Showing posts with label christian. Show all posts
Showing posts with label christian. Show all posts

Sunday, April 23, 2023

 

Christian missionaries, another perspective

0
13

FREDERICK NORONHA

At a time when religion has become a tool for political mobilisation, and mainly a means of spreading hatred, former Navhind Times journalist Camil Parkhe has taken on an interesting project. Not an easy one at that.

His 184-page ‘Contribution of Christian Missionaries in India’ (Gujarat Sahitya Prakashan, 2007) does just that. It highlights the profiles of 19 individuals who played a role in this nation. They come from different backgrounds, time periods and denominations of Christianity.

For instance, Pandita Ramabai (Rama Dongre, 1858-1922), the Indian social reformer who converted to Christianity, was a Sanskrit scholar, and worked for child widows. She campaigned for female education, was an early member of the Indian National Congress, taught the blind, and translated the Bible.

Thomas Stephens, SJ, (c.1549–1619) the Jesuit priest has a Konkani institution named after him at Porvorim. Born in the mid-16th century, he wrote the first book to be printed in Marathi. He wrote the first European-crafted or printed Indian grammar (‘Arte de lingoa Canarim’, 1640). His Konkani Cathecism ‘Doutrina Cristam’ was the second printed in any Indian language. His ‘Krista Purana’, a Marathi-Konkani epic poem on the life of Christ in 11,000 stanzas of four verses, was sung up to the 1930s in some areas.

Since these were in the Roman script, Parkhe explains, “therefore, Marathi scholars did not pay any attention to this great literary work” till much later, in the early
20th century.

There are chapters on the Italian Jesuit Robert de Nobili, 1577-1656, (the “father of inculturation in India”). He adopted a lifestyle acceptable to the local people, and tried to set up a Sanskrit-medium seminary of Christian philosophy in 1610.

Fr. Nehemiah Nilakanta Shastri Gore (1825-95), a prominent convert, was considered the “first Marathi missionary”. Satyavan Namdeo Survanshi was a journalist and ‘kirtankar’. He was a bridge builder between Protestants
and Catholics.

Belgian Jesuit Fr. Camille Bulcke, SJ (1909-82), earned a Padma Bhushan award in 1974 for enriching the Hindi language with his research as an indologist. He first published the Angreji-Hindi Koshi (English-Hindi Dictionary) in 1968, with multiple reprints.

Narayan Vaman Tilak (1861-1919) was a poet and missionary. A nationalist too, he was called Phula-Mulanche Kavi (poet of flowers and children). He evolved a new spiritual-cultural movement for the newly-converted Marathi-speaking Christians in Maharashtra.

Mother Teresa, who came to India as a 19-year-old Macedonian-Albanian, needs no elaboration.

Joseph Beschi SJ was a priest and Tamil poet, and also a Jesuit. He knew Tamil, Malayalam, Sanskrit, Telugu, English, French, Portuguese, Italian, Latin, Persian, and Hindi — at least five of these very well. He was an excellent diplomat, and got royal patronage from a local ruler.

Graham Stains is of very recent memory, having been burnt alive while in the service of lepers. Parkhe writes: “Until the brutal burning of the missionary and his two young sons, not many people outside Orissa had heard of Graham Staines or his wife, Gladys. After their killing under the cover of darkness, the whole world came to know about the Staines couple and the service they were rendering.”

Fr. Herman Bacher was a pioneer of rural development. He left his home in the Alps and became Maharashtra’s “pride of the agricultural sector”. He worked out schemes to help the poor — regardless of religion — after Independence. He helped get loans for farmers, dig or repair wells, and provided funds through a cooperative bank. Vocational training, groundwater recharge, and his work in drought-prone areas were what he became known for.

The Barcelona-born priest-historian Henry Heras, SJ, no stranger to Goa, was fascinated with Indian culture and history. For three decades, he researched the history of ancient India, culture, scripts, and sculptures. In 1926, he started the Indian Historical Institute in Bombay with a library of just eight books. Four guns belonging to the Maratha period became the foundation of a museum. His work on Indian Christian art and encouragement to talent like Angelo da Fonseca is well known. Many of his students became reputed historians and
archaeologists.

Baptist missionary Reverend William Carey is known as the father of printing technology in India (outside of the early Portuguese efforts). Valerian Cardinal Gracias was the first Indian Cardinal, and Parkhe credits him as being behind the building of the prestigious St. John’s Medical College in Bengaluru.

1831 Belgaum-born Baba Padmanjee is the first Marathi novelist and a missionary. Manorama Medhavi, the daughter of Pandita Ramabai, a social worker, is also featured. So is the German Jesuit and editor Archbishop Henry Doering, who started a magazine that lasted over a century. Justin Edward Abbot authored 11 books in English and Marathi on the lives and works of medieval Hindu sants of Maharashtra.

An interesting addition is Matthew Lederle SJ, who was conscripted in the Nazi war machine, escaped from a Brit PoW camp, and later became a Jesuit priest in his 20s. He was fascinated by the spiritual works of Sant Dnyandeo and Sant Namdeo. He co-founded Snehasadan Ashram, a centre for inter-religious dialogue in Pune. Fluent in Marathi, he was convinced that “local culture and Christian doctrines and beliefs can be compatible”. He encouraged Indian Christian art; one still hears names like Gemini Roy, Jyoti Sahi, Angelo de Fonseca, Sister Claire, or Sr. Genevieve. His dream was to have at least 100 ashrams run by the Catholic churches in India, which completely blend with the local religion and culture. Lederle became Provincial of the then Goa-Poona Jesuits, headquartered at the time in Panaji but died of a heart attack barely a year later in 1986, while swimming
off Baga.

This book isn’t a recent publication. But given the manner in which religious infighting within India keeps getting stoked, perhaps this point needs to be made. And noticed.

One question that could be raised though is how critical can such a book be. Even more serious a question could be on how does one decide whom to include? Seen one way, Parkhe’s view is from beyond the traditional places associated with Christianity in India. In this case, Maharashtra. Some points and perspectives could be debated though. The claim that Christianity was brought to India by St. Thomas could be just that — a claim. Likewise, accepting how “terrible” the Goa Inquisition was might be another aspect that needs a rethink, considering recent studies on the issue.

“The consistent demonising of Christians, especially the religious personnel commonly and freely referred to as missionaries, may seem to some as unwarranted. Christians in India are a tiny and scattered minority….,”
writes journalist Anosh Malekar in
the book. He argues that the book “is important” not because it talks about religious conflict, or salvation of metaphysics. “It is their disproportionate undertaking… Christians run 25% of India’s voluntary sector. The beneficiaries belong to all castes, creeds, and cults.”

Tuesday, March 14, 2023

                                               Abdul Rehman Antulay

भारताचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग, मुंबईतील दादाभाई नौरोजी, बदद्रुद्दीन तय्यबजी, सर फिरोजशहा मेहता, मुंबईचे माजी महापौर आणि महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री डॉ लिऑन डिसोझा, मुंबईतीलच आमदार एफ एम पिंटो, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अब्दुल रेहमान अंतुले, पुण्याचे माजी महापौर अली सोमजी आणि मोहनसिंग राजपाल, पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आझमभाई पानसरे या नावांमध्ये एक समान गोष्ट आहे.

ती म्हणजे अल्पसंख्य समाजातील असूनसुद्धा या व्यक्तींना लोकांचे - बहुसंख्य समाजाचे - प्रतिनिधित्व करता आले. त्यावेळी त्यांची जात किंवा धर्म आडवे आले नाही.
किंबहुना एके काळी म्हणजे आता लयास गेलेल्या काँग्रेस पक्षाच्या काळात प्रातिनिधिक स्वरूपात का होईना अधूनमधुन अल्पसंख्य समाजातील लोकांना संपूर्ण सर्वसमावेशक समाजाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जायची.
अशा निवडींतून समाजात योग्य तो संदेश पोहोचला जायचा.
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात मुंबईतील परप्रांतीयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्याची प्रथा पडली आहे.
महाराष्ट्रात शिवसेना-भाजपच्या सत्ताकाळात शिवसेनेचे साबिर शेख हे मंत्री होते, नंतरच्या भाजप-शिवसेनेच्या मंत्रिमंडळात मात्र महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मुस्लिम समाजाला राज्याच्या मंत्रिमंडळात पूर्णतः डावलले गेले होते.
ख्रिस्ती समाजातील व्यक्तीला आता राज्याच्या मंत्रीमंडळात जागा मिळण्याची शक्यता अजिबात राहिलेली नाही, अगदी विधानसभेवर निवडून येण्याचीसुद्धा शक्यता राहिलेली नाही. पूर्वी वसईतून एक ख्रिस्ती आमदार हमखास निवडून येई.
गेले ते दिवस.
पण मुस्लिम, ख्रिस्ती, शीख, पारशी व्यक्तींना सर्वसमावेशक समाजाचे प्रतिनिधीत्व करण्याची बात कशाला. ती फार दूरची, असंभवनीय गोष्ट आहे.
सध्या समाजात निम्मी संख्या असलेल्या महिलांना सुद्धा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान नाही.
महाराष्ट्राच्या गेल्या साठ वर्षांच्या इतिहासात एकही महिला मुख्यमंत्री झालेली नाही.
महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !


Thursday, September 8, 2022

 बाबा पदमनजी 

 

मराठी भाषेतील आद्य कादंबरीकार म्हणून बाबा पदमनजी सुपरिचित आहेत. तत्कालीन समाजातील विधवांच्या प्रश्नास वाचा फोडण्यासाठी आणि विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करण्यासाठी 1857 साली ‘यमुनापर्यटन‘ ही कादंबरी लिहून त्यांनी मराठी भाषेत कादंबरी या वाङ्मयप्रकाराचा पाया घातला. 

जवळजवळ सव्वाशे पुस्तके लिहून बाबांनी मराठी साहित्यातील कोश, निबंध, आत्मचरित्र वगैरे वाङ्मयप्रकारांची दालने समृद्घ केली. 
 
बाबा पदमनजी त्या काळातील एक प्रमुख समाजसुधारकही होते. आपल्या साहित्यातून त्यांनी प्रचलित विविध घनिष्ट सामाजिक रीतिरिवाजांवर टीका केली. पेशवाईचा अस्त होऊन ब्रिटिश आमदानीच्या काळात महाराष्ट्रातील समाज जीवनास नवी दिशा देणाऱ्या सामाजिक पुढाऱ्यांमध्ये बाबा पदमनजींचा समावेश होतो.
 
बाबा पदमनजी यांचा जन्म बेळगाव येथे 1831 च्या मे महिन्यात झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाबा पदमनजी मुळे. मात्र त्या काळात प्रचलित असलेल्या प्रथेमुळे त्यांनी आपल्या आडनावाचा वापर केला नाही. बाबा पदमनजी हे कासार जातीचे होते. त्यांचे वडील पदमनजी माणिकजी यांनी दक्षिण कोकणात सब असिस्टंट सर्व्हेअर व बिल्डर म्हणून काम केले होते, नंतर त्यांची बेळगावात बदली झाली. 
 
बेळगावातच लंडन मिशनच्या शाळेत बाबा पदमनजींनी शिक्षण घेतले. 1847 साली वर्षभर त्यांचे एडन येथे वास्तव्य होते. तेथून परल्यानंतर 1849 साली त्यांनी मुंबईतील काळबादेवी गायवाडी येथील फ्री चर्च विद्यालयात प्रवेश घेतला. या विद्यालयात नारायण शेषाद्री हे मूळचे चित्पावन ब्राह्मण समाजातील, पण नंतर ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केलेले शिक्षक शिकवित असत. 
 
या काळातच बाबा पदमनजी यांची हिंदू समाजातील चालीरीतींविषयी, जातिभेदांविषयीची मते बदलत गेली. त्याकाळात अत्यंत गुप्त रीतीने स्थापन झालेल्या परमहंस मंडळीचे ते सभासद बनले. . मात्र त्याकाळात समाजसुधारणांबाबत कर्मठ मंडळींचा कडवा विरोध लक्षात घेऊन परमहंस मंडळीच्या स्थापनेबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात येत असे. 
 
मात्र या मंडळीच्या एका सभासदाने या सभेच्या सदस्यांची यादीच प्रसिद्ध केली. 
 
परमहंस मंडळीच्या सभासदांच्या या यादीने त्याकाळात समाजात मोठी खळबळ निर्माण केली होती. या सभेच्या सदस्यांचा ख्रिस्ती धर्माकडे कल आहे, हे सर्व सभासद लवकरच ख्रिस्ती होणार अशीही वदंता सगळीकडे पसरली.
बाबा पदमनजींच्या वडिलांनी त्यामुळे बाबांना ताबडतोब घरी म्हणजे साताऱ्याजवळील उडतरे गावी बोलावून घेतले. बाबा पदमनजींनी 3 सप्टेंबर 1854 रोजी म्हणजे वयाच्या तेविसाव्या वर्षी बेळगाव येथे बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. 
 
आपण धर्मांतर का केले याची कारणे बाबांनी ‘ज्ञानोदय’ या ख्रिस्ती नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात दिली होती. या धर्मांतराचे वृत्त तत्कालीन अनेक मराठी नियतकालिकांतही प्रसिद्ध झाले.
 
सोळा वर्षे बाबांचे पुण्यात वास्तव्य होते. पुण्यात ते बराच काळ फ्री चर्चच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करत.
बाबा पदमनजींचे महात्मा जोतिबा फुले यांच्याशी चांगले संबंध होते. बाबा पदमनजी हे अनेकदा बी.पी. किंवा बा.प. या आपल्या नावाच्या आद्याक्षरांनी लेख लिहित असत. महात्मा फुल्यांच्या ‘ब्राम्हणाचे कसब’ या पुस्तकाला बाबांनी प्रस्तावना लिहिली होती व प्रस्तावनेखाली बी.पी. अशी सही केली होती. 
 
त्याशिवाय महात्मा फुले यांच्या ‘शिवाजीचा पोवाडा’ या पुस्तकाची प्रूफेही बाबांनी तपासली होती.
 
बाबा पदमनजी त्याकाळात ख्रिस्ती समाजात खूप लोकप्रिय होते असे दिसून येते. त्यांच्या धर्मातरास 40 आणि 50 वर्षे पूर्ण झाली त्यावेळी हा प्रसंग साजरा करण्यासाठी खास समारंभ झाले होते व या समारंभाचे वृत्तान्तही प्रसिद्ध झाले होते.
 
त्यांनी स्वतःही काही नियतकालिकांचे अनेक वर्षे प्रकाशन केले. ‘उदयप्रभा’, ‘सत्यदीपिका (धाकटी), ‘सत्यदीपिका (थोरली)’, सत्यवादी, कुटुंबमित्र आणि ऐक्यदर्शक पत्रिका ही बाबांनी चालविलेली नियतकालिके. 
 
समाजाचे उपेक्षित घटक असणाऱ्या बालविधवा आणि महिलांच्या उन्नतीसाठी महात्मा फुल्यांनी कार्य सुरू केले तेव्हा त्यांना प्रचंड सामाजिक प्रक्षोभास तोंड द्यावे लागले. अशावेळी बाबांनी आपल्या या स्नेह्यास पाठबळ पुरविले.
‘सत्यदीपिका’ नियतकालिक चालविणारे बाबा पदमनजी यांच्यासारखे ख्रिस्ती मिशनरी आणि ` ज्ञानोदय’ सारख्या मिशनरींच्या मुखपत्राने जोतिरावांना नेहमी साहाय्य केले आणि त्यांची कड घेतली, असे ज्येष्ठ संशोधक य. दि. फडके यांनी आपल्या ‘विसाव्या शतकातील महाराष्ट्र (खंड पहिला) या ग्रंथात नमूद केले आहे.
 
मराठी साहित्यातील कादंबरी, शब्दकोश, निबंधसंग्रह, चरित्रे, आत्मचरित्र, मृत्युलेख वगैरे विविध वाङ्मयप्रकारांत मोलाची भर टाकणाऱ्या बाबा पदमनजींना आपल्या या साहित्यकृतींच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध होण्याचे भाग्य लाभले. अर्थात यासाठी त्यांची जाहिरातपद्धती आणि ही पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रभावी पद्धती उपयुक्त ठरल्या. 
 
आपल्या या साहित्यकृती अधिकाधिक वाचकांपर्यंत जाण्यासाठी बाबा प्रकाशनपूर्व सवलीची किंमत, भरपूर जाहिरात वगैरे मार्केटिंग तंत्रांचा कुशलतेने वापर करत. त्यामुळे त्यांच्या हयातीत ‘यमुनापर्यटन‘च्या तीन आवृत्या हातोहात खपल्या. 
 
आपल्या या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीत ही कादंबरी कुणी खरेदी केली याची बाबांनी सरळसरळ यादीच प्रकाशित केली. या यादीमध्ये दादोबा पांडुरंग, जगन्नाथ शंकरशेठ, लोकहितवादी, महात्मा जोतिबा फुले, शेख दाऊद गुलाम महंमद, शिक्षणतज्ज्ञ रेव्ह. जॉन विल्सन, रेव्ह. नारायण शेषाद्री, मराठी शब्दकोशकार जेम्स टी. मोल्सवर्थ आदी त्याकाळच्या नामांकित व्यक्तींचा समावेश होता.
 
या सामाजिक पुढाऱ्याचे वयाच्या 75 व्या वर्षी म्हणजे 29 ऑगस्ट 1906 रोजी मुंबईत निधन झाले. मुंबईतील शिवडी येथे त्यांचा पार्थिव देह पुरण्यात आला.
 
एखाद्या वाङ्मयप्रकारातील पहिली वहिली कृतीच मोठी प्रक्षोभक, वादग्रस्त आणि तत्कालीन समाजातील एखाद्या महत्त्वाच्या ज्वलंत प्रश्नाचा वेध घेणारी क्वचितच असते, ‘यमुनापर्यटन‘ ही पहिली वहिली कृती त्यादृष्टीने अपवादात्मकच म्हणाली लागेल, असे बाबा पदमनजींचे चरित्रकार डॉ. केशव सीताराम कऱ्हाडकर यांनी म्हटले आहे. 
 
एकोणिसाव्या शतकात विधवांची स्थिती आणि त्यांचा पुनर्विवाह हा अत्यंत ज्वलंत सामाजिक विषय होता. विधवांच्या प्रश्नावर लिहिलेल्या या कादंबरीस बाबांचे एक स्नेही आणि समाजसुधारक दादोबा पांडुरंग यांनी छापील 27 पानांची संस्कृतमध्ये प्रस्तावना लिहिली. या प्रस्तावनेचा 18 पानांचा मराठीतील सारांशही बाबांनी आपल्या या कादंबरीबरोबर प्रसिद्घ केला. 
 
विधवांच्या पुनर्विवाहाची गरज दादोबा पांडुरंगांनी आपल्या या प्रस्तावनेत मांडली. त्यामुळे ‘यमुनापर्यटन‘ या कादंबरीद्बारे समाजात विधवाविवाहाबाबत जागृती करण्याचा कादंबरीकाराचा हेतू होता हे स्पष्ट होते. बाबांनी आपल्या या कादंबरीचे उपशीर्षक ‘हिंदुस्थानातील विधवांच्या स्थितीचे निरूपण‘ असे ठेवले त्यावरूनही हेच स्पष्ट होते.
 
बाबा पदमनजींनी ‘शब्दरत्नावली‘ या नावाचा समानार्थी शब्दांचा कोश अथवा थिसॉरस 1860 साली प्रसिद्घ केला. मराठी भाषेतील हा पहिलाच समशब्दकोश. इंग्रजी भाषेतील ज्येष्ठ कोशकार पीटर मार्क रॉजेट थिसॉरस या प्रसिद्घ समानार्थी शब्दांच्या कोशाच्या धर्तीवर ‘शब्दरत्नावली‘ची निर्मिती करण्यात आली आहे. 
 
विशेष म्हणजे रॉजेट थिसॉरसची पहिली आवृत्ती 1852 साली प्रसिद्घ झाली. त्यानंतर केवळ आठ वर्षातच रेव्ह. पदमनजींनी आपला ‘शब्दरत्नावली‘ कोश प्रसिद्घ केला. 
 
मराठी भाषेतील आद्य कादंबरीकार बाबा पदमनजी मराठी भाषेतील एक प्रमुख कोशकर्ते म्हणूनही ओळखले जातात. संस्कृतमध्ये ‘निघंटु‘ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शब्दकोश या वाङ्मयप्रकाराचा मराठीत सर्वप्रथम पाया रेव्ह. विल्यम केरी या बॅप्टिस्ट मिशनरीने 1810 साली रचला. 
 
बाबा पदमनजी यांनी 1860 साली इंग्लीश आणि मराठी कोशाचा संक्षेप (A Comprehensive Dictionary-English and Marathi) या नावाचा त्यांचा पहिला शब्दकोश प्रसिद्घ केला. बावीस हजारांहून अधिक शब्द असलेल्या या कोशाची दुसरी आवृत्ती 1870 साली तर तिसरी आवृत्ती 1889 साली प्रसिद्घ झाली.
 
पुण्याच्या भवानी पेठेत बोहरा दफन भूमी जवळ त्यांच्या नावाने चौक आहे.
 
 
  ^^
 
 
( संदर्भ : ‘बाबा पदमनजी' : काल व कर्तृत्व’-डॉ. केशव सीताराम कऱ्हाडकर, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई 400 032 (1979).
 
^^^
( `ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' , लेखक कामिल (पारखे (वितरक सुगावा प्रकाशन, पुणे, दुसरी आवृत्ती २०१७) मधील एक प्रकरण ) 

Wednesday, April 27, 2022

आश्विनी डॅनियल लांडगे - पुणे महापालिकेच्या सभागृहातील एकमेव ख्रिस्ती नगरसेविका


 नुकतीच मुदत संपलेल्या पुणे महापालिकेच्या सदस्यांमध्ये एमआयएम या पक्षाचा एकमेव सदस्य होता. हैद्राबादच्या ओवैसी बंधूंच्या नेतृत्वाखालील एमआयएम हा पक्ष केवळ मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करतो असे समजले जाते. एमआयएमच्या तिकिटावर आश्विनी डॅनियल लांडगे निवडून आल्या होत्या मात्र त्या मावळत्या पुणे महापालिकेच्या सभागृहातील एकमेव ख्रिस्ती नगरसेविका होत्या.

ऑल इंडिया अंजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन किंवा एमआयएम च्या तिकिटावर आश्विनी लांडगे या ख्रिस्ती महिलेने पुणे महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत विजय मिळविला होता. येरवडा येथील सहा क्रमांकाच्या प्रभागातील खुल्या महिला गटातून लांडगे निवडून आल्या आहेत. एमआयएम हा पक्ष केवळ मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करतो असे समजले जाते. त्यामुळे या पक्षाचा एकमेव उमेदवार पुणे महापालिकेत निवडून येतो आणि ती व्यक्ती ख्रिस्ती आहे हे समजल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला.
एकूण १६२ सदस्यसंख्या असलेल्या पुणे महापालिकेत आश्विनी लांडगे यांच्यामुळे ख्रिस्ती समाजाला खूप वर्षाच्या कालावधीनंतर प्रतिनिधित्व लाभले आहे.
एमआयएम या पक्षाने पुणे महापालिकेस निवडणुकीच्या रिंगणात प्रथमतः २५ उमेदवारांना उतरवले होते. कोंढवासारख्या मुस्लिमबहुल प्रभागात काही जागांवर या पक्षाला विजय मिळेल असा अनेकांचा कयास होता. मात्र आश्विनी लांडगे वगळता या पक्षाच्या इतर उमेदवारांना यश मिळाले नाही.
लांडगे यांच्या प्रभाग क्रमांक सहामध्ये इतर तिन्ही विजयी उमेदवार शिवसेनेचे आहेत. येरवडा प्रभाग क्रमांक सहामध्ये मतदारांमध्ये दलित, मुस्लिम आणि ख्रिस्ती समाजाचे प्रमाण लक्षणीय आहे. लांडगे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी यशस्वीरीत्या सोशल इंजिनीयरिंग केल्यामुळे या तिन्ही समाजांव्यतिरिक्त इतरांचीही मते त्यांच्याकडे वळण्यात मदत झाली असे त्यांच्या यशावरून दिसते.
बत्तीस वर्षे वयाच्या आश्विनी लांडगे यांचे शिक्षण बारावीपर्यंत झालेले असून त्या मूळच्या सोलापूरच्या आहेत. त्यांचे पती डॅनियल लांडगे हे सामाजिक कार्यकर्ते असून गेले अनेक वर्षे गरीब लोकांना पुण्यातील विविध इस्पितळात मोफत वैद्यकीय सेवा मिळवून देण्यात, तसेच सरकारी कार्यालयातील कामे करण्यात ते मदत करतात. त्यांचे सामाजिक कार्य पाहून अनेक लोकांनी त्यांना राजकीय क्षेत्रात उतरण्याचा, महापालिकेची निवडणूक लढविण्याचा आग्रह केला होता.
मात्र त्यांनी आपल्या पत्नी आश्विनी याना महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे ठरविले. या निवडणुकीसाठी त्यांनी प्रस्थापित पक्षाकडे अल्पसंख्याक पक्षाची उमेदवारी मागितली होती. मात्र या पक्षाचे तिकीट न मिळाल्याने त्यांनी अल्पसंख्याक पक्षाची उमेदवारी मिळविली आणि आश्विनी यांचा विजयही झाला.
पुण्यात येरवडा आणि वाडगावशेरी येथे आणि नजीकच्या पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी आणि काळेवाडी येथे ख्रिस्ती मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे ख्रिस्ती समाजातर्फे अनेक पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांनी या दोन शहरात विविध प्रमुख राजकीय पक्षांतर्फे उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला होता.
अनुपमा डोंगरे-जोशी, सुनीता जॉन भोसले वगैरे इच्छुक उमेदवारांना काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळाले नाही. ख्रिस्ती समाजातील इतर इच्छुकांनी मग इतर पक्षांतर्फे किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. यामध्ये राष्ट्रवादीच्या ऐश्वर्या जाधव, बहुजन समाज पक्षाचे प्रकाश त्रिभुवन आणि अपक्ष उमेदवार प्रमोद पारधे, एलिझाबेथ संजय भालेराव-फर्नांडिस, विकास उमापती, येशूराज बेली यांचा समावेश होता. मात्र केवळ एमआयएमच्या लांडगे यांनाच यश मिळाले.
दोन दशकांपूर्वी पुण्यात येरवडा वॉर्डातून जॉन पॉल यांची पुणे महापालिकेवर निवड झाली होती. त्यानंतर ख्रिस्ती समाजाला महापालिकेत प्रतिनिधित्व मिळाले नव्हते. ख्रिस्ती समाजाची मते काही राजकीय पक्षांना नेहमीच मिळत असली तरी या समाजाच्या प्रतिनिधींना या पक्षांची उमेदवारी दिली जात नाही किंवा स्वीकृत सभासद म्हणून निवड केली जात नाही अशी अनेक ख्रिस्ती लोकांची तक्रार असते.
पुण्यात आणि पिंपरी चिंचवड शहरात २०१७ यावर्षी प्रथमच भारतीय जनता पक्षाची सत्ताधारी पक्ष म्हणून निवड झाली आहे. या पक्षाने काही मुस्लिम व्यक्तींनाही निवडणूक लढविण्यासाठी तिकीट दिले होते. मात्र भाजपतर्फे निवडणूक लढणारा एकही मुस्लिम उमेदवार यशस्वी झाला नाही.
भारतीय जनता पक्षातर्फे मात्र एकही ख्रिस्ती व्यक्तीस उमेदवारी दिली गेली नव्हती.
भारतीय जनता पक्ष या दोन्ही शहरात सत्तेवर आला असला तरी या सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये एकही अल्पसंख्य समाजातील म्हणजे मुस्लिम, ख्रिस्ती व शीख व्यक्ती नाही.
गेल्या काही दशकात पुणे महापालिकेत महापौर आणि इतर महत्वाच्या पदांवर तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस पक्षातर्फे मुस्लिम आणि शीख समाजाच्या स्थानिक नेतृत्वास संधी देण्यात आली होती.
खूप वर्षांपूर्वी म्हणजे १९६७ साली डॉ. लिऑन डिसोझा या ख्रिस्ती व्यक्तीला मुंबईचे महापौर होण्याचा मान काँग्रेस पक्षाने दिला होता. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळात आरोग्य राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
पुण्यात काँग्रेस पक्षाने अली सोमजी या मुस्लीम नेत्याला आणि आणि मोहनसिंग राजपाल या शीख नगरसेवकास महापौर बनवले होते तर शरद पवार यांनी मुस्लीम नेते आझमभाई पानसरे यांना पिंपरी चिंचवड शहरात महापौर होण्याची संधी दिली होती.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांतील महापालिकेत २०१७च्या निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाचा एकही मुस्लीम वा ख्रिस्ती धर्मिय नगरसेवक नाही. (देशात दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या भाजपची लोकसभेत अल्पसंख्य समाजातील प्रतिनिधींबाबत अशीच तऱ्हा आहे, )
महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यात तसेच मुंबईतील काही उपनगरात आणि अहमदनगर, औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्यात ख्रिस्ती लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र वसई वगळता महाराष्ट्रात राजकीय पदे मिळविणाऱ्या ख्रिस्ती व्यक्तीची संख्या अगदीच नगण्य आहे.
काही वर्षापर्यंत महाराष्ट्र विधानमंडळात म्हणजे विधानसभेत किंवा विधानपरिषदेत ख्रिस्ती समाजाचा एकतरी प्रतिनिधी हमखास असायचा. राज्याच्या मंत्रिमंडळातही एका ख्रिस्ती व्यक्तीचा समावेश केला जायचा. गेल्या वीस वर्षात हि परंपरा विविध कारणांनी खंडित झाली आहे.
अहमदनगर, श्रीरामपूर, औरंगाबाद तसेच संगमनेर शहरातसुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये प्रतिनिधित्व मिळविण्यात ख्रिस्ती नागरिकांना अपयश येते आहे. याबाबत समाजातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
-----
क्रुसाभोवतालचा मराठी समाज - लेखक कामिल पारखे (प्रकाशक चेतक बुक्स, २०२१ ) मधील एक प्रकरण
---

Thursday, October 28, 2021

 मराठी पत्रकारितेत मुसलमान

A celebration in Sakal Times

फार वर्षांपूर्वी हिंदी चित्रपटांत वेगवेगळया रसांसाठी अनेक छोटेमोठे नटनटया लागायाच्या, विनोदासाठी मेहमूद, लठ्ठ टुणटुण, सुंदर, मुक्री, वगैरे नट असायचे करुण रसासाठी रडणाऱ्या कामिनी कौशल सारख्या आयाबहिणी असायच्या, वीररसासाठी नायकाची यथेच्छा पिटाई करणारा आणि नंतर मार खाणारा खलनायकाचा नोकर शेट्टी असायचा, कॅबरे डान्स करणारी हेलेनसारखी गोवन किंवा ईस्ट इंडियन ख्रिश्चन असायची. केश्तो मुखर्जी, शरद तलवळकर,ललिता पवार, बिंदू, अरुणा इराणी, रणजित, डेव्हीड, के एन सिंग, ओम प्रकाश, सुजित, जॉनी वॉकर वगैरेसाठी खास ठरलेल्या भूमिका विविध चित्रपटांत असायच्या. सर्व धर्माच्या, प्रांतांच्या, संस्कृतींना या चित्रपटांत थोड्याबहुत प्रमाणात प्रतिनिधित्व मिळायचे. असा संच असला कि मगच चित्रपटाची भट्टी जमायची आणि प्रेक्षक व त्त्यांच्यासह निर्माते खूष व्हायचे.

मी गोव्यात 'नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकात बातमीदार म्हणून 1981ला रुजू झालो, मांडवीच्या काठावर पणजी मार्केटशेजारी एकमजली कौलारी गोमंतकीय शैलीच्या बाल्कनी असलेल्या आमच्या ऑफिसच्या इमारतीत नवप्रभा हे मराठी जुळे दैनिक होते. आमच्या इंग्रजी दैनिकाचे खास कल्चर होते आणि नवप्रभा मराठी दैनिकाची वेगळी संस्कृती होती.
इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्र दैनिकांची ही संस्कृती अखिल भारतीय पातळीवर समान स्वरुपाची होती, राष्ट्रीय पातळीवर इंग्रजी आणि व्हर्नांक्युलर किंवा प्रादेशिक असे हे विभाजन असायचे हे मी वृत्तपत्र कामगार चळवळीच्या निमित्ताने आणि माझ्या परदेश दौऱ्यांच्या निमित्ताने राष्ट्रीय पातळीवर पोहोचलो तेव्हा मला प्रकर्षाने जाणवले.
इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांतील दैनिकांतील आणि नियतकालिकांतील ही संस्कृती आणि विविध भूमिकांचा संच मला भारतीय किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतील विविध भुमिकांची आणि पात्रांची वेळोवेळी आठवण करुन द्यायचा.
उदाहरणार्थ, टाइम्स ऑफ इंडियाच्या (बेनेट कॉलेमान ) ग्रुपच्या मारिओ मिरांडाच्या व्यंगचित्रांत आणि हिंदी चित्रपटांत बॉसची पीए किंवा डिक्षेशन घेणारी टायपिस्ट नेहेमी फ्रॉकवाली गोवन तरुणी असायची, देशातल्या इंग्रजी दैनिकांत डिट्टो हिच स्थिती असायची. मराठी संपादकांच्या नशिबी हे नसायचे.
आमचे वृत्तपत्र गोव्यात असल्याने साहजिकच गोवन ख्रिस्ती आणि हिंदू कर्मचारी बहुसंख्येने होते. त्याशिवाय
इंग्रजी वृत्तपत्रांत त्याकाळात किमान एकदोन दाक्षिणात्य म्हणजे नायर, जोसेफ, मेनन, मॅत्थू या नावाचे संपादकीय आणि छपाई वगैरे विभागांत कर्मचारी असायचेच. मूळचा नागपूरचा असलेला प्रभाकर झाडये हा माझा सहकारी नेहेमी म्हणायचा... "कामिल, रिमेम्बर, नो इंग्लिश न्यूजपेपर कॅन बी कंप्लेंट अनलेस देर आर मेनन्स, नायर्स, रॉय ऑर जोसेफ्स....''
त्याच्या म्हणण्यात खूप तथ्य होते हे माझ्या लक्षात आले. नंतरच्या काळात इंग्रजी वृत्तपत्रसृष्टीत दाक्षिणात्य कर्मचाऱ्यांबरोबर बंगाली लोकांची हजेरी आवश्यक ठरली.
गोव्यात 1970 च्या दशकातील हे मी वर्णन करतो आहे. त्याकाळात गोमंतकात आजच्या इतका भायलोंचा म्हणजे बाहेरच्या लोकांचा भरणा झाला नव्हता, पर्यटक पाहुण्यांसारखे यायचे आणि तसेच लगेच परतायचे. स्थानिक लोक आपापसांत कोकणी, पोर्तुगीज, मराठी आणि इंग्रजी बोलायचे, बाहेरच्यांशी हिंदी आणि इंग्रजीचा वापर व्हायचा.
पणजीला 18th जून रोडवर पणजी चर्चच्या जवळ माझ्या एका शीख मित्राचे 'शेर-इ -पंजाब' हॉटेल होते आणि त्याच रस्त्यावर जुन्ता हाऊसशेजारी गुजरात हॉटेल होते ही दोन हॉटेल्स बाहेरच्यांच्या विशिष्ट चवीच्या जेवणाची काळजी घेत असत. आझाद मैदानापाशी 'कासा फर्नांडिस' या दुकानाशेजारी शानबाग हे पणजीतील तेव्हाचे एकमेव उडुपी हॉटेल होते.
आमचे नवहिंद टाइम्स हे गोवा मुक्तीनंतर सुरु झालेले आणि टिकलेले इंग्रजी दैनिक, गोमंतक हे असेच मराठी दैनिक. आमचे हे इंग्रजी दैनिक ख्रिस्ती आणि इंग्रजाळलेल्या वाचकांमध्ये लोकप्रिय आणि गोमंतक हे मराठी वाचणाऱ्या हिंदू वाचकांमध्ये लोकप्रिय.
आपापल्या वाचकांच्या कलानुसार आणि आवडीनुसार या मराठी आणि इंग्रजी दैनिकांच्या बातम्या आणि संपादकीय भूमिका असायचा. पोर्तुगीज भाधेतून प्रसिद्ध होणारे 'ओ हेराल्डो' या काळात इंग्रजीतून प्रसिद्ध होऊ लागले आणि आपल्या वाचकांना म्हणजे ख्रिश्चंनांना धार्जिन अशा बातम्या आणि धोरणे स्वीकारू लागले. उदाहरणार्थ, मराठी कोकणी वादात कोकणी भाषेला अनुकूल, तर गोमंतक दैनिक मराठीस अनुकूल अशी सरळसरळ विभागणी असायची.
अशीच गोष्ट फार पूर्वी म्हणजे गोवा महाराष्ट्रात विलीन करण्याच्या मुद्द्यावर गोव्यात i(भारतातले आतापर्यतचे एकमेव सार्वमत ) झालेल्या 1967 सालच्या सार्वमतात झाली होती. त्यावेळी गोयेंकरांनी गोवा महाराष्ट्रात विलीन करण्यास ठाम नकार दिला होता.
या दोन्ही इंग्रजी आणि मराठी दैनिकांमध्ये संस्कृतीचा एक समान धागा होता, तो म्हणजे या दोन्ही दैनिकांचे संपादक भायले म्हणजे बिगरगोमंतकीय असायचे. माधव गडकरी, नारायण आठवले हे गोमंतकचे नावाजलेले संपादक आणि त्र्यंबक पर्वते, मेनन, बिक्रम व्होरा, मुदालियार वगैरे 'नवहिंद टाइम्स'चे संपादक. तसेच राजन नारायण हे हेराल्डचे संपादक.
अगदी अलिकडे एकदोन महिन्यांपूर्वी गोमंतकीय पत्रकार राजू बी. नायक यांनी 'गोमंतक'चे संपादक म्हणून सूत्रे घेतली तेव्हा अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी ही जुनी अनिष्ट परंपरा खंडीत केल्याबद्दल त्यांचे
अभिनंदन
केले होते.
या मराठी वृत्तपत्रांत साहजिकच मराठी आणि कोकणी बोलणारे हिंदू पत्रकार आणि इतर कामगार असत आणि इंग्रजी वृत्तपत्रांत अर्थातच पोर्तुगिजचे जुजबी ज्ञान असलेले, कोकणी आणि इंग्रजी बोलणारे ख्रिश्चन असत. गोव्यात सरकारी पातळीवर मराठी आणि देवनागरी भाषा जाणणारे बातमीदार
केवळ हिंदू असायचे त्यामुळे आमच्या नवहिंद टाइम्समध्ये दोन्ही बातमीदार हिंदूच होते. (गोव्यात मराठी आणि कोकणी न समजता पत्रकारिता करणे अवघड आहे,)
गंमत म्हणजे इंग्रजी वृतपत्रे ख्रिस्ती वाचकांमध्ये वाचली जाणार आणि या ख्रिस्ती वाचकांच्या चालीरिती संस्कृतीचे चित्रण हिंदू बातमीदार किती प्रभावीपणे करणार? उदाहरणार्थ, ख्रिसमस, कार्निंव्हाल, लेंट म्हणजे उपवासकाळ, सान जाव फेस्त या पारंपरिक सणांची कॅथोलिक धर्मातील पार्श्वभूमी आणि महत्व आजही गोव्यात काम करणाऱ्या हिंदू बातमीदारांना माहित असेल असे मला वाटत नाही
मी नवहिंद टाइम्सला जॉईन झालो आणि पहिल्यांदा मी ही धार्मिक, सांस्कृतिक, प्रादेशिक आणि भाषिक कोंडी फोडली. मी मराठी भाषिक असलो तरी कॅथोलिक. मी मराठी, कोकणी आणि इंग्रजीत बोलायचो, हिंदुप्रमाणेच कोकणी देवनागरी लिपीत लिहायचो आणि वाचायचो आणि ख्रिस्ती लोकांप्रमाणे कोकणी रोमन लिपीत लिहायचो, वाचायचो.
या माझ्या बहुरंगी व्यक्तिमत्वाचा गोव्यात बातमीदार म्हणून दोन्हीं समाजांतील विषयांच्या बातम्या देण्यास मदत झाली. माझ्यासारखे असे बहुधार्मिक, बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक व्यक्तिमत्व गोव्यातील तेव्हाच्या पत्रकारांमध्ये फक्त जॉन आगियर यांचेच होते.
गोव्यातून औरंगाबादला लोकमत टाइम्सला जॉईन झालो तेव्हा तिथल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वातावरणाची नव्याने ओळख झाली. इथे हिंदु बहुसंख्य असले तरी आंबेडकरी जनतेचे महत्व आणि अस्तित्व सातत्याने जाणवायचे, तीच बाब मुसलमान समाजाची. आणि याचे प्रतिबिंब आमच्या पत्रकारितेत दिसायचे.
आमच्या 'लोकमत टाईम्स'मध्ये मुस्तफा आलम या माझ्या मित्रासह तीन मुसलमान बातमीदार होते, संपादकांचा पीए मुसलमान होता, मराठी दैनिकांत दलित, बहुसंख्य समाजाला प्रतिनिधित्व होते, त्याशिवाय उर्दू दैनिके अनेक होती, त्यातून अल्पसंख्य समाजाच्या बातम्या यायच्या, त्या समाजाची अनेक पोरं पत्रकारितेच्या व्यवसायात आलेली मी पाहिली. आज इंग्रजी पत्रकारितेत ही मंडळी मोठ्या हुद्यावर आहेत. औरंगाबादचे आताचे खासदार आणि पूर्वीचे आमदार इम्तियाज जलील हेसुद्धा काही वर्षांपूर्वी पुण्यात न्यूज चॅनलमध्ये पत्रकार होतेच. आमच्या इंग्रजी दैनिकात आधी म्हटल्याप्रमाणे दाक्षिणात्य आणि गोवन ख्रिश्चन अर्थातच होतेच.
एक वर्षातच औरंगाबाद सोडून पुण्याला इंडियन एक्स्प्रेसला जॉईन झालो. इथल्या इंग्रजी दैनिकांत म्हणजे पूना हेराल्ड (नंतरचे महाराष्ट्र हेराल्ड ) येथे 'अमर अकबर और अँथनी ' या नावाने ओळखले जाणारे व्ही. कृष्णमूर्ती, ताहेर शेख आणि हॅरी डेव्हीड हे स्थानिक पत्रकारितेतले अत्यंत प्रस्थापित त्रिकुट होते.
पुण्यातल्या इंग्रजी वृत्तपत्र सृष्टीत राष्ट्रीय पातळीप्रमाणेच सर्वसमावेशक धार्मिक, प्रादेशिक आणि सांस्कृतिक समतोल राखला जायचा. इथे नावावरून किंवा आडनावावरून जातीविषयक काहीही बोध होत नसायचा, त्यामुळे जात चोरण्याची कुणाला गरज भासत नसायची. मुस्लीम समाजातील लोक बातमीदारीत आणि न्यूज डेस्कवर लक्षणीय प्रमाणात असायची आणि आजही आहेत. त्
या सर्वसमावेशकतेंमुळे दिवाळी, दसरा, पवित्र रमजान महिना, नवरात्री उत्सव, ख्रिसमस, गुड फ्रायडे, पोंगल, बैशाखी, ओणम वगैरे सर्व सणांना बातम्यांत व्यवस्थित स्थान, प्रतिनिधित्व मिळायचे आणि या सणांबाबत कुठलाही सावळा गोंधळं नसायचा.
उदाहरणार्थ, गुड फ्रायडे ला वाचकांना इतर सणांसारख्या 'हॅपी गुड फ्रायडे' च्या शुभेच्छा द्यायच्या नसतात! मात्र हॅपी ईस्टर म्हणता येईल, हे तारतम्य इथे पाळले जायचे.
गोव्यात, औरंगाबादला आणि पुण्यात नवहिंद टाइम्स, लोकमत टाइम्स, इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया आणि अलिकडे सकाळ ग्रुपच्या 'महाराष्ट्र हेराल्ड - सकाळ टाइम्स' या सर्व इंग्रजी दैनिकांत कितीतरी मुस्लिम सहकाऱ्याबरोबर मी काम केले आहे, त्यापैकी काही बॉस तर इतर सहकारी वा ज्युनियर होते. त्याशिवाय दोन महिला बॉस पारशी होत्या.
या चार दशकांच्या कालावधीत मराठी पत्रकारितेत मुसलमान समाजातील तरुणांचे अस्तित्व मात्र मला फारसे जाणवले नाही हे आता प्रकर्षाने लक्षात येत आहे.
पुण्यातील इंग्रजी पत्रकारितेत स्थानिक म्हणजे मराठी मुस्लीम स दिसतात तसें मराठी वृत्तपत्र व्यवसायात मुस्लीम समाजातील पत्रकार दिसत नाहीत. मुंबईत वा राज्याच्या इतर शहरांत काय स्थिती आहे हे मला माहित नाही.
मुंबई आणि इतर शहरांत मराठी आणि इंग्रजी पत्रकारितेत इथल्या म्हणजे मराठीभाषक वसई. पुणे, मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद वगैरे ठिकाणच्या ख्रिस्ती समाजाचे प्रमाण लक्षणीय आहे हे मात्र मला माहित आहे.
तर मग अल्पसंख्यांकामध्ये सर्वाधिक संख्येने असलेल्या या मुस्लीम समाजाच्या प्रश्नांचे, भावनांचे आणि संस्कृतीचे प्रतिबिंब मराठी वृत्तपत्र सृष्टीत उमटत असते कि नाही? मागे एकदा कुठल्या तरी लेखात "मुस्लिम मनाचा कानोसा '' अशा पद्धतीच्या शिर्षकाच्या सदरांचा कुणीतरी खरपूस समाचार घेतलेला आठवतो.
कानोसा??
धार्मिक पातळीवर कुठल्याही उद्योगक्षेत्राकडे वा व्यवसायाकडे पाहिले जाऊ नये हे योग्यच आहे. मात्र अशी काही स्थिती असेल तर त्याची कारणेही शोधली गेली पाहिजेत.
वृत्तपत्रे समाजाचा आरसे असतात, त्यात सर्वच समाजघटकांचे प्रतिबिंब पडायला हवे.


Friday, June 11, 2021

पंडिता रमाबाई


ख्रिस्ती मिशनरींचे योगदान

 कामिल पारखे

 वितरक:  सुगावा प्रकाशन

          1881 मध्ये कलकत्ता शहरात एका वीस वर्षांच्या मराठी युवतीचे आगमन झाले आणि तिच्या विद्वत्तेच्या तेजाने, संस्कृतवरील प्रभुत्वाने तेथील सामाजिक पुढारी चकित झाले. कलकत्त्याच्या विद्वान मंडळींनी या युवतीचा सत्कार घडवून तिला सरस्वतीउपाधी बहाल केली. विशेष म्हणजे रमाबाई डोंगरेहे नाव धारण करणाऱ्या या युवतीचे नाव महाराष्ट्रात तोपर्यंत कुणीही ऐकले नव्हते. त्यानंतर प्रसिद्धीचे वलय होऊन रमाबाई महाराष्ट्रात आल्यानंतर पुणे व पुण्याजवळील केडगाव ही त्यांची उर्वरित आयुष्यातील कर्मभूमी बनली. कलकत्त्यात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती चिकटलेले प्रसिद्धीचे वलय त्यानंतर त्यांना संपूर्ण आयुष्यभर चिकटले.

          प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात वावरणाऱ्या व्यक्तींच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातील प्रत्येक घटना समाजासमोर येत असतात. या घटनांबद्दल त्या व्यक्तीला कधी हार तर कधी प्रहार स्वीकारण्याची मानसिक तयारी ठेवावी लागते. पंडिता रमाबाई तर चाकोरीबद्ध वाट सोडून स्वत:च्या नव्या वाटा निर्माण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या. ज्या काळात महिलांना स्वत:चे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व नसे त्या काळात कुटुंबातील वा नातलगांमधील कुणाही कर्त्या पुरुषाचा आधार नसताना या एकाकी महिलेने प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे धाडस दाखविले. त्यांच्या स्वत:च्या धर्मांतरामुळे, बालविधवांच्या पुनर्वसन कार्यामुळे आणि नंतर ख्रिस्ती मिशनरी या नात्याने समाजातील सर्व अनाथ आणि असाहाय्य घटकांचा सांभाळ करण्याच्या वृत्तीमुळे समाजात निर्माण झालेल्या अनेक वादळांना या विदूषीने खंबीरपणे तोंड दिले. पंडिता रमाबार्इंचे जीवन म्हणजे सतत संघर्षाशी झुंजणाऱ्या, प्रतिकूल परिस्थितीत लढून जीवनमूल्यांशी एकनिष्ठ राहणाऱ्या व्यक्तीची गाथाच आहे.

          पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म कर्नाटकात मेंगलोरजवळील गंगामूळ यागावी 23 एप्रिल 1858 रोजी झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री (अनंतपद्मनाभ) परमेश्‍वर डोंगरे हे संस्कृतपंडित होते. चित्पावन ब्राह्मण कुळातील अनंतशास्त्रींनी आपल्या पत्नीला, लक्ष्मीबाईला संस्कृत शिकविले. रमाबाई केवळ सहा महिन्यांच्या असताना अनंतशास्त्री आपल्या कुटुंबासह म्हणजे पत्नी, मुलगा आणि दोन मुलींसह तीर्थयात्रेसाठी घराबाहेर पडले. पंधरा वर्षे तीर्थार्टन केल्यानंतर हे कुटुंब मद्रास इलाख्यात पोहोचले. त्यावेळी तेथे भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळाने अनंतशास्त्रींचा आणि त्यांच्या पत्नीचा बळी घेतला. रमाबाई, त्यांचा थोरला भाऊ श्रीनिवास आणि थोरली बहीण कृष्णाबाई पोरके बनले. तेथूनच रमाबार्इंच्या संघर्षमय आयुष्याला सुरुवात झाली.

          आई-वडिलांच्या निधनानंतर या तरुण भावंडांनी आपली तीर्थयात्रा चालूच ठेवली. त्यानंतर काही महिन्यातच रमाबार्इंच्या थोरल्या बहिणीचे कृष्णाबाईचे निधन झाले. पित्याच्या मार्गदर्शनाखाली श्रीनिवासशास्त्री आणि रमाबार्इंनी संस्कृतचे आणि हिंदू धर्मशास्त्राचे गाढे ज्ञान संपादन केले होते. पुराण सांगत आणि संस्कृतमधून व्याख्याने देत हे बहीण-भाऊ पुढे फिरतच राहिले. त्यांना आसरा देणारे, मायेने त्यांची काळजी घेणारे या जगात आता कुणी उरले नव्हते. तीन-चार वर्षे हजारो मैलांचा पायी प्रवास करत श्रीनिवासशास्त्री आणि रमाबाई 1878 साली कलकत्त्यात पोहोचले. या शहरात मात्र या भाऊ-बहिणीच्या ज्ञानाची कदर करणारे लोक त्यांना भेटले. आधुनिक विचारसरणीच्या ब्राह्मो समाजाच्या आणि कलकत्त्यातील विद्यापीठाच्या पंडितांनी या तेजस्वी तरुणांना आदराची वागणूक दिली.

          श्रीनिवासशास्त्री आणि रमाबार्इंच्या संस्कृतवरील प्रभुत्वाने कलकत्त्यातील विद्वान मंडळी चकित झाली. ज्या काळात महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला जात होता त्या काळात या महिलेचे संस्कृतवरील प्रभुत्व ही निश्‍चितच कौतुकाची बाब होती. कलकत्ता विद्यापीठात झालेल्या विद्वानांच्या सभेत यावेळी रमाबार्इंना सरस्वतीउपाधी सन्मानाने देण्यात आली. तेव्हापासून रमाबाई डोंगरे ही युवती पंडिता रमाबाई सरस्वतीया नावाने संपूर्ण हिंदुस्थानभर ओळखली जाऊ लागली.

रमाबार्इंविषयी मुंबईच्या एका दैनिकात 1878 च्या जुलै महिन्यात पुढील बातमी प्रसिद्ध झाली:

          हल्ली कलकत्त्यास रमाबाई नावाची कोणी मराठी स्त्री आली आहे. तिने कलकत्त्यात काही दिवस मुक्काम करून तेथील विद्वान मंडळीस चकित करून सोडले आहे. बाई संस्कृत भाषा बोलते, जागच्या जागी संस्कृत काव्य करते. तिचे वय बावीस वर्षांचे असून ती अविवाहित आहे. महाराष्ट्रीयन असली तरी कर्नाटक प्रांतातून आली आहे.

          या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. स्त्री असूनही ही संस्कृत भाषा कशी शिकली, बावीस वर्षे ओलांडून अजून ती अविवाहित कशी, मराठी असूनही महाराष्ट्रात तिच्याविषयी कुणालाच काही कशी माहिती नाही, असे विविध प्रश्‍न रमाबार्इंविषयी मुंबई-पुण्यात विचारले जाऊ लागले.

          महाराष्ट्राला रमाबार्इंची ओळख झाली ती अशाप्रकारे. पंडिता रमाबार्इंच्या जीवनातील अनेक घटनांनी पुढील काळात महाराष्ट्रातील सामाजिक जीवन अनेकदा ढवळून टाकले. रमाबार्इंचा कलकत्त्यातील विद्वानांनी केलेला सत्कार आणि या महिलेविषयी महाराष्ट्रात झालेली त्यावेळची चर्चा रमाबार्इंच्या महाराष्ट्रातील पुढील जीवनाची एकप्रकारे नांदीच ठरली.

          त्यानंतर रमाबाई आणि त्यांचे बंधू आसामात सिल्हट येथे आणि बंगालमधील ढाका येथे गेले. ढाक्यात असताना श्रीनिवासशास्त्री आजारी पडले. तेथे त्यांचे 8 मे 1880 रोजी निधन झाले. आई-वडिलांच्या तसेच थोरल्या बहिणीच्या निधनानंतर रमाबार्इंना निदान आपल्या थोरल्या भावाचा तरी आधार होता. श्रीनिवासशास्त्रींच्या निधनानंतर तोही आधार संपला. कर्नाटक प्रांत सोडून आलेल्या या तरुण अविवाहित महिलेला आता कुणाचाही आधार नव्हता.

          श्रीनिवासशास्त्री हयात असताना त्यांची आणि रमाबार्इंची बिपीन बिहारीदास मेधावी या बंगाली व्यक्तीशी ओळख झाली. श्रीनिवासशास्त्रींच्या निधनानंतर बिपीन बिहारींनी रमाबाईंना लग्नाची मागणी घातली आणि 13 जून 1880 रोजी बांकीपूर शहरात रजिस्ट्रारसमोर नोंदणी पद्धतीने या दोघांचा विवाह झाला. त्याकाळात रमाबार्इंनी नोंदणी पद्धतीने विवाह केला या घटनेने पुन्हा एकदा समाजात खळबळ उडाली. लग्नानंतर सिल्हट येथे बिपीन बिहारीदास वकिली करत असत. 16 एप्रिल 1881 रोजी रमाबार्इंच्या मनोरमा या मुलीचा जन्म झाला.

          रमाबार्इंना वैवाहिक सुख फार काळ लाभले नाही. लग्नानंतर केवळ 19 महिन्यांनंतर बिपीन बिहारींचा 4 फेब्रुवारी 1882 रोजी अल्पशा आजारानंतर मृत्यू झाला. थोड्या काळाच्या अवधीत वडील, आई, थोरली बहीण आणि थोरला भाऊ यांच्या निधनाचं दु:ख सहन करणाऱ्या रमाबार्इंवर आता पतीच्या निधाची आपत्ती कोसळली. त्यानंतर आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पंडिता रमाबार्इंनी महाराष्ट्राची वाट धरली.

          रमाबाई महाराष्ट्रात पोहोचण्याआधीच या विदूषीची महाराष्ट्राला ओळख झाली होती. पुण्यात आल्यावर रमाबार्इंचे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्याशी घनिष्ट संबंध जुळले. रमाबार्इंच्या पुण्यातील वास्तव्यात त्यांच्याविरुद्ध समाजात प्रतिकूल वातावरण निर्माण झाल्यानंतरही रमाबाई रानड्यांनी पंडिता रमाबार्इंना भावनिक आधार दिला. पुण्यात पंडिता रमाबार्इंचे आगमन झाल्यानंतर या तेजस्विनीच्या सभा आयोजित करण्यात प्रसिद्ध मराठी कादंबरीकार हरी नारायण आपटे आणि रमाबाई रानड्यांनी पुढाकार घेतला. पुण्यातील आपल्या वास्तव्यात पंडिता रमाबार्इंनी लोकजागृतीचे विशेषतः महिलांच्या प्रबोधनाचे कार्य सुरू केले. त्यांच्या या कार्यास पुण्यातील समाजसुधारकांचा मोठा पाठिंबा लाभला. रमाबार्इंच्या पुढाकाराने पुण्यात, अहमदनगर, सोलापूर आणि मुंबई येथे आर्य महिला समाजाची स्थापना करण्यात आली.

          एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातसमाजजागृतीचे कार्य करणाऱ्या सामाजिक पुढाऱ्यांमध्ये पुरुषांचीच अधिक संख्या होती. ज्या थोड्याफार महिला या क्षेत्रात काम करत होत्या त्या सर्वांना त्यांच्या घरातील कर्त्या पुरुषांचे पूर्ण पाठबळ लाभले होते व त्यामुळे आपल्या कार्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकूल टीकेस त्या तोंड देऊ शकल्या. पंडिता रमाबाई मात्र परप्रांतातून एकट्या आल्या होत्या. एक छोटी मुलगी वगळता त्यांना कुटुंबातील कुणाही व्यक्तीचा वा नातलगाचा आधार नव्हता. त्याकाळात स्त्रियांच्या उन्नतीचे काम हाती घेणे किती कठीण होते हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना सहन कराव्या लागलेल्या टीकेमुळे आणि हालअपेष्टांमुळे सिद्ध झाले होते. स्वत:च्या वैयक्तिक जीवनातसुद्धा रमाबार्इंनी खूप दु:ख सोसले. तरीसुद्धा सामाजिक प्रबोधनाचा काटेरी मार्ग त्यांनी निवडला हे विशेष.

          याच काळात ब्रिटिश सरकारने सर डब्ल्यू. हंटर या शिक्षणतज्ज्ञाच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोगाची नेमणूक केली. या हंटर कमिशनसमोर दिलेली पंडिता रमाबार्इंची हिंदुस्थानातील महिलांच्या शिक्षणाबद्दलची साक्ष त्यावेळी खूप गाजली. हिंदुस्थानातील प्रचलीत सामाजिक व्यवस्थेमुळे या देशात महिला डॉक्टरांची खूप गरज आहे. त्यामुळे स्त्रियांसाठी वैद्यकीय शिक्षण व्यवस्था करावी असे त्यांनी या साक्षीत सुचविले. हंटर कमिशनच्या सदस्यांनी यावेळी रमाबार्इंची उलटतपासणीही घेतली. रमाबार्इंना त्यावेळी इंग्रजीचे फारसे ज्ञान नव्हते, त्यामुळे त्यांनी मराठीतून साक्ष दिली. रमाबार्इंच्या साक्षीने खुद्द सर हंटर फारच प्रभावित झाले. त्यांनी रमाबार्इंच्या साक्षीचे इंग्रजी रूपांतर करून छापून घेतले, इतकेच नव्हे तर इंग्लंडला परतल्यानंतर तेथे रमाबार्इंच्या कार्यासंबंधी व्याख्यानही दिले. अशाप्रकारे रमाबार्इंनी परदेशगमन करण्यापूर्वीच त्यांची कीर्ती इंग्लंडमध्ये पोहोचली.

          त्यानंतर थोड्याच काळात पंडिता रमाबार्इंनी शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला प्रस्थान केले. त्यांची मुलगी मनोरमासुद्धा त्यांच्याबरोबर होती. इंग्लंडमध्ये असतानाच वॉण्टेज शहरात त्यांनी आपल्या मुलीसह 29 सप्टेंबर 1883 रोजी बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. या घटनेपासून या विदूषीच्या आयुष्याचे नवे पर्व सुरू झाले. रमाबाई इंग्लंडला गेल्या तर तेथे त्या ख्रिस्ती होतील ही महाराष्ट्रातील काही पुढाऱ्यांची भीती खरी ठरली. अपेक्षेप्रमाणे या घटनेने त्याकाळात महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली.

          इंग्लंडमध्ये 1886 पर्यंत म्हणजे तीन वर्षे राहून रमाबार्इंनी आपला अभ्यासक्रम पूर्ण केला. याच दरम्यान महाराष्ट्रातून आनंदीबाई गोपाळराव जोशी अमेरिकेत वैद्यकीय शिक्षणासाठी गेल्या होत्या. वैद्यकीय शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या आनंदीबाई पहिल्या भारतीय महिला, तर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाणाऱ्या पंडिता रमाबाई या दुसऱ्या महाराष्ट्रीयन महिला. महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रार्थना समाजाचे नेते डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांच्या कन्या अन्नपूर्णा किंवा ॲना तर्खडकर इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला. आनंदीबाई जोशी आणि पंडिता रमाबाई सरस्वती यांची पूर्वी कधीही गाठभेट झाली नव्हती. मात्र आनंदीबार्इंच्या वैद्यकीय पदवीदान समारंभास उपस्थित राहण्यासाठी पंडिता रमाबाई कन्येसह इंग्लंडहून अमेरिकेत गेल्या.

          आनंदीबार्इंच्या पदवीदान समारंभानंतर रमाबार्इंचे अमेरिकेत अडीच वर्षे वास्तव्य होते. या काळात त्यांनी अमेरिकेच्या विविध भागांत व्याख्याने दिली. अमेरिकेतील महिलांच्या संस्था, तेथील शिक्षणपद्धतीचा त्यांनी अभ्यास केला. आपल्या व्याख्यानातून त्यांनी अमेरिकन जनतेत भारतातील महिलांच्या, विशेषत: बालविधवांच्या परिस्थितीबाबत जागृती निर्माण केली. या जागृतीमुळे हिंदुस्थानात पंडिता रमाबार्इंच्या महिलांविषयक कार्यास मदत करणाऱ्या रमाबाई असोसिएशनया संस्थेचा जन्म झाला. हिंदुस्थानात हे कार्य करण्यासाठी आर्थिक मदत करण्याची हमी या संस्थेने स्वीकारली.

          हिंदुस्थानात उच्चवर्णीय बालविधवांसाठी शाळा चालविणे हे रमाबाई असोसिएशनचे प्रमुख उद्दिष्ट होते. या शाळेची शैक्षणिक पद्धती पूर्णत: पंथरहित असावी, असा या संस्थेच्या घटनेत महत्त्वाचा नियम होता. रमाबाई असोसिएशनच्या सल्लागार मंडळात रावबहादूर रामकृष्ण गोपाळ भांडारकर, रावबहादूर महादेव गोविंद रानडे यांचा समावेश होता.

          भारतात परतल्यानंतर पंडिता रमाबार्इंनी रमाबाई असोसिएशनच्या वतीने मुंबईत चौपाटीजवळ 11 मार्च 1889 रोजी शारदा सदनया संस्थेची स्थापना केली. या सदनाच्या पहिल्या बालविधवा विद्यार्थिनी गोदूबाई. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याशी त्यांचा पुनर्विवाह होऊन पुढे त्या आनंदीबाई वा बाया कर्वे या नावाने सुपरिचित झाल्या. बाया कर्वे यांनी माझे पुराणया आपल्या आत्मचरित्रात शारदा सदनातील दिवसांचे वर्णन केले आहे. गोदूबार्इंप्रमाणेच अनेक बालविधवांना शारदा सदनात शिक्षण आणि निवारा मिळाला.

          दीड वर्षानंतर म्हणजे 1880 च्या नोव्हेंबरात रमाबार्इंनी शारदा सदनचे मुंबईतून पुण्यातील कॅम्पात स्थलांतर केले. शारदा सदन ज्या संस्थेतर्फे चालविले जात होते ती रमाबाई असोसिएशन ही मिशनरी संस्था नसल्याने शारदा सदनचे काम सेक्युलर पद्धतीने चालवावे असा स्पष्ट नियम होता. रमाबाई स्वत: ख्रिस्ती असल्या तरी सदनातील बालविधवांच्या धार्मिक बाबतीत त्यांनी ढवळाढवळ करू नये असा असोसिएशनच्या सल्लागार मंडळींचा आग्रह होता. मात्र शारदा सदनच्या चालिका स्वत: हे कार्य येशू ख्रिस्ताच्या सेवेसाठी चालवित असल्याने त्यांच्या जीवनपद्धतीचा, विचारसरणीचा प्रभाव सदनातील कोवळ्या वयाच्या मुलींवर पडणे साहजिकच होते. यातूनच रमाबाई शारदा सदनातील असाहाय्य मुलींवर धर्मांतराची सक्ती करतात, रमाबाई छुप्या पद्धतीने ख्रिस्ती धर्माचा प्रचार करत आहेत, असे आरोप त्यांच्यावर केले जाऊ लागले.

          शारदा सदनच्या पहिल्या विद्यार्थिनी गोदूबार्इंचा धोंडो केशव कर्वे यांच्याशी विवाह झाला तेव्हा पंडिता रमाबार्इंनी शारदा सदनात मोठी जेवणावळ घातली. या समारंभाबद्दल महर्षी कर्व्यांनी आपल्या आत्मवृत्तया आत्मचरित्रात लिहिले आहे, “आपल्या पहिल्याविद्यार्थिनीची योग्य व्यवस्था लागत आहे हे पाहून त्यांना (रमाबार्इंना) अतिशय आनंद झाला होता. सदनातील विद्यार्थिनींनाही आपल्या एका मैत्रिणीला संसारसुखाचा अनुभव घेण्याची संधी मिळाल्यामुळे आणि विधवांच्या भावी सुस्थितीचे द्वार मोकळे होत चालल्यामुळे अत्यंत हर्ष झाला होता.बाया कर्वे यांनी आपल्या माझे पुराणआत्मचरित्रात म्हटले आहे, ‘बार्इंनी मला दागिने व कपडे दिले. त्यांच्या जावयालाकर्व्यांना कपडे दिले.पंडिता रमाबार्इंच्या या जावयाने पुढे शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे योगदान केले आणि वयाची शंभरी गाठल्यानंतर त्यांचा पंडित नेहरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तेव्हा त्यांनी आपल्या भाषणात पंडिता रमाबाई, डॉ. भांडारकर आणि गोपाळ कृष्ण गोखले आदी मोजक्या व्यक्तींच्या ऋणांचा आदरपूर्वक उल्लेख केला.

          शारदा सदनचे काम चालू असतानाच पंडिता रमाबाई हिंदुस्थानच्या राष्ट्रीय चळवळीतही सक्रियपणे भाग घेत. रमाबार्इंच्या प्रयत्नांमुळे काँग्रेस संघटनेत स्त्री प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला. मुंबईत भरलेल्या 1889 च्या काँग्रेस अधिवेशनात रमाबाई स्त्री-प्रतिनिधी म्हणून उपस्थित होत्या. काँग्रेस अधिवेशनानंतर पार पडलेल्या सामाजिक परिषदेच्या अधिवेशनाला उपस्थित असलेल्या केवळ दोन महिलांमध्ये रमाबार्इंचा समावेश होता. या परिषदेतील रमाबाईंच्या भाषणाचे विस्तृत वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने 30 डिसेंबर 1889 च्या अंकात दिले.

          1897 मध्ये महाराष्ट्रात प्लेगच्या साथीने थैमान घातले. यावेळी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी चालविलेल्या कडक तपासणीमुळे सामान्य लोकांच्या झालेल्या हालाविरुद्ध पंडिता रमाबार्इंनी आवाज उठविला. गार्डीयनया इंग्रजी साप्ताहिकात रमाबार्इंनी या संदर्भात एक पत्र लिहिले. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये उपस्थित झालेल्या या विषयाच्या संदर्भात उत्तर देताना लॉर्ड जॉर्ज हॅमिल्टन यांनी रमाबार्इंचे हे पत्रच वाचून दाखविले.

          1895 साली पुण्यात काँग्रेसचे प्रथम अधिवेशन भरले तेव्हा संपूर्ण हिंदुस्थानातून या शहरात जमलेल्या काही पुढाऱ्यांनी शारदा सदनला भेट दिली. तोपर्यंत या सदनातील बारा मुली रमाबार्इंच्या कार्याने प्रभावित होऊन ख्रिस्ती झाल्या. या घटनेमुळे महाराष्ट्रात मोठे वादळ निर्माण झाले. काँग्रेस अधिवेशनानंतर पार पडलेल्या सामाजिक परिषदेत विधवाविपनाचा निषेध करणारा व विधवांना स्वावलंबी करण्याबाबतचा ठराव इंडियन सोशल रिफॉर्मचे संपादक के. नटराजन यांनी मांडला. त्यावेळच्या भाषणात नटराजन म्हणाले, “विधवांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करण्याचा जो पायंडा पंडिता रमाबार्इंनी घालून दिला आहे व या शहरात त्यांचे कार्य इतक्या यशस्वीपणे चालू आहे त्याची प्रशंसा केल्याखेरीज माझ्याने राहवत नाही. काही धर्मांतरे झाली त्यांच्याबद्दल रमाबार्इंवर जे टीका करत आहेत त्यांच्याबद्दल मला सहानुभूती वाटत नाही. ठोकळेबाज धर्ममतांवर माझा विश्‍वास नाही. आपल्या बंधूंचे भले करणे हा मी सर्वोच्च धर्म समजतो. भुकेल्याला अन्न देणे हे अत्यंत उच्च दजाचे धार्मिक कृत्य व श्रेष्ठ प्रतीचे दान आहे. पंडिताबाई व तिचे अमेरिकेतील मित्र व सहायक यांचे आपल्यावर इतके ऋण आहेत की आपण ते कधीही फेडू शकणार नाही; मग धर्ममतांबद्दल कितीही मतभेद असो.

          रमाबार्इंना जातीपातीचे भेदभाव मान्य नव्हते. रमाबाई असोसिएशनच्या नियमानुसार शारदा सदनात उच्चवर्णीय मुलींसाठी सोवळ्याओवळ्याचे कडकडीत नियम पाळावे लागत असत. असे सोवळ्याओवळ्याचे नियम तेथे पाळले नसते तर अनेक उच्चवर्णीय लोकांनी आपल्या बालविधवा मुलींना वा बहिणींना शिक्षणासाठी येथे पाठविलेच नसते. या संदर्भात शारदा सदनातील आपल्या सुरुवातीच्या दिवसांचे बाया कर्व्यांनी पुढील शब्दात वर्णन केले आहे. सहा महिने ब्राह्मणाची बाई मिळाली नाही म्हणून माझे जेवणही मलाच करावे लागे. गोविंदराव व काशीबाई कानिटकर, हरी नारायण आपटे आदी मंडळी केव्हा तरी सदनात आली म्हणजे एखाद्या वेळी त्यांच्यासाठी स्वयंपाकसुद्धा करावा लागे.

          आपल्या मुली बालविधवा असल्या, समाजात त्या कितीही उपेक्षित असल्या तरी शारदा सदनात त्यांनी सुखात राहावे, असे रमाबार्इंना वाटे. शारदा सदनातील घटनांकडे लक्ष असणारे लोक रमाबाई आपल्या मुलींना दुधातुपात नुसते लोळवितेअसे म्हणत. शारदा सदनातील बालविधवांच्या या खाण्यापिण्यावरून एकदा केसरी आणि सुधारक या वृत्तपत्रांत वादही झाला होता. बाया कर्व्यांनी या संदर्भात लिहिले आहे, रमाबाई असोसिएशनची सल्लागार मंडळी म्हणे आपल्या जातीतील विधवांनी चैनीने राहणे बरे नव्हे’, पण रमाबार्इंना ते आवडत नसे. पूर्वीचे दिवस त्यांच्या मनात येत. त्या म्हणत, ‘मी विद्यार्थिनींना हालातून वर काढण्यासाठी त्यांचे हाल कमी करण्यासाठी शाळा घातली. मी त्यांना सुखात ठेवायचे ठरविले, ते कमी होणे शक्य नाही.

          शारदा सदनातील दिवसांबद्दल कृष्णाबाई गद्रे यांनी लिहिले आहे, ‘काय त्या बंगल्याची शोभा व काय तो सुंदर फुलांनी शृंगारलेला बगीचा, जिकडे पाहिजे तिकडे मोकाट फिरण्याची आम्हाला मुभा, दिवाणखाना देखील आमची बैठकीची जागा. सुंदर कोचाखुर्च्यांवर बसून गप्पा माराव्यात, बागेत जाऊन जाई, जुई, मोगरा, चमेली, बकुळी व मधुमालतीच्या वेण्या गुंफून केसावर लावाव्यात. रमाबार्इंनी आम्हाला फुलांची, पक्ष्यांची व झाडांची माहिती देऊन दुर्बिणीतून (सूक्ष्मदर्शक यंत्रांतून) त्यांचे निरीक्षण करण्यास शिकवले. काय ते लाड? अशा सुंदर वातावरणात आपले दिवस घालवायला कोण बालविधवा येणार नाही? कधी कधी रमाबाई स्वत: पहाटेस उठून आम्हाला आगाशीवर नेऊन नक्षत्रे वगैरे मोठ्या आवडीने शिकवीत.

          रमाबाई या शारदा सदनातील मुलींवर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची बळजबरी करतात, हा त्यांच्यावर नेहमी केला जाणारा आरोप. या आरोपामुळे घाबरून काही पालकांनी आपल्या मुली सदनातून काढून घेतल्या. मात्र त्यामुळे या सदनात आश्रयासाठी येणाऱ्या अनाथ, समाजाने टाकून दिलेल्या बालविधवांची संख्या रोडावली नाही. समाजात त्यांच्याविरुद्ध निर्माण झालेल्या वादळास खंबीरपणे तोंड देऊन पंडिता रमाबार्इंनी विधवांच्या पुनर्वसनाचे आपले कार्य चालूच ठेवले.

          त्या काळात मुली पाच-सहा वर्षांच्या झाल्या की त्यांची लग्ने उरकून टाकली जात असत. अनेकदा या कोवळ्या मुलींची प्रौढ पुरुषांशी लग्ने लावली जात असत. यामुळे अनेक मुलींवर वैवाहिक सुख भोगण्याआधीच बालविधवा होण्याची आपत्ती कोसळे. या बालविधवांना त्यानंतर अत्यंत उपेक्षित जीवन जगावे लागे. त्यांच्या स्वत:च्या कुटुंबातील व्यक्तींकडून आणि समाजाकडून त्यांची उपेक्षा होत असे. बैरामजी मलबारी या पारशी समाजसुधारकाने बालविवाह प्रथेविरुद्ध आवाज उठविला. या चळवळीचा परिणाम होऊन ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानात संमतीवयाचे विधेयक आणले. या विधेयकानुसार बारा वर्षांपेक्षा लहान असलेल्या स्त्रीशी तिच्या नवऱ्याने शरीरसंबंध ठेवल्यास तो गुन्हा ठरणार होता. या विधेयकामुळे स्त्रियांच्या हालअपेष्टा कमी होणार असल्याने या विधेयकास स्त्रियांच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी पंडिता रमाबार्इंनी पुढाकार घेतला.

          संमतीवयाच्या विधेयकामुळे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्रात. विशेषत: पुण्यात मोठा वाद निर्माण झाला. ब्रिटिश सरकारतर्फे सामाजिक सुधारणा लागू करण्यास लोकमान्य टिळकांचा प्रथमपासून विरोध होता. त्यातच समाजातील सनातनी मंडळींचाही या विधेयकास विरोध अपेक्षितच होता. या विधेयकामुळे पुण्यात गोपाळ गणेश आगरकर, डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे समाजसुधारक आणि या विधेयकास विरोध करणारी सनातनी मंडळी यांच्यामध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला. महिलांच्या विकासासाठी धडपडणाऱ्या पंडिता रमाबाई या विधेयकास पाठिंबा देण्यासाठी महिलांना संघटित करू लागल्या. संमतीवयाच्या विधेयकाच्या निमित्ताने पुण्यातील दोन गटांनी एकमेकांविरुद्ध मोठ्या प्रमाणात चिखलफेक केली. या संघर्षात अल्पसंख्य असणाऱ्या आगरकर, पंडिता रमाबाई, डॉ. भांडारकर या समाजसुधारकांना अर्थातच मोठी किंमत चुकवावी लागली.

          संमतीवयाच्या विधेयकास पाठिंबा मिळविण्यासाठी मुंबईत झालेल्या एका सभेचे चालकत्व पंडिता रमाबार्इंकडे होते, तर अध्यक्षस्थानी कॉर्नेलिया सोराबजी या सामाजिक कार्यकर्त्यां होत्या. त्यानंतर पुण्यात आर्य महिला समाजाच्या वतीने पंडिता रमाबाई आणि काशीबाई कानिटकरांनी सभा आयोजित केली. या सभेत पाच-सहा महिलांचा अपवाद वगळता इतर महिलांनी या विधेयकास पाठिंबा व्यक्त करणाऱ्या ठरावावर सह्या केल्या, असे त्यावेळी आगरकरांच्या सुधारकपत्रात छापून आले.

          न. चिं. केळकरांनी लोकमान्य टिळकांच्या चरित्रात या सभेबद्दल खालील माहिती दिली आहे. या लिखाणावरून पंडिता रमाबार्इंच्या स्वभाववैशिष्ट्यांवरही प्रकाश पडतो. केळकरांनी लिहिले आहे.

          सौ. काशीबाई कानिटकर यांनी बिलाचे समर्थन केले, पण दुसरी एक बाई उठून म्हणाली, या बिलान्वये तुमच्या जावयावर उद्या खटला झाला तर तो तुम्हांस आवडेल काय? काशीबाई पडल्या हाडाच्या हिंदू. त्यांच्याने उत्तर देववेना. रामाबाईही हाडाच्या हिंदूच, पण धर्मांतराने त्यांचे सर्वच विचार बदललेले होते. काशीबाई निरुत्तर झाल्यावर रमाबाई म्हणाल्या, ‘बेहेत्तर आहे. मुलीपेक्षा जावई अधिक नाही.हे उत्तर पंडिता रमाबाईंच्या सडेतोड स्वभावास धरूनच होते. हा स्वभाव धर्मांतराने नव्याने बनलेला नव्हता.

          संमतीवयाच्या विधेयकाविरुद्ध कितीही गदारोळ उठला तरी अखेरीस हे विधेयक मंजूर होऊन तसा कायदा अस्तित्वात आला. आज विशीच्या आत मुलींची सहसा लग्ने होत नाहीत. शंभर वर्षांपूवी मात्र बारा वर्षांखालील मुलींच्या विवाहास विरोध करण्यासाठी रमाबार्इंना चळवळ करावी लागली आणि प्रतिकूल टीकेस तोंडही द्यावे लागले.

          मध्य भारतात 1897 साली भीषण दुष्काळ पडला तेव्हा भुकेने हाडाचे सापळे झालेल्या शेकडो मुलींना पंडिता रमाबार्इंनी आश्रय दिला. या मुलींच्या मदतीला रमाबाई धावून गेल्या नसत्या तर या मुलींना मृत्यूलाच सामोरे जावे लागले असते.

          रमाबाईंच्या भारतातील महिलांच्या कार्यासाठी अमेरिकेतील रमाबाई असोसिएशनने दहा वर्षे आर्थिक पाठबळ देण्याचे कबूल केले होते. 1898 मध्ये ही मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा रमाबाई अमेरिकेत गेल्या व ही संस्था विसर्जित करण्यात आली. यानंतर नव्याने स्थापन झालेल्या अमेरिकन रमाबाई असोसिएशनया संस्थेच्या मदतीने रमाबार्इंनी पुण्याजवळील केडगाव येथे मुक्ती सदनचे काम सुरू केले. त्यानंतर रमाबार्इंनी आपल्या आयुष्याचा उर्वरित काळ केडगाव येथेच घालविला.

          केडगाववात पंडिता रमाबार्इंनी समाजाच्या विविध उपेक्षित घटकांसाठी वेगवेगळी सदने काढली. एखाद्या स्त्रीचे पाऊल वाकडे पडले वा त्यांच्यावर एखाद्या अनुचित घटनेची आपत्ती कोसळली की त्या स्त्रियांच्या कुटुंबाला आणि संपूर्ण समाजाला ती स्त्री नकोशी होई, अशा समाजबहिष्कृत स्त्रियांसाठी पंडिता रमाबाईंनी कृपासदनउघडले. या परित्यक्ता स्त्रियांचे त्यांनी पुनर्वसन केले. वृद्ध, अपंग आणि परावलंबी स्त्रियांसाठी रमाबार्इंनी प्रीती सदनसुरू केले.

          भारतातील पहिली अंधशाळा उघडण्याचे श्रेय रमाबार्इंच्या कन्या मनोरमाबाई यांना दिले जाते. अंधत्वामुळे परावलंबी बनलेल्या मुलींना आणि महिलांना केडगावातील बर्तमय सदनातआश्रय देऊन रमाबार्इंनी त्यांचे पुनर्वसन केले. येशू ख्रिस्ताने बर्तमय नावाच्या अंधाला दृष्टी दिली असे बायबलमध्ये सांगितले आहे. बर्तमय सदनातील अंध महिलांना ब्रेलने एकप्रकारे दृष्टीच दिली. बर्तमय सदनात या अंधांना स्वेटर विणण्याची, वेताच्या खुर्च्या बनविण्याची, टोपल्या तयार करण्याची कला शिकविली जाई. त्यामुळे या अंध महिला आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकल्या.

          केडगावात स्थायिक झाल्यानंतर लवकरच म्हणजे 1905 साली पंडिता रमाबार्इंनी संपूर्ण बायबलचे मराठी भाषांतर करण्याचे कार्य हाती घेतले. आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत त्यांचे हे कार्य चालू राहिले. संपूर्ण बायबलच्या भाषांतरास त्यांना अठरा वर्षे लागली. बायबलचा जुना करार हिब्रू भाषेत तर नवा करार ग्रीक भाषेत आहे. संपूर्णबायबलच्या इंग्रजी भाषांतराच्या अनेक आवृत्त्या रमाबाईंच्या काळातसुद्धा उपलब्ध होत्या. तरीसुद्धा मूळ हिब्रू आणि ग्रीक भाषांतून बायबलचे मराठीत भाषांतर करण्याचे या विदूषीने ठरविले आणि त्यासाठी या दोन्ही भाषांचा त्यांनी अभ्यास केला.

          कर्नाटकात जन्मलेल्या रमा डोंगरेला कानडी भाषा येत होती, वडिलांमुळे तिने संस्कृतवर प्रावीण्य मिळविले आणि रमा पुढे पंडिता रमाबाई सरस्वतीबनली. महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी मराठीवरही प्रभुत्व मिळविले. इंग्रजी शिकून पुढे त्या इंग्लंड आणि अमेरिकेतही व्याख्याने देत फिरल्या. चाळिशी उलटल्यानंतर त्या आता बायबलच्या भाषांतरासाठी हिब्रू आणि ग्रीक भाषेचा अभ्यास करू लागल्या. मुक्ती सदनातील दीड-दोन हजार अनाथ मुली आणि महिलांची जबाबदारी असताना पंडिता रमाबाई आपल्या विविध कार्याचा व्याप सांभाळत असत हे विशेष.

          बायबलच्या मूळ भाषेतून म्हणजे हिब्रू आणि ग्रीक मधून या धर्मग्रंथाचे भाषांतर करणाऱ्या पंडिता रमाबाई सरस्वती या जगातील एकमेव महिला. पंडिता रमाबार्इंच्या कन्या मनोरमाबार्इंचे वयाच्या चाळिसाव्या वर्षी निधन झाले. आपल्या लाडक्या मुलीच्या मृत्यूचा आघात रमाबार्इंनी खंबीरपणे सोसला आणि बायबलच्या भाषांतराचे काम चालूच ठेवले. बायबलचे भाषांतर हे त्यांच्या अखेरच्या जीवनातील मिशन बनले होते. भाषांतर पूर्ण होण्याआधी आपला मृत्यू होऊ नये अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. रमाबार्इंचे बायबलचे भाषांतर त्यांच्या स्वत:च्या केडगावातील छापखान्यातच छापले जात होते. 4 एप्रिल 1922 रोजी पंडिता रमाबार्इंनी भाषांतराचे शेवटचे प्रूफ वाचून हातावेगळे केले आणि छपाईसाठी छापखान्यात पाठविले. त्यानंतर त्याच रात्री या महान समाजसेविकेने या जगाचा निरोप घेतला.

संदर्भ

1. ‘महाराष्ट्राची तेजस्विनी पंडिता रमाबाई’- लेखक आणि प्रकाशक - देवदत्त नारायण टिळक, शांतिसदन, आग्रा रोड, नाशिक (1960).

2. ‘वधस्तंभाचे सेवक’ - लेखक-थिओडोर विल्यम्स - मराठी अनुवाद - डी. वाय. गायकवाड, प्रकाशक - औटरिच प्रकाशन, इंडियन इव्हँजेलिकल मिशन, 7 लँगफोर्ड रोड, बंगलोर 560025 (1991).

3. ‘भारत आणि ख्रिस्त’ - लेखक-फादर हान्स स्टाफनर (येशूसंघ) मराठी अनुवाद - डॉ. वा. पु. गिडे, प्रकाशक - मार्ग प्रकाशक, स्टीफन्स निवास, 2008, संत विन्सेंट मार्ग, पुणे 411001 (1988).

4. ‘ख्रिस्ती मराठी वाङ्मय (फादर स्टीफन्स ते इ.स. 1960 अखेर)’-लेखक -डॉ. गंगाधर नारायण मोरजे, प्रकाशक - डॉ. पी. एस. जेकब, प्राचार्य, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर आणि डॉ. मॅथ्यू लेदर्ले (येशूसंघ), स्नेहसदन, 250 शनिवार पेठ, पुणे 411030, (वितरक - अ.ज.प्रभू, विदर्भ मराठवाडा बुक कंपनी, 1334शुक्रवार पेठ, पुणे 411 002 (1984).