Showing posts with label Hiroshima. Show all posts
Showing posts with label Hiroshima. Show all posts

Thursday, December 21, 2023

 मोगलाई आणि अमरावती 

                                       

आम्ही मोगलाईतले म्हणजे मराठवाड्यातले. माझा जन्म आणि बालपण पश्चिम महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपुर येथे गेले तरी नाळ मात्र कायम गंगेपलिकडे असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या आजोळशी राहिली. या मोगलाईतली भामाठाण, पैठण, नागमठाण, वरखेड, बोरसर, लासूर, महालगाव वैजापूर, गंगापूर अशी अनेक नावे बाई-दादांच्या अन आजोळच्या लोंकांच्या बोलण्यातून कायम कानावर पडायची. गंमत म्हणजे वरीलपैकी बहुतेक ठिकाणी मी कधीही गेलेलो नाही वा त्यांचे भौगोलिक स्थान मला आजही माहित नाही.
अधूनमधून सणावाराला माळीघोगरगाव येथून पायपीट करत आमचे आजोबा म्हणजे गोविंदराव शिनगारे टिळकनगर श्रीरामपूरला स्थायिक झालेल्या मार्थाबाई आणि अनुसयाबाई या आपल्या दोन्ही लेकुरवाळ्या लेकींसाठी पुरणपोळ्यांचे आणि इतर खाद्यपदार्थांचे टोपले घेऊन दुपारी बारापर्यंत आमच्या घरी पोहोचायचे. बहुधा भल्या सकाळी गरमागरम पुरणपोळ्याचे टोपले फेट्यावर ठेवून घेऊन ते या पायी प्रवासाला निघत असत. या सगळ्या ऐकिव गोष्टी.
याचे कारण म्हणजे मी जन्मायच्या खूप वर्षे आधीच आजोबा अचानक गेले. एका सकाळी शेतमळ्यात घराबाहेर झोपलेल्या आजोबांचे शरीर काळेनिळे पडलेले दिसले होते, बहुधा विषारी सर्पदंशाने. आजीचे - आईची आई - जिच्याबाबत कधी एक शब्द ऐकलेला आठवत नाही, तिचे तर आजतागायत नावसुद्धा माहित नाही.
दहापंधरा वर्षांपूर्वी बाई असताना काहीही निमित्त नसताना मुद्दामच तिच्याबरोबर तिच्या माहेरी गेलो होतो. तेव्हा शांत्वनमामांच्या थोरल्या मुलाला माझ्या मामेभाऊ शाहूला सहज `आपले शेत कुठपर्यंत आहे ? ' असे विचारले तेव्हा त्याने दोन दिशेला हात उभारुन लांबवरपर्यंतची शेतीची जागा दाखवली होती. ``बहुधा साठ-पासष्ट एकरांपर्यंत असावी,'' असे तो म्हणाला होता.
विशेष म्हणजे ही हाडुळकीची शेती नव्हती. तेव्हा त्यावेळी नाशिकजवळच्या नांदूर-मधमेश्वर धरणाचे पाणी नुकतेच घोगरगावाला पोहोचले होते. तशी शेतात विहीर होती, गरजेनुसार मोटेने पिकांना पाणी दिले जात होते.
विहिरीतून चार बैलांच्या मदतीने मोटेने विहिरीतून पाणी काढून या शेतातल्या भाजीपाल्यांना, वांगे, काकडी वगैरेंना पाणी दिले जाताना मी पाहिले आहे. आता धरणाच्या पाण्याने शेती पूर्णतः बागायती झाल्याने सालातून तीनदा पीक घेणे आज शक्य झाले आहे. आम्ही श्रीरामपूरला परतताना शाहूभाऊने आमच्या नजरेसमोर जमीनीतून उपटलेला डहाळ, गव्हाच्या कोवळ्या लोंब्या असे कायकाय दिले होते.
बाईची ही तिच्या माहेरची शेवटची गाठभेट ठरली. त्यानंतर घोगरगावातल्या त्या शेतमळ्यात आजपर्यंत मी पाय ठेवलेला नाही.
आता नक्की संदर्भ आठवत नाही मात्र आमच्या आईवडलांच्या संभाषणात अनेकदा येणारा एक शब्द म्हणजे `मोगलाई' हा होता. मोगलाई हा शब्द ऐकून तेव्हा शालेय वयातला मी अचंबित व्हायचो. (तिथल्या `राजवाडा' या शब्दाचा नेमका अर्थ मला तसा फार लवकर समजला होता).
`आम्ही मोगलाईतले', `मोगलाईतला अमुकअमुक परिसर' असे शब्दप्रयोग व्हायचे. ''ही काय मोगलाई हाई काय?'', ''मोगलाई लागून गेली काय?'' असे वाक्प्रचार कानावर पडायचे.
दिल्लीतले मुघल साम्राज्य आणि औरंगाबाद जिल्ह्यातली मोगलाई ही नक्की काय भानगड आहे, असा मला प्रश्न पडायचा. नंतरनंतर कळायला लागले कि ही मोगलाई म्हणजे हैदराबाद निजामाच्या अमलाखालील मराठवाडा वगैरे प्रदेश म्हणजे मोगलाईतील भाग. अहमदनगर जिल्ह्यातल्या सीमेवरची गोदावरी म्हणजे गंगा ओलांडली कि हा मोगलाईचा भाग सुरु व्हायचा.
घोगरगावच्या फादर गुरियन जाकियरबाबांचे मी चरित्र लिहायला घेतले तेव्हा अगदी पहिल्यांदा 'मोगलाई' हा शब्द त्याच्या समर्पक अर्थासह तोही इंग्रजी पुस्तकांत मी पहिल्यांदा वाचला आणि या शब्दाविषयीच्या माझ्या कुतूहलाला अखेरीस पुर्णविराम मिळाला.
मी वाचलेल्या कुठल्याही मराठी पुस्तकांत `मोगलाई' या शब्द या अर्थाने वापरलेला माझ्या वाचनात आलेला नाही. मी वाचलेले बहुतेक लेखक पुण्यामुंबईतले, पश्चिम महाराष्ट्रातले आणि कोकणातले असावेत यामुळेही हे असेल कदाचित.
दुसरा नेहेमी कानावर पडणारा शब्द म्हणजे अमरावती आणि अमरावतीचे बिशप. त्याकाळात औरंगाबाद जिल्हा आणि गोदावरी नदीपलीकडचा परिसर अमरावती डायोसिसमध्ये म्हणजे धर्मप्रांतात होता. औरंगाबाद धर्मप्रांताची निर्मिती खूप अलिकडची, १९७७ सालची, पण तोपर्यंत मी माझे घर आणि श्रीरामपूर सोडून गोव्यात फादर होण्यासाठी गेलो होतो
ऐंशीच्या दशकाआधी खूप, खूप वर्षांपुर्वी अखंड नागपूर धर्मप्रांत होता. नागपूरचे फ्रान्सलियन बिशप यांच्या अखत्यारीतला. फ्रेंच असलेले फ्रान्सलियन धर्मगुरु विशाखापट्टणम येथून मिशनकार्य करण्यासाठी नागपूर आणि वऱ्हाडात पोहोचले होते आणि तेथून ते मोगलाईचे अखेरचे टोक असलेले औरंगाबाद जिल्ह्यात माळीघॊगरगाव येथे १८९२ साली काम करण्यासाठी पोहोचले होते. ही त्यांची मिशनकामाची सीमाहद्द कारण तेथून पुढे अहमदनगर आणि पश्चिम महाराष्ट्रात आणि मुंबईत जर्मन असलेल्या जेसुईट धर्मगुरुंची हद्द.
युरोपातल्या एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या दर्यावर्दी देशांत आपापसांत झगडे नको म्हणून मध्ययुगात पोपमहाशयांनी संपूर्ण जगाची चक्क दोन भागांत वाटणी केली होती ! एक-दुसऱ्यांच्या हद्दीत आक्रमण टाळण्यासाठी.
मोगलाईतल्या गंगेपलीकडे अहमदनगर, पुण्या-मुंबईत जर्मन जेसुईट प्रॉव्हिन्सचे जर्मन, स्विस, ऑस्ट्रेलियन धर्मगुरू कार्यरत होते त्याप्रमाणे विदर्भात, अमरावती आणि मराठवाड्यात फ्रान्समधल्या फ्रान्सलियन संस्थेचे धर्मगुरू कार्यरत होते. या संस्थेच्या कागदपत्रांतून आणि रोजनिशीतून विसाव्या शतकातील येथील ख्रिस्ती मिशन कामाबाबत, शैक्षणिक संस्थाबाबत माहिती मिळते.
फ्रेंच फ्रान्सलियन धर्मगुरु फ्रान्सिस मॉगे ( Francis Moget) यांनी Vagabonds for God : A story of the Catholic Church in India (1846-1907) प्रकाशनवर्ष १९९० आणि Shepherds for Christ : A story of the Catholic Church in Central India 1907-1960) प्रकाशनवर्ष १९९४ हे दोन ग्रंथ विविध संदर्भ आणि रोजनिशींच्या आधारे लिहिलेले आहेत.
सामाजिक आणि आर्थिक जीवन अभ्यासण्यासाठी अशा प्रकारचा ऐतिहासिक दस्तऐवज किती महत्त्वाचा आहे हे सांगायलाच नको. याच दोन पुस्तकांच्या आधारावर मी स्वतः ``घोगरगावचे जाकियरबाबा : मराठवाडा कॅथोलिक धर्मप्रांताचा इतिहास' हे पुस्तक मराठी आणि इंग्रजीत लिहिले आहे.
पहिल्या महायुद्धात आणि दुसऱ्या महायुध्दातसुद्धा तत्कालीन ब्रिटिश सरकारने भारतातल्या सर्व शत्रुराष्ट्रातील नागरिकांना म्हणजे जर्मन जेसुईट धर्मगुरूंना तुरुंगात वा छावणीत टाकले होते. अशा कठीण आणि युद्धस्थसमयी मोगलाई, अमरावती आणि नागपूर येथील फ्रेंच असलेले फ्रान्सलियन धर्मगुरु फादर गुरियन जाकियर आणि मेरी बेर्जे पुण्यातल्या आणि इतर जर्मन जेसुइट धर्मगुरूंच्या मदतीला धावले आणि येथील चर्चचे काम पाहिले.
यापैकी फादर बेर्जे यांनी १९१७ साली जन्मलेल्या माझ्या वडलांचा माळीघोगरगाव येथे बाप्तिस्मा केला होता. बाप्तिस्मा सर्टिफिकेटवर फादर बर्जे यांचे आणि गॉडफादरचेही नाव आहे. आपल्याकडे लग्नात नवरीला उचलून मांडवात आणण्यासाठी नवरीच्या मामाची - खऱ्या किंवा मानलेल्या - मामाची गरज असते तसेच बाप्तिस्मा करताना गॉडफादर ( आणि कधीकधी गॉडमदरसुद्धा) पाहिजेच.
पहिल्या महायुद्धात जर्मन शत्रूराष्ट्राचे नागरिक असलेले पुण्याचे बिशप हेन्री डोरींग रोममध्येच अडकल्याने त्यांच्या अनुपस्थितीत नागपूरचे बिशप फ्रान्सिस कॉपेल बैलगाडीने प्रवास करत मजल दरमजल करत पुण्याला, खडकी, संगमनेर आणि राहाता येथे तीन वेळेस म्हणजे १९१६, १९१७ आणि १९१९ला आले होते !
अन याची परतफेड म्हणून महायुद्ध संपल्यानंतर १९२६ला जपानमधील हिरोशिमातून भारतात परतलेल्या पुण्याचे आर्चबिशप हेन्री डोरींग हे ८ जानेवारी १९३३ रोजी मोगलाईतल्या माळीघोगरगावला मुलांमुलींना कन्फर्मेशन सांक्रामेंत देण्यासाठी पोहोचले होते. कारण नागपूरचे बिशप कॉपेल त्यावेळी आजारी होते.
कॅथोलिक लोकांच्या जीवनात धर्मप्रांत आणि बिशप यांचे एक अतूट नाते असते कारण आयुष्यात किमान एकदा तरी भाविक लोक काही क्षण बिशपांच्या अगदी जवळ येत असतात. याचे कारण म्हणजे सप्त स्नानसंस्कारांपैकी एक असलेल्या दृढीकरण किंवा confirmation हे सांक्रामेंत केवळ बिशपमहोदयच देऊ शकतात. बाप्तिस्मा, लग्नविधी, अंत्यसंस्कार वगैरे सांक्रामेंतासाठी कुठलाही दिक्षित धर्मगुरु पौराहित्य करू शकतो.
इतर धर्माच्या तुलनेत ख्रिस्ती धर्मात सश्रद्ध लोकांच्या जीवनात धर्मगुरूंचे अधिक महत्त्वाचे स्थान असते. विशेष महत्त्वाचे म्हणजे ख्रिस्ती धर्मात कुणाही व्यक्तीला- हो कुणालाही - धर्मगुरु होता येते, हे पद किंवा अधिकार विशिष्ट समाजघटकाचे नसतात. आता माझेच उदाहरण आहे. कधीकाळी मीसुध्दा गोव्यात फादर होण्यासाठी गेलो नव्हतो का?
तर एकेकाळी अमरावती धर्मप्रांत खूप महत्त्वाचा होता कारण या हद्दीत ख्रिस्ती लोकसंख्या भरपूर होती, या भागात अनेक ख्रिस्ती मंदिरे होती. माझ्या आजोळी माळीघोगरगाव येथे 1927 साली गॉथिक वास्तू शैलीत बांधलेले भव्य आणि सुंदर चर्च आहे. चर्चचे नाव आहे ख्रिस्त राजा मंदिर.... Church of Christ the King... आजही अशाप्रकारचे भव्य आणि सुंदर बांधकाम नवलाईची बाब ठरते. या बांधकामासाठी नेवाशाहून खास काळे पाषाण मागवण्यात आले होते.
या भागातील ख्रिस्ती लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होण्याची अनेक सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक कारणे आहेत.
तर सांगायचा मुद्दा असा कि आम्ही जसे मोगलाईतले तसेच एकेकाळच्या अमरावती धर्मप्रांतातले सुद्धा .
मागच्या आठवड्यात अमरावती येथील बिशपांचे कॅथेड्रल किंवा आसनपीठ (कॅथेड्रॉ म्हणजे आसन, seat ) असलेल्या चर्चमध्ये दुपारी पाचच्या दरम्यान चर्चबेलचा घंटानाद झाला.
त्याचवेळेस व्हॅटिकन सिटीमध्ये सेंट पिटर्स बॅसिलिकामध्येसुद्धा घंटानाद झाला होता.
अमरावती डायोसिसच्या नव्या बिशपांची पोप फ्रान्सिस यांनी नेमणूक केली हे जाहीर करण्यासाठी हा घंटानाद होता.
अमरावतीच्या नव्या बिशपांच्या नेमणुकीची बातमी इथेच फेसबुकवर लगेचच पाचदहा मिनिटांत मला कळाली आणि अमरावतीशी असलेल्या माझ्या खूप जुन्या नातेसंबंधांना उजाळा मिळाला.
अमरावती धर्मप्रांताचे हे नवे बिशप आहेत पुणे धर्मप्रांताचे आताचे व्हिकर जनरल (धर्मसत्तेत पदश्रेणीत बिशपानंतर दुसऱ्या क्रमांकाचे) फादर मॅल्कम सिक्वेरा.
पुढच्या महिन्यात प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला, २५ जानेवारीला, अमरावतीचे नवे बिशप म्हणून त्यांचा दीक्षाविधी होईल.

Camil Parkhe

Wednesday, April 27, 2022

`निरोप्या'कार आर्चबिशप हेन्री डोरिंग

बाळशास्त्री जांभेकरांनी 1832 साली ‘दर्पण’ मासिक सुरू करून मराठी वृत्तपत्रकारितेचा पाया रोवला. त्यानंतर मराठी भाषेत अनेक नियतकालिके सुरू करण्यात आली. यापैकी बहुतेक नियतकालिके आज काळाच्या ओघात गडप झाली आहेत. ‘ज्ञानोदय’ हे 1842 साली सुरू झालेले नियतकालिक आजही पुण्यातून प्रसिद्ध होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वळण या आजही अत्यंत आडवळणाच्या ठिकाणी असलेल्या खेडेगावी फादर हेन्री डोरिंग या येशूसंघीय जर्मन धर्मगुरूने ‘निरोप्या’ हे मासिक 1903 च्या एप्रिल महिन्यापासून सुरू केले. हे मासिक अजूनही पुण्यातून प्रकाशित होत आहे.

4 जानेवारी 1881 पासून गोपाळ गणेश आगरकर यांच्या संपादकत्वाखाली ‘केसरी’ हे नियतकालिक सुरू झाले. त्यामुळे सर्वाधिक दीर्घायुषी ठरलेल्या मराठी नियतकालिकांमध्ये ‘निरोप्या’ या मासिकाने या एप्रिल २०२२ महिन्यात एकशेविसाव्या वर्षांत पदार्पण केले आहे ही बाब कौतुकास्पद आहे.
मराठी भाषिक कॅथोलिक समाजाची आध्यात्मिक गरज भागविणाऱ्या, या समाजातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील वृत्त पुरविणाऱ्या या मासिकाची महाराष्ट्रातील विविध भागातील त्याचप्रमाणे देशातील इतर राज्यातील मराठी भाषक ख्रिस्ती वाचक आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. यावरून या मासिकाची लोकप्रियता लक्षात येते.
हिंदू मागासवर्गीय जातींतून नव्यानेच ख्रिस्ती धर्मात आलेल्या अशिक्षित, आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागास असलेल्या समाजासाठी विसाव्या शतकाच्या सुरुवातीस नियतकालिक सुरू करणारे फादर हेन्री डोरिंग हे धर्मगुरू निश्चितच द्रष्ट्ये मिशनरी होते हे यावरून दिसून येते. ‘निरोप्या’च्या या संस्थापकाचे त्यामुळे मराठी भाषिक ख्रिस्ती समाजावर आणि त्याचप्रमाणे मराठी भाषेवर मोठे ॠण आहेत.
विशेष म्हणजे ‘ज्ञानोदय’ आणि ‘निरोप्या’ ही मराठीतील दोन्ही दीर्घायुषी मासिके मराठी भाषिक ख्रिस्ती समाजाची मुखपत्रे आहेत. ‘ज्ञानोदय’ हे रेव्ह. हेन्री बॅलन्टाईन या अमेरिकन धर्मगुरूने सुरू केलेले नियतकालिक प्रॉटेस्टंट समाजात, तर ‘निरोप्या’ हे कॅथोलिक समाजात प्रामुख्याने वितरित केले जाते. या मासिकांचा खप केवळ ख्रिस्ती समाजापुरताच मर्यादित असला तरी महाराष्ट्रातील सामाजिक स्थित्यंतराचे या नियतकालिकांत प्रतिबिंब उमटत असल्याने संपूर्ण मराठी समाजाची ही मासिके एक महत्त्वाचा सांस्कृतिक ठेवा आहेत.
हेन्री डोरिंग यांचा जन्म जर्मनीत बोकोल्ट येथे 13 सप्टेंबर 1859 रोजी झाला. 1882 मध्ये त्यांना गुरुदीक्षा मिळाली. 1895 मध्ये फादर डोरिंग यांचे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीपाशी असलेल्या वळण येथे आगमन झाले. वळण शेजारी असलेले केंदळ हे गाव अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या खेडेगावातूनच कॅथोलिक मिशनरींनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सर्वप्रथम धर्मप्रसार सुरू केला. आज अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, बीड, पुणे या जिल्ह्यात मराठी भाषिक कॅथोलिक ख्रिस्ती समाजाची मोठी संख्या आहे. यापैकी बहुसंख्य लोकांनी पूर्वाश्रमीच्या हिंदू महार या अस्पृश्य जातीतून ख्रिस्ती धर्मात प्रवेश केला.
फादर डोरिंग वळण येथे आले तेव्हा अहमदनगर जिल्ह्यातील मिशनकार्य नुकतेच सुरू झाले होते. अस्पृश्य जातीतून अनेकजण ख्रिस्ती धर्मात येत होते तरी केवळ धर्मांतरामुळे त्यांच्या सामाजिक वा शैक्षणिक परिस्थितीत एकदम मोठा बदल होत नव्हता. या नवख्रिस्ती समाजाला शिक्षित करण्यासाठी मिशनऱ्यांनी प्राथमिक शाळा सुरू केल्या. या नवसाक्षरांसाठी ख्रिस्ती धर्माचे ज्ञान देण्यासाठी मग या मिशनऱ्यांनी स्वतः मराठी भाषेचे ज्ञान प्राप्त करून घेतले आणि नंतर या भाषेत धर्मशिक्षणाची पुस्तकेही तयार केली.
फादर डोरिंग वळणला येण्याआधीच काही मिशनऱ्यांनी मराठी भाषेत धर्मशिक्षणाची काही पुस्तके लिहिली होती असे दिसते. अहमदनगर आणि नजिकच्या जिल्ह्यातील कॅथोलिक समाजातील पहिल्या पुस्तकाचा मान ‘लहान कॅथेखिसम’ या धर्मशिक्षणविषयक पुस्तकाला मिळतो. या पुस्तकाच्या लेखकाच्या नावाची नोंद मिळत नसली तरी या पुस्तकाचे लेखक केंदळ वळणमध्येच काम करणारे फादर दालिंग असावेत असे फादर डॉ. ख्रिस्तोफर शेळके यांनी म्हटले आहे. मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील असणारे आणि रोम येथील विद्यापीठात तौलनिक धर्मशास्त्राचे प्राध्यापक असणारे फादर शेळके यांनी अहमदनगर जिल्ह्यातील ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या कार्यावर संशोधन केलेले आहे.
फादर शेळके पुढे म्हणतात की, फादर डोरिंग केंदळ वळण येथे स्थायिक झाले तेव्हा त्यांना स्थानिक लोकांमध्ये ‘सुभक्तीसार’ या शीर्षकाचे धर्मशिक्षणाचे पुस्तक सर्वाधिक लोकप्रिय आहे असे आढळले.
फादर डोरिंग यांच्या आधी म्हणजे 1892 च्या मध्यास केंदळ येथे आलेल्या फादर फ्रान्सिस ट्रेनकाम्प यांनी ‘सुभक्तीसार’ हे पुस्तक 1895 पूर्वी लिहून प्रसिद्ध केले. फादर ट्रेनकाम्प यांनी मराठी भाषेचा चांगला अभ्यास केला. या पुस्तकासाठी त्यांनी पुण्या-मुंबईच्या पुस्तकात आढळणाऱ्या भाषेऐवजी अहमदनगर जिल्ह्यात प्रचलित असलेल्या बोलीभाषेचा वापर केला. थोडेफार शिक्षण झालेले नवख्रिस्ती लोक या पुस्तकाचा वापर करत. देवळात मिस्साच्या वेळी प्रार्थना करण्यासाठीही धर्मगुरू या पुस्तकाचा वापर करत असत.
धर्मकार्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात स्थायिक झालेल्या फादर डोरिंग यांना केवळ ‘लहान कॅथेखिसम’, ‘मोठे कॅथेखिसम’ या भाषांतरित आणि ‘सुभक्तीसार’ या पुस्तकांचाच उपयोग करावा लागत असे. त्याकाळी मिशनऱ्यांना आपल्या घरापासून लांबवर असलेल्या खेडेगावात उपदेशासाठी, मिस्सासाठी जावे लागत असे. ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांना ख्रिस्ती धर्माचे मराठीतून धर्मज्ञान देण्यासाठी त्याकाळी मराठी भाषेत पुस्तकेच नसल्याने या भाषेत धर्मविषयक साहित्याची निर्मिती करण्याची गरज फादर डोरिंग यांना भासू लागली. अशा प्रकारचे साहित्य नसल्याने लहान मुलांना आणि प्रौढांना ख्रिस्ती धर्माची शिकवण देणाऱ्या धर्मशिक्षकांना किंवा पालकांना त्यांचे कार्य करणे कठीण जात होते.
या समस्येवर उपाय म्हणून फादर डोरिंग यांनी मराठी भाषेतून धर्मविषयक माहिती देणारे मासिक सुरू करण्याचे ठरविले. येशूसंघाच्या अधिकाऱ्यांनी या मासिकासाठी आर्थिक मदत देण्याचे मान्य केले. अशाप्रकारे 1903 च्या एप्रिल महिन्यात फादरनी ‘येशूच्या अतिपवित्र हृदयाचा निरोप्या’ या आपल्या मासिकाचा पहिला अंक प्रसिद्ध केला.
तेव्हापासून पहिल्या महायुद्धाच्या काळातील काही वर्षांचा अपवाद वगळता ‘निरोप्या’ आजपर्यंत नियमितपणे प्रकाशित होत आहे. येसूसंघ या कॅथोलिक धर्मगुरूंच्या संस्थेच्या मालकीचे हे नियतकालिक असल्याने केवळ एक अपवाद वगळता गेली १२० वर्षे येशूसंघीय धर्मगुरूच या मासिकाच्या संपादनाची जबाबदारी सांभाळत आहेत.
फादर डोरिंग यांनी ‘निरोप्या’सुरू केल्यानंतर या मासिकात लिहिण्यासाठी स्वतःच्या मराठी भाषेच्या ज्ञानात अधिक भर घालण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अहमदनगर जिल्ह्यातील लोकांची बोलीभाषेतील शब्द, हिंदू धर्मसाहित्यात वापरले जाणारे शब्द तसेच संकल्पना ते शिकले. या ज्ञानाचा वापर करून आपले मासिक नवसाक्षर नवख्रिस्ती लोकांसाठी अधिकाधिक उपयुक्त करण्याचा ते प्रयत्न करू लागले.
फादर डोरिंग हे या मासिकाचे संपादक आणि लेखकही होते. सुरुवातीच्या काळात ‘निरोप्या’ मुंबईतील ‘एक्झामिनर’ प्रेसमध्ये छापले जात असे. ‘निरोप्या’च्या पहिल्या अंकाची एकूण दहा पाने होती आणि त्यात पाच विषयांवर लेख होते. एप्रिल महिन्यासाठी प्रार्थनेचा विषय, पवित्र मिस्साचा चाकर होणे, लिओ तेरावे परमगुरुस्वामींचा (पोप) सण, तुझे राज्य येवो आणि एक रक्तसाक्षी (हुतात्मा) हे ते पाच विषय होत.
राहुरी तालुक्यातील एका आडवळणाच्या ठिकाणी ‘निरोप्या’च्या संपादकांचे वास्तव्य होते आणि त्यांचे मासिक तर मुंबईतून प्रसिद्ध होत होते. त्यामुळे अंक वेळेवर छापला जाईल यासाठी संपादकांना खास प्रयत्न करावे लागत असत. आपल्या या मासिकाचा चौथा अंक तर खुद्द संपादक महाशयांनीच सरळ स्वतःच्या हाताने लिहून काढला होता असे दिसते. हा अंक त्यावेळी का छापला गेला नाही हे आजही स्पष्ट होत नसले तरी या मासिकाच्या हस्तलिखित प्रतींवरून आपले नियतकालिक वेळेवर प्रकाशित झाले पाहिजे याबद्दल फादर डोरिंग विशेष आग्रही होते हे दिसून येते.
‘निरोप्या’तून ख्रिस्ती संतांची चरित्रे आणि ख्रिस्ती जगातील विविध घडामोडींविषयी लेख असत. शंभरी गाठलेल्या या मासिकात आजही ही सदरे प्रसिद्ध होत आहेत. त्याशिवाय ख्रिस्ती अध्यात्मात अभिजात वाङ्मय समजल्या जाणाऱ्या खाळेीींंळे लहीळीींळ या लॅटिन पुस्तकाचा अनुवादही त्यांनी या मासिकातून क्रमशः प्रसिद्ध केला. ‘ख्रिस्तानुवर्तन’ या नावाने या पुस्तकाच्या तिसऱ्या अध्यायापर्यंत हे पुस्तक ‘निरोप्या’तून प्रकाशित केले गेले.
दर महिन्याला नियमितपणे प्रभूचा संदेश घेऊन ‘निरोप्या’ हे चिमुकले मासिक अहमदनगर आणि शेजारच्या जिल्ह्यातील खेड्याखेड्यांतून प्रवासाला निघत असे. त्याकाळी पुस्तकांची किंवा मासिकांची वानवाच असल्याने या छोट्याशा नियतकालिकाने शंभर वर्षांपूर्वीच्या ग्रामीण भागातील ख्रिस्ती धर्मीय वाचकांची वाचनाची आणि अध्यात्माची भूक भागविली असणार.
1907 मध्ये फादर डोरिंग यांची पुणे धर्मप्रांताचे महागुरुस्वामी किंवा बिशप म्हणून नेमणूक झाली. केंदळ वळण येथे असताना त्यांना केवळ आपल्या धर्मग्रामाची जबाबदारी सांभाळावी लागे. बिशप झाल्यानंतर त्यांना आता संपूर्ण पुणे धर्मप्रांतात येणाऱ्या विविध जिल्ह्यांच्या धर्मग्रामांचे धर्माधिकारी म्हणून काम पाहावे लागत असे. त्याकाळच्या पुणे धर्मप्रांतात पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सातारा, सांगली वगैरे जिल्ह्यांचा परिसर येत असे. बिशप म्हणून डोरिंग यांची जबाबदारी अनेक पटींनी वाढली तरीसुद्धा या साहेबांनी ‘निरोप्या’ चे संपादन आणि लेखन सोडले नाही. ‘निरोप्या’च्या संपादकांची धर्मगुरुपदावरून महाधर्मगुरुपदावर बढती होऊन पुण्याला बदली झाली तसे या मासिकाचे प्रकाशनस्थळही पुण्याला हलविण्यात आले.
पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले तेव्हा बिशप डोरिंग पोपमहाशयांना भेटण्यासाठी रोम येथे गेले होते मूळचे जर्मन असलेल्या बिशपांना ब्रिटिशांची वसाहत असलेल्या आपल्या कर्मभूमीत परतणे अशक्य झाले. पोपनी जपानमधील हिरोशिमा धर्मप्रांताचे अपोस्तोलिक व्हिकर म्हणून त्यांची 1921 साली नेमणूक केली. या काळातच आर्चबिशप हे ख्रिस्ती महामंडळातील आणखी एक उच्च पद त्यांना देण्यात आले.
जपानमध्ये नेमणूक झाल्यानंतरही आपल्या कर्मभूमीत परतण्याची डोरिंग यांची तीव्र इच्छा असावी असे दिसते, कारण ब्रिटिश सरकारची परवानगी मिळताच त्यांनी पुन्हा 1927 साली पुणे धर्मप्रांतातील मराठी ख्रिस्ती समाजाचे मेंढपाळ म्हणून पुन्हा एकदा सूत्रे हाती घेतली.
पुण्यात परतल्यानंतर केवळ सहाच महिन्यात म्हणजे जून 1928 मध्ये त्यांनी बंद पडलेल्या ‘निरोप्या’चे पुन्हा एकदा आधीच्याच उत्साहाने प्रकाशन सुरू केले. ‘निरोप्या’ त्याच्या गुरूप्रमाणेच (येशू ख्रिस्ताप्रमाणे) पुनरुत्थित झाला’’ असे या घटनेचे फादर ख्रिस्तोफर शेळके यांनी वर्णन केले आहे.
‘निरोप्या’ हे मराठी भाषिक कॅथोलिक समाजाचे सर्वात पहिले मुखपत्र. गेले एक शतक हे मासिक महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कॅथोलिक कुटुंबांमध्ये नियमितपणे जात आहे. आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागास असलेल्या या समाजातील अनेक कुटुंबांना दररोज वर्तमानपत्र घेण्याचीही ऐपत नाही. मात्र अगदी वाजवी वर्गणी असलेले हे मासिक या कुटुंबातील लहानथोरांची वाचनाची भूक भागवत आहे. त्यादृष्टीने आर्चबिशप डोरिंग यांनी या समाजास मोठे उपकृत करून ठेवले आहे यात शंकाच नाही.
1981 साली या मासिकाची वार्षिक वर्गणी केवळ तीन रुपये हेाती आणि किरकोळ अंकाची किंमत तीस पैसे होती. आज 2022 साली रंगीत मुखपृष्ठ असलेल्या आणि एकूण 32 पाने असलेल्या या मासिकाची वार्षिक वर्गणी दोनशे रुपये आहे.
आर्चबिशप डोरिंग यांच्या ‘निरोप्या’ने मराठी भाषिक कॅथोलिक समाजात वाचनाची आवड निर्माण करण्याबरेाबरच या समाजात लेखकांच्या आणि कवींच्या पिढ्या निर्माण करण्याचेही मोठे योगदान दिले आहे. मराठी सारस्वतात पुढे मोठे नाव कमाविणाऱ्या अनेक कॅथोलिक आणि प्रॉटेस्टंट पंथीय लेखकांना त्यांच्या उमेदवारीच्या काळात ‘निरोप्या’ ने त्यांना हक्काचे एक व्यासपीठ मिळवून दिले. आचार्य सत्यवान नामदेव सूर्यवंशी, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, कवी विश्वासकुमार आदी नामवंत साहित्यिकांचा ‘निरोप्या’च्या लेखकांमध्ये समावेश होतो.
आपले साहित्य आणि नाव पहिल्यांदाच छापून आल्यामुळे मिळणाऱ्या आनंदाचा अनुभव मलासुद्धा ‘निरोप्या’मुळेच लाभला. माझा पहिला लेख होता वि.स, खांडेकर यांना त्यांच्या `ययाती' कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला याबद्दल. साल होते १९७४ आणि माझे वय १५ वर्षे.
एखाद्या नियतकालिकाच्या प्रकाशन स्थळात अगदी क्वचितच बदल होतात. ‘निरोप्या’च्या शंभर वर्षांच्या आयुष्यात मात्र असे प्रसंग अनेकदा घडून आलेले दिसतात. याचे कारण म्हणजे ‘निरोप्या’चे मालकीहक्क असणाऱ्या येशूसंघाचे धर्मप्रांताधिकारी यांच्यामार्फत ‘निरोप्या’च्या संपादकांची नेमणूक केली जाते. नव्या संपादकांच्या नियुक्तीनंतर हे मासिकही ते संपादक ज्या धर्मग्रामात कार्यरत असतात तेथून प्रसिद्ध होत राहिले आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील केंदळ वळण, श्रीरामपूर, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, सातारा जिल्ह्यातील कराड, त्याचप्रमाणे नाशिक वगैरे ठिकाणी ‘निरोप्या’चे कार्यालय सातत्याने स्थलांतरित होत राहिले.
या विविध जिल्ह्यांतील ख्रिस्ती धर्मियांनी अर्थातच त्यामुळे ‘निरोप्या’ची साथ सोडली नाही. त्यांच्या अनेक पिढ्यांनी या चिमुकल्या नियतकालिकावर आपली वाचनाची आणि अध्यात्माची भूक भागविली आहे.
‘निरोप्या’कार आर्चबिशप डोरिंग यांनी मराठी साहित्याला आणखी एक मोठे योगदान दिले आहे. सतराव्या शतकात गोमंतकात मराठी भाषेत लिहिले गेलेले ‘क्रिस्तपुराण’ हे अस्सल देशी महाकाव्य त्यांनी महाराष्ट्रात उजेडात आणले. ‘क्रिस्तपुराणा’ची रचना फादर थॉमस स्टीफन्स या मूळच्या इंग्रज येशूसंघीय धर्मगुरूंनी 1616 साली केली. मात्र त्याकाळात गोव्यात देवनागरी मुद्रणकला विकसित झाली नसल्याने त्यांना ते छापावे लागले.. रोमन लिपीत असल्याने मराठी सारस्वताचे या अभिजात वाङ्मयाकडे तीन शतके लक्षच गेले नाही.
आर्चबिशप डोरिंग यांनी या महाकाव्याचा अभ्यास केला व या साहित्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी या पुराणातील येशू ख्रिस्ताच्या चरित्रावर आधारित काही भागांचे देवनागरीत लिप्यांतर करून त्यांच्या तीन पुस्तिका प्रकाशित केल्या. अशाप्रकारे मराठी भाषेत असूनही रोमन लिपीमुळे मराठी भाषिकांपासून दुरावलेल्या या महाकाव्याचा निदान काही भाग तरी आर्चबिशप डोरिंग यांच्यामुळे प्रथमतःच मराठी भाषिकांना प्राप्त झाला. हे संपूर्ण महाकाव्य 1956 साली शांताराम बंडेलू यांनी देवनागरीत आणून य. गो. जोशी यांच्या प्रसाद प्रकाशनाने प्रकाशित केले.
मराठीत साहित्यसंपदा असणारे आजचे पुण्याचे बिशप थॉमस डाबरे हे आर्चबिशप हेन्री डोरिंग यांचे उत्तराधिकारी आहेत. फादर भाऊसाहेब संसारे हे `निरोप्या'चे विद्यमान संपादक आहेत


1949 मध्ये वृद्धत्वामुळे आर्चबिशप डोरिंग यांनी निवृत्ती स्वीकारली आणि त्यांच्या जागी अँड्र्यू डिसोझा या धर्मगुरूंनी पुण्याचे पहिले भारतीय बिशप म्हणून सूत्रे हाती घेतली. ‘निरोप्या’तून शेवटचे बोधपत्र लिहून या मेंढपाळाने आपल्या कळपाचा निरोप घेतला. ‘निरोप्या’च्या अंकात प्रसिद्ध झालेले हे बोधपत्र पुढीलप्रमाणे आहे.
‘येशू ख्रिस्तामध्ये अतिप्रिय लेकरांनो, ईश्वराने तुम्हांस पुष्कळ वर्षे माझ्या हवाली केले, तरी आता तुम्हांस माझा शेवटचा सलाम सांगण्याची वेळ आली. 42 वर्षांपूर्वी 10वे प्रिय परमगुरुस्वामी यांनी मला पुण्याचे महागुरू म्हणून नेमिले आणि बायदरलीदन बिशपच्या जागी मला पुणे धर्मप्रांताचा अधिकार दिला.
सात वर्षे माझ्या कळपामध्ये शांतीने काम करता आले. मग पहिले महायुद्ध सुरू झाले, त्यावेळी मी परमगुरुस्वामींची भेेट घ्यायला रोम शहरी गेलो होतो. पुण्याला परत जाण्याचे माझे सर्व प्रयत्न व्यर्थ निघाले. मला माझ्या प्रिय लेकरांपासून लांब राहणे भाग पडले.
युद्ध संपल्यावर परमगुरुस्वामींनी मला जपान देशाला पाठविले. हिरोशिमा शहराचे अपोस्तोलिक व्हिकर म्हणून त्यांनी मला नेमिले. शेवटी 1927 साली ब्रिटिश सरकारने मला पुण्याला परत जाण्याची परवानगी दिली. तेव्हापासून मी पुन्हा तुम्हांमध्ये राहात होतो.
दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा नवीन अडचण व त्रास उत्पन्न झाला. काही तरुण फादर, जर्मन नागरिक असल्याकारणाने, त्यांस सरकारने कैद्यांच्या छावणीत ठेवले आणि बिशपचा व्यवहारदेखील जरा कठीण झाला. या अवघड दिवसात विश्वासी आणि फादर लोकांचा विश्वासूपणा, प्रेम ही मला मोठ्या समाधानाची व शक्तीची कारणे होती. त्यांची आस्था आणि साहाय्य शेवटपर्यंत उपकारी मनाने मी विसरणार नाही.
युद्ध संपल्यावर माझ्या वृद्धपणाचा परिणाम अधिकाधिक मजवर झाला. प्रवास करणे मला कठीण झाल्यामुळे सर्व मिशनस्थानांची भेट वेळोवेळी घेता आली नाही. म्हणून माझ्यापासून हे भारी ओझे काढण्यास आणि उत्साही खांद्यावर ठेवण्यास परमगुरुस्वामींची विनंती करण्यास मला योग्य वाटले. त्यांनी माझी विनंती मान्य करून अंद्रू डिसोजा फादर यांस माझ्या जागी महागुरू म्हणून नेमले. त्यांची दीक्षा 24 ऑगस्टला झाली आणि या दिवसापासून ते महागुरूचा अधिकार चालवू लागले. ते तुमची चांगली काळजी घेतील.
म्हणून माझ्या प्रिय लेकरांनो, मी तुम्हास माझा शेवटचा बोध करितो. तुम्ही विश्वासात स्थिर राहून आपल्या विश्वासाप्रमाणे वर्तन करा. तुमच्यापुढे नवीन संकटे आहेत. येशूच्या हृदयाची आणि प.मारियेच्या निष्कलंक हृदयाची भक्ती बाळगत जा. ती तुमची रक्षण करतील. तुमच्या नवीन महागुरुस्वामींसाठी आणि माझ्यासाठी प्रार्थना करा. मी तुम्हांसाठी रोजरोज प्रार्थना करीत जाईन, अशी खातरी मी तुम्हाला देतो. ईश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो.”
                                                                                                                    - हेन्री आर्चबिशप

निवृत्तीनंतर 17 डिसेंबर 1951 रोजी आर्चबिशप डोरिंग यांचे निधन झाले. पुण्यातील सेंट पॅट्रिक कॅथेड्रलमध्ये त्यांची समाधी आहे. जर्मनीतून महाराष्ट्रात येऊन मराठी भाषा शिकून, स्थानिक निरक्षर आणि अर्धशिक्षित ख्रिस्ती समाजाला ज्ञानार्जन करणारे आर्चबिशप डोरिंग हे आज विस्मृतीत गेले असले तरी ‘निरोप्या’च्या रूपाने त्यांचे स्मारक त्यांच्या कळपाच्या भेटीस आजही दर महिन्याला नियमाने येत आहे.


( ख्रिस्ती मिशनरींचे योगदान- कामिल पारखे (वितरण सुगावा प्रकाशक) मधील एक प्रकरण )

Wednesday, January 20, 2021

`टाइम्स ऑफ इंडिया'तली पान एकची पहिली बायलाईन

 `टाइम्स ऑफ इंडिया'तली पान एकची पहिली बायलाईन

टाइम्स ऑफ इंडियाने २००० साली पुण्यात नव्यानेच स्वतंत्र आवृत्ती सुरु केल्यानंतर तेथे महाराष्ट्र पानाची जबाबदारी सांभाळण्यासाठी `इंडियन एक्सप्रेस'मधून माझी निवड करण्यात आली होती. पत्रकारितेतील माझा मित्र अभय वैद्य आणि निवासी संपादक शेरना गांधी यांनी माझी यासाठी निवड केली होती. अहमदनगर जिल्हा म्हणजे अहमदनगर, शिर्डी आणि श्रीरामपूर वगैरे परिसरात आणि सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत पोहोचणाऱ्या या खास म्हाफुसिल आवृत्तीतील महाराष्ट्र पान असलेल्या पान दोनला सर्व मजकूर पुरवण्याची माझी जबाबदारी होती.
टाइम्स ऑफ इंडिया'च्या जुळ्या भावंडाच्या म्हणजे `महाराष्ट्र टाइम्स'च्या पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक बातमीदारांनी फॅक्सवर पाठवलेल्या मराठी बातम्यांचे मी भाषांतर करुन आणि वृत्तसंस्थांच्या बातम्यांनी हे पूर्ण पान भरले जायचे. सांगलीचे रविंद्र दफतरदार, कोल्हापुरचे प्रभाकर कुलकर्णी, सोलापूरचे रजनीश जोशी आणि शिर्डीचे ताराचंद म्हस्के यांच्याकडून रोज बातम्यांचा रतीब यायचा. अधूनमधून मी स्वतंत्र म्हणजे माझ्या बायलाईनच्या बातम्याही लिहित असायचो.
तर त्यादिवशी मी माझा एक मजकूर न्यूज डेस्ककडे सोपवून झाल्यावर ''पान दोनसाठी एडिटिंग करण्यासाठी अजूनही काहीच स्टोऱ्या नाही'' असे आपले दोन्ही हात वर उंचावून उपसंपादक संजय पेंडसे याने मोठ्याने सांगितले. मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले असता माझा तो मजकूर आतल्या पानासाठी नसून पान एकच्या अँकरची ती बातमी आहे असे तो म्हणाला.
''बातमीचा पहिला पॅरा वाचताच ती पान एकचे मॅटर आहे हे कळाले , इट इज अ पेज वन मटेरियल ! पण एडिट मिटिंगमध्ये काय होते ते पाहू,'' असे तो म्ह्टल्यावर पान दोनसाठी मी दुसरे मजकूर तयार करू लागलो.
पत्रकारितेत तोपर्यंत जवळजवळ मी एक तप घालवलेले असल्याने मी मनातल्या मनात संजय पेंडसेच्या न्यूज सेन्सबद्दल कौतुक केले.
आणि अखेर संजय म्हणाला होता तसेच झाले. 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये दाखल झाल्यानंतर पान एकवर प्रसिद्ध झालेली माझी ती पहिली बातमी.
त्याकाळात टाइम्स ऑफ इंडियात डेस्कवर काम करणाऱ्या उपसंपादकाने व इतरांनी पान एकसाठी बायलाईनची बातमी लिहिल्यास उत्तेजनार्थ वाढिव दिडशे रुपये पगारासोबत मिळायचे. शिवाय फोटोसाठी पन्नास रुपये वेगळे ! या वाढिव मानधनाऐवजी टाइम्स ऑफ इंडिया'च्या पान एकवर बायलाईनची बातमी छापून येण्याचे अधिक अप्रूप होते.
काय होती ती पान एकची बातमी ? आणि त्या बातमीचा इंट्रो ?
Marathi monthly Niropya enters 100th year
Camil Parkhe,TNN | Dec 26, 2002, 10.37 PM IST
''पुणे: एका जर्मन जेसुईट फादरांनी अहमदनगर जिल्ह्यातील एका आडवळणाच्या खेड्यात - राहुरीजवळच्या केंदळ -वळण या गावात - १९०३ साली सुरु केलेल्या मराठी मासिकाने 'निरोप्या'ने आज मराठी नियतकालिकांत एक वैशिष्ठपूर्ण स्थान मिळविले आहे. पुणे शहरातून प्रकाशित होत असलेले हे मासिक शतक पूर्ण केलेल्या मराठीतील काही अगदी मोजक्या नियतकालिकांपैकी आहे.
या मासिकाचे संस्थापक-संपादक फादर हेन्री डोरींग यांची नंतर पुण्याचे बिशप आणि काही काळ जपानमधील हिरोशिमा शहरात व्हिकर अपोस्तोलिक म्हणून नेमणूक झाली होती.''
टाइम्स ऑफ इंडियाच्या पुणे आवृत्तीत २६ डिसेंबर २००२च्या अंकात म्हणजे ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी ही बातमी प्रसिद्ध झाली. टाइम्सच्या आर्किव्हमधून आजही ही बातमी वाचता येते.
या बातमीबरोबर बिशपमहोदयांचा अर्धा कॉलम रंगीत फोटोही छापण्यात आला होता. टाइम्स ऑफ इंडियाने पान एक आणि शेवटचे पान रंगीत छापण्यास त्यावेळी नुकतीच सुरुवात केली होती.
( माझ्या इतर बायलाईनच्या अनेक बातम्यांप्रमाणे याही बातमीचे कात्रण मी आजही जपून ठेवले आहे. इतरांच्या दृष्टीने ही जीर्ण झालेली कात्रणे तद्दन रद्दी असली तरी फ्लॅटच्या माळ्यावर मी ती ठेवली आहेत. )
वृत्तपत्रीय जगतात विविध पानांच्या पानांच्या वेगवेगळ्या ढंगात लिहिल्या जातात. त्यातही कुठली बातमी आपल्या वाचकांना आवडेल याचे काही खास निकष असतात. उदाहरणार्थ, व्हॅलेंटाईन डे निमित्त पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात होणाऱ्या गुलाबाच्या उत्पादनाची आणि युरोपला निर्यात होणाऱ्या फुलांच्या मी दिलेल्या बातम्या दरवर्षी महाराष्ट्र हेराल्ड- नंतर सकाळ टाइम्स या इंग्रजी दैनिकात कायम पान एकवर अँकर म्हणून वापरल्या जातात. या काळात दैनिकाचे संपादक बदलले तरी व्हॅलेंटाईन डे च्या विशिष्ट शैलीत लिहिलेल्या ह्या बातम्या पान एकवरच अँकरच्या जागा पटकावत असत !
टाइम्स ऑफ इंडिया'त त्या दिवशी पान एकवर छापून आलेल्या माझ्या त्या पहिल्या बायलाईनचे कारण म्हणजे जर्मन असलेल्या बिशप डोरींग यांचे मराठी पत्रकारितेतील आणि मराठी भाषेतील महत्त्वाचे योगदान.
'निरोप्या' या मासिकाने मराठीतल्या अजूनही हयात असलेल्या नियतकालिकांत अगदी वरचा क्रमांक मिळवलेला आहे. मराठी पत्रकारितेचा इतिहास १८३२ साली बाळशास्त्री जांभेकरांनी सुरु केलेल्या `दर्पण' पासून सुरु होतो. त्यानंतर सुरु झालेली अनेक मराठी नियतकालिके अल्पजीवी ठरली. शतकायुषी असून आजही प्रसिद्ध होणाऱ्या काही मोजक्या मराठी नियतकालिकांत १८८१ सालापासून लोकमान्य टिळकांच्या 'केसरी' चा समावेश होतो. मात्र यापैकी बहुतेक नियतकालिके ऑक्सिजन वा व्हेंटिलेटरवर तग धरुन आहेत.
वजनाने नेहेमीपेक्षा अधिक जाडजुड असलेला डिसेंबरच्या नाताळ विशेषांकानंतर आता प्रसिद्ध झालेला निरोप्या' जानेवारी २०२१ चा अंक पाहायला हवा. रंगीत जाहिरातीची तब्बल बारा पाने असलेला एकुण ४४ पानांचा अंक पाहिला तर या मासिकाला वाचकांपासून मिळणाऱ्या प्रतिसादासंबंधी ठोकताळे बांधणे शक्य आहे.
स्थापनेपासून म्हणजे १९०३ पासून 'निरोप्या' हे मासिक सोसायटी ऑफ जिझस (जेसुईट्स) वा येशूसंघीय फादरांच्या संस्थेतर्फे चालविले जाते. पुण्याचे दुसरे बिशप म्हणून डोरींग यांची १९०७ साली नेमणूक झाल्यावर हे मासिक पुण्यातून प्रसिद्ध होऊ लागले. पोपमहाशयांना भेटण्यासाठी बिशप डोरींग रोमला गेले आणि पहिले महायुद्ध सुरु झाले. ते जर्मन असल्यामुळे ब्रिटिश भारतात त्यांचे परतणे अवघड झाले. कारण जर्मनी व इंग्लंड ही शत्रुराष्ट्रे होती. याकाळात डोरींग यांची जपानमध्ये हिरोशिमाचे आर्चबिशप पदावर व्हिकर अपोस्तोलिक म्हणून नेमणूक झाली. त्यांच्या अनुपस्थितीत `निरोप्या'चे प्रकाशन थांबले.
महायुद्धाच्या समाप्तीनंतर डोरींग आपल्या कर्मभूमीत पुण्याला १९२६ साली परतले. आर्चबिशप डोरींग यांनी याकाळात बंद पडलेल्या आणि आपले अपत्य असलेल्या ‘निरोप्या’ मासिकाचे १९२७ साली पुनरुज्जीवन केलं. तेव्हापासून आजतागायत ‘निरोप्या’चं प्रकाशन (अलिकडचा कोरोना काळाचा अपवाद वगळता) अखंडितपणे चालू आहे.
.
ब्रिटिश जेसुईट फादर थॉमस स्टीफन्स लिखित महाकाव्य 'ख्रिस्तपुराण' हे मराठीतील पहिलेवहिले मुद्रित साहित्य. हे मराठी महाकाव्य पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोव्यात १६०४ साली रोमन लिपीत छापले गेले, कारण त्यावेळी देवनागरी छपाई साठी लागणारे तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. या 'ख्रिस्तपुराणा'तील काही भाग रोमन लिपीतून देवनागरी लिपीत छापण्याचे श्रेय आर्चबिशप डोरींग यांच्याकडेच जाते.
मात्र संपूर्ण ख्रिस्तपुराण रोमन लिपीतून देवनागरीत आणण्यास १९५६ साल उजाडले. लिप्यांतराचे हे महत्त्वाचे काम अहमदनगरच्या प्राध्यापकशांताराम बंडेलू यांनी आणि पुण्याच्या य. गो. जोशींच्या प्रसाद प्रकाशनाने केले.
निवृत्त आर्चबिशप डोरींग यांचे निधन १९५१ साली वयाच्या ९४ व्या वर्षी झाले. त्यांची कबर वा समाधी पुण्यातील सेंट पॅट्रिक कॅथेड्रलच्या अल्तारापाशी म्हणजे वेदीपाशी आजही आहे. चर्च किंवा कॅथेड्रल मध्ये समाधीचा हा मान हा फक्त बिशप, कार्डिनल अशा वरीष्ठ धर्माचार्यांनाच मिळतो.
त्यांच्या समाधीवरील शिलालेख आर्चबिशपांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीविषयी बोलतो. परंतु,`निरोप्या'चे संस्थापक-संपादक म्हणून अथवा मराठी पत्रकारितेतील त्यांच्या योगदानाबद्द्ल ह्या शिलालेखात उल्लेख नाही.
मी लिहिलेल्या `ख्रिस्ती मिशनरीचे योगदान' या मराठी (सुगावा प्रकाशन ) आणि इंग्रजी (गुजरात साहित्य प्रकाश - २००३) या पुस्तकात आर्चबिशप हेन्री डोरींग यांच्यावर एक प्रकरण आहे.
( निरोप्या'विषयी मला विशेष आत्मियता असण्याचे एक कारण म्हणजे माझा पहिला लेख आणि पहिली बायलाईन याच मासिकात १९७० च्या दशकात मी श्रीरामपुरात शाळेत शिकत असताना प्रसिद्ध झाली. त्यावेळी पत्रकार म्हणून लिखाण हाच माझा व्यवसाय असेल याची कल्पनाही केली नव्हती. )

Friday, April 26, 2013

Catholic Marathi monthly turns 110 years old


Magazine published from Pune turns 110
- ST Correspondent
Monday, 22 April 2013 - 10:39 AM IST

PUNE: ‘Niropya’, a Marathi monthly started by the German Jesuit priest Fr Henry Doering in 1903, has completed 110 years this month. The monthly published from ‘Snehsadan’ in the city, is incidentally among the handful of Marathi periodicals which have crossed the century mark.
‘Niropya’ (messenger) was launched by Fr Doering in Walan-Kendal village in Ahmednagar district in April 1903. The founder editor of the magazine was appointed as the second bishop of Pune Catholic Diocese in 1907.
During the first World War, the British government had banned the return of Bishop Doering, a German national, from Rome to India and subsequently, the Vatican had posted him as the Vicar Apostolic of Hiroshima in Japan.
During the turbulent war period, when German missionaries working in India were either incarcerated or deported, the publication of ‘Niropya’ came to a halt. After the cessation of the hostilities, Doering returned to Pune as an archbishop in 1926 and restarted publication of the ‘Niropya’, a year later.
Archbishop Doering who died at the age of 92 in 1951 was interred near the altar of St Patrick’s Cathedral in the city.
The place of the publication of the monthly has often changed, depending on the location of its editor. Since past ten years, it is being published from Pune. Most of the subscribers of this monthly are its third, fourth and sometimes, fifth generation readers. The monthly is published by a trust run by the Jesuits. Significantly, the 110-year-old Marathi monthly was edited by European Jesuits for over six decades, till 1971.
Fr Joe Gaikwad, the present editor of ‘Niropya’, said the monthly has been catering to its readers in keeping with the changing times and it carries articles and news on various social issues. It has nearly 4000 subscribers in various parts of the state.
The history of Marathi journalism began with the publication of ‘Darpan’, a periodical launched by Balshastri Jambhekar in 1832. ‘Dnyanodaya,’ a monthly published by another Christian trust from Pune, is incidentally the oldest surviving Marathi periodical. It was established in 1842.

Photo Gallery
Comment
David Sampat Kadam - Tuesday, 23 April 2013 - 12:48 PM IST
Congratulations!!!!! to the Editor and the people who are contributing articles for Niropya....The oldest magazine in India...We can also take the Social Issues and contribute the lot of aricles on WATER Conservation and the work done by Social centers in Ahemadnagar District ....and activate thier activities in this area......along with religious articles......Wishing You All The Best!!!!!
Fr.Joe Gaikwad,s.j. - Monday, 22 April 2013 - 05:39 PM IST
Thanks Camil for rembering 110 years of Niropya and publishing it in Sakal times.
Dr. Ajit LOKHANDE - Monday, 22 April 2013 - 04:02 PM IST
As far as I know, Monsignor Reginald Gonsalves, AN INDIAN, took over as the editor of Niropya in 1951. In 1926 Henry Doering returned to Pune (not as Archbishop but) with the title of "Archbishop" and continued as Bishop of the Pune diocese. Hence the appellation "Archbishop-Bishop Henry Doering".
Add new comment

Sunday, September 25, 2011

Editor, missionary Archbishop Henry Doering




A young German Jesuit, Fr Henry Doering, launched a Marathi monthly ‘Niropya’ in April 1903 from a village Kendal-Valan in Rahuri tehsil of Ahmednagar district in April 1903. This magazine presently published from Pune has recently celebrated 100 years of its existence. Significantly, this Catholic magazine is among the only three Marathi periodicals, which have survived for over a century.
Balshastri Jambhekar who launched Darpan (mirror) periodical in 1832 is credited with laying the foundation of Marathi journalism. Thereafter many periodicals were launched in Marathi. Over a period of time, a majority of these periodicals have ceased to exist.
Dnyanoday; a periodical launched by the American Marathi Mission, a Protestant congregation, in 1842 has already completed 150 years of existence and is the oldest surviving Marathi publication. It is still being published from Ahmednagar. The daily ‘Kesari’ was launched by Lokmanya Bal Gangadhar Tilak and veteran social reformer Gopal Ganesh Agarkar on 4 January 1881. This 125-year-old newspaper is still published from Pune. The centurion 'Niropya’ ranks third in the list of longest surviving publications in Marathi language.
It is indeed creditable that a Marathi publication launched by a German Jesuit is among a handful of publications, which have managed to survive despite various problems faced by it. In fact, 'Niropya' too had faced the prospect of wounding up its publication during the First World War hostilities when the British government asked Bishop Doering and other German missionaries, citizens of their enemy nation to leave India. But the magazine, which could not be published for a decade, breathed a fresh lease of life soon after the German missionaries were allowed to return to India. Now the magazine has become a mouthpiece of the Marathi-speaking Christians, a majority of whom was brought to the fold of Christianity by the missionaries during the last 110 years.
The Marathi-speaking Christians - Catholics and in the recent years, Protestants too - from various parts of the country wait eagerly for this magazine that fulfils their spiritual need, besides providing information about various social and other events in their community.
Fr Doering was indeed a missionary with a vision who established this periodical at the beginning of the 20th century to cater to the semi-educated, economically backward neo-Christians in Ahmednagar district. The German Jesuits had started their evangelical activities in this district in1887. A majority of the converts to Christianity belonged to the untouchable Mahar caste, which is presently included in the Scheduled Caste category.
Henry Doering was born in Bocholt in Germany, on 13 September 1859. He was ordained a priest in 1882 and arrived at Kendal-Valan in Ahmednagar district in 1895. The twin villages Kendal and Valan, located on the banks of Pravara river, are very significant for the Marathi-speaking Catholics. This was the place where the priests belonging to the Jesuit German province, had first launched their evangelical mission in rural Maharashtra. A group of persons were baptised by the Catholic priests here in 1887. Gradually Christianity was embraced by people from neighbouring villages and districts. Today, there are a large number of Christians in Ahmednagar, Aurangabad, Nashik, Beed and Pune districts. A few years ago, the Catholic community from these districts celebrated the centenary of their conversion.
The Jesuits had just launched their missionary work in Ahmednagar district when Fr. Doering arrived in Kendal-Valan. Many untouchables were getting converted to Christianity but the conversion did not bring any changes in their social and economical conditions. The Jesuits established primary schools to educate these converts as well as others. Education was considered important to improve the lot of the local community.
Fr. Doering, like other German missionaries, learnt the local Marathi language to preach Christianity to the locals. It is indeed noteworthy that after learning Marathi, these missionaries also wrote books in Marathi to impart religious education to the converts.
It seems that some missionaries had already written books in Marathi on religious education, even before the arrival of Fr Doering arrived in Kendal. The honour of being the first Marathi religious book of Catholics goes to a book entitled ‘Lahan Catechism (Small Catechism).
Although the book does not carry the author's name, according to research scholar Fr. (Dr.) Christopher Shelke, the author of the book must have been Fr. Dalling who was based in Kendal. Fr. Shelke who hails from Ahmednagar district and is now working as a professor of comparative theology at the Pontifical Gregorian University in Rome has completed research on the history of the Jesuit mission in Ahmednagar district. He had published a series of articles based on this research in Niropya monthly in late 1970s. Fr. Shelke has written that when Fr Doering settled in Kendal -Valan, he found that a Marathi religious book entitled ‘Subhaktisar’ was the most popular amongst local people.
‘Subhaktisar’ was written and published in 1895 by Fr. Francis X. Trenkamp who had come to Kendal in mid-1892 that is before Fr. Doering. Fr. Trenkamp had studied Marathi well. Instead of adopting the literary style used by the writers based in Mumbai and Pune, Fr. Trenkamp used the dialect prevalent in Ahmednagar district for writing his book. The local Catholics who had recently acquired the writing and reading skills used this book to understand the tenets of their new religion. The other Jesuit priests also used the book for saying prayers during celebration of the holy mass.
Fr. Doering had to depend on the available catechism book in Marathi to continue his evangelical activities. During those days, the missionaries traveled to long distance villages on horsebacks or tongas to preach Christianity and to help the local people in various ways. There were no religious books in Marathi, which could be used for teaching the principles and doctrines of Christianity to the converts. Therefore, Fr Doering felt the need of creating religious literature in Marathi. Due to non-availability of such literature, priests and catechists were finding it difficult to preach Christianity to children and the adults.
Fr. Doering decided to start a magazine to overcome this problem. The superiors of Society of Jesus agreed to provide financial aid for this venture. Fr Doering published the first issue of the magazine titled ‘Yeshuchya Atipavitra Hrudayacha Niropya’ (Messenger of the Sacred Heart of Jesus) in April 1903.
Since then, with an exception of a few years during the First World War, ‘Niropya’ is being published regularly till date. The Society of Jesus owns and publishes the periodical. Jesuits priests have shouldered the responsibility of editing the magazine for the past 100 years, barring a brief span when a diocesan priest edited it.
After launching ‘Niropya’, Fr Doering started improving his Marathi vocabulary for his contribution to the magazine. He learnt dialect of people from Ahmednagar district and also specific terms and concepts used in Hindu religious literature. He started using these and making the magazine more and more user- friendly for the neo-Christians.
Fr Doering was the main contributor writer of the magazine he edited. Initially ‘Niropya’ used to be printed at the ‘'Examiner’ press in Bombay. The first issue of ‘Niropya’ was of 10 pages and there were five brief articles. The articles were entitled - ‘The theme of prayer’, ‘To be an alter server’, ‘The feast of Pope Leo XIII, ‘Let thy kingdom come’, and ‘A martyr’.
The founder-editor of ‘Niropya’ stayed at Kendal, a remote village in Ahmednagar district, whereas the magazine was being published from Mumbai. Therefore, the editor had to take pains to maintain the deadline of the magazine's publication. From the available records, it appears that the fourth issue of the monthly was in a manuscript form. Although, the reason for not printing the issue is not clear, it definitely indicates that Fr. Doering was very particular about publishing the issue in time.
The periodical carried articles about developments in the Christian world and also biographies of Christian saints. Apart from this, the translation of the famous Latin classical book ‘Imitotio Christi’ (Imitation of Christ) was serially published in the magazine. Its three chapters were published in ‘Niropya’ under the title ‘Kristanuvartan’.
The small magazine reached at the doorsteps of the Catholics in Ahmednagar district every month. About 100 years ago there were few newspapers and magazines and these periodicals catered only to a select upper sections of society. Under such circumstances, ‘Niropya’ must have played an important role in the lives of its readers.
Fr. Doering was consecrated the second bishop of Pune diocese on December 8, 1907. The Pune diocese then included Pune, Ahmednagar, Nashik, Kolhapur, Solapur, Ratnagiri, Satara, Sangli and Sindhudurg revenue districts. Presently these areas come under Pune, Nashik and Sindhudurg dioceses. After his elevation as bishop, Doering’s responsibilities increased many fold, but he did not desert his brainchild, ‘Niropya’. After Doering took over as bishop in Pune, the place of Niropya's publication too was shifted to Pune.
Bishop Doering was in Rome when the First World War broke out in 1914. The British government refused permission to Bishop Doering to return to India as he, being a German, was a citizen of their enemy nation. Therefore, the pope appointed him as vicar apostolic of Hiroshima diocese in Japan on 16 June 1921. After being shunted out of India, Bishop Doering must have felt strong desire to return to this country, which he had chosen for his mission.
When the British permitted the German missionaries to return to India to resume their missionary work, Bishop Doering once again opted to return to Pune. He was once again appointed to head the Pune diocese on July 14, 1927. However he was allowed to retain ‘archbishop’ as personal title although Pune was not an archdiocese.
After returning to Pune, within six months Archbishop Doering resumed publication of ‘Niropya’ magazine with renewed enthusiasm. Fr. Shelke has described the incident as - ‘Niropya’ too was resurrected like its Lord, Jesus Christ ’.
For the past 100 years, Niropya has offered its services to its readers at a very reasonable price. The annual subscription for the magazine was Rs. 3 only in 1981. In 2007, this magazine with 36 pages and a colourful cover had an annual subscription of Rs 60 only.
Archbishop Doering’s Niropya has not only inculcated the reading habit among the Marathi-speaking Christians but has also contributed by way of producing generations of writers and poets in the community. Niropya has provided a very useful forum to budding Catholic and Protestants writers, who later earned a big name in Marathi literature. Some of the veteran littérateurs contributing articles to this magazine included Satyavan Namdeo Suryavanshi, Fr. Francis D'Britto and poet Vishwaskumar. The author of this book, who is now a fulltime journalist, got his first literary piece published for the first time in Niropya only. There are many Christian families in various districts of Maharashtra who have been the second, third of fourth generation readers of this magazine.
The Jesuits belonging to Pune, Bombay, Goa and Gujarat celebrated the 150th year of their mission and arrival of the German and Swiss provinces in West India arrival in 2004. A souvenir, titled Reise (yatra), released on the occasion carried a brief note on Niropya, and highlighted its contribution to the Marathi-speaking Christians.
The founder of Niropya Archbishop Doering has also contributed to Marathi literature in yet another great way. ‘Kristapuran’, an epic composed in Marathi by British Jesuit Fr. Thomas Stephens in the Portuguese-controlled Goa in the 17th century was brought to the notice of Marathi readers in Maharashtra by archbishop Doering. ‘Kristapuran’ was printed in Roman script since the technology for printing in Devanagari script was not developed in Goa then. For good three centuries, the existence of this epic had remained unknown to Marathi readers, as it was in Roman script and read widely only in Goa, which was, then under the Portuguese control.
Archbishop Doering studied the epic, understood the importance of the literature and published some parts based on Jesus’ biography from the epic in the form of three booklets after transcripting them into Devanagari. Thus the epic came to the notice of Marathi scholars in Maharashtra. The whole epic was later transcripted and edited by Shantaram Bandelu.
In 1949, Archbishop Doering opted for retirement due to old age. Fr Andrew D’Souza then took charge as the first Indian bishop of Pune diocese. Doering wrote his last pastoral letter in Niropya to bid adieu to the flock he had led for almost half a century. The letter is as follows: -
‘My dear children in Jesus Christ, the Lord had put you under my care for several years. But now the time has come for me to say goodbye to you. Pope Pious X had appointed me as bishop of Pune some 42 years ago as a successor to bishop Bernard Bieder-Linden (SJ).
For seven years I could work in peace for my people. When I had gone to Rome to meet the Pope, the First World War broke out and all my efforts to return to Pune went in vain and I was compelled to remain away from my beloved folk.
After the end of the war, the Pope sent me to Japan. He appointed me as Apostolic Vicar of Hiroshima city there. At last in 1927, the British government permitted me to return to Pune and since then I have been staying amongst you all.
As the Second World War broke out, new problems, new troubles started. The government had incarcerated some young priests because they were Germans. This posed several problems for the bishop to carry out his mission. During those difficult days, I derived strength and satisfaction from the confidence and love given by the faithful and priests. I will always remember their concern and help.
Therefore my dear children, this is my last homily to you. Remain steady in your faith and behave accordingly. You will have to face some new problems. Have devotion towards Sacred Heart of Jesus and immaculate heart of Mother Mary. This devotion will protect you. Pray for your new bishop and for me. I assure you that I would pray for you all everyday. May god bless you!'
-Henry Archbishop
Archbishop Doering passed away on 17 December 1951. Like his predecessor, he was interred in St Patrick’s Cathedral in Pune. Archbishop Doering who came to Maharashtra from Germany and took spiritual care of his flock for so many years now may have gone into oblivion. But Niropya founded by him continues to visit his flock every month, keeping alive memory of its founder and a great visionary missionary.

References: -
1. ‘Khristi Sahitya Aani Niropya ‘(Series of articles on the Jesuit mission in Ahmednagar district) Writer – Fr. Christopher Shelke, Niropya monthly, August 1978, Editor – Fr. Prabhudhar (S.J.), Rosary Church, Ajra, District Kolhapur, - 416 505.
2. ‘Khristi Marathi Vangmay -Fr Stephens te 1960 Akher’ (Marathi Christian literature - Since Fr Thomas Stephens to 1960 A D) Author - Dr. Gangadhar Narayan Morje, Publisher- Ahmednagar College, Ahmednagar, and Snehasadan, Shanivar Peth, Pune, 411 030, Distributors - Vidarbha Marathwada Book Company, 1334, Shukrawar Peth, Pune -2 (1984).
3. 'Marathi Khristi Niyatkalike, 1800 te 1950’, (Marathi Christian periodicals- From 1800 to 1950)), Author Bhaskar Jadhav, Publishers - Vijaya Punekar, Maharashtra Khristi Sahitya Parishad, Pune (1981)
4. A note by the publisher, Ramdas Bhatkal, of ‘Kristapuran’ (Marathi) edited by Fr. Caridrad Drago (S.J.), Publishers - Ramdas Bhatkal, Popular Prakashan, 35 C, Pt. Madan Malaviya Marg, Tardeo, Mumbai 411 034, First Shreyas edition (1996-97)
5. Archbishop Doering's last letter to his flock, Niropya monthly September 1949