुलै १८१८ रोजी बाप्तिस्मा केला, आधुनिक काळात ख्रिस्ती मिशनरींनी भारतात केलेला हा पहिला बाप्तिस्मा. मात्र बाप्तिस्मा करणारे आणि स्विकारणारी व्यक्ती दोघेही परदेशी होते.
या काळात ख्रिस्ती धर्मात प्रवेश करणारी पहिली एतद्देशीय व्यक्ती मुसलमान होती हे या अमेरिकन मराठी मिशनचा इतिहास वाचला कि स्पष्ट होते. मोहंमद कादिन किंवा कादेर यार खान या मुळच्या हैदराबादचा असलेल्या वयाने ज्येष्ठ असलेल्या मुस्लीम व्यक्तीचा मुंबईत २५ सप्टेंबर १८१९ रोजी बाप्तिस्मा झाला.
मॅन्युएल अंतोनिओ या रोमन कॅथोलिकाचा १८२५ साली पुन्हा एकदा प्रोटेस्टंट पंथात बाप्तिस्मा देण्यात आला आणि हेसुद्धा `धर्मांतर' असेच गणले गेले. उमाजी गोविंद या चांभार व्यक्तीने १८२७ साली ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
स्कॉटिश मिशनरींनी कोकणात हर्णै आणि बाणकोट येथे मिशनकार्य म्हणजे शाळा चालवणे आणि धर्मप्रसार करणे सुरु केले. डोनाल्ड मिचेल, जॉन कुपर, जेम्स मिचेल, ए क्रॉफर्ड आणि रॉबर्ट नेस्बिट हे ते स्कॉटिश आद्य मिशनरी.
इथल्या समाजात जात किती खोलवर रोवलेली आहे याचा अनुभव या आद्य मिशनरींना खूप लवकर आला. ही घटना १८२७च्या आसपासची आहे. या मिशनरींच्या मिशनकामाला यश येऊन एका हिंदु व्यक्तीने ख्रिस्ती धर्म स्विकारला होता. त्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर काही आठवड्यांनीं या मिशनरींनी प्रभुभोजनाचा म्हणजे येशु ख्रिस्ताच्या `लास्ट सपर’ किंवा शेवटच्या भोजनाच्या स्मरणार्थ केला जाणारा विधी चर्चमध्ये आयोजित केला होता. या विधीसाठी सर्व जण एकत्रित बसले होते.
प्रभुभोजन सुरु होणार तोच नव्यानेच ख्रिस्ती झालेला तो माणूस तटदिशी उभा राहिला, ''नाही, नाही. मी माझी जात इतक्या लवकर सोडणार नाही,'' असे म्हणत त्याने त्या चर्चबाहेर धूम ठोकली.
स्कॉटिश मिशनरी जॉन विल्सन बाणकोटला १८२९ आले तेव्हा बाणकोटचा रामचंद्र पुराणिक हा पुराण सांगणारा ब्राह्मण ख्रिस्ती झाला होता. उच्चवर्णीय ब्राह्मण जातीतल्या मराठी लोकांपैकी ख्रिस्ती झालेला हा पहिला माणूस. जॉन विल्सन यांनी मुंबईत १८३० साली हिंदु धर्म आणि ख्रिस्ती धर्म याबाबत वादविवाद आयोजित केला तेंव्हा ख्रिस्ती धर्माचा गड या रामचंद्र पुराणिकने लढवला होता.
प्रभु समाजातील दाजिबा निळकंठने ५ डिसेंबर १८३० रोजी ख्रिस्ती समाजाची दीक्षा घेतली,. कोकणातील देवाचे गोठणे येथील एक ब्राह्मण बाबाजी रघुनाथ मराठे बाणकोट २० नोव्हेंबर १८३१ रोजी ख्रिस्ती झाला.
ब्राह्मण बाबाजी रघुनाथचा बाप्तिस्मा झाल्यानंतर लगेचच त्याचा एका ब्राह्मण विधवेशी विवाह झाला. लग्नाआधीच ते दोघे एकत्र राहत होते, म्हणजे आताच्या भाषेत `लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये होते.
त्याकाळात समाजातल्या खालच्या गणल्या जातींजमातींमध्ये स्त्रियांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अधिक मोकळीक होते असे दिसते. या जातींजमातींमधल्या विधवांना किंवा नवऱ्याने टाकून दिलेल्या स्त्रियांना पुनर्विवाह करण्याची मुभा होती. गाठ मारणे. पाट लावणे किंवा म्होतुर लावणे अशी काही नावे या पुनर्विवाहांना होती. सती ही अत्यंत घृण प्रथासुद्धा केवळ वरच्या जातींत होती.
ब्राह्मण जातीतील विधवा पुनर्विवाहाच्या या घटनेनंतर अनेक वर्षांनी म्हणजे तब्बल पाच दशकांनंतर १८५६ मध्ये पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता मिळाली होती.
भारतात उच्चवर्णिय गणल्या जाणाऱ्या ब्राह्मण समाजातील विधवा पुनर्विवाहाची ही बहुधा पहिलीच घटना असावी. महर्षी केशव धोंडो कर्वे यांनी पंडिता रमाबाई यांच्या आश्रमातील गोदू या विधवेशी १८९३ ला पुनर्विवाह केला होता तो तब्बल सहा दशकांनंतर.
बाबाजी रघुनाथ या ब्राह्मणाशी एका ब्राह्मण विधवेने १८३१ साली केलेला हा पुनर्विवाह समाजशास्त्रज्ञांकडून आणि इतर अभ्यासकांकडून दुर्लक्षितच राहिला आहे.
ब्राह्मण विधवेचा हा पुनर्विवाह ज्या दिवशी झाला त्याच दिवशी त्याच चॅपेलमध्ये (प्रार्थनामंदिरात ) आणखी एक मोठी किंवा त्याहून अधिक क्रांतिकारक घटना घडली होती. ती म्हणजे ब्राह्मण बाबाजी रघुनाथला बाप्तिस्मा देण्यात आला त्याच दिवशी महार जातीच्या गोपी या महिलेचेसुद्धा ख्रिस्ती धर्मात स्वागत करण्यात आले. हिंदू धर्मातील दोन विरुद्ध असलेले टोक अशाप्रकारे पहिल्यांदाच ख्रिस्ती बंधुभावात एकत्र आले अशा शब्दात या घटनेचे वर्णन करण्यात आले आहे.
अमेरिकन मराठी मिशनने अहमदनगर शहराच्या वेशीच्या आत सर्वप्रथम बाप्तिस्मा केला तो त्यांच्याकडे डॉ. ग्रॅहॅम यांनी सुपूर्द केलेल्या पुअर हाऊसमधील दृष्टिहीन, मूकबधिर, अपंग आणि अनाथ लोकांचा. कुटुंबियांनी आणि समाजाने टाकून दिलेल्या या अनाथ आणि अपंग व्यक्तींच्या मूळ जातीजमाती काय होत्या हे कळणे अशक्य आहे. या डॉ. ग्रॅहॅम यांनीच अमेरिकन मिशनच्या लोकांचे अहमदनगर शहरात १८३१ साली स्वागत केले होते.
मुंबईत उच्चभ्रु गणल्या जाणाऱ्या पारशी समाजातील काही तरुणांनी ख्रिस्ती धर्म स्विकारला तेव्हा मोठी खळबळ माजली होती, कोर्टकचेऱ्यासुद्धा झाल्या होत्या.
स्कॉटिश मिशनरी जॉन विल्सन यांच्या शाळेत शिकणाऱ्या धनजीभाई नौरोजी आणि होरमसजी पेस्तनजी या दोन पारशी तरुणांनी १८३९च्या अनुक्रमे १ मे आणि ५ मे रोजी पोलीस पहाऱ्यात ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
या दोन पारशी तरूणांपैकी होरमसजी पुढे ख्रिस्ती धर्मगुरू झाला, स्कॉटलंडमध्ये धर्मशिक्षण पुर्ण केले आणि भारतात दीर्घकाळ मिशनकार्य केले, त्यांनी आपले आत्मचरित्रसुद्धा लिहिले आहे.
मुंबईत परळीचा तरुण देशस्थ ब्राह्मण नारायणशास्त्री शेषाद्री ख्रिस्ती झाला, त्याचा बारा वर्षाचा धाकटा भाऊ श्रीपतशास्त्री यानेसुद्धा स्कॉटिश मिशन हाऊसमध्ये धर्मातरासाठी आश्रय घेतला होता. याप्रकरणी श्रीपतीला डांबून ठेवल्याचा आरोप करणारा हेबीअसं कॉपर्स अर्ज न्यायालयात रेव्हरंड रॉबर्ट नेस्बिट यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला होता.
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कायद्याचा अंमल सुरु झाला होता, या कायद्यासमोर न्यायालयात आणले जाणारे सर्व फिर्यादी आणि समान होते. एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीररित्या डांबून ठेवण्यात आले आहे असा आरोप करणारे कलम असणारे `हेबीअस कॉपर्स' चा खटला या निमित्ताने भारतात पहिल्यांदाच चालवला गेला असणार.
रेव्हरंड नारायणशास्त्री शेषाद्री यांनी ख्रिस्ती मिशनरी म्हणून फार मोठे योगदान दिले.
सोराबजी खारसेटजी लांगराना हा मुंबईतला पारशी तरुणही त्यानंतर लगेचच ख्रिस्ती झाला. फ्रान्सीना सांत्या या निलगिरी प्रदेशातील तोडा आदिवासी जमातीच्या असलेल्या मात्र ब्रिटिश रेजिमेंट अधिकारी सर फ्रान्सिस फोर्ड आणि त्यांची पत्नी कोर्नेलिया यांनी सांभाळलेल्या मुलीशी सोराबजी याचे लग्न झाले. सोराबजी १८७८ ला आपली सरकारी नोकरी सोडून पूर्ण वेळ ख्रिस्ती मिशनरी बनले. त्यांच्या पत्नीने फ्रान्सीना सांत्या यांनी पुण्यात बालवाडी (नंतरची व्हिक्टोरिया स्कुल), इंग्रजी, मराठी, गुजराती आणि उर्दू माध्यमाच्या शाळा सुरु केल्या .
सोराबजी हा पारशी ख्रिस्ती तरुण आणि त्यांची तोडा आदिवासी पत्नी फ्रान्सीना सांत्या यांची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे भारतातली पहिली महिला वकिल कॉर्नेलिया सोराबजी यांचे हे दोघे पिता आणि माता.
जॉन विल्सन यांचे परमस्नेही असलेल्या व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची मुलगी वेणुबाई हिने वैधव्यानंतर एका ख्रिस्ती कुटुंबाच्या सहवासात राहून शिक्षण घेतले आणि तिने ख्रिस्ती धर्मही स्वीकारला होता.
पंजाबचे राजा रणजितसिंग यांच्या मृत्युनंतर ब्रिटिशांनीं पंजाबचे राज्य खालसा केले. रणजितसिंहांचा पंधरा वर्षांचा मुलगा युवराज दुलिपसिंह दुलिपसिंह ख्रिस्ती होतो आणि काहीं काळानंतर इंग्लंड येथेच स्थायिक होतो. ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेणारा युवराज दुलिपसिंह हा पहिला सेलिब्रिटी किंवा वलयांकित शीखधर्मीय. भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री राजकुमारी अमृत कौर या दुसऱ्या वलयांकित व्यक्ती.
पंजाबमध्ये आणि संपुर्ण भारतात ख्रिस्ती धर्मप्रसार करणाऱ्या मिशनरींमध्ये साधू सुंदरसिंग या मूळच्या शीखधर्मीय असलेल्या गूढवादी किंवा मिस्टिक धर्मगुरुचा समावेश होतो.
अहमदनगरच्या हरिपंत ख्रिस्ती या देशस्थ ब्राह्मण तरुणाचा १३ एप्रिल १८३९ रोजी बाप्तिस्मा झाला.
१८५४ साली हरिपंत रामचंद्र खिस्ती आणि रामकृष्ण विनायक मोडक यांचा धर्मोपदेशक म्हणून दीक्षाविधी झाला. महाराष्ट्रात इतद्देशियांपैकी धर्मोपदेशक म्हणून दीक्षा मिळणारे ते पहिलेच दोन तरुण. येथील मराठी समाजात ख्रिस्ती धर्मप्रसार करणारे इथल्या मातीतील हे पहिले दोन मिशनरी. यापैकी रामकृष्णपंत विनायक मोडक हे अनेक चित्रपटांत कृष्णाच्या भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते शाहू मोडक यांचे पणजोबा.
हरिपंत खिस्ती हे इंग्रजीतील `सगुणा' ही आत्मचरित्रात्मक कादंबरी लिहिणाऱ्या आणि खालावलेल्या प्रकृतीमुळे वैद्यकीय शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागणाऱ्या कृपा सत्यनाथन या महिलेचे वडील. ``सगुणा : अ स्टोरी ऑफ नेटिव्ह ख्रिश्चन लाईफ'' ही कादंबरी १८८७ साली प्रसिद्ध झाली. इंग्रजीत लिखाण करणारी कृपा सत्यनाथन ही पहिली भारतीय स्त्री-कादंबरीकार .
त्याकाळात पुण्यामुंबईत स्कॉटिश आणि अमेरिकन मिशनरींच्या संपर्कात आलेल्या अनेक सुशिक्षित ब्राह्मण व्यक्तींनी ख्रिस्ती धर्म स्विकारला आणि इथल्या उच्चभ्रू समाजात धोक्याची घंटा लावली. यथावकाश योग्य ती पावले उचलून आणि विविध सामाजिक, आध्यात्मिक किंवा धार्मिक मंडळे / समाज स्थापन करुन ख्रिस्ती धर्माचे हे आक्रमण रोखण्यास बऱ्यापैकी यश आले.
त्यानंतर ख्रिस्ती मिशनरींनी आपला लक्ष महाराष्ट्रातील ग्रामीण भागांतील दुर्लक्षित, उपेक्षित, गावच्या वेशीबाहेर हुसकावून लावलेल्या समाजघटकांकडे वळवले. मिशनरींच्या सुदैवाने त्यावेळी तरी या लोकांना मिशनरींनी जवळ करण्याबाबत, त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक गरज पुरवण्याबाबत समाजातील पुढारलेल्या वर्गांचे काही एक आक्षेप नव्हते.
यानंतर अनेक मातंग आणि महार लोकांनी सामुदायिकरीत्या प्रभूच्या राज्यात प्रवेश केला. शिऊरचा भागोबा काळेखे हा मातंग जातीतला पहिलाच धर्मांतरीत होता. अहमदनगरच्या चर्चमध्ये भागोबाने पहिल्यांदा पाऊल ठेवले त्या क्षणाला त्या देवळात कमालीचे उत्साहाचे औत्सुकाचे वातावरण होते.
भागोबा पूर्वी तमासगीर होते. या पार्श्वभूमीमुळे त्यांनी मराठीत अनेक ख्रिस्ती गायने लिहिली. ख्रिस्ती धर्मातील अस्सल मराठी गायनांची रचना करण्याचा मान अशाप्रकारे भागोबा यांच्याकडे जातो.
या ख्रिस्ती धर्मात ब्राह्मण, धनगर, तेली, साळी, मराठा, मातंग, महार, कायस्थ प्रभू, आणि इतर कैक जातीजमातींचे लोक गुण्यागोविंदांचे नांदू लागले. `यमुनापर्यटन' ही मराठी भाषेतील पहिली कादंबरी लिहिणारे बाबा पद्मनजी हे कासार जातीचे. पंडिता रमाबाई, निळकंठशास्त्री नेहेम्या गोरे, मराठी पंचकविंमध्ये समावेश असणाऱे रेव्हरंड नारायण वामन टिळक वगैरे नामवंत मंडळी चित्पावन ब्राह्मण होती.. पुण्यात भर पेठवस्तीत म्हणजे कसबा पेठेत ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च आहे हे पहिल्यांदा ऐकले तेव्हा मलाही असाच धक्का बसला होता.
अशाप्रकारे ख्रिस्ती समाजात स्वतःला सारस्वत ब्राह्मण म्हणवून घेणारे लोक आहेत त्याचप्रमाणे रेड्डी ख्रिस्ती आहेत, अय्यंगार, नायर, नंबुद्रीपाद ख्रिस्ती आहेत आणि पुर्णो संगमा यांच्या कुटुंबासारखे ईशान्य भारतातील आदिवासीसुद्धा ख्रिस्ती आहेत.
कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया या कॅथोलिक चर्चच्या धर्माधिकाऱ्यांच्या संघटनेची पुण्यात १९९२ साली बैठक झाली तेव्हा इंडियन एक्सप्रेसमध्ये आणि `लोकसत्ता’त पुर्ण पानभर जाहिरातीत देशातील या सर्व बिशपांचे नावांसहीत फोटो छापण्यात आले होते तेव्हा जातीजमाती दर्शवणाऱ्या नावांची ही यादी वाचून मला स्वतःला धक्काच बसला होता.
ईशान्य भारतातल्या काही राज्यांत ख्रिस्ती समाज बहुसंख्य आहेत आणि जवळजवळ सर्वच लोक आदिवासी आहेत आणि त्यांना अनुसूचित जमातींना लागू असणाऱ्या सर्व सुविधा आणि आरक्षण लागू आहेत.
विविध जतिजमातीतील लोकांनी आपल्या आधीच्या चालीरीती म्हणजे लग्नकार्य आणि इतर सांस्कृतिक प्रथापरंपरा ख्रिस्ती समाजातही आणल्या आहेत. उदाहरणार्थ लग्नकार्य म्हणजे रोटीबेटी व्यवहार, खाद्यसंस्कृती वगैरेवगैरे.
पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजातल्या ख्रिस्ती लोकांना अनुसूचित जातीच्या सवलती नसल्या तरी भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या विशेषतः खानदेश, पालघर जिल्हा वगैरे भागांतल्या सर्व आदिवासी ख्रिस्ती लोकांना अनुसूचित जमातीच्या सर्व सुविधा आणि आरक्षण लागू आहेत.
अशाप्रकारे उच्च वर्णीय ब्राह्मण, विविध तथाकथित ओबीसी समाजातील तसेच दलीत आणि आदिवासी अशा विविध जाती आणि जमातींचा देशातील आणि राज्यातील ख्रिस्ती समाजात समावेश होतो.
ख्रिस्ती समाजात अशाप्रकारे विविध जाती जमाती अगदी खुल्या स्वरूपात अस्तित्वात असल्या तरीसुद्धा ख्रिस्ती धर्मात मात्र जातीभेद नाही असे ठोसपणे म्हणता येते.
हे नंतर अगदी सविस्तरपणे पुढल्या पोस्टमध्ये…

Sunday, April 23, 2023

 

Christian missionaries, another perspective

0
13

FREDERICK NORONHA

At a time when religion has become a tool for political mobilisation, and mainly a means of spreading hatred, former Navhind Times journalist Camil Parkhe has taken on an interesting project. Not an easy one at that.

His 184-page ‘Contribution of Christian Missionaries in India’ (Gujarat Sahitya Prakashan, 2007) does just that. It highlights the profiles of 19 individuals who played a role in this nation. They come from different backgrounds, time periods and denominations of Christianity.

For instance, Pandita Ramabai (Rama Dongre, 1858-1922), the Indian social reformer who converted to Christianity, was a Sanskrit scholar, and worked for child widows. She campaigned for female education, was an early member of the Indian National Congress, taught the blind, and translated the Bible.

Thomas Stephens, SJ, (c.1549–1619) the Jesuit priest has a Konkani institution named after him at Porvorim. Born in the mid-16th century, he wrote the first book to be printed in Marathi. He wrote the first European-crafted or printed Indian grammar (‘Arte de lingoa Canarim’, 1640). His Konkani Cathecism ‘Doutrina Cristam’ was the second printed in any Indian language. His ‘Krista Purana’, a Marathi-Konkani epic poem on the life of Christ in 11,000 stanzas of four verses, was sung up to the 1930s in some areas.

Since these were in the Roman script, Parkhe explains, “therefore, Marathi scholars did not pay any attention to this great literary work” till much later, in the early
20th century.

There are chapters on the Italian Jesuit Robert de Nobili, 1577-1656, (the “father of inculturation in India”). He adopted a lifestyle acceptable to the local people, and tried to set up a Sanskrit-medium seminary of Christian philosophy in 1610.

Fr. Nehemiah Nilakanta Shastri Gore (1825-95), a prominent convert, was considered the “first Marathi missionary”. Satyavan Namdeo Survanshi was a journalist and ‘kirtankar’. He was a bridge builder between Protestants
and Catholics.

Belgian Jesuit Fr. Camille Bulcke, SJ (1909-82), earned a Padma Bhushan award in 1974 for enriching the Hindi language with his research as an indologist. He first published the Angreji-Hindi Koshi (English-Hindi Dictionary) in 1968, with multiple reprints.

Narayan Vaman Tilak (1861-1919) was a poet and missionary. A nationalist too, he was called Phula-Mulanche Kavi (poet of flowers and children). He evolved a new spiritual-cultural movement for the newly-converted Marathi-speaking Christians in Maharashtra.

Mother Teresa, who came to India as a 19-year-old Macedonian-Albanian, needs no elaboration.

Joseph Beschi SJ was a priest and Tamil poet, and also a Jesuit. He knew Tamil, Malayalam, Sanskrit, Telugu, English, French, Portuguese, Italian, Latin, Persian, and Hindi — at least five of these very well. He was an excellent diplomat, and got royal patronage from a local ruler.

Graham Stains is of very recent memory, having been burnt alive while in the service of lepers. Parkhe writes: “Until the brutal burning of the missionary and his two young sons, not many people outside Orissa had heard of Graham Staines or his wife, Gladys. After their killing under the cover of darkness, the whole world came to know about the Staines couple and the service they were rendering.”

Fr. Herman Bacher was a pioneer of rural development. He left his home in the Alps and became Maharashtra’s “pride of the agricultural sector”. He worked out schemes to help the poor — regardless of religion — after Independence. He helped get loans for farmers, dig or repair wells, and provided funds through a cooperative bank. Vocational training, groundwater recharge, and his work in drought-prone areas were what he became known for.

The Barcelona-born priest-historian Henry Heras, SJ, no stranger to Goa, was fascinated with Indian culture and history. For three decades, he researched the history of ancient India, culture, scripts, and sculptures. In 1926, he started the Indian Historical Institute in Bombay with a library of just eight books. Four guns belonging to the Maratha period became the foundation of a museum. His work on Indian Christian art and encouragement to talent like Angelo da Fonseca is well known. Many of his students became reputed historians and
archaeologists.

Baptist missionary Reverend William Carey is known as the father of printing technology in India (outside of the early Portuguese efforts). Valerian Cardinal Gracias was the first Indian Cardinal, and Parkhe credits him as being behind the building of the prestigious St. John’s Medical College in Bengaluru.

1831 Belgaum-born Baba Padmanjee is the first Marathi novelist and a missionary. Manorama Medhavi, the daughter of Pandita Ramabai, a social worker, is also featured. So is the German Jesuit and editor Archbishop Henry Doering, who started a magazine that lasted over a century. Justin Edward Abbot authored 11 books in English and Marathi on the lives and works of medieval Hindu sants of Maharashtra.

An interesting addition is Matthew Lederle SJ, who was conscripted in the Nazi war machine, escaped from a Brit PoW camp, and later became a Jesuit priest in his 20s. He was fascinated by the spiritual works of Sant Dnyandeo and Sant Namdeo. He co-founded Snehasadan Ashram, a centre for inter-religious dialogue in Pune. Fluent in Marathi, he was convinced that “local culture and Christian doctrines and beliefs can be compatible”. He encouraged Indian Christian art; one still hears names like Gemini Roy, Jyoti Sahi, Angelo de Fonseca, Sister Claire, or Sr. Genevieve. His dream was to have at least 100 ashrams run by the Catholic churches in India, which completely blend with the local religion and culture. Lederle became Provincial of the then Goa-Poona Jesuits, headquartered at the time in Panaji but died of a heart attack barely a year later in 1986, while swimming
off Baga.

This book isn’t a recent publication. But given the manner in which religious infighting within India keeps getting stoked, perhaps this point needs to be made. And noticed.

One question that could be raised though is how critical can such a book be. Even more serious a question could be on how does one decide whom to include? Seen one way, Parkhe’s view is from beyond the traditional places associated with Christianity in India. In this case, Maharashtra. Some points and perspectives could be debated though. The claim that Christianity was brought to India by St. Thomas could be just that — a claim. Likewise, accepting how “terrible” the Goa Inquisition was might be another aspect that needs a rethink, considering recent studies on the issue.

“The consistent demonising of Christians, especially the religious personnel commonly and freely referred to as missionaries, may seem to some as unwarranted. Christians in India are a tiny and scattered minority….,”
writes journalist Anosh Malekar in
the book. He argues that the book “is important” not because it talks about religious conflict, or salvation of metaphysics. “It is their disproportionate undertaking… Christians run 25% of India’s voluntary sector. The beneficiaries belong to all castes, creeds, and cults.”

Friday, June 11, 2021

पंडिता रमाबाई


ख्रिस्ती मिशनरींचे योगदान

 कामिल पारखे

 वितरक:  सुगावा प्रकाशन

          1881 मध्ये कलकत्ता शहरात एका वीस वर्षांच्या मराठी युवतीचे आगमन झाले आणि तिच्या विद्वत्तेच्या तेजाने, संस्कृतवरील प्रभुत्वाने तेथील सामाजिक पुढारी चकित झाले. कलकत्त्याच्या विद्वान मंडळींनी या युवतीचा सत्कार घडवून तिला सरस्वतीउपाधी बहाल केली. विशेष म्हणजे रमाबाई डोंगरेहे नाव धारण करणाऱ्या या युवतीचे नाव महाराष्ट्रात तोपर्यंत कुणीही ऐकले नव्हते. त्यानंतर प्रसिद्धीचे वलय होऊन रमाबाई महाराष्ट्रात आल्यानंतर पुणे व पुण्याजवळील केडगाव ही त्यांची उर्वरित आयुष्यातील कर्मभूमी बनली. कलकत्त्यात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती चिकटलेले प्रसिद्धीचे वलय त्यानंतर त्यांना संपूर्ण आयुष्यभर चिकटले.

          प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात वावरणाऱ्या व्यक्तींच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातील प्रत्येक घटना समाजासमोर येत असतात. या घटनांबद्दल त्या व्यक्तीला कधी हार तर कधी प्रहार स्वीकारण्याची मानसिक तयारी ठेवावी लागते. पंडिता रमाबाई तर चाकोरीबद्ध वाट सोडून स्वत:च्या नव्या वाटा निर्माण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या. ज्या काळात महिलांना स्वत:चे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व नसे त्या काळात कुटुंबातील वा नातलगांमधील कुणाही कर्त्या पुरुषाचा आधार नसताना या एकाकी महिलेने प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे धाडस दाखविले. त्यांच्या स्वत:च्या धर्मांतरामुळे, बालविधवांच्या पुनर्वसन कार्यामुळे आणि नंतर ख्रिस्ती मिशनरी या नात्याने समाजातील सर्व अनाथ आणि असाहाय्य घटकांचा सांभाळ करण्याच्या वृत्तीमुळे समाजात निर्माण झालेल्या अनेक वादळांना या विदूषीने खंबीरपणे तोंड दिले. पंडिता रमाबार्इंचे जीवन म्हणजे सतत संघर्षाशी झुंजणाऱ्या, प्रतिकूल परिस्थितीत लढून जीवनमूल्यांशी एकनिष्ठ राहणाऱ्या व्यक्तीची गाथाच आहे.

          पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म कर्नाटकात मेंगलोरजवळील गंगामूळ यागावी 23 एप्रिल 1858 रोजी झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री (अनंतपद्मनाभ) परमेश्‍वर डोंगरे हे संस्कृतपंडित होते. चित्पावन ब्राह्मण कुळातील अनंतशास्त्रींनी आपल्या पत्नीला, लक्ष्मीबाईला संस्कृत शिकविले. रमाबाई केवळ सहा महिन्यांच्या असताना अनंतशास्त्री आपल्या कुटुंबासह म्हणजे पत्नी, मुलगा आणि दोन मुलींसह तीर्थयात्रेसाठी घराबाहेर पडले. पंधरा वर्षे तीर्थार्टन केल्यानंतर हे कुटुंब मद्रास इलाख्यात पोहोचले. त्यावेळी तेथे भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळाने अनंतशास्त्रींचा आणि त्यांच्या पत्नीचा बळी घेतला. रमाबाई, त्यांचा थोरला भाऊ श्रीनिवास आणि थोरली बहीण कृष्णाबाई पोरके बनले. तेथूनच रमाबार्इंच्या संघर्षमय आयुष्याला सुरुवात झाली.

          आई-वडिलांच्या निधनानंतर या तरुण भावंडांनी आपली तीर्थयात्रा चालूच ठेवली. त्यानंतर काही महिन्यातच रमाबार्इंच्या थोरल्या बहिणीचे कृष्णाबाईचे निधन झाले. पित्याच्या मार्गदर्शनाखाली श्रीनिवासशास्त्री आणि रमाबार्इंनी संस्कृतचे आणि हिंदू धर्मशास्त्राचे गाढे ज्ञान संपादन केले होते. पुराण सांगत आणि संस्कृतमधून व्याख्याने देत हे बहीण-भाऊ पुढे फिरतच राहिले. त्यांना आसरा देणारे, मायेने त्यांची काळजी घेणारे या जगात आता कुणी उरले नव्हते. तीन-चार वर्षे हजारो मैलांचा पायी प्रवास करत श्रीनिवासशास्त्री आणि रमाबाई 1878 साली कलकत्त्यात पोहोचले. या शहरात मात्र या भाऊ-बहिणीच्या ज्ञानाची कदर करणारे लोक त्यांना भेटले. आधुनिक विचारसरणीच्या ब्राह्मो समाजाच्या आणि कलकत्त्यातील विद्यापीठाच्या पंडितांनी या तेजस्वी तरुणांना आदराची वागणूक दिली.

          श्रीनिवासशास्त्री आणि रमाबार्इंच्या संस्कृतवरील प्रभुत्वाने कलकत्त्यातील विद्वान मंडळी चकित झाली. ज्या काळात महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला जात होता त्या काळात या महिलेचे संस्कृतवरील प्रभुत्व ही निश्‍चितच कौतुकाची बाब होती. कलकत्ता विद्यापीठात झालेल्या विद्वानांच्या सभेत यावेळी रमाबार्इंना सरस्वतीउपाधी सन्मानाने देण्यात आली. तेव्हापासून रमाबाई डोंगरे ही युवती पंडिता रमाबाई सरस्वतीया नावाने संपूर्ण हिंदुस्थानभर ओळखली जाऊ लागली.

रमाबार्इंविषयी मुंबईच्या एका दैनिकात 1878 च्या जुलै महिन्यात पुढील बातमी प्रसिद्ध झाली:

          हल्ली कलकत्त्यास रमाबाई नावाची कोणी मराठी स्त्री आली आहे. तिने कलकत्त्यात काही दिवस मुक्काम करून तेथील विद्वान मंडळीस चकित करून सोडले आहे. बाई संस्कृत भाषा बोलते, जागच्या जागी संस्कृत काव्य करते. तिचे वय बावीस वर्षांचे असून ती अविवाहित आहे. महाराष्ट्रीयन असली तरी कर्नाटक प्रांतातून आली आहे.

          या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. स्त्री असूनही ही संस्कृत भाषा कशी शिकली, बावीस वर्षे ओलांडून अजून ती अविवाहित कशी, मराठी असूनही महाराष्ट्रात तिच्याविषयी कुणालाच काही कशी माहिती नाही, असे विविध प्रश्‍न रमाबार्इंविषयी मुंबई-पुण्यात विचारले जाऊ लागले.

          महाराष्ट्राला रमाबार्इंची ओळख झाली ती अशाप्रकारे. पंडिता रमाबार्इंच्या जीवनातील अनेक घटनांनी पुढील काळात महाराष्ट्रातील सामाजिक जीवन अनेकदा ढवळून टाकले. रमाबार्इंचा कलकत्त्यातील विद्वानांनी केलेला सत्कार आणि या महिलेविषयी महाराष्ट्रात झालेली त्यावेळची चर्चा रमाबार्इंच्या महाराष्ट्रातील पुढील जीवनाची एकप्रकारे नांदीच ठरली.

          त्यानंतर रमाबाई आणि त्यांचे बंधू आसामात सिल्हट येथे आणि बंगालमधील ढाका येथे गेले. ढाक्यात असताना श्रीनिवासशास्त्री आजारी पडले. तेथे त्यांचे 8 मे 1880 रोजी निधन झाले. आई-वडिलांच्या तसेच थोरल्या बहिणीच्या निधनानंतर रमाबार्इंना निदान आपल्या थोरल्या भावाचा तरी आधार होता. श्रीनिवासशास्त्रींच्या निधनानंतर तोही आधार संपला. कर्नाटक प्रांत सोडून आलेल्या या तरुण अविवाहित महिलेला आता कुणाचाही आधार नव्हता.

          श्रीनिवासशास्त्री हयात असताना त्यांची आणि रमाबार्इंची बिपीन बिहारीदास मेधावी या बंगाली व्यक्तीशी ओळख झाली. श्रीनिवासशास्त्रींच्या निधनानंतर बिपीन बिहारींनी रमाबाईंना लग्नाची मागणी घातली आणि 13 जून 1880 रोजी बांकीपूर शहरात रजिस्ट्रारसमोर नोंदणी पद्धतीने या दोघांचा विवाह झाला. त्याकाळात रमाबार्इंनी नोंदणी पद्धतीने विवाह केला या घटनेने पुन्हा एकदा समाजात खळबळ उडाली. लग्नानंतर सिल्हट येथे बिपीन बिहारीदास वकिली करत असत. 16 एप्रिल 1881 रोजी रमाबार्इंच्या मनोरमा या मुलीचा जन्म झाला.

          रमाबार्इंना वैवाहिक सुख फार काळ लाभले नाही. लग्नानंतर केवळ 19 महिन्यांनंतर बिपीन बिहारींचा 4 फेब्रुवारी 1882 रोजी अल्पशा आजारानंतर मृत्यू झाला. थोड्या काळाच्या अवधीत वडील, आई, थोरली बहीण आणि थोरला भाऊ यांच्या निधनाचं दु:ख सहन करणाऱ्या रमाबार्इंवर आता पतीच्या निधाची आपत्ती कोसळली. त्यानंतर आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पंडिता रमाबार्इंनी महाराष्ट्राची वाट धरली.

          रमाबाई महाराष्ट्रात पोहोचण्याआधीच या विदूषीची महाराष्ट्राला ओळख झाली होती. पुण्यात आल्यावर रमाबार्इंचे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्याशी घनिष्ट संबंध जुळले. रमाबार्इंच्या पुण्यातील वास्तव्यात त्यांच्याविरुद्ध समाजात प्रतिकूल वातावरण निर्माण झाल्यानंतरही रमाबाई रानड्यांनी पंडिता रमाबार्इंना भावनिक आधार दिला. पुण्यात पंडिता रमाबार्इंचे आगमन झाल्यानंतर या तेजस्विनीच्या सभा आयोजित करण्यात प्रसिद्ध मराठी कादंबरीकार हरी नारायण आपटे आणि रमाबाई रानड्यांनी पुढाकार घेतला. पुण्यातील आपल्या वास्तव्यात पंडिता रमाबार्इंनी लोकजागृतीचे विशेषतः महिलांच्या प्रबोधनाचे कार्य सुरू केले. त्यांच्या या कार्यास पुण्यातील समाजसुधारकांचा मोठा पाठिंबा लाभला. रमाबार्इंच्या पुढाकाराने पुण्यात, अहमदनगर, सोलापूर आणि मुंबई येथे आर्य महिला समाजाची स्थापना करण्यात आली.

          एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातसमाजजागृतीचे कार्य करणाऱ्या सामाजिक पुढाऱ्यांमध्ये पुरुषांचीच अधिक संख्या होती. ज्या थोड्याफार महिला या क्षेत्रात काम करत होत्या त्या सर्वांना त्यांच्या घरातील कर्त्या पुरुषांचे पूर्ण पाठबळ लाभले होते व त्यामुळे आपल्या कार्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकूल टीकेस त्या तोंड देऊ शकल्या. पंडिता रमाबाई मात्र परप्रांतातून एकट्या आल्या होत्या. एक छोटी मुलगी वगळता त्यांना कुटुंबातील कुणाही व्यक्तीचा वा नातलगाचा आधार नव्हता. त्याकाळात स्त्रियांच्या उन्नतीचे काम हाती घेणे किती कठीण होते हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना सहन कराव्या लागलेल्या टीकेमुळे आणि हालअपेष्टांमुळे सिद्ध झाले होते. स्वत:च्या वैयक्तिक जीवनातसुद्धा रमाबार्इंनी खूप दु:ख सोसले. तरीसुद्धा सामाजिक प्रबोधनाचा काटेरी मार्ग त्यांनी निवडला हे विशेष.

          याच काळात ब्रिटिश सरकारने सर डब्ल्यू. हंटर या शिक्षणतज्ज्ञाच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोगाची नेमणूक केली. या हंटर कमिशनसमोर दिलेली पंडिता रमाबार्इंची हिंदुस्थानातील महिलांच्या शिक्षणाबद्दलची साक्ष त्यावेळी खूप गाजली. हिंदुस्थानातील प्रचलीत सामाजिक व्यवस्थेमुळे या देशात महिला डॉक्टरांची खूप गरज आहे. त्यामुळे स्त्रियांसाठी वैद्यकीय शिक्षण व्यवस्था करावी असे त्यांनी या साक्षीत सुचविले. हंटर कमिशनच्या सदस्यांनी यावेळी रमाबार्इंची उलटतपासणीही घेतली. रमाबार्इंना त्यावेळी इंग्रजीचे फारसे ज्ञान नव्हते, त्यामुळे त्यांनी मराठीतून साक्ष दिली. रमाबार्इंच्या साक्षीने खुद्द सर हंटर फारच प्रभावित झाले. त्यांनी रमाबार्इंच्या साक्षीचे इंग्रजी रूपांतर करून छापून घेतले, इतकेच नव्हे तर इंग्लंडला परतल्यानंतर तेथे रमाबार्इंच्या कार्यासंबंधी व्याख्यानही दिले. अशाप्रकारे रमाबार्इंनी परदेशगमन करण्यापूर्वीच त्यांची कीर्ती इंग्लंडमध्ये पोहोचली.

          त्यानंतर थोड्याच काळात पंडिता रमाबार्इंनी शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला प्रस्थान केले. त्यांची मुलगी मनोरमासुद्धा त्यांच्याबरोबर होती. इंग्लंडमध्ये असतानाच वॉण्टेज शहरात त्यांनी आपल्या मुलीसह 29 सप्टेंबर 1883 रोजी बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. या घटनेपासून या विदूषीच्या आयुष्याचे नवे पर्व सुरू झाले. रमाबाई इंग्लंडला गेल्या तर तेथे त्या ख्रिस्ती होतील ही महाराष्ट्रातील काही पुढाऱ्यांची भीती खरी ठरली. अपेक्षेप्रमाणे या घटनेने त्याकाळात महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली.

          इंग्लंडमध्ये 1886 पर्यंत म्हणजे तीन वर्षे राहून रमाबार्इंनी आपला अभ्यासक्रम पूर्ण केला. याच दरम्यान महाराष्ट्रातून आनंदीबाई गोपाळराव जोशी अमेरिकेत वैद्यकीय शिक्षणासाठी गेल्या होत्या. वैद्यकीय शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या आनंदीबाई पहिल्या भारतीय महिला, तर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाणाऱ्या पंडिता रमाबाई या दुसऱ्या महाराष्ट्रीयन महिला. महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रार्थना समाजाचे नेते डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांच्या कन्या अन्नपूर्णा किंवा ॲना तर्खडकर इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला. आनंदीबाई जोशी आणि पंडिता रमाबाई सरस्वती यांची पूर्वी कधीही गाठभेट झाली नव्हती. मात्र आनंदीबार्इंच्या वैद्यकीय पदवीदान समारंभास उपस्थित राहण्यासाठी पंडिता रमाबाई कन्येसह इंग्लंडहून अमेरिकेत गेल्या.

          आनंदीबार्इंच्या पदवीदान समारंभानंतर रमाबार्इंचे अमेरिकेत अडीच वर्षे वास्तव्य होते. या काळात त्यांनी अमेरिकेच्या विविध भागांत व्याख्याने दिली. अमेरिकेतील महिलांच्या संस्था, तेथील शिक्षणपद्धतीचा त्यांनी अभ्यास केला. आपल्या व्याख्यानातून त्यांनी अमेरिकन जनतेत भारतातील महिलांच्या, विशेषत: बालविधवांच्या परिस्थितीबाबत जागृती निर्माण केली. या जागृतीमुळे हिंदुस्थानात पंडिता रमाबार्इंच्या महिलांविषयक कार्यास मदत करणाऱ्या रमाबाई असोसिएशनया संस्थेचा जन्म झाला. हिंदुस्थानात हे कार्य करण्यासाठी आर्थिक मदत करण्याची हमी या संस्थेने स्वीकारली.

          हिंदुस्थानात उच्चवर्णीय बालविधवांसाठी शाळा चालविणे हे रमाबाई असोसिएशनचे प्रमुख उद्दिष्ट होते. या शाळेची शैक्षणिक पद्धती पूर्णत: पंथरहित असावी, असा या संस्थेच्या घटनेत महत्त्वाचा नियम होता. रमाबाई असोसिएशनच्या सल्लागार मंडळात रावबहादूर रामकृष्ण गोपाळ भांडारकर, रावबहादूर महादेव गोविंद रानडे यांचा समावेश होता.

          भारतात परतल्यानंतर पंडिता रमाबार्इंनी रमाबाई असोसिएशनच्या वतीने मुंबईत चौपाटीजवळ 11 मार्च 1889 रोजी शारदा सदनया संस्थेची स्थापना केली. या सदनाच्या पहिल्या बालविधवा विद्यार्थिनी गोदूबाई. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याशी त्यांचा पुनर्विवाह होऊन पुढे त्या आनंदीबाई वा बाया कर्वे या नावाने सुपरिचित झाल्या. बाया कर्वे यांनी माझे पुराणया आपल्या आत्मचरित्रात शारदा सदनातील दिवसांचे वर्णन केले आहे. गोदूबार्इंप्रमाणेच अनेक बालविधवांना शारदा सदनात शिक्षण आणि निवारा मिळाला.

          दीड वर्षानंतर म्हणजे 1880 च्या नोव्हेंबरात रमाबार्इंनी शारदा सदनचे मुंबईतून पुण्यातील कॅम्पात स्थलांतर केले. शारदा सदन ज्या संस्थेतर्फे चालविले जात होते ती रमाबाई असोसिएशन ही मिशनरी संस्था नसल्याने शारदा सदनचे काम सेक्युलर पद्धतीने चालवावे असा स्पष्ट नियम होता. रमाबाई स्वत: ख्रिस्ती असल्या तरी सदनातील बालविधवांच्या धार्मिक बाबतीत त्यांनी ढवळाढवळ करू नये असा असोसिएशनच्या सल्लागार मंडळींचा आग्रह होता. मात्र शारदा सदनच्या चालिका स्वत: हे कार्य येशू ख्रिस्ताच्या सेवेसाठी चालवित असल्याने त्यांच्या जीवनपद्धतीचा, विचारसरणीचा प्रभाव सदनातील कोवळ्या वयाच्या मुलींवर पडणे साहजिकच होते. यातूनच रमाबाई शारदा सदनातील असाहाय्य मुलींवर धर्मांतराची सक्ती करतात, रमाबाई छुप्या पद्धतीने ख्रिस्ती धर्माचा प्रचार करत आहेत, असे आरोप त्यांच्यावर केले जाऊ लागले.

          शारदा सदनच्या पहिल्या विद्यार्थिनी गोदूबार्इंचा धोंडो केशव कर्वे यांच्याशी विवाह झाला तेव्हा पंडिता रमाबार्इंनी शारदा सदनात मोठी जेवणावळ घातली. या समारंभाबद्दल महर्षी कर्व्यांनी आपल्या आत्मवृत्तया आत्मचरित्रात लिहिले आहे, “आपल्या पहिल्याविद्यार्थिनीची योग्य व्यवस्था लागत आहे हे पाहून त्यांना (रमाबार्इंना) अतिशय आनंद झाला होता. सदनातील विद्यार्थिनींनाही आपल्या एका मैत्रिणीला संसारसुखाचा अनुभव घेण्याची संधी मिळाल्यामुळे आणि विधवांच्या भावी सुस्थितीचे द्वार मोकळे होत चालल्यामुळे अत्यंत हर्ष झाला होता.बाया कर्वे यांनी आपल्या माझे पुराणआत्मचरित्रात म्हटले आहे, ‘बार्इंनी मला दागिने व कपडे दिले. त्यांच्या जावयालाकर्व्यांना कपडे दिले.पंडिता रमाबार्इंच्या या जावयाने पुढे शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे योगदान केले आणि वयाची शंभरी गाठल्यानंतर त्यांचा पंडित नेहरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तेव्हा त्यांनी आपल्या भाषणात पंडिता रमाबाई, डॉ. भांडारकर आणि गोपाळ कृष्ण गोखले आदी मोजक्या व्यक्तींच्या ऋणांचा आदरपूर्वक उल्लेख केला.

          शारदा सदनचे काम चालू असतानाच पंडिता रमाबाई हिंदुस्थानच्या राष्ट्रीय चळवळीतही सक्रियपणे भाग घेत. रमाबार्इंच्या प्रयत्नांमुळे काँग्रेस संघटनेत स्त्री प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला. मुंबईत भरलेल्या 1889 च्या काँग्रेस अधिवेशनात रमाबाई स्त्री-प्रतिनिधी म्हणून उपस्थित होत्या. काँग्रेस अधिवेशनानंतर पार पडलेल्या सामाजिक परिषदेच्या अधिवेशनाला उपस्थित असलेल्या केवळ दोन महिलांमध्ये रमाबार्इंचा समावेश होता. या परिषदेतील रमाबाईंच्या भाषणाचे विस्तृत वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने 30 डिसेंबर 1889 च्या अंकात दिले.

          1897 मध्ये महाराष्ट्रात प्लेगच्या साथीने थैमान घातले. यावेळी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी चालविलेल्या कडक तपासणीमुळे सामान्य लोकांच्या झालेल्या हालाविरुद्ध पंडिता रमाबार्इंनी आवाज उठविला. गार्डीयनया इंग्रजी साप्ताहिकात रमाबार्इंनी या संदर्भात एक पत्र लिहिले. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये उपस्थित झालेल्या या विषयाच्या संदर्भात उत्तर देताना लॉर्ड जॉर्ज हॅमिल्टन यांनी रमाबार्इंचे हे पत्रच वाचून दाखविले.

          1895 साली पुण्यात काँग्रेसचे प्रथम अधिवेशन भरले तेव्हा संपूर्ण हिंदुस्थानातून या शहरात जमलेल्या काही पुढाऱ्यांनी शारदा सदनला भेट दिली. तोपर्यंत या सदनातील बारा मुली रमाबार्इंच्या कार्याने प्रभावित होऊन ख्रिस्ती झाल्या. या घटनेमुळे महाराष्ट्रात मोठे वादळ निर्माण झाले. काँग्रेस अधिवेशनानंतर पार पडलेल्या सामाजिक परिषदेत विधवाविपनाचा निषेध करणारा व विधवांना स्वावलंबी करण्याबाबतचा ठराव इंडियन सोशल रिफॉर्मचे संपादक के. नटराजन यांनी मांडला. त्यावेळच्या भाषणात नटराजन म्हणाले, “विधवांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करण्याचा जो पायंडा पंडिता रमाबार्इंनी घालून दिला आहे व या शहरात त्यांचे कार्य इतक्या यशस्वीपणे चालू आहे त्याची प्रशंसा केल्याखेरीज माझ्याने राहवत नाही. काही धर्मांतरे झाली त्यांच्याबद्दल रमाबार्इंवर जे टीका करत आहेत त्यांच्याबद्दल मला सहानुभूती वाटत नाही. ठोकळेबाज धर्ममतांवर माझा विश्‍वास नाही. आपल्या बंधूंचे भले करणे हा मी सर्वोच्च धर्म समजतो. भुकेल्याला अन्न देणे हे अत्यंत उच्च दजाचे धार्मिक कृत्य व श्रेष्ठ प्रतीचे दान आहे. पंडिताबाई व तिचे अमेरिकेतील मित्र व सहायक यांचे आपल्यावर इतके ऋण आहेत की आपण ते कधीही फेडू शकणार नाही; मग धर्ममतांबद्दल कितीही मतभेद असो.

          रमाबार्इंना जातीपातीचे भेदभाव मान्य नव्हते. रमाबाई असोसिएशनच्या नियमानुसार शारदा सदनात उच्चवर्णीय मुलींसाठी सोवळ्याओवळ्याचे कडकडीत नियम पाळावे लागत असत. असे सोवळ्याओवळ्याचे नियम तेथे पाळले नसते तर अनेक उच्चवर्णीय लोकांनी आपल्या बालविधवा मुलींना वा बहिणींना शिक्षणासाठी येथे पाठविलेच नसते. या संदर्भात शारदा सदनातील आपल्या सुरुवातीच्या दिवसांचे बाया कर्व्यांनी पुढील शब्दात वर्णन केले आहे. सहा महिने ब्राह्मणाची बाई मिळाली नाही म्हणून माझे जेवणही मलाच करावे लागे. गोविंदराव व काशीबाई कानिटकर, हरी नारायण आपटे आदी मंडळी केव्हा तरी सदनात आली म्हणजे एखाद्या वेळी त्यांच्यासाठी स्वयंपाकसुद्धा करावा लागे.

          आपल्या मुली बालविधवा असल्या, समाजात त्या कितीही उपेक्षित असल्या तरी शारदा सदनात त्यांनी सुखात राहावे, असे रमाबार्इंना वाटे. शारदा सदनातील घटनांकडे लक्ष असणारे लोक रमाबाई आपल्या मुलींना दुधातुपात नुसते लोळवितेअसे म्हणत. शारदा सदनातील बालविधवांच्या या खाण्यापिण्यावरून एकदा केसरी आणि सुधारक या वृत्तपत्रांत वादही झाला होता. बाया कर्व्यांनी या संदर्भात लिहिले आहे, रमाबाई असोसिएशनची सल्लागार मंडळी म्हणे आपल्या जातीतील विधवांनी चैनीने राहणे बरे नव्हे’, पण रमाबार्इंना ते आवडत नसे. पूर्वीचे दिवस त्यांच्या मनात येत. त्या म्हणत, ‘मी विद्यार्थिनींना हालातून वर काढण्यासाठी त्यांचे हाल कमी करण्यासाठी शाळा घातली. मी त्यांना सुखात ठेवायचे ठरविले, ते कमी होणे शक्य नाही.

          शारदा सदनातील दिवसांबद्दल कृष्णाबाई गद्रे यांनी लिहिले आहे, ‘काय त्या बंगल्याची शोभा व काय तो सुंदर फुलांनी शृंगारलेला बगीचा, जिकडे पाहिजे तिकडे मोकाट फिरण्याची आम्हाला मुभा, दिवाणखाना देखील आमची बैठकीची जागा. सुंदर कोचाखुर्च्यांवर बसून गप्पा माराव्यात, बागेत जाऊन जाई, जुई, मोगरा, चमेली, बकुळी व मधुमालतीच्या वेण्या गुंफून केसावर लावाव्यात. रमाबार्इंनी आम्हाला फुलांची, पक्ष्यांची व झाडांची माहिती देऊन दुर्बिणीतून (सूक्ष्मदर्शक यंत्रांतून) त्यांचे निरीक्षण करण्यास शिकवले. काय ते लाड? अशा सुंदर वातावरणात आपले दिवस घालवायला कोण बालविधवा येणार नाही? कधी कधी रमाबाई स्वत: पहाटेस उठून आम्हाला आगाशीवर नेऊन नक्षत्रे वगैरे मोठ्या आवडीने शिकवीत.

          रमाबाई या शारदा सदनातील मुलींवर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची बळजबरी करतात, हा त्यांच्यावर नेहमी केला जाणारा आरोप. या आरोपामुळे घाबरून काही पालकांनी आपल्या मुली सदनातून काढून घेतल्या. मात्र त्यामुळे या सदनात आश्रयासाठी येणाऱ्या अनाथ, समाजाने टाकून दिलेल्या बालविधवांची संख्या रोडावली नाही. समाजात त्यांच्याविरुद्ध निर्माण झालेल्या वादळास खंबीरपणे तोंड देऊन पंडिता रमाबार्इंनी विधवांच्या पुनर्वसनाचे आपले कार्य चालूच ठेवले.

          त्या काळात मुली पाच-सहा वर्षांच्या झाल्या की त्यांची लग्ने उरकून टाकली जात असत. अनेकदा या कोवळ्या मुलींची प्रौढ पुरुषांशी लग्ने लावली जात असत. यामुळे अनेक मुलींवर वैवाहिक सुख भोगण्याआधीच बालविधवा होण्याची आपत्ती कोसळे. या बालविधवांना त्यानंतर अत्यंत उपेक्षित जीवन जगावे लागे. त्यांच्या स्वत:च्या कुटुंबातील व्यक्तींकडून आणि समाजाकडून त्यांची उपेक्षा होत असे. बैरामजी मलबारी या पारशी समाजसुधारकाने बालविवाह प्रथेविरुद्ध आवाज उठविला. या चळवळीचा परिणाम होऊन ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानात संमतीवयाचे विधेयक आणले. या विधेयकानुसार बारा वर्षांपेक्षा लहान असलेल्या स्त्रीशी तिच्या नवऱ्याने शरीरसंबंध ठेवल्यास तो गुन्हा ठरणार होता. या विधेयकामुळे स्त्रियांच्या हालअपेष्टा कमी होणार असल्याने या विधेयकास स्त्रियांच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी पंडिता रमाबार्इंनी पुढाकार घेतला.

          संमतीवयाच्या विधेयकामुळे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्रात. विशेषत: पुण्यात मोठा वाद निर्माण झाला. ब्रिटिश सरकारतर्फे सामाजिक सुधारणा लागू करण्यास लोकमान्य टिळकांचा प्रथमपासून विरोध होता. त्यातच समाजातील सनातनी मंडळींचाही या विधेयकास विरोध अपेक्षितच होता. या विधेयकामुळे पुण्यात गोपाळ गणेश आगरकर, डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे समाजसुधारक आणि या विधेयकास विरोध करणारी सनातनी मंडळी यांच्यामध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला. महिलांच्या विकासासाठी धडपडणाऱ्या पंडिता रमाबाई या विधेयकास पाठिंबा देण्यासाठी महिलांना संघटित करू लागल्या. संमतीवयाच्या विधेयकाच्या निमित्ताने पुण्यातील दोन गटांनी एकमेकांविरुद्ध मोठ्या प्रमाणात चिखलफेक केली. या संघर्षात अल्पसंख्य असणाऱ्या आगरकर, पंडिता रमाबाई, डॉ. भांडारकर या समाजसुधारकांना अर्थातच मोठी किंमत चुकवावी लागली.

          संमतीवयाच्या विधेयकास पाठिंबा मिळविण्यासाठी मुंबईत झालेल्या एका सभेचे चालकत्व पंडिता रमाबार्इंकडे होते, तर अध्यक्षस्थानी कॉर्नेलिया सोराबजी या सामाजिक कार्यकर्त्यां होत्या. त्यानंतर पुण्यात आर्य महिला समाजाच्या वतीने पंडिता रमाबाई आणि काशीबाई कानिटकरांनी सभा आयोजित केली. या सभेत पाच-सहा महिलांचा अपवाद वगळता इतर महिलांनी या विधेयकास पाठिंबा व्यक्त करणाऱ्या ठरावावर सह्या केल्या, असे त्यावेळी आगरकरांच्या सुधारकपत्रात छापून आले.

          न. चिं. केळकरांनी लोकमान्य टिळकांच्या चरित्रात या सभेबद्दल खालील माहिती दिली आहे. या लिखाणावरून पंडिता रमाबार्इंच्या स्वभाववैशिष्ट्यांवरही प्रकाश पडतो. केळकरांनी लिहिले आहे.

          सौ. काशीबाई कानिटकर यांनी बिलाचे समर्थन केले, पण दुसरी एक बाई उठून म्हणाली, या बिलान्वये तुमच्या जावयावर उद्या खटला झाला तर तो तुम्हांस आवडेल काय? काशीबाई पडल्या हाडाच्या हिंदू. त्यांच्याने उत्तर देववेना. रामाबाईही हाडाच्या हिंदूच, पण धर्मांतराने त्यांचे सर्वच विचार बदललेले होते. काशीबाई निरुत्तर झाल्यावर रमाबाई म्हणाल्या, ‘बेहेत्तर आहे. मुलीपेक्षा जावई अधिक नाही.हे उत्तर पंडिता रमाबाईंच्या सडेतोड स्वभावास धरूनच होते. हा स्वभाव धर्मांतराने नव्याने बनलेला नव्हता.

          संमतीवयाच्या विधेयकाविरुद्ध कितीही गदारोळ उठला तरी अखेरीस हे विधेयक मंजूर होऊन तसा कायदा अस्तित्वात आला. आज विशीच्या आत मुलींची सहसा लग्ने होत नाहीत. शंभर वर्षांपूवी मात्र बारा वर्षांखालील मुलींच्या विवाहास विरोध करण्यासाठी रमाबार्इंना चळवळ करावी लागली आणि प्रतिकूल टीकेस तोंडही द्यावे लागले.

          मध्य भारतात 1897 साली भीषण दुष्काळ पडला तेव्हा भुकेने हाडाचे सापळे झालेल्या शेकडो मुलींना पंडिता रमाबार्इंनी आश्रय दिला. या मुलींच्या मदतीला रमाबाई धावून गेल्या नसत्या तर या मुलींना मृत्यूलाच सामोरे जावे लागले असते.

          रमाबाईंच्या भारतातील महिलांच्या कार्यासाठी अमेरिकेतील रमाबाई असोसिएशनने दहा वर्षे आर्थिक पाठबळ देण्याचे कबूल केले होते. 1898 मध्ये ही मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा रमाबाई अमेरिकेत गेल्या व ही संस्था विसर्जित करण्यात आली. यानंतर नव्याने स्थापन झालेल्या अमेरिकन रमाबाई असोसिएशनया संस्थेच्या मदतीने रमाबार्इंनी पुण्याजवळील केडगाव येथे मुक्ती सदनचे काम सुरू केले. त्यानंतर रमाबार्इंनी आपल्या आयुष्याचा उर्वरित काळ केडगाव येथेच घालविला.

          केडगाववात पंडिता रमाबार्इंनी समाजाच्या विविध उपेक्षित घटकांसाठी वेगवेगळी सदने काढली. एखाद्या स्त्रीचे पाऊल वाकडे पडले वा त्यांच्यावर एखाद्या अनुचित घटनेची आपत्ती कोसळली की त्या स्त्रियांच्या कुटुंबाला आणि संपूर्ण समाजाला ती स्त्री नकोशी होई, अशा समाजबहिष्कृत स्त्रियांसाठी पंडिता रमाबाईंनी कृपासदनउघडले. या परित्यक्ता स्त्रियांचे त्यांनी पुनर्वसन केले. वृद्ध, अपंग आणि परावलंबी स्त्रियांसाठी रमाबार्इंनी प्रीती सदनसुरू केले.

          भारतातील पहिली अंधशाळा उघडण्याचे श्रेय रमाबार्इंच्या कन्या मनोरमाबाई यांना दिले जाते. अंधत्वामुळे परावलंबी बनलेल्या मुलींना आणि महिलांना केडगावातील बर्तमय सदनातआश्रय देऊन रमाबार्इंनी त्यांचे पुनर्वसन केले. येशू ख्रिस्ताने बर्तमय नावाच्या अंधाला दृष्टी दिली असे बायबलमध्ये सांगितले आहे. बर्तमय सदनातील अंध महिलांना ब्रेलने एकप्रकारे दृष्टीच दिली. बर्तमय सदनात या अंधांना स्वेटर विणण्याची, वेताच्या खुर्च्या बनविण्याची, टोपल्या तयार करण्याची कला शिकविली जाई. त्यामुळे या अंध महिला आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकल्या.

          केडगावात स्थायिक झाल्यानंतर लवकरच म्हणजे 1905 साली पंडिता रमाबार्इंनी संपूर्ण बायबलचे मराठी भाषांतर करण्याचे कार्य हाती घेतले. आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत त्यांचे हे कार्य चालू राहिले. संपूर्ण बायबलच्या भाषांतरास त्यांना अठरा वर्षे लागली. बायबलचा जुना करार हिब्रू भाषेत तर नवा करार ग्रीक भाषेत आहे. संपूर्णबायबलच्या इंग्रजी भाषांतराच्या अनेक आवृत्त्या रमाबाईंच्या काळातसुद्धा उपलब्ध होत्या. तरीसुद्धा मूळ हिब्रू आणि ग्रीक भाषांतून बायबलचे मराठीत भाषांतर करण्याचे या विदूषीने ठरविले आणि त्यासाठी या दोन्ही भाषांचा त्यांनी अभ्यास केला.

          कर्नाटकात जन्मलेल्या रमा डोंगरेला कानडी भाषा येत होती, वडिलांमुळे तिने संस्कृतवर प्रावीण्य मिळविले आणि रमा पुढे पंडिता रमाबाई सरस्वतीबनली. महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी मराठीवरही प्रभुत्व मिळविले. इंग्रजी शिकून पुढे त्या इंग्लंड आणि अमेरिकेतही व्याख्याने देत फिरल्या. चाळिशी उलटल्यानंतर त्या आता बायबलच्या भाषांतरासाठी हिब्रू आणि ग्रीक भाषेचा अभ्यास करू लागल्या. मुक्ती सदनातील दीड-दोन हजार अनाथ मुली आणि महिलांची जबाबदारी असताना पंडिता रमाबाई आपल्या विविध कार्याचा व्याप सांभाळत असत हे विशेष.

          बायबलच्या मूळ भाषेतून म्हणजे हिब्रू आणि ग्रीक मधून या धर्मग्रंथाचे भाषांतर करणाऱ्या पंडिता रमाबाई सरस्वती या जगातील एकमेव महिला. पंडिता रमाबार्इंच्या कन्या मनोरमाबार्इंचे वयाच्या चाळिसाव्या वर्षी निधन झाले. आपल्या लाडक्या मुलीच्या मृत्यूचा आघात रमाबार्इंनी खंबीरपणे सोसला आणि बायबलच्या भाषांतराचे काम चालूच ठेवले. बायबलचे भाषांतर हे त्यांच्या अखेरच्या जीवनातील मिशन बनले होते. भाषांतर पूर्ण होण्याआधी आपला मृत्यू होऊ नये अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. रमाबार्इंचे बायबलचे भाषांतर त्यांच्या स्वत:च्या केडगावातील छापखान्यातच छापले जात होते. 4 एप्रिल 1922 रोजी पंडिता रमाबार्इंनी भाषांतराचे शेवटचे प्रूफ वाचून हातावेगळे केले आणि छपाईसाठी छापखान्यात पाठविले. त्यानंतर त्याच रात्री या महान समाजसेविकेने या जगाचा निरोप घेतला.

संदर्भ

1. ‘महाराष्ट्राची तेजस्विनी पंडिता रमाबाई’- लेखक आणि प्रकाशक - देवदत्त नारायण टिळक, शांतिसदन, आग्रा रोड, नाशिक (1960).

2. ‘वधस्तंभाचे सेवक’ - लेखक-थिओडोर विल्यम्स - मराठी अनुवाद - डी. वाय. गायकवाड, प्रकाशक - औटरिच प्रकाशन, इंडियन इव्हँजेलिकल मिशन, 7 लँगफोर्ड रोड, बंगलोर 560025 (1991).

3. ‘भारत आणि ख्रिस्त’ - लेखक-फादर हान्स स्टाफनर (येशूसंघ) मराठी अनुवाद - डॉ. वा. पु. गिडे, प्रकाशक - मार्ग प्रकाशक, स्टीफन्स निवास, 2008, संत विन्सेंट मार्ग, पुणे 411001 (1988).

4. ‘ख्रिस्ती मराठी वाङ्मय (फादर स्टीफन्स ते इ.स. 1960 अखेर)’-लेखक -डॉ. गंगाधर नारायण मोरजे, प्रकाशक - डॉ. पी. एस. जेकब, प्राचार्य, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर आणि डॉ. मॅथ्यू लेदर्ले (येशूसंघ), स्नेहसदन, 250 शनिवार पेठ, पुणे 411030, (वितरक - अ.ज.प्रभू, विदर्भ मराठवाडा बुक कंपनी, 1334शुक्रवार पेठ, पुणे 411 002 (1984).